मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं होतं का?? प्रेमवेड्या तरुणाचे थेट उद्धव ठाकरेंना पत्र

0
294
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका प्रेमवेड्या तरुणाने पत्र पाठवून आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री साहेब, आपण शेतकरी असून आपली शेतजमीन कमी असल्याने आपले प्रेम नाकारले गेले आहे असे सांगत मुख्यमंत्री साहेब, आपण कधी कोणावर प्रेम केलं आहे का असा सवाल या तरुणाने उद्धव ठाकरेंना केला आहे. या पत्रात या प्रेमवेड्या तरुणाने स्वत:चे नाव मात्र लिहिले नाही.

या पत्रात तरुण म्हणतो, साहेब लिहिताना खूप दुःख होत आहे. साहेब तुमचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होत का हो? आयुष्यात कधी तरी केलं असेल उत्तर द्या. प्रेम हे धन-दौलतीचे मोहताज असते का हो? मी पण कोणावर तरी प्रेम केलं होतं पण शेत जमीन कमी असल्याने प्रेमाला विरोध असं असतं का हो? असा सवाल युवकानं पत्रातून केलाय.

मी ऐकलं होतं हिर रांजा, लैला-मजनू, शिरी फरहाद, सोनी महिवाल यांनी जर प्रेम केलं असेल तर मृत्यू का? प्रेमात विरह का असतो? ज्या प्रेमात विरह नसेल तर त्याचा मी धिक्कार करतो. तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातील एका तुमचा मुलासाठी वहिनीला विचारा खरंच असं असतं का?

साहेब, शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का?खरंतर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटत आहे. उद्धवसाहेब, तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता. त्यांचे प्रश्न सोडवता, माझं कसं काय? या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी वाट पाहतो. अन्यथा जगातून निघून जाण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. उत्तर कधी देत आहे साहेब, वाट पाहतोय, असं या पत्रात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here