मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध ; मोर्चे काढू नका उद्धव ठाकरेंचं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला न्याय मिळणारच. मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंदोलनं जरुर करा पण कधी? जर सरकार दाद देत नसेल तर मात्र इथे तर आपलं सरकार आहे. सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यामुळे मराठा समाजाने आपल्या सरकारविरोधात मोर्चे काढू नयेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.  गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाचा विषय समोर आला आहे. खरं म्हणजे हा विषय अशा पद्धतीने समोर येण्याची आवश्यकता नव्हती. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मराठा समाजाचं आरक्षण मान्य केलेलं आहे. विधीमंडळातल्या सगळ्या पक्षांनी एकमताने त्याबद्दल निर्णय घेतला. त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं ते आपण जिंकलो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं ती लढाईही आपण लढतो आहोत.

अन्यायाविरोधात लढा, आंदोलनं जरुर करा पण कधी? जर सरकार दाद देत नसेल तर मात्र इथे तर आपलं सरकार आहे. आम्ही तुमच्या न्याय हक्कांसाठी तुमच्या सोबतच आहोत. तेव्हा घाबरण्याचं, काळजीचं काहीही कारण नाही. मराठा समाजाने सरकारविरोधात मोर्चे काढू नयेत कारण आम्हाला तुमच्या न्याय आणि हक्कांच्या सगळ्या मागण्या मान्यच आहेत. दोन दिवसांपूर्वीही मी आश्वासन दिलं होतं की मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी तसूभरही मागे हटणार नाही तेच आज या निमित्ताने पुन्हा देतो आहे असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

आपण सर्वोत्तम वकील दिले आहेत. ज्यांनी सूचना दिल्या ते वकीलही आपण या प्रकरणी घेतले आहेत. कोणतंही राजकारण न करता विरोधी पक्षही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारसोबत आहोत. या केसच्या सुनावणीच्या वेळी अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अजित पवार, जयंत पाटील या सगळ्यांसमवेत आम्ही संस्थांशी, मराठा बांधवांशी चर्चा केली. त्यानंतर कोर्टासमोर बाजू मांडली तरीही हा अनाकलनीय निकाल आला. सगळ्यांची मतं लक्षात घेऊन पुढे काय करायचं त्याचे उपाय शोधत आहोत, अस उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

Leave a Comment