मुख्यमंत्र्यांनी पक्ष बदलाचा बाजार मांडलाय – जयंत पाटील

0
26
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे. साम, दाम, दंड, भेद नीती वापरून भल्या भल्या भल्यांना वर्षा बंगल्यावर जाण्याची वेळी आणली आली आहे. ज्यांचं राष्ट्रवादी पक्षाच्या सात बारा वर नाव होतं ते पक्ष सोडून जात आहेत’ अशी घणाघती टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ची ‘शिवस्वराज्य यात्रा’ रात्री उशीरा पंढरपुर मध्ये दाखल झाली. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ‘पंढरपुर मध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते कर्ज माफी नाही केली तर सत्तेला लाथ मारू. पण हे जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तसे ते बसले आहेत’ अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here