राजू शेट्टींनी गुजरात मुंबई सीमेवर दिला ठिय्या

0
33
thumbnail 1531886860314
thumbnail 1531886860314
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | आज दूध आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सलग तिसर्या दिवशीही आंदोलनात कमालीची सक्रियता बघायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी स्वत: महाराष्ट्र गुजरात सीमेवर गुजरात मधील दूध अडवण्यासाठी ठिय्या देऊन बसले आहेत. गुजरातवरुन मुंबईकडे येणार्या दुधाच्या गाड्या माघारी पाठवण्यात आंदोलकांना यश आले आहे. गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी दुध आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतू ऐनवेळी हार्दिकने काहीच सक्रियता न दाखवल्यामुळे खुद्द शेट्टी यांना गुजरातेतील दुध मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी महाराष्ट्र गुजरात सीमेवर ठीय्या मांडून बसावे लागले आहे.
तिसर्या दिवशी ही दुधाचे आंदोलन क्षमले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात आज आंदोलन उग्र झाले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात १० पेक्षा अधिक टँकर फोडण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातही आंदोलकांनी टँकर फोडून दूध रस्त्यावर ओतून दिले आहे. तर पुणे मुंबई महामार्गावर अज्ञात लोकांनी दुधाचे तीन टँकर फोडले आहेत. मुंबई पुण्यात आज दुधाची टंचाई जाणवणार आहे. तिसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक आहेत. सरकारने लवकर तोडगा काढावा असा सूर जण समन्यातून उमटतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here