“…तर शेतकरी उद्धव ठाकरेंनाही दिवाळी साजरी करु देणार नाही”; रवी राणांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाकरे सरकारच्यावतीने काल महत्वपूर्ण निर्णय घेत शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करीत निर्णय घेण्यात आला. मात्र, हि मदत कधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. अशात बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीवरून इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी जर मदत जमा दिली नाही तर सर्व शेतकऱ्यांसह मातोश्रीवर जाऊ, आणि तुम्हालाही दिवाळी गोड होऊ देणार नाही,” असा इशारा राणा यांनी ठाकरेंना दिला आहे.

बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अतिवृष्टी, पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. निसर्गाने यंदा शेतकऱ्याला साथ दिलेली नाही. शेती वाहून गेली, पिकं वाहून गेली, घरं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यावर कर्जाचे ओझे आहे. अमरावतीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय.

अशा परिस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष दिले पाहिजे. दिवाळीच्या आठ दिवसआधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता आली पाहिजे. अन्यथा मातोश्रीवरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही,” असा इशारा राणा यांनी यावेळी दिला आहे.

Leave a Comment