यंदाच्या होळीला चीनचे मोठे नुकसान, चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे वाढला देशांतर्गत व्यापार

0
46
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात स्वदेशी वस्तू स्विकारणे आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे याचा परिणाम या होळीवर दिसून आला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बाजारात तेजी होती ती यावेळी हलकी होत आहे. त्यामुळेच होळीच्या दिवशी दिल्लीसह देशभरात व्यवसायात 30 टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, यंदा देशभरात होळीच्या सणाशी संबंधित वस्तूंची 20 हजार कोटींहून जास्तीची उलाढाल झाली आहे.

CAIT कडून सांगण्यात आले की,”कोरोनाचे सर्व निर्बंध संपल्यानंतर, यंदाच्या होळीच्या सणाने दिल्लीसह देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये नवा उत्साह आणि जोश संचारला आहे आणि व्यवसायाच्या भविष्याबाबत पुन्हा एकदा नवी आशा निर्माण केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा होळीच्या सणामुळे देशातील व्यवसायात सुमारे 30 टक्क्यांनी वाढ अपेक्षित असून, त्यामुळे देशभरात 20 हजार कोटींहून जास्तीचा व्यवसाय झाला आहे.

या व्यवसायातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केवळ व्यापारीच नाही तर सर्वसामान्यांनीही चिनी वस्तूंवर पूर्ण बहिष्कार टाकला होता. देशात होळीशी संबंधित वस्तूंची आयात सुमारे 10 हजार कोटींची आहे, जी यावेळी अगदीच नगण्य होती. त्याचबरोबर यंदा एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विवाहसोहळ्यांच्या शेवटच्या टप्प्यातही चांगला व्यवसाय होण्याची आशा निर्माण झाली आहे.

देशातील सर्वात मोठे व्यापारी नेते आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना कोविडपासून बचावाच्या व्यवस्थापनाचे कौतुक करताना म्हटले की, “सरकारने कोविड समस्येला चांगल्या प्रकारे हाताळल्यामुळे देशभरातील कोविड निर्बंध संपले आहेत आणि व्यवसायाला आता गती मिळू लागली आहे, जी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली आहे.”

या वेळी होळीच्या सणासुदीत व्यापारी व ग्राहकांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून केवळ हर्बल रंग, गुलाल, पिचकारी, फुगे, चंदन, पूजेचे साहित्य, वस्त्रे आदी वस्तूंची भारतातच मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याच वेळी, मिठाई, ड्राय फ्रुट्स, गिफ्ट्स, फुले आणि फळे, कपडे, फर्निशिंग फॅब्रिक्स, ग्रॉसरी, एफएमसीजी प्रॉडक्ट्स, ग्राहकोपयोगी वस्तूंसह इतर अनेक उत्पादनांचा मोठा व्यवसाय होता.

खंडेलवाल म्हणाले की,”कोविड निर्बंधांमुळे सामान्य व्यवसायाला फटका बसला असताना, विशेषतः हॉस्पिटॅलिटी बिझनेस जवळजवळ संपुष्टात आला होता, मात्र यावर्षी कोविड निर्बंध संपल्यानंतर, देशभरात मोठ्या प्रमाणावर होळी साजरी करण्यात आली. त्यामुळे बँक्वेट हॉल, फार्म हाऊस, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सार्वजनिक उद्यानांमध्ये होळी साजरी करण्यात आली आणि दोन वर्षानंतर या क्षेत्राने चांगला व्यवसाय केला. अनेक ठिकाणी होळी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते आणि सर्व कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि उत्साहाचे नवीन वातावरण दिसून आले.

होळीच्या उत्साहातच व्यापाऱ्यांनी आता लग्नाच्या मोसमासाठी मोठी तयारी सुरू केली आहे आणि व्यापाऱ्यांना आशा आहे की, नवीन कोविडमुक्त वातावरणात ते आणखी चांगला व्यवसाय करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here