आता ठाकरी बाण्यात काही दम राहिलेला नाही; प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका

0
83
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात ठाकरी बाणा होता. बाकी कोणाचाही ठाकरी बाणा आम्ही मानत नाही. आता ठाकरी बाण्यात काही दम राहिलेला नाही,” अशी टीका लाड यांनी केली.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला सरकार पडण्याचा छंद आहे. पण आमचे असे म्हणणे आहे कि चंदा आणि धंदा हे महाविकास आघाडी सरकारचे काम आहे. गेंड्याच्या कातडीच्या सरकारला दोन वर्षे झाली. पण भ्रष्टाचारी सर्व मंत्री आजही तसेच मंत्रिमंडळात आहेत. महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या आजही होत आहे. ठाकरी बाणा फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याचाच होता. आम्ही बाकी कोणाचाही बाणा मानत नाही.

महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या 2 वर्षांतील कामकाजाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाले तर “आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय!, अशा शब्दात लाड यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोविडचे गैरव्यवस्थापन, पालघर साधू हत्याकांड बिघडलेली कायदा सुव्यवस्था, १०० कोटींची वसूली, बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकार पुरस्कृत दादागिरी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या ही देखील यांचीच जबाबदारी आहे, अशी टीका लाड यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here