मनसुख हिरेन प्रमाणे सचिन वाझेंची देखील हत्या होऊ शकते ; भाजप नेत्याने व्यक्त केली भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्याप्रकारे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका असून त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार रवी राणा यांनी केली आहे. तसंच सचिन वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे ‘मातोश्री’ अडचणीत आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सचिन वाझेंचाही हिरेन होईल, त्यांना तातडीने संरक्षण द्या अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.तसेच त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा असं देखील म्हटलं आहे.

सचिन वाझे यांचंही मनसुख हिरेनप्रमाणे होऊ शकतं, त्यांच्या जीवाला धोका आहे. सचिन वाझे यांच्यामुळे मातोश्री अडचणीत आली आहे. मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवा असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत.असेही ते म्हणाले.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. सचिन वाझे हे छोटी व्यक्ती असून या प्रकरणातील हात मोठ्या लोकांचे आहेत असा आरोप त्यांनी केलाय.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हांला 7972630753 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment