मोबाईलमध्ये सिम ठेवण्याचा नियम बदलला, नवीन नियम जाणून घ्या अन्यथा सिमकार्ड बंद केले जाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दूरसंचार विभागाने (DoT) बुधवारी एक नवीन नियम जारी केला आहे, ज्यामध्ये जास्त सिम ठेवण्याची सूट रद्द करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाच्या नवीन नियमांनुसार आता 9 पेक्षा जास्त सिम असणा-या युझरला सिमकार्डचे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक झाले आहे.

या सिमकार्डचे व्हेरिफिकेशन न केल्यास ते बंद केले जातील. जम्मू आणि काश्मीर (J&K) आणि ईशान्य राज्यांसाठी ही संख्या फक्त सहा आहे. दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नियमांनुसार वापरात नसलेले सर्व मोबाइल नंबर डेटाबेसमधून काढून टाकण्यास सांगितले आहे.

DoT ऑर्डर काय आहे हे जाणून घ्या?
दूरसंचार विभागाने जारी केलेल्या या आदेशात असे म्हटले गेले आहे की, जर ग्राहकांकडे परवानगीपेक्षा जास्त सिम कार्ड आढळले तर त्यांना त्यांच्या आवडीचे सिम ठेवण्याचा आणि बाकीचे बंद करण्याचा पर्याय दिला जाईल, मात्र त्याची मर्यादा 9 पेक्षा जास्त नसेल.

दूरसंचार विभागाने सांगितले की, विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान कोणत्याही ग्राहकाकडे सर्व दूरसंचार कंपन्यांचे सिमकार्ड निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास सर्व सिमचे पुन्हा व्हेरिफिकेशन केले जाईल. आर्थिक गुन्हे, आक्षेपार्ह कॉल, ऑटोमेटेड कॉल आणि फसवणुकीच्या घटनांचा तपास करण्याच्या उद्देशाने दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे.

30 दिवसात सिम बंद करण्याचा आदेश
DoT ने सर्व दूरसंचार ऑपरेटर्सना 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असलेल्या युझर्सना नोटिफिकेशन पाठवण्याचे आदेश दिले आहेत. अशा सिमकार्डवरील सर्व आउटगोइंग कॉल 30 दिवसांच्या आत थांबवावेत तर इनकमिंग कॉल 45 दिवसांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मोबाइल सिम युझर्सना अतिरिक्त सिम सरेंडर करण्याचा पर्याय देखील असेल.

Leave a Comment