मूर्तीची उंची कमी करुन उत्सवाची उंची वाढविण्याचे मुख्यमंत्र्याचे गणेश मंडळांना आवाहन

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेश उत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावर्षी गणेशमूर्तीची उंची कमी करुन आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात, असा नारा त्यांनी दिलाय. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी सार्वजनिक गणेश मंडळांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे, पण ती सुरक्षित व्हायला पाहीजे.”मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ वादळं, संकटं येत आहेत. मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परिक्षा आहे. विघ्नंहर्ताही आपल्याकडे पहात असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय. त्यामुळे यंदा गणेशमूर्तीची उंची कमी करून आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात, असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

कोरोनामुळं यंदा जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग गणेश मूर्ती संदर्भात आपण निर्णय घेतला पाहीजे. त्यामुळं गणेश मूर्तींची उंची हा सर्वात महत्वाचा प्रश्नं आहे. म्हणून गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच साकारावी. जेणेकरून सुरक्षेचे इतर प्रश्नंही सुटतील. अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेनमेंट झोन झाला तर मग अनेक अडचणी उभ्या रहातील. त्यामुळे सुरक्षित उत्सव केला पाहीजे.गणेशमूर्तीची उंची मर्यादीत असावी जेणेकरून ती कृत्रिम तलावात सुरक्षितपणे विसर्जीत करता येईल.या वर्षी आपल्या गणेशमूर्तीची उंची कमी करुन आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात असं त्यांनी आवाहन गणेश मंडळांना केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी गणेशमूर्तींची उंची किती असावी या संदर्भात मी आपल्या सर्वांशी बोललोय. तसेच आता मी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून पुढील दोन दिवसांत गणेश मूर्तींची उंची किती असावी हा निर्णय जाहीर करतो असं यावेळी सांगितलं.

दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेश उत्सव यंदा मात्र मर्यादीत स्वरुपात साजरा करावा लागणार आहे. राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक शहर, गावं, खेड्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, यंदा राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशावेळी काळजी घेतली नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळेचं सर्वांनीच गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here