काँग्रेसचे सर्व आमदार मुबंईत दखल, घोडेबाजाराची अजूनही भीती

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । राज्यात सत्ताकोंडीत कायम आहे. आपले आमदार विरोधी पक्षाच्या गळाला लागू नये या भीतीने काँग्रेसने आपले सर्व आमदार जयपूर येथे हलवले होते. आता हे आमदार मुंबईत परतले आहेत. विमानतळावर या आमदारांचं स्वागत करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे दाखल झाले होते.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.त्यामुळं घोडेबाजाराच्या शक्यता कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने आपल्या आमदारांना राज्यात परत बोलावून घेतलं आहे. दरम्यान शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी यांच्यात सरकारस्थापनेच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, तरी सुद्धा सरकार स्थापन होईपर्यंत आमदार फुटण्याची भीती काँग्रेसला लागून राहणार.

शिवसेना-काँग्रेस यांच्यात एकत्र सत्तास्थापनेवरून आज महत्वाच्या बैठका झाल्या. याबैठकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी केली गेली आहे. त्याचबरोबर ज्या मुद्द्यावरून सेना-भाजप यांच्यातील वाद विकोपाला जात युती तुटली होती तोच फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला या बैठकींच्या केंद्रस्थानी असणार आहे. दरम्यान उद्धव आणि काँग्रेस नेते यांची आज एक बैठक पार पडली. याबैठकीनंतर उद्धव यांनी चर्चा योग्य दिशेने सुरु आहे. बैठक सकारात्मक झाली अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. एकसूत्री कार्यक्रमावर एकमत झाल्यास शिवसेनेसोबत सरकार स्थापन करू असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here