“लसीकरणासाठी राखून ठेवलेले ते 35 हजार कोटी गेले कुठे?” पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्राला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जगभरात सर्व देश मोफत लसीकरण करत असताना भारतात केंद्र सरकार मोफत लसीकरण का करु शकत नाही? केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकानुसार सरकारने लसीकरणासाठी 35 हजार कोटीचा निधी राखून ठेवला होता. मग ते 35 हजार कोटी गेले कुठे?, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

केंद्राने योग्य वेळी लसींना परवानगी न दिल्यामुळे सातारा जिल्ह्यातील मागील 10 दिवसापासून लसीकरण सेवा विस्कळीत झाली असल्याचं चव्हाण म्हणाले. केंद्र सरकारने सर्व लस खरेदी केली पाहिजे. राज्य सरकार किंवा खाजगी संस्थावर हि जबाबदारी ढकलू नये. अन्यथा लसीकरणासाठी खाजगी संस्था मोठी किमंत आकारु शकतात, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केलीय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment