‘काही लोक पक्ष सोडून गेल्याने वजाबाकीच्या ऐवजी बेरीजसुद्धा होते’ – अजित पवार

0
45
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई , विशेष प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहीर यांच्या सोडचिट्ठी वर आता राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी मौन सोडले असून, अहीर यांच्या पक्षांतरावर जोरदार टिपण्णी करतांना दिसत आहे.

राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयावर उशीरा प्रतिक्रिया दिली. “कोणीही पक्ष सोडला तरी पक्ष संपत नसतो किंव्हा वजाबाकीच होते असं नाही, तर काही वेळेस बेरीजसुद्धा होते. पवार साहेबांनी ५ आमदारांपासून ६५ आमदार पुन्हा निवडून आणले होते.

त्यामुळे आता लोकांचा आमच्या पक्षावरचा विश्वास वाढेल, असेच प्रतिनिधी घेऊन लोकांसमोर जायचं आहे.” असे पवार यांनी सचिन अहीर यांच्या पक्षांतर भूमेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here