संकट काळात सरकार प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

सांगलीत महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची भेट घेत असून झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. उपमुख्यमंत्री पवारांनी सांगलीतून दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री पवारांनी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पुरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

नुकसानग्रस्थांशी झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करावा, वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासाव्यात, सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

बोटीतून केली भिलवडी बाजारपेठेची पाहणी
सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम त्यांच्यासोबत उपस्थित होते.

Leave a Comment