Devendra Fadnavis On Mumbai Local Train : मुंबई लोकल ट्रेनचा चेहरामोहरा बदलणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis On Mumbai Local Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Devendra Fadnavis On Mumbai Local Train । मुंबईची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन, दररोज लाखो मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करत आपलं ऑफिस गाठतात. मधल्या काळात मुंबईत मेट्रो ट्रेन, मोनोरेल आल्या, तरीही लोकलची गर्दी कमी होण्याचं काय नाव नाही. मिळेल त्या जागेवर, अनेकदा उभं राहून आणि कधी कधी बाजूला लटकून, जीव टांगणीला लावून मुंबईकर लोकलने प्रवास करतो. यामुळे अनेकदा अपघात सुद्धा होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल ट्रेनबाबत एक मोठी घोषणा करत मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

काय म्हणाले फडणवीस? Devendra Fadnavis On Mumbai Local Train

युनायटेड नेशन्सचे भारतीय मॉडेल (IIMUN) आयोजित युथ कनेक्ट सत्रात Involvement of Youth in Governance या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई लोकल ट्रेनच्या होणाऱ्या कायापालटची माहिती दिली. मुंबईची जी लोकल आहे, ज्यातून साधारण ९० लाख लोक दररोज प्रवास करतात. त्यात आपण मोठा बदल करणार आहोत. आता आम्ही लोकलचे सर्व कोच हे मेट्रोप्रमाणे एअर कंडिशन करणार आहोत. त्याचे दरवाजे आता बंद होणार आहेत. लोकल ट्रेनमध्ये हा सर्वात मोठा बदल होत असला तरी सर्वसामान्य प्रवाशाला कोणताही अधिकच आर्थिक फटका बसणार नाही, कारण रेल्वेच्या तिकिटात कोणतीही वाढ होणार नाही. सध्याच्या किमतीतीच मेट्रो प्रवासाप्रमाणे अनुभव लोकल प्रवास करता येणार आहे, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. Devendra Fadnavis On Mumbai Local Train

अंडरग्राउंड बोगद्याचे जाळे –

पुढील सात वर्षांत मुंबईचा सरासरी वेग ताशी ८० किमीपर्यंत पोहोचावा यासाठी मुंबई भूमिगत बोगद्यांचे एक मोठे जाळे तयार करत आहे, जे सध्या गर्दीच्या वेळी सरासरी १५ ते २० किमी प्रतितास आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. “मुंबईच्या वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही पथल लोक (भू-बोगद्यांच्या जाळ्याखाली) तयार करत आहोत. वांद्रे सी लिंकवरून, एक बोगदा तयार केला जाईल जो बीकेसीला जोडेल आणि दुसरा बोगदा जो वाहतूक थेट मुंबई विमानतळावर नेईल. “या बोगद्याचे उद्दिष्ट बीकेसीची गर्दी कमी करणे आणि लोकांना कमीत कमी वेळेत विमानतळावर पोहोचवणे आहे,” असे फडणवीस म्हणाले.