औरंगाबाद जिल्ह्यात आणखी अकरा रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. घाटी रुग्णालयात आणखी ११ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली असून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. घाटी रुग्णालयात आज दुपारी आलेल्या अहवालानुसार आणखी ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यात अंगुरीबाग येथील ९३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर नारळीबाग येथील ६५ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ७७ वर्षीय स्त्री, पाडेगाव येथील ५० वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७३ वर्षीय पुरुष, हर्षनगर, लेबर कॉलनी येथील ७० वर्षीय पुरुष, कन्नड , गवळी येथील ३० वर्षीय पुरुष, इंदिरानगर, बायजीपुरा येथील ७४ वर्षीय स्त्री, कन्नड सिद्धार्थ कॉलनी येथील ७५ वर्षीय पुरुष, केसर कॉलनी येथील ६० वर्षीय स्त्री, सिडको शिवाजीनगर येथील ७२ वर्षीय स्त्री रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत एकूण मृत्यू होण्याचे प्रमाण हे ११३९ वर जाऊन पोहचले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

 

 

Leave a Comment