व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मनपाच्या नागरी मित्र पथकाने केला एक लाख 32 हजारांचा दंड वसूल

औरंगाबाद – महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने शहराच्या विविध भागात दंडात्मक कारवाई करून एक लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान 15 पथकामार्फत 5 हजार 150 नागरिकांची लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यात आले. यात 85 नागरिकांनी अध्याप लस न घेतल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून प्रतिव्यक्ती पाचशे रुपये प्रमाणे एकूण 42 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.

शहरात विविध ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिक आठवण आल्या बाबत 16 जणांकडून 56 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्याबद्दल 11 जणांकडून 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.