महेंद्रसिंग धोनीला टी-20 विश्वचषकासाठी मेंटर बनवल्याने घाबरले गावस्कर, सांगितले 17 वर्षांपूर्वीचे ‘हे’ कारण

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । टी 20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा एक दिवस आधीच झाली आहे. अनेक दिग्गजांना या संघातून काढून टाकण्यात आले तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र एका नावाबद्दल सर्वात आश्चर्य व्यक्त होते आहे ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे. मात्र एक खेळाडू म्हणून नव्हे तर एक मेंटर म्हणून. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दोन वेळा वर्ल्ड कप आणि एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तो संघासाठी लकी चार्म मानला जातो आणि डाव पलटवण्याचे कौशल्य जाणतो. कदाचित म्हणूनच बीसीसीआयने त्याला संघाचा मेंटर बनवले.

माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर देखील धोनीला टीम इंडियामध्ये जोडण्याच्या या निर्णयामुळे खूप आनंदी झाले आहेत. पण त्यांना एका गोष्टीची भीती वाटते. एका न्यूज चॅनलवर, जेव्हा त्यांना धोनीला मेंटर बनवण्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी 17 वर्षांपूर्वीच्या एका गोष्टीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की,” मी 2004 मध्ये टीम इंडियाशी सल्लागार म्हणूनही जोडला गेला होतो. त्या काळात, संघाचे प्रशिक्षक जॉन राइट यांना त्यांच्या पदाबद्दल चिंता वाटू लागली. त्यांना वाटले की, मी त्यांची जागा घेईन. मात्र, तसे काहीही नव्हते.”

धोनीला मेंटर बनवणे संघासाठी फायदेशीर आहे: गावस्कर
गावस्कर म्हणाले की,” टी -20 विश्वचषकासाठी संघाव्हा मेंटर म्हणून महेंद्रसिंग धोनीची नियुक्ती ही भारतासाठी चांगली बातमी आहे. धोनी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात कोणताही संघर्ष होणार नाही, अशी आशा करायला हवी.”

शास्त्री आणि धोनी यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता!
ते पुढे म्हणाले की,” मुख्य प्रशिक्षक शास्त्री आणि धोनी यांच्यात कदाचित संघर्ष न होवो. कारण शास्त्रींना माहित आहे की, धोनीला कोचिंगमध्ये रस नाही. जर धोनी आणि शास्त्री यांचे विचार जुळले तर टी -20 विश्वचषकात टीम इंडियाला त्याचा खूप फायदा होईल. परंतु धोरण किंवा संघ निवडीबाबत असहमती किंवा मतभेद असल्यास, त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, धोनी संघात सामील होणे संघाची ताकद वाढवण्यासाठी पुरेसे आहे. त्याला अनुभवाची कमतरता नाही. जेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता, तेव्हा त्याच्यापेक्षा मोठा आणि आक्रमक फलंदाज दुसरा कोणीही नव्हता.”

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2 विश्वचषक जिंकले
माजी भारतीय कर्णधार म्हणाला की,”धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांनंतर 2011 मध्ये विश्वचषक जिंकला. याच्या 4 वर्षांपूर्वी हा संघ टी -20 चा विश्वविजेता बनला. अशा स्थितीत धोनीचे टीम इंडियामध्ये सामील होणे प्रत्येक बाबतीत अधिक चांगले आहे आणि यामुळे संघाला फायदाच होईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here