जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेलं पात्र ; पडळकरांची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर पडळकर यांना प्रतिक्रिया व्यक्त केली असता त्यांनी पाटील यांना घेरले. जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील राजारामबापूच्या जागेवर अनुकंपाच्या जागेवर गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले आहेत, अशी जोरदार टीका पडळकर यांनी केली.

जयंत पाटील राष्ट्रवादीतुन मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. जयंत पाटलांना यूनोमध्ये वगैरे पाठवता येत का हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे. कारण ते फार बुद्धिमान आहेत, असा त्यांच्या पक्षाचा समज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता राज्यात आहे. पण भविष्यात दिसेल की नाही माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment