“भारताकडे चीनसारखे कोळश्याचे संकट नाही, मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा आहे “- केंद्रीय मंत्री

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मंगळवारी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांनी चीनमधील कोळशाची कमतरता आणि भारतातील कोळशाची वाढती मागणी यावरील मीडिया रिपोर्टबाबत सांगितले की,”देशात कोळशाचा पुरेसा साठा आहे, ज्यामधून सर्व मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकतात.” ते म्हणाले, “कोळशाची मागणी वाढली आहे आणि आम्ही ही मागणी पूर्ण करत आहोत. आम्ही मागण्यांमध्ये आणखी वाढ पूर्ण करण्याच्या स्थितीत आहोत. सध्या आपल्याकडे कोळशाचा साठा आहे जो 4 दिवस टिकू शकतो. चीनप्रमाणे भारतात कोळशाचे संकट नाही.”

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की,”विजेची मागणी वाढल्याने कोळशाची मागणी वाढली आहे, जे देशासाठी चांगले आहे.” ते म्हणाले, “विजेची मागणी वाढणे हे एक चांगले लक्षण आहे, जे दर्शवते की, आपण रिकव्हरीच्या मार्गावर आहोत. सौभाग्य योजनेअंतर्गत 2.82 कोटी घरांना वीज जोडणी ही विजेची मागणी वाढण्यामागचे एक कारण आहे.”

कोळशाची मागणी देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडताना ते म्हणाले, “कोळशाची मागणी वाढवणे ही चांगली गोष्ट आहे, यावरून हे दिसते की, आपली अर्थव्यवस्था प्रगती करत आहे. जी काही मागणी असेल, ती पूर्ण करू. या स्थितीत आपण सध्या आहोत. ”

गेल्या आर्थिक वर्षात देशातील कोळशाचे उत्पादन 2.02 टक्क्यांनी घटून 71.60 कोटी टन झाले. कोळसा मंत्रालयाच्या तात्पुरत्या डेटामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कोळशाचे उत्पादन 73.08 कोटी टन होते.

एकूण कोळसा उत्पादनात नॉन-कोकिंग कोळशाचा वाटा 67.12 कोटी टन होता आणि कोकिंग कोळसा 44.7 कोटी टन होता. यापैकी सार्वजनिक क्षेत्राचे उत्पादन 68.59 कोटी टन आणि खाजगी क्षेत्राचे उत्पादन 30.1 कोटी टन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here