India vs New Zealand: रोहित शर्मा सोडणार टीम इंडियाची कमान ! संघाला लवकरच मिळणार नवा कर्णधार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्माला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहलीने टी-20 संघाची कमान सोडली आहे. 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होत आहे. 25 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा भाग आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर राहू शकतो. त्याने BCCI ला विश्रांती देण्यास सांगितले आहे.

इनसाइड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार, रोहित शर्मा दोन्ही कसोटीत दिसणार नाही. तर दुसरीकडे, विराट कोहलीने टी-20 मालिकेव्यतिरिक्त पहिल्या कसोटीतून बाहेर राहण्याबाबत सांगितले आहे. अशा स्थितीत पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेकडे टीम इंडियाची कमान सोपवली जाऊ शकते. रहाणेने आपल्या नेतृत्वाखाली संघाला ऑस्ट्रेलियात विजय मिळवून दिला. नुकत्याच झालेल्या इंग्लंड मालिकेत त्याला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्या कामगिरीबातही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

7 डावात फक्त एकच अर्धशतक करता आले
इंग्लंड मालिकेदरम्यान अजिंक्य रहाणेला 7 डावात केवळ एकच अर्धशतक झळकावता आले. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 61 धावा केल्या. याशिवाय पुढील 6 डावात त्याला फक्त 14, 0, 18, 10, 1 आणि 5 धावाच करता आल्या. त्याच्या एकूण कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 78 सामन्यांच्या 132 डावांमध्ये 40 च्या सरासरीने 4756 धावा केल्या आहेत. त्याने 12 शतके आणि 24 अर्धशतके केली आहेत. 188 धावांची सर्वात मोठी इनिंग खेळली आहे.

दरम्यान, T20 मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 5 पैकी 4 सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. यासह त्याने स्वबळावर येण्याचे संकेत दिले आहेत. यादरम्यान त्याने दोनदा 70 हून अधिक धावांची इनिंग खेळली आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका हलक्यात घ्यायला संघाला आवडणार नाही. अलीकडेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

Leave a Comment