1947मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं; कंगणा पुन्हा बरळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस म्हणत कंगनाने मुक्ताफळे उधळली आहेत. दरम्यान, कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.

एका मुलाखतीत कंगना रनौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, “स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का?  सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं. “

दरम्यान कंगनाच्या वक्तव्याचा वरुण गांधी यांनी समाचार घेतलाय. ट्विट करत वरुण गांधी यांनी कंगनावर निशाणा साधलाय. वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘कधी महात्मा गांधी यांच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या खुन्याचा सन्मान. आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारांना वेडेपणा म्हणू की देशद्रोह?’

Leave a Comment