महाराष्ट्रातील लातूर आणि  हिंगोली जिल्ह्यातील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर | सतिश शिंदे

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या देशातील ५२ शाळांमध्ये राज्यातील दोन शाळांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील लातूर आणि हिंगोली जिल्ह्यामधील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यामध्ये लातूर जिल्ह्याचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी देशातील एकूण ५२ शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या शाळांपैकी ३७ शाळा या ग्रामीण भागातील तर १५ शाळा शहरी भागातील आहेत. ५२ शाळांपैकी ४५ शाळा या शासकीय व शासकीय अनुदान प्राप्त आहेत. ७ शाळा या खाजगी स्वरूपात आहेत. ज्या शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते त्याचे स्वरूप हे पुढीलप्रमाणे होते, प्रमाणपत्र, ५० हजार रूपये रोख असे आहे. ५० हजार रूपये या शाळांच्या खात्यामध्ये डिजीटल सेवेंतर्गत जमा करण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्रामधील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या लातूर या जिल्ह्यातील दोन शाळा तसेच निलंगा तालुक्यातील जाऊ येथील मुलींची शासकीय निवासी शाळा, रेणापूर तालुक्यातील बाऊची येथील मुलींची शासकीय निवासी शाळा या सर्व शाळांनी स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण केल्याबद्दल विशेष पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय मुख्यम व सर्व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. सामाजिक न्याय विभाग आयुक्त व बाऊची शाळेचे मुख्याध्यापक श्री. जमादार व विद्यार्थी यांनी पुरस्कार स्विकारला. लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार दिल्यामुळे लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, सामाजिक कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बी. जी. अरवत यांनी हा पुरस्कार स्विकारला. देशातील केवळ ९ जिल्ह्यांना हा विशेष पुरस्कार मिळालेला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील गोटीवाडी येथील पोस्ट बेसिक आश्रम शाळेला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. विशाल रोठोड, मुख्याध्यापक साहेबराव आवचर व विद्यार्थी यांनी हा पुरस्कार स्विकारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला केंद्रिय पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, केंद्रिय शालेय शिक्षण विभागाच्या सचिव रिना रे सहसचिव मनिष गर्ग, सीबीएससीच्या अध्यक्षा अनिता करवाल यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment