फडणवीस साहेब तुम्हीही नुसतीच आश्वासने देताय; कोल्हापूरातील पूरग्रस्त संतापले

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. तर कोल्हापुरातही महापुरामुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथे दौरा केला. यावेळी पुरग्रस्तांनी फडणवीसांवर संताप व्यक्त केला. “देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हीही नुसतीच आश्वासने देताय, अशा शब्दात पुरग्रस्तांनी आपला संताप व्यक्त केला.

आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथील महापूरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी संतप्त झालेल्या पुरग्रस्तांनी मात्र त्यांच्यावर संताप व्यक्त केला. एवढे मोठे नुकसान झाले आहे. आणि पतुम्ही नुसतेच दौरे करत आहात. आम्हाला मदत कधी मिळणार ? फडणवीस साहेब तुम्हीही नुसतीच आश्वासने देताय? मंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. आता तुम्ही कशाला आलाय? असा सवाल यावेळी पुरग्रस्तांनी फडणवीस यांना केला.

राज्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे महापूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. यात आता पुराचे पाणी ओसरल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी आणि समस्या जाणून घेतल्या. मात्र, त्यांच्या या दौऱ्यावर पुरग्रस्तांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here