मी सुद्धा शेतकरी, कायदे मागे घेतले नाहीत तर…..पत्र लिहून नाना पटोलेंचा मोदींना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहे.याच पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर ला भारत बंदची हाकही देण्यात आली होती. दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. शेतकरी आंदोलनाबाबत हे पत्र असून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची या पत्रात मागणी करण्यात आलीय. कायदे मागे न घेतल्यास संविधानिक पदावर असूनही आंदोलन करू असा इशारा त्यांनी पत्राच्या माध्यमातून दिलाय.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरलेय. देशभरात या आंदोलनाचे पडसाद दिसू लागलेयत. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी पत्र लिहून इशारा दिलाय. देशात शेतकऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन योग्य आहे. ही आत्मसन्मानाची लढाई नाही. ही देशाच्या अन्नदात्यांच्या अधिकाराची लढाई आहे.  म्हणून देशातील अन्नदाता कडाक्याच्या थंडीत, कोरोना संकटातही रस्त्यांवर उतरलेयत. तुम्ही जो कायदा बनवलाय तो शेतकरी विरोधी असल्याचे नाना पटोलेंनी आपल्या पत्रात म्हटलंय. म्हणूनच शेतकरी मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरलाय. शेतकऱ्यांची समस्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हा काळा कायदा मागे घ्याल अशी मला अपेक्षा असल्याचे पटोलेंनी म्हटलंय.

पण तुम्ही जर हा कायदा मागे घेतला नाहीत तर सांविधानिक पद असूनही मला शेतकऱ्यांच्या लढाईत सामील व्हावे लागेल. तुम्ही जास्त वेळ न दवडता हा शेतकरी विरोधी कायदा परत घ्यावा असे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment