संजय राऊत काय घेऊन बोलतात माहिती नाही; राणेंचा घणाघात

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे बोलले जात होते.  त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही केला. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला.

हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्याबाबत विचारले असता राऊतांनी एकदा तर 25 वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही, अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केली आहे.

तसेच, चंद्रकांत पाटील मंत्री बनण्यासाठी शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत, असं सूचक वक्तव्यही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असंही राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here