सरकारी इमारतींसमोर बॅनर लावून नक्षल्यांचे जिल्हा बंदचे आवाहन

0
42
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक

नक्षल्यांनी एटापल्ली, गट्टा, जांभिया व अन्य ठिकाणी बॅनर लावल्याचे आढळले असून, जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा यांची हत्या पोलिसांनी खोट्या चकमकीत केल्याचा आरोप करुन १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

एटापल्ली येथील वनविभागाच्या नाक्याजवळ, तसेच जांभिया येथील शासकीय आश्रमशाळा, समाजमंदिर व अन्य ठिकाणी नक्षल्यांनी बॅनर लावून पत्रकेही टाकली. २७ एप्रिलला झालेल्या चकमकीत जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा ह्या ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, ही चकमक खोटी होती आणि दोघींनाही पोलिसांनी यातना देऊन ठार केले, असा आरोप नक्षल्यांनी बॅनर व पत्रकांमधून केला आहे. शिवाय या घटनेच्या निषेधार्थ १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात नक्षल कारवाया सुरु आहेत. हत्या, जाळपोळीचे सत्र सुरुच असताना नक्षल्यांनी आता बॅनर लावून बंदचे आवाहन केल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here