गृहमंत्रीपद अनिल देशमुखांकडेच राहील ; जयंत पाटलांनी केली पाठराखण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आता गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवलं जाणार? अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. अनिल देशमुख यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहणार आहे. राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाही असा खुलासा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA करत आहेत. सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही, जे कोणी चुकीचे वागले असतील तर त्यांना शिक्षा होईल असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे.

गृहमंत्रीपदासाठी तुमचं आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तुमच्या नावाला हिरवा कंदीलही दाखविण्यात आला आहे, त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय? असं पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर याला हिरवा कंदील, त्याला हिरवा कंदील असं काही नाही. तुम्हीही या वावड्या उठवू नका, असं पाटील म्हणाले.

 

Leave a Comment