हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातला 1000 कोटींची मदत केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोदींवर टीका केली. महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोदी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मोदींवर टीका केली आहे.
यासंदर्भात महेश तपासे यांनी ट्विट करत म्हंटल की तौक्ते चक्रीवादळाने केरळ, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत थैमान घातले. कोकणाला सर्वाधिक फटका बसून नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातला सढळ हस्ते १००० कोटी रुपयांची मदत केली, परंतु महाराष्ट्रात झालेली हानी त्यांना दिसली नाही
तौक्ते चक्रीवादळाने केरळ, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत थैमान घातले. कोकणाला सर्वाधिक फटका बसून नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातला सढळ हस्ते १००० कोटी रुपयांची मदत केली, परंतु महाराष्ट्रात झालेली हानी त्यांना दिसली नाही@PMOIndia
— महेश तपासे Mahesh Tapasay (@maheshtapase) May 20, 2021
कोकणातल्या माणसावर नरेंद्र मोदी सरकारने अन्याय केला आहे. देशाचे पंतप्रधान राज्याराज्यांमध्ये भेदभाव करतील ही अपेक्षा नव्हती. वास्तविक सगळ्यांनाच चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील ही अपेक्षा होती परंतु जिथे सरकार तिथेच मदत कदाचित अशी भाजप सरकारची भूमिका असावी अशी टीकाही तपासे यांनी केली आहे.
कोकणवासियांवर नरेंद्र मोदी सरकारने अन्याय केला आहे. देशाचे पंतप्रधान राज्याराज्यांमध्ये भेदभाव करतील ही अपेक्षा नव्हती. वास्तविक सर्वच नुकसानग्रस्तांना ते भरपाई देतील ही अपेक्षा होती, परंतु जिथे सरकार तिथेच मदत कदाचित अशी भाजप सरकारची भूमिका असावी.@PMOIndia@BJP4Maharashtra
— महेश तपासे Mahesh Tapasay (@maheshtapase) May 20, 2021
परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्यासोबत या कठीण काळात खंबीरपणे उभी आहे असेही महेश तपासे यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.




