महाविकास आघाडीच्या टिकण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; म्हणाल्या की..

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार टाकण्याबाबत विरोधी भाजपकडून अनेकवेळा शंका निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यात काल फडणवीस व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कमराबंद झालेल्या चर्चेमुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. यावरून व महाविकास आघाडी सरकार टिकण्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आज नागपूरचा दौरा केला जात आहे. दौऱ्याच्या त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक घेतली जाणार आहे. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “प्रत्येकाला आपला पक्ष वाढविणायचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हीही आमचा पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. काल जमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांची कमराबंद चर्चा झाली. प्रत्येकाला चर्चा करण्याचा अधिकार आहे. मात्र. महाविकास आघाडी सरकारच्या टिकण्याबाबत एकच गोष्ट सांगते कि. आमचे सरकार हे पाच वर्षे नाही तर पंचवीस वर्षे टिकणार असून ते या राज्याची सेवा नक्कीच करेल. हे सरकार भक्कम आहे, असे सुळे यांनी यावेळी म्हंटले.

भाजप नेत्यांकडून व ईडीकडून कारवाईची धमकी दिली जर असल्याच्या प्रष्णांवर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ईडीचा नेहमीच फायदा झालेला आहे, असे उत्तर सुळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here