आवाज कोणाचा आवाज राष्ट्रवादीचा; राज्यातील सर्वाधिक नगरपंचायती ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून यात महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिला आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार सरशी केली असून राष्ट्रवादीला तब्बल 27 नगरपंचायतीत विजय मिळवता आला आहे.

महाविकास आघाडीने काही ठिकाणी एकत्र निवडणूक लढवली तर काही ठिकाणी त्या त्या परिस्थितीनुसार तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले. या सर्वात राष्ट्रवादीने बाजी मारत तब्बल 27 नगरपंचायतीत सत्ता काबीज केली.

    कोणाला किती जागा मिळाल्या-
भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा
राष्ट्रवादी काँग्रेसला 27 नगरपंचायती आणि ३८७ जागा
काँग्रेसला 22 नगरपंचायची आणि २९७ जागा
शिवसेनेला 17 नगरपंचायती आणि ३०० जागा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. त्यात कर्जत नगरपंचायत येथे रोहित पवार आणि कवठे महांकाळ येथे रोहित पाटील यांनी मिळवलेला विजय नक्कीच राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढवणारा असेल

Leave a Comment