Saturday, December 6, 2025
Home Blog Page 10

Thane Metro : ठाण्यात प्रथमच धावली मेट्रो!! 8 डब्बे, 10 स्थानके, 21 लाख प्रवाशांना फायदा

Thane Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Thane Metro । ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने आज महत्वपूर्ण पाऊल पडले. मेट्रो मार्ग 4 व 4 अ च्या टप्पा-1 प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो मार्ग 4 (वडाळा–कासारवडवली) आणि 4 अ (कासारवडवली–गायमुख) या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ केला. ठाणे मेट्रोसाठी एकनाथ शिंदे यांनी खूप प्रयत्न केले, त्यामुळे मी आज एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंचं कौतुक केलं.

मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा आहे. यावर एकूण 32 स्थानकं प्रस्तावित आहेत. आज मेट्रोच्या ट्रायल वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ हा मार्ग अत्यंत महत्वाचा असून आज आम्ही या रूटचे टेस्टिंग करत आहोत. या रूटची लांबी जवळपास 35 किलोमीटर आहे. याठिकाणी ८ डब्ब्यांची मेट्रो धावणार आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांतील वाहतूक या मेट्रोमुळे सुलभ होईल. त्यादृष्टीने हा महामार्ग अतिशय महत्वाचा राहणार आहे. त्यामुळे हा देशातला सर्वात लांब मार्ग होईल. ठाणे मेट्रोतून (Thane Metro) दररोज २१ लाख ठाणेकर प्रवास करू शकतील. या मेट्रोमार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्के कमी होणार आहे. तसेच एलिव्हेटेड मार्ग असल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील कमी होईल, असे फडणवीसांनी म्हटले. मी खास करून एकनाथ शिंदे यांचं यावेळी अभिनंदन करतो कारण त्यांनी ठाणे मेट्रो साठी खूप प्रयत्न केले अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार? Thane Metro

१) कॅडबरी

२) माजीवाडा

३) कपूरबावडी

४) मानपाडा

५) टिकुजी-नी-वाडी

६) डोंगरी पाडा

७) विजय गार्डन

८) कासरवाडावली

९) गोवानिवाडा

१०) गायमुख

शिंदेंचं महाविकास आघाडीवर खापर –

दरम्यान, ठाण्याला उशिरा मेट्रो (Thane Metro) मिळाल्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडलं. मला ठाणे मेट्रोकरिता आंदोलन करावं लागलं होते. यापूर्वी पिंपरी चिंचवडला मेट्रो मिळाली, परंतु ठाण्याला मेट्रो नाकारण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने ठाणे मेट्रोच्या कामाला ब्रेक लावला… त्यामुळे ठाणे मेट्रोच्या कामाला उशीर तर झालाच याशिवाय तिचा खर्चही वाढला असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

ATM PIN : ATM यूजर्ससाठी महत्वाची बातमी!! PIN मध्ये चुकूनही वापरु नका ‘हे’ अंक!

ATM PIN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल ATM तर तुमच्या सर्वांकडे असेल.. बँकेच्या गर्दीत जाऊन पैसे काढण्यापेक्षा ATM मधून पैसे काढणे सर्वच जण सोयीस्कर मानतात. यामुळे आपला बहुमूल्य वेळ वाचतो. ATM मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्वचा असतो तो म्हणजे ATM PIN.. हा एक ४ अंकी नंबर असतो जो व्यवस्थित टाकला तरच तुमच्या एटीएम मधून पैसे निघत असतात. अशावेळी ATM PIN खूप महत्वाची बाब आहे. आजकाल तर सायबर हल्ल्यांचे आणि हॅकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेकदा तर एटीएम पिन हॅक केल्याच्या आणि बँक खाते रिकामे केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा बघितल्या असतील. अशावेळी आपला एटीएम पिन सुद्धा तितकाच मजबूत असला पाहिजे जेणेकरून कोणताही हॅकर तो हॅक करू शकणार नाही….. चला तर मग आज आम्ही तुम्हाला एटीएम पिन बाबत अशाच काही टिप्स देणार आहोत.

1) नेहमीचेच साधे पिन टाळा

सायबर तज्ज्ञांच्या मते, काही पिन क्रमांक असे आहेत जे अतिशय सोप्पे आहेत आणि अनेक ग्राहक त्याचा सातत्याने वापर करतात. उदाहरणार्थ 1234 हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा आणि सर्वात असुरक्षित पिन आहे.. हा पिन वापरयाला सोप्पा असल्याने अनेकजण हाच पिन एटीएम साठी ठेवण्यावर भर देतात… मात्र इथेच घात होण्याची शक्यता असते. यासोबतच 0000 हा पिन सुद्धा धोकादायक मानला जातो. त्यामुळे असे सोप्पे पिन टाळणे गरजेच आहे.

2) एकच अंक पुन्हा पुन्हा नको (ATM PIN)

कधी कधी आपण डोक्याला ताप नको म्हणून एकच क्रमांक डबल टिबल टाकून पिन तयार करतो. उदाहरणे द्यायची झाल्यास, 1111, 2222, 3333, 4444 किंवा 5555 … परंतु एकाच अंकाची पुनरावृत्ती असलेले पिन कोड सायबर गुन्हेगार प्रथम तपासतात आणि अशा नंबरला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. हे पिन सोप्पे असल्याने हॅकरला सुद्धा हॅक करताना जास्त कष्ट घ्यायला लागत नाहीत. त्यामुळे असे पिन त्वरित बदलावेत.

3) अनुक्रमे येणारे क्रमांक टाळा

कधी कधी आपण सोप्यात सोपा पिन टाकण्यासाठी एकसलग नंबर टाकतो.. उदाहरणार्थ, 2345, 4567, 5678, 6789 … परंतु असे एटीएम पिन सायबर गुन्हेगारांना ट्रॅक करणे सोप्पं जाते. त्यामुळे कधीही एकसलग क्रमांक एटीएम पिनसाठी वापरू नयेत.

4) वैयक्तिक माहिती दाखवणारा पिन नकोच

अनेकजण एटीएम पिनसाठी (ATM PIN) आपल्या वाढदिवसाची तारीख किंवा गाडीच्या नंबर प्लेटचा क्रमांक टाकतात… उदाहरणार्थ १९९५…. २००१ … परंतु तुमच्या काही जवळच्या आणि ओळखीच्या लोकांना तुमची हि बातमी माहित असते.. अशावेळी त्यामुळे असे पिन वापरणे धोकादायक ठरू शकते.. त्यामुळे चुकूनही तुमची वैयक्तिक माहिती दर्शवणारा एटीएम पिन टाकू नका.

5) कोणती काळजी घ्याल?

मित्रानो, सायबर हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हॅकरला सुद्धा अडचणीत टाकणारे आणि स्मार्ट एटीएम पिनचा वापर करा. आपल्या एटीएमचा पिन कोणालाही सहज ओळखता न येणारा असावा. आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतागुंतीचा आणि कोणाच्या कधी लक्षातही येणार नाही असे एटीएम पिन ठेवा.
आपले बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहा आणि. जर आपला पिन वरीलपैकी कोणत्याही प्रकारात बसत असेल, तर तो लवकरात लवकर बदलून सुरक्षित पिन सेट करा.

GST Savings Festival : आजपासून ‘या’ वस्तू स्वस्त होणार; संपूर्ण यादीच पहा

GST Savings Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन GST Savings Festival । केंद्र सरकारने GST स्लॅब मध्ये बदल केल्यानंतर आजपासून अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहे. काही वस्तूंवर शून्य टक्के टॅक्स असल्याने तसेच काही वस्तूंवर ५ टक्के टॅक्स असल्याने सर्वसामान्य ग्राहक आधीपेक्षा कमी किमतीत या वस्तू खरेदी करू शकणार आहेत. यामध्ये अंघोळीच्या साबणापासून ते दुग्धजन्य पदार्थ, पिझ्झा बर्गर पर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे यंदाची दसरा आणि दिवाळी देशवासियांना अतिशय आनंदाची आणि कमी खर्चात जाणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला खऱ्या अर्थाने हायसं वाटणार आहे. आज आपण जाणून घेऊयात नेमक्या कोणकोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी लागणार? GST Savings Festival

1) खाद्यपदार्थ- अल्ट्रा-हाय टेम्परेचर (UHT) दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी टू इट चपाती, पराठा, खाखरा

2) शैक्षणिक साहित्य- पेन्सिल, वही, चार्ट, प्रयोगशाळेतील वह्या. व्यायामपुस्तक, आलेखपुस्तक, प्रयोगशाळेच्या नोटबुक आणि नोटबुकसाठी वापरले जाणारे अनकोटेड पेपर, पेपरबोर्ड. नकाशे

3) आरोग्य क्षेत्र- 33 जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा

कोणत्या वस्तूंवर ५ टक्के GST ?

1) खाद्यपदार्थ- वनस्पती तेल, ब्राझील नट्स, संत्री, दुग्धजन्य पदार्थ, बटर, तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, नारळपाणी

2) शाम्पू, तेल, साबण, शेव्हिंग क्रीम, दंत फ्लॉस, टूथपेस्ट, टूथ पावडर, टॉयलेट साबण, GST Savings Festival

3) किचनमधील वस्तू, लहान मुलांची दुधाची बाटली, छत्री, मेणबत्त्या, टेपर्स आणि तत्सम, हस्तनिर्मित मेणबत्त्या, शिलाई मशीन, नॅपकिन,डायपर्स, हँडबॅग, फर्निचर, भाजीपाला मेण

4) कृषी साहित्य- ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, सिंचन साहित्य, ठिंबक सिंचन साहित्य, पंप

5) वैद्यकीय वस्तू- थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, चष्मा, रबर, हातमोजे

6) नक्षीकाम केलेल्या वस्तू, हस्तनिर्मित कागद आणि पेपरबोर्ड, पेटिंग्ज, वीटा, टाईल्स, कार्टन्स, बॉक्स

कोणत्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी

1) इलेक्ट्रॉनिक वस्तू- एअर-कंडिशनिंग मशीन, वॉशिंग मशीन, एलईडी- एससीडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर

2) वाहने- लहान कार, तीनचाकी वाहने, रुग्णवाहिका, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, व्यापारी वाहने

3) ट्रॅक्टरसाठी लागणारे हायड्रोलिक इंधन, इंधन पंप (GST Savings Festival)

4) कोळसा; ब्रिकेट, ओव्हॉइड्स आणि तत्सम घन इंधन कोळशापासून बनवलेले
लिग्नाइट

5) पोर्टलँड सिमेंट, ॲल्युमिनियम सिमेंट, स्लॅग सिमेंट, सुपर सल्फेट सिमेंट आणि तत्सम हायड्रॉलिक सिमेंट

साताऱ्यातील पाथरपुंज जागतिक पर्यटनकेंद्र बनणार; सह्याद्रीच्या कुशीत लुटता येणार निसर्गसौंदर्याचा आनंद

Shambhuraj Desai On Patharpunj (3)

सातारा जिल्ह्याचं नाव आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरलेल्या आणि मागच्या काही वर्षात देशातील पावसाची जणू नवीन राजधानी बनलेल्या पाथरपुंज (Patharpunj) गावाला आपण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणणार आहोत अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. हॅलो महाराष्ट्राने पाथरपुंज या गावावर आणि तेथील निसर्गरम्य वातावरण, पावसाचे प्रमाण यावर केलेल्या एका विशेष डॉक्युमेंट्रीवर बोलताना शंभूराज देसाई यांनी हि माहिती दिली. तसेच त्यासाठीचा रोडमॅप कसा राहिल हे सुद्धा शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले.

पाथरपुंज हे गाव अजून बऱ्याच लोकांना माहित नाही… अशावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटवर, पर्यटन संचालनाच्या वेबसाईटवर, अगदी देशाचे जे पर्यटन विभाग आहे त्यांच्याशीही लिंकिंग करून पाथरपुंज हे गाव जागतिक नकाशावर आणण्याचे माझे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने १-२ बैठकही झाल्या आहेत अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली. सध्या पाथरपुंजला जायला रस्ता आहे, परंतु तो कच्चा रस्ता आहे. बऱ्याच वेळा तिथे चारचाकी घेऊन जाताना व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामुळे काही निर्बंध आहेत. पण इकोफ्रेंडली गाड्या घेऊन लोकांच्या त्याठिकाणी पाहणी करता येईल. यादृष्टीने आराखडा बनवायच्या सूचना मी वनविभागाला आणि आमच्या पर्यटनाला दिल्या आहेत असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत मी सांगितलं आहे. ते सुद्धा यासाठी आग्रही आहेत. येत्या महिन्यात किंवा २ महिन्यात आमचं प्राथमिक प्रारूप तयार होईल अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

एकदा का पाथरपुंजचा चेहरामोहरा बदलला आणि पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलं कि, सातारा जिल्ह्याला नवीन पर्यटन स्थळ मिळेल. याठिकाणी पावसाळ्यात तुम्ही मनसोक्त पावसाचा आनंद घेऊ शकता.. सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या अद्भुत निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटू शकाल. इथल्या निसर्गसह खाद्यसंस्कृतीची चव चाखण्याची संधी पर्यटकांना मिळेल. एकूणच काय तर पर्यटनाच्या दृष्टीने पाथरपुंज हे फक्त सातारच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

Shambhuraj Desai On Patharpunj : पाथरपुंजला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणणार; मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला रोडमॅप

Shambhuraj Desai On Patharpunj (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shambhuraj Desai On Patharpunj। देशातील सर्वाधिक पावसाची नोंद ज्याठिकाणी झाली ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज गाव पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यटनमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाथरपुंज गाव जरी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने याठिकाणी पर्यटक कसे आकर्षित होतील यासाठीचे माझे पर्यंत सुरु आहेत. मी यासंदर्भात एक – दोन बैठकाही घेतल्याचे मंत्री देसाई यांनी “हॅलो महाराष्ट्र” शी बोलताना सांगितले.

काय म्हणाले शंभुराज देसाई ? Shambhuraj Desai On Patharpunj

आज पाथरपुंजचा विचार जर केला तर पाथरपुंजमध्ये पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष रहिवास करणारी कुटुंबे त्याठिकाणी आहेत. काही लोक नोकरीनिमित्त साताऱ्याला आली,काहीजण मुंबई आणि पुण्याला गेली. वर्षातून एकदा – दोनदा हि लोक मूळगावी म्हणजेच पाथरपुंजला येत असतात. परंतु जेव्हा मी पर्यटन विभागाचा मंत्री झालो तेव्हा माझी एक कल्पना होती कि, जर देशातील सर्वाधिक पाऊस हा पाथरपुंजला होतो, जरी तो व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत असला तरी पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक कसे आकर्षित होतील यासाठीचे माझे पर्यंत सुरु आहेत….

पाथरपुंज हे गाव अजून बऱ्याच लोकांना माहित नाही… अशावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटवर, पर्यटन संचालनाच्या वेबसाईटवर, अगदी देशाचे जे पर्यटन विभाग आहे त्यांच्याशीही लिंकिंग करून पाथरपुंज हे गाव जागतिक नकाशावर आणण्याचे माझे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात मी एक- दोन वेळा प्राथमिक बैठकाही घेतल्या होत्या. आता ऑक्टोबरच्या महिन्यात माझ्या पर्यटन विभागाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीत आम्ही पाथरपुंजच्या पर्यटनाबाबत नियोजन ठरवेन. Shambhuraj Desai On Patharpunj

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, पाथरपुंजला जायला रस्ता आहे, परंतु तो कच्चा रस्ता आहे. बऱ्याच वेळा तिथे चारचाकी घेऊन जाताना व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामुळे काही निर्बंध आहेत. पण इकोफ्रेंडली गाड्या घेऊन लोकांच्या त्याठिकाणी पाहणी करता येईल का? यादृष्टीने आराखडा बनवायच्या सूचना मी वनविभागाला आणि आमच्या पर्यटनाला दिल्या आहेत. पाथरपुंजला विशेषतः जून, जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान पाऊस पडतो. या अडीच महिन्यात लोकांना पाथरपुंजला जाता येईल, तिथला पाऊस अनुभवता येईल, तेथील निसर्ग पाहता येईल आणि तिथली जी खाद्यसंस्कृती आहे तिचा अनुभव घेता येईल,.. वनडे ट्रिप ज्याला आपण म्हणतो म्हणजे सकाळी लवकर लोक पाथरपुंजला गेली आणि संध्याकाळी रिटर्न आली तरी हे एक चांगलं पर्यटन ठिकाण म्हणून पाथरपुंज उदयास येईल. त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.

येत्या महिन्यात किंवा २ महिन्यात आमचं प्राथमिक प्रारूप तयार होईल आणि पर्यटनाच्या बाबतीत अशी ठिकाणे जागतिक नकाशावर आणावीत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असतात, साताऱ्याचे सुपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबही आग्रही असतात. त्यामुळे आमचं वनविभाग आणि पर्यटन विभाग एकत्रितपणे याच प्रारूप तयार करणार आहोत ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांना दाखवू…. यांच्यात आणखी काही सुधारणा असतील तर त्या सुद्धा करू. तसेच निधी कसा उपलब्ध करायचा? व्याघ्र प्रकल्प आणि वन विभाग याच्या नियमांना कुठेही अडथळा न येता निसर्ग कसा पाहता येईल याचा विचार करू. पाथरपुंजला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा आमच्या प्रयत्न सुरु आहे असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

यंदा पाथरपुंजला किती पाऊस पडला?

दरम्यान, यावर्षी १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये (Patharpunj ) तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान, मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे. फक्त मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते

Patharpunj : पाथरपुंज – भारतातील पावसाची नवी राजधानी; टीम हॅलोच्या डॉक्युमेंटरीने उलगडलं सर्वाधिक पावसाचे रहस्य

Patharpunj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Patharpunj । मित्रानो, भूगोलाच्या पुस्तकात भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण चेरापुंजी असं आपण शिकलो आहे. मात्र आता महाराष्ट्रातील पाथरपुंज या गावात भारतातील सर्वाधिक पाऊसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणच्या कुशीत वसलेलं या गावात सर्वात जास्त पाऊस कसा काय पडतो? पाथारपुंजची भौगोलिक परिस्थिती नेमकी आहे तरी कशी ज्यामुळे वरुणराजाची कृपा सतत या परिसरावर असते हे जाणून घेण्यासाठी हॅलो महाराष्ट्राची टीम थेट पाथारपुंजला पोचली …. आणि मागोवा घेतला इथल्या निसर्गाचा… निसर्गात लपलेल्या वातावरण निर्मितीचा… अनुभव घेतला पाथारपुंजमध्ये कोसळणाऱ्या धो धो सरींचा… हॅलो महाराष्ट्राची हीच डॉक्युमेंट्री तुमच्या समोर आज ठेवतोय….

तर मित्रानो, पाथरपुंज या गावाचे भौगोलिक स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलले हे गाव पाटण तालुक्यात असले तरी सातारा, सांगली आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. येथील काही घरे तिन्ही जिल्ह्यांमध्ये विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर असूनही, येथे पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट वारणा धरणात जमा होते, ज्यामुळे वारणा धरण भरण्यामध्ये या गावाचा मोठा वाटा आहे.

पाथरपुंज मध्ये का पडतो इतका पाऊस? Patharpunj

पाथरपुंज मध्ये पाऊस इतका जास्त आणि प्रचंड पडतोय कि गावातील कमान हि पाण्याने शेवाळलेले आहे…. त्यामुळे गावाचे नावही कमानीवर दिसत नाही. समुद्रातील बाष्पीभवन घेऊन येणारे जे काही ढग आहेत, ते ढग सह्याद्रीला धडकतात आणि पाणी खाली पाडतात. यावेळी वाऱ्याचा जोर हा इतका प्रचंड असतो कि पाऊस आडवा तिडवा कसाही पडतो. जोपर्यंत ढगातील पाणी संपत नाही तोपर्यंत पाऊस पडत असतो. त्यामुळे दरवर्षी पाथरपुंजमध्ये मुसळधार आणि धुव्वाधार पाऊस कोसळतो. २०१९ पासून पाथरपुंज मध्ये सातत्याने सार्वधिक पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाची आकडेवारी सांगते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, खास करून जुलै महिन्यात पाथरपुंजमध्ये सतत पाऊस पाहायला मिळतो. स्थानिक सांगतात कि एकेकाळी पाथरपुंजला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायचा कि रेड्याच्या अंगावरचं कातडे जायचं…

यावर्षी १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये (Patharpunj ) तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान, मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे. फक्त मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन-

महत्वाची बाब म्हणजे पाथरपुंज हे गाव (Patharpunj) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये येते… साहजिकच जंगली प्राण्यांचा वावरही याठिकाणी पाहायला मिळतो. वारणा नदीचा उगमही याचा पाथरपुंज गावात होतो. सह्याद्रीत भयंकर पाऊस पडत असल्याने पावसाचे काही पाणी डोंगरावरून वाहून जाते तर काही पाणी जमिनीत मुरते. जमिनीत मुरलेले पाणी सह्याद्रीचा डोंगर त्याच्या पोटामध्ये साठवून ठेवतो.. कालांतराने हे पाणी झऱ्यांच्या माध्यमातून हळूहळू बाहेर पडते. अनेक ठिकाणी आपल्याला पाझर बघायला मिळतात…. नदीचा उगम हा अशाच पाझरामधून झालेला असतो. पाथरपुंजच्या २ किलोमीटर मागील बाजूला एक पाझर आहे, त्या पाझरातून वारणा नदीचा उगम झाला असं म्हंटल जाते. पाथरपुंजचे निसर्गरम्य वातावरण आणि मागच्या काही वर्षातील पावसाची आकडेवारी बघितली तर पाथरपुंज हे देशातील पावसाची नवी राजधानीच ठरली आहे असं म्हंटल तरी ते चुकीचं ठरणार नाही…

Rohit Sharma : होय, मी पुन्हा आलोय …. रोहितच्या व्हिडिओने चाहते खुश

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rohit Sharma । मुंबईचा राजा रोहित शर्मा… भारतीय क्रिकेट संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा याचा चाहतावर्ग मोठा आहे.. रोहितची एक झलक बघायला चाहते मोठ्या प्रमाणावर स्टेडियम मध्ये गर्दी करतात,… एवढच नव्हे तर रोहित जिथे जिथे जातो, तिथे तिथे त्याच्यासोबत चाहत्यांचा मोठा गराडा असतो. मात्र रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे… मागील अनेक दिवसांपासून रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. रोहितच्या निवृत्तीबाबत सुद्धा सतत चर्चा सुरु असतात. याच दरम्यान, रोहित शर्माने एक नवा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. होय मी पुन्हा आलोय, आणि मला खूप छान वाटतंय असं म्हणत रोहित शर्माने प्रॅक्टिस करत असतानाच विडिओ शेअर केला आहे.

काय आहे रोहितच्या व्हिडिओत? Rohit Sharma

खरं तर रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. अलिकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हिटमॅनच्या एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीबद्दल दावा करण्यात आला होता. मात्र आता थेट व्हिडिओच शेअर करत रोहितने या दावा फेटाळून लावला आहे.इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना दिसतोय कि, मी पुन्हा आलोय आणि मला इथे बरे वाटत आहे…. यावेळी रोहित सराव करताना दिसतोय आणि वेगवेगळे फटके मारताना दिसतोय… या व्हिडिओच्या माध्यमातून रोहितने निवृत्तीच्या चर्चाना पूर्ण विराम दिलाय. तसेच अजूनही माझ्यात भरपूर क्रिकेट शिल्लक आहे, अजूनही मी खेळू शकतो हेच दाखवण्याचा प्रयत्न रोहित शर्माने केला आहे.

दरम्यान, टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी20 क्रिकेटला अलविदा केला होता. 7 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधूनही त्याने निवृत्ती घेतली होती. मात्र आता वनडे फॉरमॅटमध्ये रोहित पूर्ण ताकदीने खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहितचे पुनरागमन होऊ शकते. त्याने शेवटचा भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद जिंकले होते. रोहितने (Rohit Sharma) न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ७६ धावा केल्या. त्याच्या खेळीसाठी रोहितला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर रोहित आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावर दिसलाच नाही.. अखेर त्याने आपला प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिलासा दिला आहे. रोहितने असच खेळत राहावे, २०२७ च्या विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करावे आणि भारताला वर्ल्ड कप जिंकवून द्यावा अशी इच्छा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे.

Gold Rate : सोन्याच्या किमती 229 टक्क्यांनी वाढणार?? प्रतितोळा 3.61 लाख रुपये मोजावे लागणार

Gold Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate। सोने हा भारतीयांचा आवडता दागिना.. कोणत्याही शुभकार्यात किंवा सणासुदीला अनेक भारतीय मोठ्या उत्साहाने सोन्याची खरेदी करतात. परंतु मागच्या काही वर्षात सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे. सद्यस्थितीत सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या पार गेला आहे. अशावेळी सोने खरेदी करावं का? कि किमती कमी झाल्यानंतर सोन्याची खरेदी करावी याबाबत ग्राहकांच्या मनात गोंधळाचे वातावरण आहे. आता सोन्याच्या किमतीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. भविष्यातही सोन्याचा दर असाच कायम वाढत राहील… येत्या काळात सोन्याच्या किमती २२९ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून ग्राहकांना एक तोळा सोन्याच्या खरेदीसाठी तब्बल 3.61 लाख रुपये मोजावे लागू शकतात. स्विस आशियाने हा अंदाज वर्तवला आहे.

स्विस आशियाने सोन्याच्या किमतींबाबत (Gold Rate) सर्वात मोठा दावा केला आहे. सोन्याची सध्याची किंमत प्रति १० ग्रॅम १.१० लाख रुपयांपर्यंत आहे. २०३२ पर्यंत सोन्याची किंमत ११९% वरून २२९% पर्यंत वाढू शकते. जर सोन्यात ११९% वाढ झाली तर नवीन किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे २,४०,९०० रुपये असेल. जर २२९% वाढ झाली तर ती प्रति १० ग्रॅम ३,६१,९०० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच, पुढील ७ वर्षांत सोने प्रति १० ग्रॅम २.४० लाख रुपयांवरून ३.६१ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. सोन्याच्या किमतींबाबतचा हा अन्दाज खरा ठरला तर एक तोळा सोने खरेदी करणंही सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाईल .

सध्या सोने प्रति औंस $३,६५० वर आहे. कॅपिटल लीगचे राजुल कोठारी म्हणतात की, नजीकच्या भविष्यात सोने $३,७००-$३,८०० पर्यंत जाऊ शकते. परंतु , अल्पावधीत २-५% ची घसरण देखील होऊ शकते.

का वाढत आहेत सोन्याच्या किमती? Gold Rate

जागतिक अनिश्चितता आणि भारतीयांची पारंपारिक खरेदी यामुळेच सोन्याच्या किमतीचा आलेख हा वर वरच जात आहे. स्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीचे सीईओ दर्शन देसाई यांच्या मते भविष्यात सोन्याच्या किमतीत काही चढउतार होतील, परंतु सुरक्षित गुंतवणुकीची मागणी आणि जागतिक आर्थिक परिस्थिती या दोन्ही कारणांनी सोन्याच्या किमती या वाढतच राहतील. दुसरीकडे, आयबीजेएचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनीही दर्शन देसाई यांच्या सुरात सूर मिसळत म्हंटल कि, जरी बाजार काही काळ स्थिर राहिला तरी, उत्सवाची मागणी आणि सुरक्षित गुंतवणुकीचा प्रवाह सोन्याच्या किमती कमी होऊ देणार नाही.

महाराष्ट्रात 48000 नव्या नोकऱ्या मिळणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली गुडन्यूज

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र सरकारने माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, गोदाम, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक्स हब यासारख्या क्षेत्रात सुमारे १.०९ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार (MOU) केले आहेत. या करारामुळे राज्यात ४८००० नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात उद्योजकांना सकारात्मक गुंतवणूक अनुभव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही यावेळी फडणवीसांनी म्हंटल.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड नागपूर जिल्ह्यातील कमलेश्वर लिंगा येथे एकात्मिक कोळसा पृष्ठभाग वायूकरण डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज प्रकल्पात ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, यामुळे ३०,००० रोजगार निर्माण होतील, तर पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड नंदुरबारमधील पॉलिमर उत्पादन प्रकल्पात २,०८६ कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहाकडून करण्यात येईल ज्यामुळे ६०० लोकांना रोजगार मिळेल. औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब उभारणीसाठी एमजीएसए रिअ‍ॅलिटी यांच्यावतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी ₹5000 कोटींची गुंतवणूक केली जात असून, यातून 10,000 रोजगार निर्मिती होईल.

लोढा डेव्हलपर्स लिमिटेड ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क उभारणार आहे. त्यातून ६,००० रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे १,५१३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकात्मिक अन्न आणि पेये उत्पादन सुविधा उभारेल, ज्यामुळे ५०० रोजगार निर्माण होतील.

यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे. उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

यावेळी राज्य सरकारच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन आणि अमरप्रकाश अग्रवाल (एमजीएसए रिअॅल्टी), अभिषेक लोढा (लोढा डेव्हलपर्स लिमिटेड), केतन मोदी (रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड), अजित बडोदिया (अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड) आणि प्रणय कोठारी (पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड) यांच्यात सामंजस्य करारांचे आदानप्रदान झाले.

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींना 1500 मिळण्यास सुरुवात; आत्ताच मोबाईल चेक करा

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana August Installment । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या यौजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेतून एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत… आता ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येणार याकडे लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्या होत्या. अखेर आज त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आजपासून ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलावर्गात मोठं आनंदाचे वातावरण आहे.

अदिती तटकरे यांनी दिली खुशखबर – Ladki Bahin Yojana August Installment

याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी x माध्यमावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हंटल की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. अदिती तटकरे यांच्या या ट्विटनंतर लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana August Installment) मोठा दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana August Installment) लाभाचं वितरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला रक्कम वर्ग करण्यात येते. त्याप्रमाणं सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णय 9 सप्टेंबरला जारी करण्यात आला होता. त्यामुळं ऑगस्ट महिन्याच्या लाभाचं वितरण करण्यासंदर्भातील एक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीय.