Saturday, December 6, 2025
Home Blog Page 12

Mobile Internet Saving Tips : मोबाईलचं नेट लगेच संपतंय? मग आत्ताच बदला ‘या’ सेटिंग्स

Mobile Internet Saving Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mobile Internet Saving Tips आजकाल मोबाईल म्हणजे आपला जीव कि प्राण… एकवेळ तुम्ही जेवण करायचं विसराल, परंतु मोबाईल हातात घेतल्याशिवाय राहणार नाही…. मोबाईलचे वेड आता व्यसनात बदलत आहे, आणि त्यातील इंटरनेट म्हणजे मोबाईलचा जणू आत्माच…. जसे पंख्याशिवाय पक्षी काहीच करू शकत नाही, त्याचप्रमाणे इंटरनेट शिवाय मोबाईलला किंमत नाही… म्हणूनच कि काय मोबाईलचे रिचार्ज कितीही महाग झाले तरी इंटरनेटच्या वापरासाठी आपण पैसे खर्च करतोच. सध्याच्या महागाईच्या काळात अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत, तर हे करत असताना दुसरीकडे इंटरनेट डेटा प्लॅन मात्र कमी केला आहे. त्यामुळे अनेकांना इंटरनेटची बचत करत करत वापर करावा लागतोय. अनेक वापरकर्त्यांची समस्या तर हीच असते कि त्यांचे नेट खटाखट उडते.. अशावेळी नेमकं काय करायचं? कोणती ट्रिक वापरून इंटरनेटची बचत करायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) डेटा सेव्हर मोड चालू करा-

सर्वात आधी तुमच्या मोबाईल सेटिंग्जमध्ये डेटा सेव्हर मोड सुरू करा. यामुळे बॅकग्राउंड डेटा वापर कमी होईल आणि तुमचा डेटा फक्त गरजेच्या ॲप्ससाठी वापरला जाईल. इतर कुठेही विनाकारण तो खर्च होणार नाही.

२) ऑटो अपडेट्स बंद करा- Mobile Internet Saving Tips

अनेकदा जेव्हा तुम्ही इंटरनेट डेटा सुरु करता तेव्हा अँड्रॉइड आणि आयफोनमधील अॅप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम ऑटोमॅटिक अपडेट होतात. यामुळे तुमची गरज नसतानाही फुकटचे नेट वाया जाते. त्यामुळे हे ऑटो अपडेट्स बंद करणे गरजेचं असते. यासाठी तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जावा. अॅप्स आणि सिस्टम अपडेट्स फक्त वायफायवर सेट करा. यामुळे तुमचे दररोजचे इंटरनेट वाचेल आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाचे वायफाय वापराल तेव्हाच ते अँप्स अपडेट होत राहतील.

३) WhatsApp डाउनलोड थांबवा-

कधी कधी तुमच्या WhatsApp वर येणारे फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड होतात… हे फोटो कधी आणि कसे आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात हे तुम्हाला माहितीही पडत नाही. परिणामी तुमचा इंटरनेट डेटा अनावश्यक्य संपतो. अशावेळी व्हाट्सअप सेटिंग मध्ये जावा… आणि ऑटो डाउनलोड बंद करा (Mobile Internet Saving Tips) . गरज असेल तेव्हाच फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करा.

४) व्हिडिओ लो क्वालिटी बघा –

तुमच्यापैकी अनेकजण युट्युब किंवा इतर प्लॅटफॉर्म वरून विडिओ बघत असतील. विडिओ बघत बसल्याने तर सर्वात जास्त इंटरनेट जाते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही युट्युब वर विडिओ बघाल तेव्हा त्याची क्वालिटी अतिशय लो ठेवा.. म्हणजे तुम्ही कितीही वेळ विडिओ बघितला तरी इंटरनेटची बचत होऊ शकते. तर मित्रानो, या सोप्या पद्धतींनी तुम्ही तुमच्या इंटरनेटची बचत करू शकता.

Mumbai To Nagpur Special Train : मुंबईवरून नागपूरसाठी सुरु होणार स्पेशल ट्रेन; कसा असेल रूट?

Mumbai To Nagpur Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Nagpur Special Train । महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरच्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई – नागपूर प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. सध्याच्या सणासुदीच्या काळात म्हणजे दुर्गादेवी, दसरा, दिवाळी या काळात मुंबई वरून नागपूरला वाजणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते, साहजिकच, जास्त प्रवासी एकाच वेळी प्रवासासाठी बाहेर पडल्याने गर्दी होते. गर्दीच्या संख्येनुसार, पुरेशी वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याचे प्रवाशांच्या प्रवासाचा खेळ खंडोबा होतो. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २५ सप्टेंबर पासून मुंबईतून नागपूरसाठी एक विशेष रेल्वे चालवली जाईल. या नव्या रेल्वेगाडीमुळे विदर्भवासीयांचा प्रवास आणखी सोप्पा, आरामदायी आणि जलद होण्यास मदत होणार आहे.

कसं असेल रेल्वेचे वेळापत्रक? Mumbai To Nagpur Special Train

ट्रेन क्रमांक ०२१३९ हि २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) वरून नागपूर असा प्रवास करेल. ही दिवाळी स्पेशल रेल्वे दर गुरुवारी मुंबईवरून मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०२१४० २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी नागपूरहून दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी मुंबईत दाखल होईल (Mumbai To Nagpur Special Train) . हि स्पेशल ट्रेन ३ एसी ३-टायर, १० स्लीपर, ५ जनरल सेकंड क्लास, २ सेकंड सीटिंग आणि गार्ड-ब्रेक व्हॅनसह असेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?

मुंबई ते नागपूर स्पेशल ट्रेन तिच्या प्रवासादरम्यान, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. Mumbai To Nagpur Special Train

पुणे नागपूर ट्रेनही धावणार –

मुंबईशिवाय मध्य रेल्वे सणासुदीच्या काळात पुणे ते नागपूर अशी रेल्वेही सुरु करणार आहे. पुणे – नागपूर विशेष रेल्वेगाडी 27 सप्टेंबरपासून (Pune Nagpur Special Train) सुरु होणार आहे. ही स्पेशल गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत धावेल. ०१२०९ नागपूर -पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. तर ०१२१० नागपूर- पुणे- नागपूर विशेष (१० सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. या प्रवासादरम्यान, ती उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड , जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

Nepal Protests : मोठी बातमी!! तरुण मुले थेट संसदेत घुसली; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

Nepal Protests

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nepal Protests। भारताचा शेजारी देश असलेला नेपाळ मोठ्या भीषण संकटात आहे. नेपाळच्या संसदेत हजारो तरुण मुले शिरली आहेत. तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत. या तरुण आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी आंदोलकांवर फायरिंग सुद्धा केली. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे. नेपाळ सरकारने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर हा सगळा राडा झाल्याचं बोललं जात आहे.

देशातील जनता सरकारवर नाराज – Nepal Protests

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी ४ सप्टेंबरपासून देशात सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली आहे. नेपाळ सरकारने 4 सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, वॉट्सऐप, रेडिट आणि X सारख्या 26 सोशल मीडिया ऐप्सवर बंदी घातली आहे. या बंदीचे मोठे पडसाद आज नेपाळ मध्ये पाहायला मिळाले. सोशल मीडियाच्या बंदीमुळे शिक्षण आणि व्यवसाय प्रभावित होत आहे असे या तरुण आंदोलकांचे म्हणणं आहे. आधीच नेपाळ मध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीवरून सरकार वर नाराजी आहे. त्यात आता सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केल्याने खास करून युवकांमध्ये संताप उसळला. या बंदीविरोधात राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हजारो Gen-Z तरुणांनी हिंसक निदर्शने केली. यादरम्यान शेकडो तरुण नेपाळच्या संसदेत घुसले.आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून आणि गेट ओलांडून न्यू बानेश्वर येथील संघीय संसद परिसरात घुसखोरी केली. Nepal Protests

या एकूण परिस्थितीमुळे संपूर्ण देशभरात मोठा गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू केली आहे. नेपाळी वृत्तपत्र ‘रिपब्लिका’नुसार, तरुण आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि डझनभर रबर बुलेटचा वापर केला. पोलिसांच्या कारवाईत एका आंदोलकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. काठमांडू डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऑफिसने संपूर्ण न्यू बानेश्वरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे . मुख्य जिल्हाधिकारी छाबीलाल रिजाल यांनी सेक्शनमध्ये 6 अंतर्गत दुपारी 12. 30 पासून लावलेला कर्फ्यू रात्री 10 वाजेपर्यंत असेल.

Pune Nagpur Special Train : पुणे- नागपूरसाठी विशेष ट्रेन; पहा कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार

Pune Nagpur Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nagpur Special Train । सध्याचे दिवस हे सणासुदीचे दिवस आहेत. नुकतंच सर्वानी गणपती विसर्जन केलं आहे. यानंतर आता महिन्याच्या अखेरीस नवरात्री आणि पुढच्या महिन्यात दिवाळीचा सण येईल. सणासुदीच्या काळात मुंबई- पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरांत काम करणारा नोकरदार वर्ग मूळगावी जातो. एकाच वेळी जास्त लोक प्रवासासाठी बाहेर पडल्याने गर्दी तर होणारच… तसेच या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.येत्या २७ सप्टेंबर पासून नागपूर ते पुणे अशी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या रेल्वेगाडी मुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल. तसेच नवरात्रीच्या काळात प्रवाशांचा प्रवासही सोप्पा आणि आरामदायी होईल.

कसे असेल ट्रेनचे वेळापत्रक? Pune Nagpur Special Train

पुणे – नागपूर विशेष रेल्वेगाडी 27 सप्टेंबरपासून (Pune Nagpur Special Train) सुरु होणार आहे. ही स्पेशल गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत धावेल. ०१२०९ नागपूर -पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. तर ०१२१० नागपूर- पुणे- नागपूर विशेष (१० सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?

मध्य रेल्वेने या विशेष रेल्वेगाडीला (Pune Nagpur Special Train) या मार्गावरील 14 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार, पुणे नागपूर स्पेशल ट्रेन उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड , जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. सद्यस्थितीत नागपूर वरून पुण्याला रेल्वेने यायचं म्हंटल तर रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय मर्यादित आहे. अशावेळी या नवीन स्पेशल ट्रेन मुळे प्रवाशांना दिवाळीच्या काळातही जलद आणि सुरक्षित प्रवास अनुभवायला मिळेल अशी आशा रेल्वे विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाला पुन्हा धक्का? GR विरोधात भुजबळ कोर्टात जाणार

Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित करण्यासाठी सरकारने नवीन GR काढत हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी केली. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला. आपल आरक्षण जातंय कि काय अशी भावना ओबीसी समाजात निर्माण झाली. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात भुजबळ आता थेट मुंबई हायकोर्टात जाणार आहेत. छगन भुजबळ यांच्याकडून येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे.

भुजबळांना इतर राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता- Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan

भुजबळांना इतर नेत्यांचाही छगन भुजबळ यांनी यापूर्वीही सरकारने काढलेल्या जीआरवर नाराजी व्यक्त केली होती. सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज किंवा उद्या मराठा आरक्षण संदर्भातील निर्णयाला हायकोर्टात याचिका दाखल करत छगन भुजबळ हे आव्हान देणार आहेत. खरं तर यासाठी मागील ३-४ दिवसांपासून छगन भुजबळ अनेक वकिलांसोबत चर्चा करत आहेत. ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळणी सुरु होती. ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे येत्या २ दिवसांत मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात कोर्टाचे दार ठोठावतील. विशेष बाब म्हणजे छगन भुजबळ हे सर्व ओबीसी नेत्यांच्यावतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल (Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan) करणार आहेत. म्हणजेच त्यांना ओबीसी समाजातील इतर राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. तसेच मराठा विरुद्ध ओबीसी हा नवा वादही उफाळून येऊ शकतो.

मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विचारलं असता, आमच्या जीआरला खोड करून अडचणी आणल्यास महाराष्ट्रात यांना येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा रोष घेणार नाहीत असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच आम्हाला हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या, अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

Mumbai Local Train : मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सोप्पा; AC लोकल होणार 18 डब्ब्यांची

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबई लोकल मधून प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी व्हावा आणि त्यांना गारेगार प्रवासाचा आनंद मिळावा यासाठी रेल्वेने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईकरांना आता १८ डब्यांची एसी लोकल मिळणार आहे. हि लोकल ट्रेन वंदे मेट्रो सारखी असेल. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे २,८५६ वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि दीर्घकालीन देखभालीसाठी ई-निविदा जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई लोकल ट्रेनचा चेहरामोहराच बदलणार आहे.

२ नवीन डेपोही उभारणार – Mumbai Local Train

सध्या मुंबईत मुख्यतः १२ आणि काही ठिकाणी १५ डब्यांच्या लोकल धावतात. मात्र, नवीन AC लोकल ट्रेन १२, १५ आणि १८ डब्यांची असेल. पुढील ७ ते ८ वर्षांत मुंबई उपनगरीय सेवेत कमीत कमी २३८ AC लोकल ट्रेन उपलब्ध होतील. या लोकलमुळे (Mumbai Local Train) मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी आणि वेगवान होणार आहे. १२/१५/१८ डब्याच्या AC लोकल ट्रेनच्या कॉन्फिगरेशनमध्ये ३५ वर्षे देखभाल केली जाईल, ज्यामध्ये MUTP-III आणि MUTP-3A अंतर्गत दोन नवीन देखभाल डेपोची स्थापना करण्यात येईल असे MRVC ने एका निवेदनात म्हटले आहे. मध्य रेल्वेवरील भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथे हि २ नवीन डेपो तयार केले जातील.

मार्चमध्ये, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की, मुंबई उपनगरीय नेटवर्कसाठी २३८ वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. “मी महाराष्ट्रात होतो आणि मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. आम्हाला आनंद होत आहे की २३८ नवीन लोकल ट्रेन खरेदीला अखेर मंजुरी देण्यात आली आहे,” असे वैष्णव यांनी संसदेत सांगितले होते. अखेर आता याबाबत निविदा काढण्यात आली असून रेल्वेमंत्र्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. ही निविदा सादरीकरण ८ डिसेंबरपासून सुरू होईल आणि निविदा उघडण्याची तारीख २२ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली. ही निविदा मेक इन इंडिया धोरणानुसार राबवली जाणार आहे. ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि तंत्रज्ञानाला चालना मिळेल.

नवरात्रीच्या काळात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी सुरू होणार नवीन बससेवा

Navratri Special Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षी नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात. या दिवसांत अनेक भाविक महाराष्ट्रातील साडेतील शक्तीपिठांचे दर्शन घेत असतात. आणि देवीकडे साकडं मागत असतात. तुम्हीही यंदा साडेतीन शक्तिपीठांना भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. कारण नवरात्रीच्या काळात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी नवीन बससेवा सुरु होणार आहे. हि बस सेवा पुण्यातून सुरु होणार असल्याने पुणेकरांना याचा विशेष लाभ मिळणार आहे.

कधी आणि कुठून होणार नवरात्री बस सेवा –

कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी व वणीची सप्तशृंगी देवी अशा साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घडवून आणणारी बससेवा 27 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड आगारातून सुटणार आहे. हि बस पहिल्या दिवशी कोल्हापूरला जाईल. त्याठिकाणी तुम्ही अंबाबाईचे दर्शन घेऊ शकता. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर तेथून ही बस तुळजापूरला जाईल.. तुळजापुरात तुम्हाला तुळजाभवानीचे आशीर्वाद घेता येथील. तुळजापूरातच तुमचा मुक्काम असेल.

पुढे दुसऱ्या दिवशी ही गाडी माहूरला जाणार आहे. त्याठिकाणी रेणुका मातेचे दर्शन झाल्यानंतर माहूरलाच या बसचा मुक्काम राहणार आहे. तिसऱ्या दिवशी ही विशेष बस नाशिक जिल्ह्यातील वणी येथे जाणार आहे. वणी येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आणि आणि मग बसचा परतीचा प्रवास सुरू होईल. पुन्हा हि बस पिंपरी चिंचवड आगारात येईल.

पिंपरी चिंचवड आगाराच्या स्थानक प्रमुख वैशाली कांबळे यांनी हि माहिती दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाविकांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुम्ही या गाडीने नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यातील तीनही शक्तीपीठांना भेटी देऊन दर्शन घेऊ शकता. आणि देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊ शकता.

Free Toll To Electric Vehicles : आता 100 टक्के टोल माफी; सरकारची सर्वात मोठी घोषणा

Free Toll To Electric Vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Free Toll To Electric Vehicles । महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी २०२५’ अंतर्गत राज्यातील प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना १००% टोलमाफी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाबाबत माहिती देताना म्हंटल कि, सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक गाड्यांना चालना मिळेल आणि पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा होईल. या योजनेत M2, M3 आणि M6 श्रेणीतील चारचाकी इलेक्ट्रिक वाहने, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या व खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसना टोल भरण्याची गरज राहणार नाही.

पर्यावरणपूरक वाहतूक वाढावी, पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि ग्राहकांचा खर्च वाचावा, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामूळेच आता प्रमुख महामार्गावर इलेक्ट्रिक गाडयांना टोल मधून १०० टक्के सूट दिली आहे. यामध्ये या निर्णयामुळे मुंबई-पुणे यशवंतराव चव्हण महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावरून प्रवास करताना इलेक्ट्रिक गाड्यांकडून कोणताही प्रकारचा टोल (Free Toll To Electric Vehicles) आकारला जाणार नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या पैशाची मोठी बचत होईल. आधीच इलेक्ट्रिक गाड्यांमुळे पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचतोय….,. आता सरकारने इलेक्ट्रिक गाडयांना टोल माफी केल्यामुळे आणखी पैसे वाचणार आहेत. म्हणजेच काय तर इलेक्ट्रिक वाहनधारकांना डबल फायदा होणार आहे.

कोणत्या इलेक्ट्रिक गाडयांना टोलमाफी – Free Toll To Electric Vehicles

महाराष्ट्र EV पॉलिसी २०२५ अंतर्गत टोलमाफी फक्त विशिष्ट श्रेणीच्या इलेक्ट्रिक वाहनांना लागू आहे. यात M2, M3 आणि M6 श्रेणीच्या चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा (जसे की टाटा नेक्सॉन EV, MG ZS EV, महिंद्रा XUV400 सारखी पॅसेंजर EVs) आणि इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. राज्य परिवहन महामंडळ (STU) आणि खासगी कंपन्यांच्या EVs बसेसमध्येही ही माफी लागू होईल. मात्र, ही वाहने महाराष्ट्रात नोंदणीकृत असावीत आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक असावीत. सध्या फक्त मुंबई-पुणे यशवंतराव चव्हण महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक गाडयांना टोलमाफी आहे. इतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना ५०% टोल सवलत मिळेल. ही पॉलिसी २०३० पर्यंत लागू राहील. त्यासाठी सरकारने १,९९३ कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे.

Anukampa Recruitment : अनुकंपा तत्त्वावरील 10,000 रिक्त जागा भरणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Anukampa Recruitment 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Anukampa Recruitment  । गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील महायुती सरकारने अनुकंपा तत्त्वावर (Compassionate Appointment) रिक्त असलेल्या १० हजार जागा तातडीने भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याद्वारे चतुर्थ श्रेणीतील रिक्त जागा सुद्धा भरल्या जाणार आहेत. ज्यामध्ये राज्यभरातील जवळपास 9 हजार 658 जागा आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी लागणार असून, राज्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व जागा भरल्या जाणार आहेत.

विशेष बाब म्हणजे एकाच वेळी १० हजार जागा भरण्याचा निर्णय राज्यात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे, त्यामुळे हि भरती अनुकंपा भरतीच्या (Anukampa Recruitment ) इतिहासातील सर्वात मोठी भरती ठरणार आहे. या भरतीत चतुर्थ श्रेणीतील जागांचा मोठा वाटा असून, त्या थेट शासकीय व्यवस्थेमार्फत भरल्या जाणार आहेत. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील एकूण ९,५६८ उमेदवारांचा समावेश आहे. चतुर्थ श्रेणीतील भरती ही खाजगी कंत्राटदराकडून केली जाते. मात्र अनुकंपावरील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार असल्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर पूर्ण करण्यासाठी सरकारने संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

कुठे कुठे होणार नियुक्त्या ? Anukampa Recruitment 

महानगरपालिका – ५,२२८ उमेदवार प्रतीक्षेत

जिल्हा परिषद – ३,७०५ उमेदवार प्रतीक्षेत

नगरपालिका – ७२५ उमेदवार प्रतीक्षेत

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 506 उमेदवार प्रतीक्षेत असून, त्यानंतर पुणे (348), गडचिरोली (322) आणि नागपूर (320) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे या शाशन निर्णयाचा संबंधितांना फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. नोकरी मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचीही भरभराट होईल.

अनुकंपा धोरण म्हणजे काय?

राज्यातील शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला त्या विभागात नोकरी देण्याची तरतूद अनुकंपा धोरणात आहे. हे धोरण 1973 पासून लागू आहे. हे धोरण मुख्यत्वे गट-क आणि गट-ड पदांसाठी लागू होते.

Mumbai Bomb Blast Threat : उद्या मुंबईत बॉम्बस्फोट होणार; 14 दहशतवादी शहरात शिरल्याची धमकी

Mumbai Bomb Blast Threat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Bomb Blast Threat । उद्या अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन… मुंबई पुण्यासारख्या मोठया शहरात गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर गर्दी करतात आणि वाजत गाजत गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. गणेश विसर्जनाच्या दृष्टीने मुंबईत ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरु असतानाच आता मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. उद्या मुंबई बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असून त्यासाठी 34 गाड्यांमध्ये 400 किलो RDX तयार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे.

14 पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसले – Mumbai Bomb Blast Threat

गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशीच मुंबई पोलिसांना एक धमकीचा मेसेज मिळाला आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याचं या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. यामध्ये म्हंटल आहे कि उद्या मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहे. या स्फोटांमध्ये ४०० किलो आरडीएक्स वापरला जाईल… ज्यामुळे जवळपास १ कोटी माणसे मारली जातील. धमकी देणाऱ्या व्यक्तीने लष्कर-ए-जिहादी” नावाच्या गटाचे नाव पुढे नमूद केले आहे. आणि १४ पाकिस्तानी दहशतवादी आधीच शहरात घुसले असल्याचा दावा केला आहे. या धमकीच्या मेसेज मुळे (Mumbai Bomb Blast Threat) मुंबईत खळबळ उडाली आहे.

तपास यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये-

मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणांनी ही धमकी (Mumbai Bomb Blast Threat) गांभीर्याने घेतली आहे. त्यानुसार सायबर आणि दहशतवादविरोधी युनिट्सना त्याचे मूळ शोधण्यासाठी तैनात करण्यात आले आहे, शहरातील महत्वाचे चौक, धार्मिक मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा धमकीचा मेसेज कुठून आला आणि यात किती सत्यता आहे याची माहिती आम्ही घेत आहोत. नागरिकांना शांत राहावे. कोणतीही संशयास्पद हालचाली दिसली तर याबाबत माहिती द्या.

दरम्यान, मुंबईत उद्या ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका निघालेल्या दिसतील. खास करून परळ-लालबाग आणि गिरगाव चौपाटीला गणेश भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), परळचा राजा (नरेपार्क), परळचा महाराजा, परळचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज) या मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्ती विसर्जनासाठी निघणार आहे. त्यामुळे अर्धी मुंबई उद्या रस्त्यांवर असेल. एकीकडे सर्वत्र गणेश विसर्जनाची लगबग सुरु असताना मुंबईत बॉम्बस्फोटांची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.