Saturday, July 26, 2025
Home Blog Page 4

8th Pay Commission : 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? सरकारने दिली महत्वाची माहिती

8th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 8th Pay Commission । ८ व्या वेतन आयोग कधी लागू होतोय याची वाट केंद्रीय कर्मचारी आतुरतेने बी बघत आहे. आता हा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याबाबत सरकार कडून महत्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. आठव्या वेतन आयोगासाठी अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती होताच ते अधिसूचित केले जाईल अशी माहिती सरकार कडून करण्यात आली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे.

खरं तर, आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) अधिसूचना अद्याप जारी केलेली नाही. कारण, अर्थ मंत्रालयाने अद्याप संदर्भ अटी (टीओआर) अंतिम केलेल्या नाहीत, ज्या १ कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शनच्या सुधारणेसाठी आधार बनतील. कालपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झालं. पहिल्याच दिवशी खासदार टीआर बाळू आणि आनंद भदोरिया यांनी ८ व्या वेतन आयोगाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. सरकारने जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या आठव्या वेतन आयोगाची अधिसूचना केली आहे का?? असा सवाल दोन्ही खासदारांनी सरकारला केला.

यावर उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले, “सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग (CPC) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि राज्यांसह प्रमुख भागधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर, त्याची अधिसूचना जारी केली जाईल. जेव्हा आयोग त्यांच्या शिफारस देईल आणि सरकार त्या स्वीकारतील त्यानंतरच आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार हे ठरवले जाणार आहे असेही पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं. 8th Pay Commission

का होतोय उशीर ? 8th Pay Commission

खरं तर केंद्र सरकारने जानेवारीमध्येच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती, परंतु आतापर्यंत त्याचे अध्यक्ष, सदस्य किंवा कार्यकाळ याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आयोगाच्या स्थापनेपासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला बराच वेळ लागतो. सुमारे १.१२ कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये ७ व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच हा आयोग सुरू होईल असं बोललं जातेय.

Vivo Mobiles : 12GB रॅम, 6,000mAh बॅटरीसह Vivo ने लाँच केले 2 नवे मोबाईल

Vivo Mobiles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vivo Mobiles । प्रसिद्ध मोबाईल निर्माता ब्रँड Vivo ने आपले २ नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G असं या दोन्ही मोबाईलची नावे असून हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या Y सिरीज अंतर्गत लाँच झाले आहेत. यामध्ये तुम्हाला 12GB रॅम, 6,000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स बघायला मिळतील. मोबाईलचा लूक सुद्धा अतिशय आकर्षक आहे. आज आपण या दोन्ही हँडसेटचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

डिस्प्ले –

Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.74-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1,600 पिक्सेल रिझोल्यूशन, 1,000 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 5G चिपसेट बसवण्यात आली आहे. हे दोन्ही मोबाईल एकूण ३ स्टोरेज व्हॅरियन्ट मध्ये लाँच करण्यात आले असून तुम्हाला यात जास्तीत जास्त 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइड आधारित OriginOS 5 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात.

कॅमेरा – Vivo Mobiles

मोबाईलच्या (Vivo Mobiles) कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G च्या पाठीमागील बाजूला एकच 13MP चा कॅमेरा आहे, ज्यामध्ये f/2.2 अपर्चर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6,000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. हि बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, हा मोबाईल 52 तासांपर्यंत टॉकटाइम देऊ शकतो.

अन्य फीचर्स?

इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झाल्यास, या दोन्ही स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 5G सपोर्ट, ब्लूटूथ 5.4, वाय-फाय, GPS, Beidou, GLONASS, Galileo, QZSS, 3.5mm ऑडिओ जॅक, OTG आणि USB टाइप-C सारखे पर्याय मिळतील. सुरक्षेसाठी, मोबाईल मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुविधा आहे. (Vivo Mobiles)

किंमत किती?

Vivo Y50 5G 4GB + 128GB – CNY 1,199 (सुमारे 13,000 रुपये)

Vivo Y50m 5G 6GB+128G- CNY 1,499 (अंदाजे 18,000 रुपये )

Vivo Y50m 5G 8GB+256GB – CNY 1,999 (अंदाजे 23,000रुपये )

Vivo Y50m 5G 12GB+256GB – CNY 2,299 (अंदाजे 26,000 रुपये ) हे दोन्ही मोबाईल सध्या चीनमध्ये लाँच झाले आहेत.

प्रेम करता येणं हेच माणूसपणाचं लक्षण – सचिन परब

sachin parab

पुणे, दि. २१ : एखाद्या व्यक्तीचा आहे तसा स्वीकार करणे ही भावना प्रेमातूनच जन्माला येते. माणसाचा मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असू दे, त्याला माणूस म्हणून स्वीकारणं, ही गोष्ट महत्त्वाची असून प्रेम करता येणं हेच माणूसपणाचं लक्षण आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केलं. सारद मजकूरच्या वतीने मुळातून माणूस हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तेजस्विनी गांधी आणि अभिजित सोनावणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शनिवारी (दि. २१) एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डेलीहंटचे सिनियर मॅनेजर महेंद्र मुंजाळ, ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे, नितीन कोत्तापल्ले, प्रतीक पुरी, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, प्रा. संजय तांबट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. माणसातल्या माणूसपणाला सलाम करण्यासाठी सारद मजकूरच्या वतीने दर महिन्याला ‘मुळातून माणूस’ हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी चार जणांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

परब म्हणाले, ‘प्रेम ही जबरदस्त गोष्ट असून तो एक विचार आहे. आपला देश आज जाती-पातीत अडकून पडला आहे. याला उतारा म्हणून प्रेम हीच जात आणि प्रेम हाच धर्म ही शिकवण संतांनी रुजवली. विठ्ठलाच्या भक्तीतून प्रेमाची भावना संतांनी जनमानसात पेरली. मराठी माणसातल्या माणूसपणाचा शोध घेत मागे गेलो असता तो थेट पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत नेतो.’

वर्तमानपत्रांच्या वाचनानं दिलेलं भान, कांदिवलीच्या चाळीतून एकमेकांमध्ये सहज मिसळण्याची तयार झालेली वृत्ती, भेटलेल्या माणसांमधून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून येत गेलेलं शहाणपण, मुंबईच्या महानगरात जपलं गेलेलं गावपण, आई-वडील आणि जवळच्या माणसांकडून मिळालेल्या गोष्टी या विषयांवरही सचिन परब यांनी यावेळी मांडणी केली.

फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड या भूमिकेतून एखाद्यावर सहज विश्वास ठेवून अनेकांना लिहितं केल्याच्या भावना सचिन परब यांच्याबद्दल काहींनी व्यक्त केल्या. थिंक बँकचे विनायक पाचलग, एमआयटीचे संचालक महेश थोरवे, कीर्तनकार स्वामीराज भिसे, लेखिका अमृता देसर्डा, रेणुका कल्पना, सदानंद घायाळ, हर्षदा परब यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रसन्न कुलकर्णी यांनी आभार मानले.

Bangladesh Fighter Jet Crash : लष्कराचे विमान शाळेवर कोसळलं!! कुठे घडला अपघात?

Bangladesh Fighter Jet Crash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bangladesh Fighter Jet Crash । अहमदाबाद विमान अपघाताप्रमाणे आणखी एक विमान थेट शाळेवर कोसळलं आहे. मात्र हि घटना भारतात नव्हे तर बांगलादेश मध्ये घडली आहे. अंडी जे विमान कोसळलं ते प्रवासी विमान नव्हतं तर लष्कराचे विमान होते. या विमान अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे बोललं जातंय तर काहीजण जखमी झाले आहेत. ढाका शहराच्या उत्तर भागात हि दुर्घटना घडली असून घटनास्थळी आग आणि धुराचे लोट बघायला मिळत आहेत.

शाळेच्या कॅम्पसचे मोठे नुकसान- Bangladesh Fighter Jet Crash

याबाबत अधिक माहिती अशी कि , F-7 BGI असं या हवाई दलाच्या विमानाचे नाव होते. बांगलादेशची राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हे विमान कोसळलं. विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले आणि उड्डाणानंतर लगेचच ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली. आग विझवण्यासाठी आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. बांगलादेश सैन्याच्या जनसंपर्क कार्यालयाने या अपघातात आत्तापर्यंत १ मृत्यू आणि १०० हुन अधिक जखमी झाल्याचे सांगितलं आहे.

विमान थेट शाळेवर कोसळल्याने (Bangladesh Fighter Jet Crash) शाळेच्या कॅम्पसचे मोठे नुकसान झाले आहे. घटनस्थळी आग आणि धुराचे लोट पाहायला मिळाले. विमान अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात स्पष्टपणे जळत्या ढिगाऱ्याचे आणि जखमींचे फोटो दिसत आहेत. तसेच आरडाओरडा सुरु आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु या विमान अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बांगलादेशचे सध्याचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हंटल की सरकार अपघाताची कारणे तपासेल आणि सर्व प्रकारची मदत सुनिश्चित करेल. या अपघातात हवाई दल, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजचे कर्मचारी आणि इतरांचे झालेले नुकसान अपूरणीय आहे. हा देशासाठी खोलवर रुतलेला असा दु:खाचा क्षण आहे.

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर विमानाचा अपघात; Air India चा टायर फुटला अन …

Mumbai Airport Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Airport मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. हे विमान कोचीहून मुंबईला आले होते. त्यावेळी लँडिंग करताना विमानाचे ३ तयार फुटले. पायलटच्या प्रसंगवधाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, आणि विमान सुरक्षितपणे टर्मिनल गेटपर्यंत पोचले. मात्र या घटनेने एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.

नेमकं काय घडलं? Mumbai Airport

२१ जुलै २०२५ रोजी कोचीहून मुंबईला येणाऱ्या फ्लाईट एआय-२७४४ च्या लँडिंग दरम्यान मुसळधार पाऊस पडला. हवामान खराब असल्यामुळे लँडिंगदरम्यान, काही क्षणातच विमानावरील नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरून घसरले. यावेळी विमानाचे ३ तयार फुटले. तसेच एका इंजिनला नुकसान झाल्याचे दिसून येते.इंजिनचा एक भाग धावपट्टीच्या डांबरी भागावर आदळला. मात्र, वैमानिकच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षितपणे टर्मिनल गेटपर्यंत पोहोचले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.

या घटनेनंतर मुंबई विमानतळाने (Mumbai Airport) एक निवेदन जारी केले. त्यात म्हंटल कि, २१ जुलै रोजी कोचीहून मुंबईच्या दिशेनं येणारं एआय २७४४ हे विमान लँडिंगनंतर धावपट्टीवरून घसरले. मात्र, वैमानिकच्या सर्तकतेमुळे विमान सुरक्षितरित्या गेटपर्यंत पोहोचले. यानंतर सीएसएमआयएच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना तात्काळ सक्रिय करण्यात आले. विमान लँड झाल्यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं असे निवेदनात म्हटले आहे. विमानतळाची प्राथमिक धावपट्टी – ०९/२७ ला सुद्धा या अपघातामुळे किरकोळ नुकसान झाल्याची नोंद आहे. कामकाज सुरू राहावे यासाठी, दुय्यम धावपट्टी १४/३२ – सक्रिय करण्यात आली आहे. सीएसएमआयएमध्ये, सुरक्षितता नेहमीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असते,” असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतर सातत्याने विमानाच्या तांत्रिक अडचणीच्या आणि इमर्जन्सी लँडिंगच्या बातम्या समोर येत आहेत. मागच्या सोमवारी तर मुंबई विमानतळावरच (Mumbai Airport) उभ्या असलेल्या अकासा विमानाला एका मालवाहतूक ट्रकने धडक दिली. या धडकेत विमानाच्या पंखाचे थोडेफार नुकसान झालं होते. सदर विमान हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होते. त्याच वेळी एक मालवाहतूक करणारा ट्र्क विमानाच्या संपर्कात आला. आणि विमानाला धडक दिली. या धडकेत कर्मचाऱ्यांना किंवा प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र घटनास्थळावरील एका फोटोमध्ये विमानाचा एक पंख ट्रकमधून किंचित बाहेर पडल्याचे दिसून आलं होते.

Mumbai Ganeshotsav Special Trains : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात धावणार 3 स्पेशल ट्रेन; कुठून कशी धावणार?

Mumbai Ganeshotsav Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Ganeshotsav Special Trains । येत्या २७ ऑगस्टला गणेशोत्सव असून गणरायाच्या आगमनाची सर्वच आतुरतेने वाट बघत आहेत. खास करून कोकणी माणसासाठी गणपती उत्सव म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा सण…. मुंबई- पुणेसारख्या ठिकाणी कामाला आलेला चाकरमानी कोकणी माणूस एकवेळ दिवाळीला गावी जाणार नाही, पण गणपतीला हटून सुट्टी घेणार म्हणजेच घेणारच आणि कोकणात जाऊन उत्साहाने गणेशाचे स्वागत करणार…. त्यामुळे साहजिकच, कोकणात जाणाऱ्या एसटी बस आणि ट्रेनला मोठी गर्दी बघायला मिळते. यावर उपाय म्हणून आणि प्रवाशांचा प्रवास कोणत्याही ताणाशिवाय व्हावा यासाठी पश्चिम रेल्वेने ३ विशेष ट्रेनची घोषणा केली आहे.

१) मुंबई सेंट्रल – ठोकूर ट्रेन –

ही ट्रेन २६ ऑगस्टपासून धावेल. ट्रेन क्रमांक ०९०११ मुंबई सेंट्रल – ठोकूर स्पेशल (Mumbai Ganeshotsav Special Trains) मुंबई सेंट्रलहून दर मंगळवारी सकाळी ११:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर २०२५ रोजी धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१२ ठोकूर – मुंबई सेंट्रल स्पेशल बुधवारी सकाळी ११:०० वाजता ठोकूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर २०२५ रोजी धावेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –

ही ट्रेन बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरडेश्वर, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंडापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरथकल स्टेशनवर या रेल्वे स्टेशनवर थांबेल. या ट्रेन मध्ये एसी २-टायर, एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील .

२) मुंबई सेंट्रल – सावंतवाडी ट्रेन – Mumbai Ganeshotsav Special Trains

ट्रेन क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड स्पेशल ट्रेनआठवड्यातून ४ दिवस रविवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार धावेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल. ती मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. . त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०२० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल आठवड्यातून ४ दिवस म्हणजे रविवार, सोमवार, गुरुवार, शनिवार धावेल. ही ट्रेन सावंतवाडीहून सकाळी ०४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८:१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही रेल्वेगाडी २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल. Mumbai Ganeshotsav Special Trains

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –

हि रेल्वेगाडी बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी २-टियर, एसी ३-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.

३) वांद्रे टर्मिनस – रत्नागिरी

ही गाडी २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल. (Mumbai Ganeshotsav Special Trains) ट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस – रत्नागिरी स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी दुपारी २:२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ००:३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१६ रत्नागिरी – वांद्रे टर्मिनस स्पेशल ट्रेन दर शुक्रवारी पहाटे ०१:३० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल.

कोनोकणत्या स्थानकांवर थांबा –

वांद्रे टर्मिनस – रत्नागिरी ट्रेन बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये द्वितीय श्रेणीचे आसन आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.

Fuel Price Hike Soon : पेट्रोल 8-10 रुपयांनी महागणार!! ट्रम्पमुळे भारत टेन्शनमध्ये

Fuel Price Hike Soon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fuel Price Hike Soon। जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत तेव्हापासून साऱ्या जगाला त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे टेन्शन देत आहेत. आता त्यांनी थेट रशियाला धमकी दिली आहे, परंतु त्याचा फटका भारताला बसणार आहे. रशियाने युक्रेन विरोधातील युद्ध ५० दिवसांत बंद केलं नाही तर अमेरिका रशियावर आणि रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅक्स लावेल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या या धमकीने भारताच्या कच्च्या तेलाच्या आयात धोरणावर मोठा परिणाम होणार आहे. एवढच नव्हे तर भारतात पेट्रोलच्या किमती ८ ते १० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

रशियाकडून जर भारताने कच्चे तेल घेणे बंद केले नाही तर अमेरिका १०० टक्के टॅरिफ लादणार असल्याची धमकी ट्रम्प (Donald Trump) यांनी दिली आहे. जर भारताने ही धमकी गांभिर्याने घेतली व रशियाकडून (Russia) तेल आयात करणे थांबविले तर आपल्यालाच मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कारण भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या सुमारे ३५-४०% रशियाकडून आयात करतो. जर ट्रम्प यांचा इशारा प्रत्यक्षात आला आणि रशियाकडून तेल खरेदी करण्यावरील आर्थिक दबाव वाढला, तर भारताला पर्यायी पुरवठा स्रोत शोधावे लागतील, जे स्वस्त नसतील. याचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. (Fuel Price Hike Soon)

भारत रशियाकडून ३५-४० % तेल खरेदी करतो- Fuel Price Hike Soon

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अलिकडच्या एका कार्यक्रमात सांगितले की, रशिया हा सर्वात मोठा कच्चा तेल उत्पादक देशांपैकी एक आहे, ज्याचे उत्पादन दररोज ९ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त आहे.सध्या (India – Russia) भारत रशियाकडून ३५-४०% तेल खरेदी करतो. दुसरीकडे, जगाला ९७ दशलक्ष बॅरल कच्चे तेल लागते, त्याच्या जवळपास १० टक्के वाटा हा रशियाचा आहे. अशावेळी जर रशियाकडून पुरवठा विस्कळीत झाला तर आंतरराष्ट्रीय तेल बाजारपेठेत पुरवठ्याचे संतुलन बिघडेल, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढतील. कच्च्या तेल्याचा किंमती १३०-१४० डॉलर प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रशियाकडून २०२२ पर्यंत भारत फक्त २ टक्केच कच्चे तेल घेत होता, परंतू रशियावर निर्बंध आले आणि रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल देण्यास सुरुवात केली. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताला मोठा फटका बसू शकतो.

VI Recharge Plans : कमी पैशात जास्त फायदा; VI ने 2 रिचार्ज प्लॅनमध्ये केले बदल

VI Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन VI Recharge Plans । भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या VI म्हणजेच वोडाफोन- आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिली आहे. कमी किमतीत जास्तीत जास्त फायदे देण्यासाठी कंपनीने आपल्या १९९ आणि १७९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये काही बदल केले आहेत. यानुसार कंपनीकडून इंटरनेट डेटा आणि वैधता वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहक vi कडे आणखी आकर्षित होऊ शकतात. VI ने अलीकडेच त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. त्यातच आता रिचार्जमध्ये बदल केल्याने एअरटेल आणि जिओ सारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांना थेट टक्कर मिळणार आहे. VI च्या या ऑफर नेमक्या आहेत तरी काय? ग्राहकांना यातून कसा फायदा होईल तेच आपण सविस्तर जाणून घेऊयात.

VI चा 199 रुपयांचा प्लॅन- VI Recharge Plans

खरं तर VI चा 199 रुपयांचा प्लॅन अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना कमी किमतीत कॉलिंग आणि इंटरनेट या दोन्हीचा लाभ घ्यायचा असतो. हा रिचार्ज प्लॅन पूर्ण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. 28 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यासोबत, 300 मोफत एसएमएसचा लाभ घेता येतोय. वोडाफोन आयडियाच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना यापूर्वी फक्त २ जीबी डेटाचा फायदा मिळत होता, पण आता या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३ जीबी डेटाचा फायदा मिळेल म्हणजेच आता VI या प्लॅनमध्ये १ जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा कि दररोज ३ जीबी डेटा मिळणार नाही, तर एकूण 28 दिवसांच्या कालावधीसाठी हा ३ जीबी इंटरनेट डेटा असेल. म्हणजेच काय तर हा प्लॅन (VI Recharge Plans) त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे जे जास्त इंटरनेट वापरत नाहीत आणि त्यांना फक्त कॉलिंग आणि थोडासा डेटा हवा असतो.

VI चा 179 रुपयांचा प्लॅन-

VI चा 179 रुपयांचा प्लॅन पूर्ण २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. पूर्वी या प्लॅनमध्ये (VI Recharge Plans) वापरकर्त्यांना फक्त २४ दिवसांची वैधता मिळत होती, परंतु आता या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ४ दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी मिळेल. म्हणजेच, ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आणखी चार दिवसांची सेवा घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ऍनीमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यासोबतच ३०० मोफत एसएमएसचा लाभ सुद्धा घेता येतो. बाकी इंटरनेट डेटाबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना फक्त १ जीबी डेटाचा फायदा मिळतो. म्हणजेच काय तर हा रिचार्ज प्लॅन सुद्धा अशा यूजर्सना फायदेशीर आहे जे इंटरनेटचा वापर खूप कमी करतात आणि मुख्यतः कॉलिंगसाठी रिचार्ज करतात. खरं तर आजच्या काळात, एकीकडे रिचार्जच्या किमती गगनाला भिडल्या असताना १७९ रुपयांमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणे नक्कीच परवडणारी बाब आहे.

Pune Ganeshotsav Special Buses : गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून 250 हुन अधिक स्पेशल बसेस

Pune Ganeshotsav Special Buses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Ganeshotsav Special Buses । येत्या २७ ऑगस्टला गणेशोत्सव असून आत्तापर्यंत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. गणेशोत्सव म्हंटल कि मुंबई पुण्यात असलेली चाकरमानी मूळगावी हमखास जाणार म्हणजे जाणारच… खास करून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. अशावेळी प्रवासी वाहतुकीवर जास्त ताण पडू नये आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने ५००० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली होती. आत याच अंतर्गत पुण्याहून २५० हुन अधिक स्पेशल बसेस कोकणच्या दिशेने धावणार आहेत.

कोणत्या डेपोतून धावणार- Pune Ganeshotsav Special Buses

कोकणातून पुण्याला नोकरीनिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मूळगावी जाताना कसलाही त्रास होऊ नये म्हणून या विशेष बस चालवण्यात येणार आहेत. गणेश चतुर्थीच्या पाच दिवस आधी २२ ऑगस्टपासून २५० ते ३०० विशेष एसटी बसेस (Pune Ganeshotsav Special Buses) धावतील. या स्पेशल बसेस पुण्यातील स्वारगेट आणि चिंचवड डेपोमधून चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, देवरुख, मंडणगड, तिवरे, लांजा आणि सिंधुदुर्ग यासारख्या प्रमुख कोकण शहरांमध्ये धावतील. जास्त मागणीमुळे, नियमित बसेसमधील जागा जवळजवळ दोन महिने आधीच बुक करण्यात आल्या होत्या. वाढती गर्दी लक्षात घेता, एमएसआरटीसी पुणे विभागाने अतिरिक्त सेवांचे वेळापत्रक तयार केले आहे आणि प्रवाशांना लवकर आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी, पुणे विभागाने गणेशोत्सवानिमित्त २५१ अतिरिक्त बसेस चालवल्या, ज्यामुळे ५९.७५ लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला होता.

राज्यभरातून ५००० स्पेशल बसेस-

दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी राज्यभरातून तब्बल ५००० स्पेशल एसटी बस सेवा सुरु करण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीं काही दिवसांपूर्वी केली होती. गणपती उत्सव (Ganeshotsav 2025) म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमारे 5000 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

Indonesia Ferry Fire : फेरी टॅक्सीला लागली आग!! प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या (Video)

Indonesia Ferry Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indonesia Ferry Fire । इंडोनेशिया मधून एक भयानक बातमी समोर येत आहे. उत्तर सुलावेसीच्या किनाऱ्याजवळ २८० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फेरीला आग लागली, आग इतकी भयंकर होती कि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी थेट समुद्रात उड्या मारल्या. विशेष म्हणजे या फेरी टॅक्सी मध्ये तब्बल २८० पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. सध्या याठिकाणी युध्दवपातळीवर बचावकार्य सुरु असून अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं? Indonesia Ferry Fire

याबाबत अधिक माहिती अशी किम, केएम बार्सिलोना ५ असे सदर आग लागलेल्या फेरी टॅक्सीचे नाव आहे. हे जहाज तलौद बेटांवरून मानाडोला जात होते, मात्र त्याच दरम्यान, तालिसेई बेटाजवळ या फेरी टॅक्सीला आग लागली. स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.०० वाजता हि आग (Indonesia Ferry Fire) लागली. फेरीच्या वरच्या डेकवर आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत गेल्या. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि घबराटीचे वातावरण पसरलं. अनेक प्रवाशांनी आगीपासून सुटका करण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. याबाबतचा एक विडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. आकाशात काळे धुराचे सावट पसरल्याचे आणि घाबरलेले प्रवासी ओरडताना आणि समुद्रात उड्या मारताना यामध्ये दिसत आहेत.

असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि २८४ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले आहे. मासेमारी नौका, स्थानिक स्वयंसेवक आणि अधिकृत बचाव जहाजे यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे. त्यासाठी शोध आणि बचाव पथकांनी लिकुपांग बंदराजवळ तळ उभारला आहे.

इंडोनेशियन फ्लीट कमांडचे कमांडर व्हाइस अॅडमिरल डेनिह हेंद्राटा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत २८४ प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे, अजूनही लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र जहाजात असलेल्या प्रवाशांची नेमकी संख्या अजूनही अस्पष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. हि आग (Indonesia Ferry Fire) का आणि कशी लागली याची आता चौकशी करण्यात येईल असं डेनिह हेंद्राटा यांनी सांगितलं.