Friday, January 2, 2026
Home Blog Page 318

4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार; सरकारचा मोठा निर्णय

farmer news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, तसेच शेतकऱ्यांच्या पड जमिनींबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास परवानगी देण्यात आली.

महत्वाचे म्हणजे, राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना त्यांची ४,८४९ एकर जमीन परत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता, शासन जमा झालेल्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीच्या होणार आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्यांना रेडीरकनरच्या २५% रक्कम भरावी लागणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम-२२० अंतर्गत आकारी पड जमिनीबाबत असलेल्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे म्हणले जात आहे.

महत्त्वाची बातमी!! मनू भाकरसह या 3 खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ च्या विजेत्यांची नुकतीच घोषणा केली आहे. त्यानुसार, ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) , जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश(Gukesh Dommaraju) , पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) आणि पॅरालिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार (Praveen Kumar) यांना यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award) प्रदान करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम येत्या १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रपतींकडून सर्व खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. रामासुब्रमणियम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावे करण्यात आली आहेत. ज्यांनी २०२४ मध्ये क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केली.

महत्वाचे म्हणजे, यंदा क्रीडा क्षेत्रात भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश, कांस्यपदक विजेता हरमनप्रीत सिंग, नेमबाज मनू भाकर चर्चेचा विषय बनले. आता या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

Edible Oil Price Hike : खाद्यतेलांच्या किंमतीत मोठी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या (edible oil) किमतीत 30 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत . त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती वाढल्याने स्वयंपाकघरातील खर्चात मोठी भर पडली आहे. यामुळे गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. या वाढीमुळे लोकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून , याचा थेट परिणाम बचतीवर होताना दिसणार आहे. तर सध्या या तेलांच्या किमती कितीने वाढल्या आहेत , याची माहित आज आपण जाणून घेऊयात.

किंमती वाढण्याची कारणे –

सोयाबीनच्या वाढलेल्या किमती (Oil Price) आणि सरकारने खाद्यतेल आयातीवर 20% आयात शुल्क लागू केल्यामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या कमी पुरवठ्याचा फटका देशाला बसला आहे. त्यामुळे पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

तेलांच्या दरांमध्ये वाढ –

सध्याच्या काळात तेलांच्या दरांमध्ये वाढ झालेली दिसून येते. सूर्यफूल तेलाचे जुने दर 120 रुपये प्रति लिटर होते, जे आता 140 रुपये प्रति लिटर झाले आहेत. पामतेलाच्या बाबतीत जुने दर 100 रुपये प्रति लिटर होते, पण ते आता 135 ते 140 रुपये प्रति लिटर दरम्यान पोहोचले आहेत. याचप्रमाणे, सोयाबीन तेलाचे जुने दर 115 ते 120 रुपये प्रति लिटर होते, परंतु त्याच्या नवे दर 130 ते 135 रुपये प्रति लिटर झाल्याचे पाहायला मिळते. या वाढीमुळे नागरिकांच्या खर्चावर मोठा परिणाम होतो आहे, विशेषतः जेव्हा तेलाचा वापर रोजच्या जीवनातील आवश्यक घटक म्हणून केला जातो.

सरकारकडे जनतेची मागणी –

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करताना सर्वसामान्य जनतेला आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. खाद्यतेल महाग झाल्यामुळे हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला आहे. यासाठीच महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि खाद्यतेल दर आटोक्यात आणण्यासाठी सरकारने आयात शुल्कामध्ये कपात करणे, स्वदेशी तेल उत्पादनाला प्रोत्साहन देणे, तसेच सबसिडीचा विचार करावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.

धनंजय मुंडेंची विकेट तर भुजबळांचा..; राजकीय वर्तुळात नव्या दाव्याने चर्चांना उधाण

Munde and bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. सध्या या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड पोलीस कोठडीत शिक्षा भोगत आहे. मात्र त्याला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांकडून केला जात आहे. तसेच, या कारणामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

या सर्व घडामोडींमध्येच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एक मोठा दावा केला आहे. “बीड जिल्ह्यातील घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता मंत्री धनंजय मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते आणि त्यांच्याऐवजी छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हणले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले??

या सर्व प्रकरणांमध्ये बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता कदाचित मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट काढली जाऊ शकते. धनंजय मुंडे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता किंवा असा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे का? असा प्रश्न आम्हाला चार ते पाच दिवसांपासून पडलेला आहे. कारण अजित पवार हे बीडच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत.

त्याचबरोबर, “मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका.” असाही दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

तुळजाभवानीच्या दर्शनवेळांमध्ये बदल ; भाविकांना मोठा दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची कुलदेवी म्हणून ओळखली जाणारी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी असंख्य भाविक नेहमी गर्दी करत असतात. यासाठीच नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थानाने दर्शन करण्याच्या वेळेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहे. तर आता भाविकांना दर्शनाची वेळ कशी राहील , हे आज आपण पाहणार आहोत.

मंदिराचे दरवाजे पहाटे उघडणार –

आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी तसेच पौर्णिमेच्या दिवशी मंदिराचे दरवाजे पहाटे एक वाजता उघडण्यात येणार आहेत. ही वेळ भाविकांच्या वाढत्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी ठरविण्यात आली आहे. नियमित दिवसांमध्ये मंदिर पहाटे सहा वाजता उघडले जाते, मात्र विशिष्ट दिवशी पहाटे एक वाजल्यापासूनच दर्शनासाठी मंदिर खुले असेल.

असंख्य भाविकांना मोठा दिलासा –

तुळजाभवानी मंदिर संस्थानाने ही वेळ निश्चित करण्यासाठी भाविकांच्या मागण्या आणि पुजारी मंडळाच्या सूचना विचारात घेतल्या. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे अनेक भाविकांना दर्शनासाठी लांब थांबावे लागते. त्यामुळे या नव्या वेळापत्रकामुळे गर्दी कमी होण्यास मदत मिळेल. तसेच सर्व भाविकांना सहज देवीचे दर्शन करता येणार आहे. या निर्णयामुळे असंख्य भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गर्दीचे नियोजन करण्यात मदत –

तुळजाभवानी मंदिराचे महत्त्व लक्षात घेता, सुट्ट्या आणि धार्मिक पर्वांमध्ये येथे भाविकांची संख्या अधिक वाढते. पौर्णिमा, नवरात्र, श्रावण महिना अशा विशेष काळांमध्ये दर्शनासाठी अनेक भाविक तुळजापूर गाठतात. नव्या वेळापत्रकामुळे मंदिरातील व्यवस्थापनाला गर्दीचे नियोजन करण्यात मदत होईल आणि भाविकांना रात्रीपासूनच दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे हा निर्णय भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे.

आता शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत; केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

farmer news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आता पुन्हा एकदा देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारने डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किमती प्रति ५० किलो १३५० रुपये इतकी कायम ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ नंतरही अतिरिक्त अनुदान देण्याचा कालावधी वाढवला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी सरकारने डीएपी खतासाठी प्रतिटन ३५०० रुपयांचे विशेष अनुदान दिले होते. ज्यामुळे तिजोरीवर २६२५ कोटी रुपयांचा भार पडला होता. हे अनुदान न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी (एनबीएस) योजनेच्या व्यतिरिक्त देण्यात आले होते. आता या अनुदानाचा कालावधी पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आला आहे, असे सरकारने जाहीर केले आहे.

दरम्यान, “जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेमुळे डीएपी खत महाग झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना १३५० रुपयांच्या सवलतीच्या दरात खत मिळत राहील, यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच २८ प्रकारच्या खतांवर एनबीएस योजनेद्वारे सबसिडी सुरू ठेवण्यात आली आहे.” अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

नव्या वर्षात महाराष्ट्राला मिळणार 3 मोठे महामार्ग; प्रवास होणार जलद आणि सोप्पा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील रस्ते विकासाला 2025 हे वर्ष नवी दिशा देणारे ठरणार आहे. कारण अनेक महत्त्वाचे प्रकल्प या वर्षात पूर्ण होणार असून, प्रवाशांच्या सुविधांसाठी नवी दारे खुली केली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखद होण्यास मदत मिळणार आहे. हे सर्व प्रकल्प लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर चला नव्या वर्षात महाराष्ट्रातील महामार्ग आणि रस्ते विकास प्रकल्पांना वेग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग –

701 किलोमीटर लांबीच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा शेवटचा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा, इगतपुरी ते आमने, मार्च 2025 मध्ये सुरू होईल. सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंत 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी खुला आहे. या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून, फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 8 तासांत शक्य होईल. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे. तसेच यामुळे देश प्रगतीपथावर पोहचेल .

मिसिंग लिंक आणि खाडी पूल प्रकल्प –

मुंबई-पुणे प्रवासाला अधिक गतिमान करण्यासाठी सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे लोकांच्या वेळेत बचत होण्यास मदत होणार आहे. ठाणे खाडी पूल 3 या वर्षात पूर्ण होणार आहे. पुलाचा दक्षिणेकडील भाग आधीच प्रवाशांसाठी खुला झाला असून, उत्तरेकडील मार्ग मार्च 2025 मध्ये खुला होईल. या प्रकल्पामुळे ठाणे खाडी पूल 1 आणि 2 वरील वाहतुकीचा भार कमी होईल.

2025 वर्ष कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण-

राज्यातील इतर महत्त्वाचे रस्ते प्रकल्प विविध ठिकाणांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करतील. विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका कोकण आणि मुंबई दरम्यानच्या वाहतुकीला गती देईल, तर पुणे वर्तुळाकार रस्ता पुणे शहराच्या वाहतुकीचा ताण कमी करेल. जालना-नांदेड द्रुतगती मार्ग मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. या सर्व प्रकल्पांमुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळणार आहे, तसेच 2025 हे वर्ष रस्ते कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रोहित पाटलांचा पाठपुरावा यशस्वी!! महिला पोलिसाच्या मुलाच्या दुर्मिळ आजारावर मोफत उपचार होणार

rohit patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. ठाणे पोलीस आयुक्त येथिल महिला कर्मचारी कविता सांगळे यांचा मुलगा अथर्व सांगळे याला Gaucher हा दुर्मिळ आजार झाला आहे.. या आजारावरील उपचार महाग असल्याने महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतंर्गत हा सर्व खर्च करण्यात यावा याबाबतचे पत्र रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठवलं होत.. रोहित पाटील यांच्या पत्राची दखल घेत मंत्रालयाने अथर्वच्या मोफत उपचाराला मंजुरी दिली आहे.. त्यामुळे अथर्वच्या उपचाराचा मार्ग सुकर झालाय….

याबाबत अधिक माहिती अशी कि, कविता अर्जुन सांगळे या ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा अथर्व सांगळे याला Gaucher हा दुर्मिळ आजार झाला असून या आजारावरती औषध उपचार सुरु असून यासाठी होणारा खर्च जास्तीचा आहे . सरकारी मदतीसाठी कविता सांगळे यांनी रोहीत दादांचे सहकारी कल्याण डोंबिवलीचे युवा समाजसेवक तथा रुग्णसेवक अमितजी कोळेकर यांची भेट घेतली… अमित कोळेकर यांनी याबाबत संपूर्ण माहिती रोहित पाटील यांच्या कानावर घातली. त्यानंतर अथर्व सांगळे याच्या औषोधोपचाराचा खर्च मोफत पार पडावा यासाठी रोहित पाटील यांनी १३ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहिलं होत. या आजारावरील औषधोपचाराकरीता येणाऱ्या खर्चास महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतंर्गत एक विशेष बाब म्हणून मंजूरी मिळण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच औषधोपचाराच्या सध्यस्थितीबाबतचा अहवाल आवश्यक त्या कागदपत्रासह उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाने कार्यालयास कळविले आहे. त्यामुळे अर्थव सांगळे यास असलेल्या Gaucher ह्या दुर्मिळ आजारावरील औषधोपचाराकरीता येणाऱ्या खर्चास महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतंर्गत एक विशेष बाब म्हणून मंजूरी मिळण्याबाबत शासनाचे योग्य ते आदेश कृपया निर्गमित करावेत, अशी विनंती रोहित पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना केली होती.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तात्काळ यामध्ये लक्ष्य घातलं आणि आता मंत्रालयाकडून ठाणे पोलीस आयुक्त ‘ऑफिस येथील कर्मचारी सौ.कविता सांगळे यांच्या मुलाच्या म्हणजेच अथर्व सांगळेच्या Gaucher’s disease या दुर्मिळ आजारवरील मोफत उपचाराच्या फाईलवर आज मंत्रालयातून मंजुरी मिळाली व पुढील कारवाईसाठी ती फाईल पुढे वर्ग करण्यात आली. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्या मुळेच हे सगळं शक्य झालं असं मत कविता सांगळे यांनी व्यक्त केलं आणि रोहित पाटील यांचे आभारही व्यक्त केलेत.

आता ‘या’ योजनेचे पैसेही थेट खात्यात जमा होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

scheme news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत करत आहे. यामध्ये, महिलांसाठी सर्वाधिक योजना राबवल्या जात आहेत. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये थेट लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केले जात आहेत. त्यामुळे महिलांना या योजनेसाठी सर्वाधिक फायदा होत आहे. (Government Scheme)

राज्यात ही योजना सुरू असतानाच सरकारने आणखीन एका योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनांचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळावा यासाठी अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच, शासकीय वसतीगृहांच्या दुरुस्तीच्या कामांना गती देऊन विद्यार्थ्यांसाठी सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. यासह, वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया आणि जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यासह विभागांतर्गत सर्व महामंडळांसाठी एक एसओपी तयार करण्याचे निर्देश त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. यामुळे आधार कार्ड थेट बँक खात्याशी लिंक असलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; नव्या वर्षात विश्वासू नेता सोडणार साथ??

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता लवकर महापालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटातील ६ नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर, आता माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) देखील पक्षाला रामराम करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.

माजी आमदार राजन साळवी उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत आणि निवडणूक झाल्यानंतर देखील साळवी यांची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली नसल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या त्यांच्या कुटुंबियांवरही एसीबीची चौकशी सुरू आहे.

या पार्श्वभूमीवरच साळवी आगामी महिन्यात पक्षांतराचा मोठा निर्णय घेऊ शकतात, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. परंतु साळवी भाजप की शिंदे गटात जाणार याबाबत कोणतेही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र शिवसेनेतील अंतर्गत वादाचा परिणाम आगामी निवडणुकीवर होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.