Thursday, January 1, 2026
Home Blog Page 342

अर्थव्यवस्थेला मिळाला बूस्टर डोस; 11 व्यांदा देखील रेपो दरात कोणताही बदल नाही

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या एमपीसीच्या बैठकीत पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. राज्यपालांनी शुक्रवारी तीन दिवस चाललेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेले निर्णय जनतेसमोर मांडले. या वेळीही रेपो दरावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, जो गेल्या 10 बैठकीपासून कायम होता, राज्यपालांनी महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रोख राखीव प्रमाण 0.50 टक्क्यांनी कमी केले आहे, जे आता आहे. 4 टक्के गेला.

रिझर्व्ह बँकेची ही 11 वी एमपीसी बैठक होती. ज्यामध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि 6 पैकी 4 एमपीसी सदस्यांनी पुन्हा एकदा तो 6.30 टक्के राखण्याच्या बाजूने मतदान केले आहे. म्हणजे सर्वसामान्यांच्या कर्जात कोणताही दिलासा मिळणार नाही आणि ईएमआय आहे तसाच राहील. गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या विकास दराचे आकडे पाहिल्यानंतर यावेळच्या एमपीसीच्या बैठकीत सीआरआर कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. राज्यपालांनी तेच केले आणि सीआरआर 4.5 टक्क्यांवरून 4 टक्के केला. यामुळे बँकांकडे अतिरिक्त १.२० लाख कोटी रुपये असतील, जे कर्ज वितरणासाठी वापरले जाऊ शकतात.

एमपीसीच्या बैठकीनंतर राज्यपाल म्हणाले की, सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देणे हे आमचे प्राधान्य आहे, परंतु देशाचा विकास दरही महत्त्वाचा आहे. त्यामुळे एमपीसीने आता आपला दृष्टिकोन तटस्थ ठेवला आहे, म्हणजे पुढे जाणाऱ्या वातावरणानुसार, रेपो रेट किंवा बँकांच्या कर्जदरात त्यानुसार कपात केली जाईल. तिसऱ्या तिमाहीतही चलनवाढीपासून काही दिलासा मिळताना दिसत नाही आणि चौथ्या तिमाहीपासूनच त्यात काही प्रमाणात सुधारणा होईल, अशी चिंता राज्यपालांनी व्यक्त केली.

RBI ने CRR मध्ये 50 बेसिस पॉइंट्स (bps) म्हणजेच 0.5 टक्के कपात केली आहे. त्यामुळे 1.1 लाख कोटी ते 1.2 लाख कोटी रुपयांची रक्कम बँकिंग व्यवस्थेत मोकळी झाली आहे. याचा अर्थ बँकांना त्यांच्या राखीव ठेवलेल्या रकमेचा हा भाग कर्ज म्हणून खर्च करावा लागेल. याचा थेट अर्थव्यवस्थेला फायदा होईल, कारण अधिक कर्ज वाटपाचा अर्थ असा होतो की वापरालाही चालना मिळेल ज्यामुळे उत्पादनाला गती मिळेल आणि त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेची चाके वेगाने फिरू लागतील.

सध्याची परिस्थिती पाहता महागाईच्या दबावाखाली रिझर्व्ह बँकेला विकास दराचा अंदाज कमी करावा लागला आहे. चालू आर्थिक वर्षाचा विकास दर, जो पूर्वी ७.२ टक्के असेल, असा अंदाज होता, तो आता ६.६ टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी म्हणजेच 2026 साठी विकास दराचा अंदाज देखील 7.3 वरून 6.9 टक्के कमी करण्यात आला आहे, परंतु दुसऱ्या तिमाहीचा अंदाज 7.3 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

मुलींच्या भविष्याची चिंता मिटली ! सरकारने आणल्या ‘या’ जबरदस्त योजना

Government Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकार आपल्या देशातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून नेहमीच योजना आणत असतात. आणि यामध्ये मुली किंवा महिला या नेहमीच केंद्रस्थानी असतात. मुलींना त्यांच्या आयुष्यात चांगली कामगिरी करता यावी. चांगले शिक्षण घेता यावे .तसेच भविष्यात त्यांना कोणतीही आर्थिक समस्या येऊ नये. यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या असतात. प्रत्येक पालकांना आपल्या मुलींचे शिक्षण तसेच लग्न अगदी चांगले व्हावे, अशी इच्छा असते. आणि यामुळे मुलीच्या जन्मापासूनच त्यांचे पालक त्यांच्या लग्नासाठी काहींना काही पैसे हे बँकांमध्ये ठेवत असतात.

परंतु आज आम्ही तुम्हाला मुलींसाठी काही खास योजना सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू ठेवू शकता तसेच सरकार कडून देखील तुम्हाला अनुदान मिळते. या योजना सरकारच्या योजना आहेत. त्यामुळे यामधील कोणताही धोका नाही. तुम्हाला यातील पैसे अगदी सुरक्षिततेसह मिळतील.

लेक लाडकी योजना

मुलींसाठी ही योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. 2023- 24 या वर्षात ही योजना सुरू करण्यात आली आहे. अनेक मुलींना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक दृष्ट्या त्यांना परवडणारे नसल्याने अनेक मुलींना त्यांचे शिक्षण सोडावे लागते. परंतु आता लेक लाडकी योजनेअंतर्गत जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत ठराविक आर्थिक मदत करते. मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत जवळपास 75 हजार रुपये तुमच्याकडे जमा होतील. ही रक्कम सरकार टप्प्याटप्प्याने देते.

माझी कन्या भाग्यश्री योजना

महाराष्ट्र सरकारची माझी कन्या भाग्यश्री योजना देखील अत्यंत लोकप्रिय योजना आहे. 2016 साली ही योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत जर दोन मुलींनंतर पालकांनी नसबंदी केली, तर सरकार त्यांच्या मुलींच्या नावे 50 हजार रुपये जमा करतात. तुम्ही देखील दोन मुलींचे पालक असाल आणि कुटुंब नियोजनाचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्या दोन्ही मुलींना सरकारकडून 25 – 25 हजार रुपये मिळतील. तुमच्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम सरकारकडून मुलींना मिळेल. परंतु या पैशांवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही.

बालिका समृद्ध योजना

मुलींसाठी असणारी बालिका समृद्ध योजना ही अत्यंत फायदेशीर योजना आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलीच्या नावावर देखील पैसे जमा करण्यासाठी या योजनेमध्ये सहभाग घेतला, तर या योजनेतून ही योजना मुलींचा जन्म झाल्याबद्दल तिच्या आईला पाचशे रुपयांची सबसिडी मिळेल. त्यानंतर शिक्षण घेत असणाऱ्या मुलींना 300 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप देखील दिली जाते. ही योजना मुलींसाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या लाभ आत्तापर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे. अनेक पालक मुलींच्या भविष्यासाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करतात. ही योजना तुम्ही 10 वर्षासाठी आहे. यामध्ये तुम्ही वर्षाला कमीत कमी 250 रुपये गुंतवणूक करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक 1.5 रुपये पर्यंत करू शकतात.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी घोषणा

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल म्हणजेच 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आणि त्यानंतर त्यांची पहिली पत्रकार परिषद देखील झालेली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक नवीन घोषणा केलेल्या आहेत. यामध्ये त्यांनी लाडकी बहिणीने बाबत देखील घोषणा केलेली आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये महायुती सरकारला यावर्षी भरघोस यश मिळालेले आहे. आणि या यशामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा महत्वाचा वाटा आहे. मागील सरकारने या योजनेअंतर्गत 18 ते 60 वयोगटातील पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येईल असे सांगितले होते. परंतु जर या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले, तर ही रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्यात येईल. असे देखील आश्वासन महायुती सरकारने दिलेले होते.

पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहिणी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही लाडकी बहिणी योजना सुरूच ठेवणार आहोत. महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देणार आहोत. या योजनेच्या बजेटचा आम्ही आढावा घेणार आहोत. त्याचप्रमाणे जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण देखील करणार आहोत. त्याचप्रमाणे निकषाच्या बाहेर कोणी या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्याचा फेरविचार करण्यात येईल. परंतु या योजनेचा सरसकट फेरविचार करण्याची घोषणा नाहीये. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांचाही ते सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे काही खात्यांचा प्रश्न शिल्लक आहे. त्याचा आम्ही एकत्र बसून तोडगा काढणार आहोत. असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेले आहे.

Jio की Airtel ?? कोण देतंय स्वस्त रिचार्ज

Airtel vs Jio Recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यामध्ये प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या प्लॅनमध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. यासाठीच ग्राहकांनी योग्य प्लॅन निवडणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. भारतातील प्रमुख दोन टेलिकॉम कंपन्या रिलायन्स Jio आणि Airtel , पोस्टपेड सेवेच्या बाबतीत आकर्षक योजना देत आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला कोणता प्लॅन सोयीस्कर ठरणार आहे , हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . तर चला जाणून घेऊयात या दोन्ही आकर्षक प्लॅन बदल अधिक माहिती .

Airtel चा पोस्टपेड प्लॅन –

Airtel या प्रमुख टेलिकॉम कंपनीने त्यांचा 449 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 50GB डेटा उपलब्ध होणार आहे. यासोबतच त्यांना अनलिमिटेड कॉल करता येणार आहेत. तसेच दरमहा 100 मोफत एसएमएस करता येतील . ग्राहकांना जास्त फायदे मिळावेत यासाठी Airtel Xstream Play Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये जास्त डेटा मिळतो आणि एक्सट्रीम प्लेचा अ‍ॅक्सेस ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतो.

Jio चा पोस्टपेड प्लॅन –

Jio च्या पोस्टपेड प्लॅन तुमच्यासाठी 349 रुपयांना उपलब्ध होणार आहे. या आकर्षक प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच दर महिन्यासाठी 100 मोफत एसएमएस करता येणार आहेत. जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30GB प्रति महिना डेटाची सुविधा मिळणार आहे. या कंपनीने ग्राहकांसाठी Jio TV, Jio Cinema, आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग याकडे जास्त आकर्षित होतायत . जिओचा प्लॅन कमी किंमतीत उपलब्ध असून, डिजिटल सबस्क्रिप्शनसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देतो.

योग्य प्लॅनची निवड –

जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल, तर Airtel चा 449 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरेल . तुम्हाला जर कमी बजेटमध्ये जास्त फायदे हवे असतील तर Jio चा 349 चा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. Jio आपल्या ऍप्सच्या सबस्क्रिप्शनसह अधिक मनोरंजन पर्याय देते, तर एअरटेल OTT अ‍ॅक्सेसवर भर देते. ग्राहकांनी आपली डेटा वापराची गरज, बजेट, आणि अतिरिक्त सुविधांचा विचार करून योग्य पोस्टपेड प्लॅन निवडून , विविध सुविधांचा फायदा करून घ्यावा .

महाराष्ट्राला मिळालं 1595 कोटींचं कर्ज; मागास जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार

world bank loan to maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेवर येण्याआधी तब्बल 188.28 दशलक्ष डॉलर (1595 कोटी रुपये) कर्जाची मदत मंजूर झाली आहे. जागतिक बँकेने (World Bank) महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. या निधीचा उपयोग प्रामुख्याने राज्यातील मागासलेल्या जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केला जाणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मागास भागांतील संस्था बळकट करणे, जिल्हा पातळीवर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच दीर्घकालीन विकासासाठी धोरणांची आखणी करणे हा आहे.

स्थानिकांना रोजगाराच्या संधी –

या निधीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे. ज्याद्वारे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचसोबत पर्यटन क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार आहे. जागतिक बँकेचे भारत संचालक ऑगस्टे तानो कौमे यांनी सांगितले की, या निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विकास संस्थांमध्ये गुंतवणूक केली जाईल. जिल्हा स्तरावरील नियोजन आणि समन्वय वाढवून अधिक परिणामकारक धोरणे राबवली जातील. ज्यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे.

MAITRI 2.0 तसेच RTS पोर्टलचा वापर –

प्रकल्पाचे टास्क टीम लीडर नेहा गुप्ता आणि थॉमस डॅनियलविट्झ यांनी सांगितले की, खाजगी क्षेत्रातील सुधारणा आणि सेवा सुलभतेसाठी MAITRI 2.0 पोर्टल तसेच RTS पोर्टलचा वापर केला जाईल. हे पोर्टल विविध सेवांचे ऑनलाइन वितरण सुनिश्चित करतील, ज्यामुळे विकास प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती मिळण्यास मदत मिळणार आहे.

महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास –

या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास होईल. रोजगारवाढ, कौशल्यविकास, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसह पर्यटन क्षेत्रात मोठे बदल होण्याची अपेक्षा आहे.हा उपक्रम राज्यातील मागास भागांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार असून, जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.

All New Honda Amaze भारतात लाँच; पहा किंमत अन फीचर्स

All New Honda Amaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होंडाने आपली ऑल न्यू होंडा अमेझ (All New Honda Amaze) भारतात लाँच केली आहे. बऱ्याच दिवसापासून ग्राहकवर्ग हि गाडी कधी लाँच होते याची वाट पाहत होता . अखेरी हि गाडी लाँच झाली आहे. या गाडीच्या आतील आणि बाहेरील फीचर्समुळे लोक भारावून गेले आहेत. डिझाईन्स, मॉडर्न फीचर्स, आणि अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमसारख्या सेगमेंट-फर्स्ट तंत्रज्ञानासह सज्ज असलेल्या या कारची किंमत 799900 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होत आहे . ग्राहकांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिलेल्या या कॉम्पॅक्ट सेडानसाठी टेस्ट ड्राइव्हसुद्धा सुरू झाल्या आहेत.

डायमेंशन्स आणि डिझाईन –

नवीन होंडा अमेझची लांबी 3995 मिमी, रुंदी 1733 मिमी, उंची 1500 मिमी असून व्हीलबेस 2470 मिमी आहे. 172 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 416 लीटर बूट स्पेसमुळे ही कार प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर आहे. बाहेरील डिझाईनमध्ये आयकॉनिक लाइट्स आणि स्ट्रॉंग फेस डिझाईन कॉन्सेप्टवर आधारित ही कार आकर्षक आणि बोल्ड दिसते. LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, डायमंड-कट R15 अलॉय व्हील्स, आणि शार्क फिन अँटेना यामुळे कारचे लूक अधिकच खास बनले आहे.

फीचर्स – All New Honda Amaze

होंडाने नवीन अमेझमध्ये एलिट बूस्ट अप इंटीरियर संकल्पनेचा वापर केला आहे. प्रीमियम बेज आणि ब्लॅक ड्युअल टोन कलर, 8 इंच एचडी डिस्प्ले ऑडिओ, वायरलेस ऍपल कारप्ले व अँड्रॉइड ऑटो, तसेच पीएम 2.5 केबिन एयर फिल्टर यांसारखी वैशिष्ट्ये प्रवासाचा अनुभव आरामदायक बनवतात. होंडा अमेझमध्ये 6 एअरबॅग्स, 3 पॉइंट सीट बेल्ट्स, व्हेइकल स्टॅबिलिटी असिस्ट, हिल स्टार्ट असिस्ट, ABS, EBD, आणि इमर्जन्सी स्टॉप सिग्नल यांसारखी 28 हून अधिक आधुनिक सुरक्षा दिला आहेत.

होंडा अमेझ विविध रंगात उपलब्ध –

नवीन होंडा अमेझ (All New Honda Amaze) विविध रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार कार निवडण्याची संधी मिळते. या कारमध्ये एकूण 6 आकर्षक रंग पर्याय आहेत, ज्यात ओब्सिडियन निळा पर्ल, रेडियंट लाल मेटॅलिक, प्लॅटिनम पांढरा पर्ल, गोल्डन ब्राऊन मेटॅलिक, मीटिओरॉइड ग्रे मेटॅलिक आणि लूनर सिल्व्हर मेटॅलिक समाविष्ट आहेत. या रंगांमुळे अमेझ अधिक आकर्षक आणि आधुनिक दिसते.

किंमत –

V MT ची किंमत 799900रुपये , VX MT ची किंमत 909900 आणि ZX MT ची किंमत 969900 आहे. त्याचबरोबर CVT ट्रान्समिशनसह V CVT वेरिएंटची किंमत 919900, VX CVT ची किंमत 999900 आणि ZX CVT वेरिएंटची किंमत 1089900 ठेवण्यात आली आहे. विविध वेरिएंट्समुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे.

Sandalwood Cultivation : चंदनाची शेती ठरतेय फायदेशीर; कमी गुंतवणुकीतून कमवा लाखो रुपये

Sandalwood Cultivation

Sandalwood Cultivation । आजच्या महागाईच्या काळात जास्त कमाई करणे खूप गरजेच झालं आहे. प्रत्येकजण जास्त पैसे मिळावेत यासाठी विविध व्यवसाय करून , जास्तीत जास्त नफा कमवत आहेत. जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही शेतीच्या माध्यमातून सुद्धा अनेक व्यवसाय सुरु करू शकता. तुम्हाला मोठी कमाई करायची असेल तर चंदन शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. चंदनाची लाकडे ही जगातील सर्वात महागड्या लाकडांपैकी एक मानली जातात आणि याला देश विदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करून तुम्ही लाखो रुपये मिळवू शकता.

चंदनाची लागवड –

चंदनाची लागवड (Sandalwood Cultivation) दोन पद्धतींनी करता येते. एक म्हणजे सेंद्रिय शेती आणि पारंपरिक शेती होय . सेंद्रिय पद्धतीत झाडे 10-15 वर्षांत तयार होतात, तर पारंपरिक पद्धतीत 20-25 वर्षे लागतात. चंदनाच्या झाडांना सुरुवातीचे आठ वर्ष कोणत्याही बाहेरच्या सुरक्षेची आवश्यकता नसते. पण नंतर झाडांमध्ये सुगंध येऊ लागतो, त्यामुळे चोरी होण्याचा धोका वाढतो. यासाठी झाडे तयार होईपर्यंत ती प्राण्यांपासून आणि अन्य लोकांपासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तसेच चंदनाची लागवड रेती आणि बर्फाळ भाग वगळता इतर ठिकाणी सहज करता येते.

चंदन शेती फायदेशीर पर्याय – Sandalwood Cultivation

आज अनेक ठिकाणी चंदनाचा वापर मोठ्याप्रमाणात होत असून , त्यामध्ये परफ्युम, सौंदर्यप्रसाधने, आणि आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी चंदन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. 2017 मध्ये सरकारने चंदन लाकडाच्या खरेदी आणि विक्रीवर काही निर्बंध घातले आहेत. तुम्ही चंदन लावू शकता, पण त्याची विक्री फक्त सरकारलाच करता येते. या कायद्याचे पालन न केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. चंदन शेती हा एक फायदेशीर पर्याय असून, नियमांचे पालन करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता

किती कमाई होईल –

तुम्हाला एका चंदनाच्या झाडापासून सुमारे 5 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. जर तुम्ही 100 झाडे लावलीत, तर ती तयार झाल्यावर त्यांची किंमत 5 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. चंदनाचे रोपे 100-150 रुपयांत उपलब्ध आहेत. बाजारात चंदनाची किंमत सुमारे 30000 रुपये प्रति किलो आहे. हि लाकडे महाग असली तरी लोकांची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुमच्यासाठी चंदनाच्या झाडाचा व्यवसाय सुरु करणे जास्त फायदेशीर ठरू शकते.

Horoscope 2025 : तुमच्यासाठी कसं राहील वर्ष 2025? पहा संपूर्ण 12 राशींचे राशिभविष्य

Horoscope 2025

Horoscope 2025 : 2025 हे वर्ष सुरू होण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे अनेक लोक आता 2025 मध्ये आपल्याला कोणकोणत्या नवीन गोष्टी करता येईल. कोणते नवीन उपक्रम करता येईल. याची यादी तयार करत आहेत. प्रत्येक जण नवीन वर्ष एका मोठ्या आशेने आणि उमेदीने सुरू करतात. मागील वर्षी अपूर्ण राहिलेली स्वप्न यावर्षी तरी पूर्ण करता येईल. अशी अशा मनात बाळगून ते विविध योजना आखत असतात. परंतु हे नवीन वर्ष सुरू होताना. ते आपल्याला कसे जाणार आहे? हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. येत्या वर्षात आपल्या जीवनात कोणत्या शुभ अशुभ गोष्टी घडणार आहेत? आपली ध्येयधोरणे यशस्वी होतील? किती आर्थिक लाभ होईल? या गोष्टी जर आपल्याला आधीच माहीत असतील, तर आपल्याला त्याप्रमाणे चांगले प्लॅनिंग करता येते. तर आज आपण 2025 मध्ये तुमच्या भविष्यात नक्की काय लिहिले आहे? हे जाणून घेणार आहोत. प्रत्येक राशीनुसार 2025 हे वर्ष आपल्याला कसे जाणार आहे हे जाणून घेऊया.

1) मेष रास- Aries 

करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील. वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल आणि तुमच्या कामाचे मूल्यांकन होईल. मात्र वर्षाचा दुसरा आणि तिसरा महिना तणावपूर्ण असू शकतो. प्रणयरम्य नातेसंबंधांना काही उलथापालथीचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, संपूर्ण वर्षभर तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुमचे हातपाय दुखणे चिंताजनक असू शकते. 2025 चा मे आणि सप्टेंबर महिना तुमच्यासाठी फलदायी ठरेल.

2) वृषभ रास – Taurus (Horoscope 2025)

वृषभ राशीच्या लोकांनी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुरुवात चांगली होईल. तुम्ही तुमच्या कामासाठी वचनबद्ध राहाल. मार्च आणि एप्रिल हे आर्थिकदृष्ट्या चांगले महिने आहेत. मात्र नोव्‍हेंबर आणि डिसेंबरमध्‍ये नोकरीच्‍या संदर्भात तुमच्‍यावर खूप दडपण असेल आणि तुम्‍ही पूर्णपणे आर्थिक परिस्थिती हाताळण्‍यावर लक्ष केंद्रित कराल. नव्या वर्षाच्या रोमँटिक भागीदारीत अनुकूलता अनुभवायला मिळेल. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आनंदाचा अनुभव येईल, परंतु मार्च आणि एप्रिलमध्ये संबंध तणावपूर्ण बनतील. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, तुम्हाला डोळ्यांची समस्या होऊ शकते. तसेच सांधेदुखीचा त्रास होण्याचीही शक्यता असते. 2025 मध्ये मे आणि सप्टेंबर महिना तुमच्यासाठी चांगला राहील.

3) मिथुन रास – Gemini

मिथुन राशींच्या लोकांसाठी 2025 मध्ये (Horoscope 2025) आर्थिक उत्पन्न वाढण्याची आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वर्षात दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. या काळात नोकरी न बदलण्याचा आणि गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो. वर्षाची शेवटची तिमाही जमीन आणि मालमत्ता खरेदी आणि गुंतवणूक करण्यासाठी योग्य ठरेल. 2025 मध्ये मित्र आणि भावंडांसोबत तुम्ही खूप मजा कराल. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवादाचा आनंद घ्याल. मात्र शक्यतो एखाद्याशी बोलताना कठोर शब्द वापरू नका. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, हृदयाशी संबंधित काही समस्या असू शकतात परंतु शेवटचा तिमाही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम राहील. 2025 मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना तुम्हाला फलदायी ठरेल.

4) कर्क रास – Cancer

कर्क राशींच्या लोकांना या वर्षात काही महत्त्वाच्या क्षेत्रात काही विशेष यश मिळेल. तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कामाशी संबंधित सर्व निर्णय काळजीपूर्वक घ्या. या वर्षात तुमचे नातेसंबंध चांगले राहतील. भावंड आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, तुम्हाला विशेषत: पोटाशी संबंधित समस्या आणि पचनसंस्थेतील बिघाड याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. 2025 मध्ये मे ते ऑक्टोबर तुम्हाला चांगला काळ राहील

5) सिंह रास- Leo

सिंह राशींच्या व्यक्तींचा 2025 मध्ये (Horoscope 2025) सातत्याने प्रवास होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश आणि आनंद मिळेल . तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्हाला मोठे यश मिळेल. 2025 मध्ये सर्व लोकांशी तुमचे नातेसंबंध नीट राहील. तुमचं लग्न सुद्धा या वर्षात होऊ शकत. कुटुंबाप्रती तुमचं प्रेम वाढेल. मात्र वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सावधगिरी बाळगा आणि आपल्या प्रियजनांना नाराज न करण्याचा प्रयत्न करा. 2025 मध्ये तुमचे आरोग्य उत्तम राहील. मात्र तुमचे आई-वडील किंवा कुटुंबातील काही वडीलधारी व्यक्तींना काही आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सर्वोत्तम ठरेल

6) कन्या रास – Virgo

कन्या राशीच्या लोकांसाठी 2025 मध्ये आर्थिक स्थितीत तर वाढ होईलच, याशिवाय व्यवसायात सुद्धा प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. विशेषतः ऑक्टोबर नंतर तुमचे नशीब खूप वाढेल, तुम्ही तुमच्या कामात प्रशंसा मिळवाल. मे महिन्यानंतर तुमचं लग्न होऊ शकत किंवा आधीच तुम्ही विवाहित असल्यास नातेसंबंध अधिक घट्ट होतील. 2025 मध्ये तुम्हाला आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो.

7) तूळ रास – Libra

तूळ राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबतीत एप्रिल नंतर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण याकाळात काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही ठिकाणी गुंतवुन करताना यथास्थिती ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर कराल. आपल्या कुटुंबाशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कारण नातेसंबंध बिघडण्याची शक्यता जास्त आहे. जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत कधीही अंहकाराची भावना ठेऊ नका. या 2025 मध्ये शक्यतो शांत राहण्याचा आणि आराम करण्याचा प्रयत्न करा. गाडी चालवताना सावधानता बाळगा. जास्त स्टंट करू नका. तुमच्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च महिना सर्वोत्तम राहतील.

8) वृश्चिक रास- Scorpio

आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या लोकांना या वर्षी अनेक संधी मिळतील. तुमच्या जून महिना हा आर्थिकदृष्ट्या खूप समृद्ध असेल. सत्ता आणि पदाचा लाभ होईल आणि तुम्ही सर्व शत्रूंवर मात कराल. परंतु तुमच्या बॉसला कधीही नाराज करू नका. 2025 हे वर्ष नातेसंबंधांच्या बाबतीत छान राहील. तुमचे प्रेमसंबंध वाढतील आणि प्रेमीयुगुलांमधील मतभेद दूर होतील. कुटुंब आणि मित्रांसह तुमचे संबंध चांगले राहतील. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, पोटाची थोडीफार समस्या राहील. मात्र ऑक्टोबर महिन्यानंतर तुमचे आरोग्य ठीक राहील. 2025 मध्ये जून आणि डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी फलदायी ठरतील.

9) धनु रास – Sagittarius

करिअर आणि आर्थिक बाबतीत धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष उत्तम आहे. यंदा तुम्हाला आर्थिक लाभ आणि नोकरीमध्ये आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. 2025 च्या शेवटच्या तिमाहीत, तुमच्या कारकीर्दीत उच्च पातळीवर जाण्याची आणि आर्थिक समृद्धीचा आनंद घेण्याची अपेक्षा करा. दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला थोडे चढ-उतार अपेक्षित आहेत. 2025 मध्ये प्रियजनांसोबतच्या नातेसंबंधात काही चढ-उतार येऊ शकतात. जर कोणाला प्रपोज करायचे असल्यास ऑक्टोबर नंतर करा. एखाद्याशी बोलताना शक्यतो कठोर शब्द वापरणे टाळा. आरोग्याच्या बाबतीत विशेषत: दुसऱ्या तिमाहीत सावधगिरी बाळगा. मात्र ऑक्टोबरनंतर तब्येत ठीक राहील. तुमच्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना चांगला असेल.

10) मकर रास – Capricorn

मकर राशीच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात हे वर्ष शुभ राहील. तुमच्या कामातील सर्व अडचणी दूर होतील. नशीब सुद्धा तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या कामाचा आनंदही घ्याल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल आणि तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घ्याल. यंदा कौटुंबिक जीवन शांततेने आणि आनंदाने भरलेले असेल. कुटुंबातील कोणाचे तरी लग्न होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात थोडीफार काळजी घ्या, बाकी संपूर्ण वर्ष तुम्ही आनंदी क्षणाचा अनुभव घ्याल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, फेब्रुवारी- मार्च नंतर आरोग्य चांगले राहील. काही लहान समस्या मात्र रेंगाळू शकतात. तुमच्यासाठी 2025 मध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि नोव्हेंबर हे महिने अनुकूल ठरतील.

11) कुंभ रास- Aquarius

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत 2025 ची सुरुवात चांगली होईल. परंतु नंतरच्या काही महिन्यांनी आर्थिक समस्यांना समोर जावं लगेल. यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम हाच खरा मंत्र ठरेल, परंतु वर्षाच्या शेवटी, गोष्टी आपल्या मार्गाने कार्य करण्यास सुरवात करतील. कामाशी संबंधित तुमचा प्रवासही होऊ शकतो. 2025 मधील पहिल्या तिमाहीत प्रेम आणि रोमान्ससाठी चांगला काळ आहे. कम्युनिकेशन ब्रेकडाउनमुळे वाद आणि तणावपूर्ण संबंध होऊ शकतात. तुमचा संवाद पारदर्शक ठेवा. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, सुरुवातीच्या काही महिन्यात तुमचं आरोग्य ठीक राहील परंतु एप्रिलनंतर तुम्ही तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. फेब्रुवारी आणि ऑक्टोबर हे २ महिने तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतात.

12) मीन रास- Pisces

मीन राशींच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात वर्षाच्या सुरुवातीला काही अनिश्चितता आणि गोंधळ होईल परंतु उत्तरार्धात तुम्हाला यश मिळेल. या कालावधीत तुम्ही तुमची सर्व कामे निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण कराल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा सुधारेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या कामाची पावती आणि सन्मान होईल. इतरांशी बोलताना काळजीपूर्वक बोला. यंदा तुम्हाला घरातील लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. एवढेच नव्हे तर जर तुम्ही अविवाहित असाल तर या वर्षी तुम्ही लग्न करू शकता. तुमच्या आरोग्य स्थितीबाबत सांगायचं झाल्यास ऑगस्ट 2025 पर्यंत तुमच्या आरोग्यात चढउतार पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. नियमित व्यायाम करून सकस आहारावर जोर द्या. या वर्षातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी फलदायी ठरेल.

बँक कर्मचाऱ्यांची मागणी ; 5 दिवसांचा वर्किंग आठवडा लागू होणार

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याच काळापासून कोट्यवधी बँक कर्मचारी आठवड्यात 5 दिवस काम करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. हि मागणी अंमलात आली आणि जर दोन शनिवारी सुट्टी दिली गेली, तर बँक कर्मचाऱ्यांना रोज 40 मिनिटे जास्त काम करावे लागणार आहे. या विषयावर बँक कर्मचारी संघटना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. या प्रस्तावावर डिसेंबरमध्ये निर्णय होण्याची संभाव्यता दर्शवली आहे.

बँक कर्मचाऱ्यांची मागणी

सध्या देशभरातील बँका प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद असतात. बाकी शनिवारी बँका उघड्या असतात. पण आता बँक कर्मचारी संघटनांनी सोमवारी ते शुक्रवारीच काम करावे आणि प्रत्येक शनिवार रविवार सुट्टी असावी, अशी मागणी केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सध्याच्या 6 सुट्ट्यांऐवजी 8 सुट्ट्या मिळतील. इंडियन बँक असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटनांमध्ये या प्रस्तावावर सहमती झाली आहे.

सरकारचा निर्णय महत्वाचा

जर सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर बँकिंगच्या वेळेत 40 मिनिटांची वाढ होऊ शकते. त्यामुळे बँका सकाळी 9:45 वाजता उघडतील आणि सायंकाळी 5:30 वाजता बंद होतील. सध्या अनेक बँका सकाळी 10 वाजता उघडतात आणि ग्राहकांसाठी व्यवहार सायंकाळी 4 वाजेपर्यंतच होतात. जर पाच दिवस बँकेचे काम सुरु राहील असा निर्णय झाला , तर 5 दिवसांच्या कामामुळे ग्राहक सेवेला कोणताही फटका बसणार नाही असे सांगण्यात आले आहे. मात्र हा नियम लागू करण्यासाठी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेची मंजुरी आवश्यक आहे.

AIBOC चा आंदोलनाचा इशारा

डिसेंबरपासून बँकांचा 5 दिवस वर्किंग आठवडा सुरू होण्याची शक्यता कमी दिसत आहे . ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (AIBOC) ने सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. AIBOC चे महासचिव रूपम रॉय यांनी सांगितले की सरकारकडून याबाबत कोणताही स्पष्ट माहिती मिळालेला नाही. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय आणि सरकारला लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे सर्वात मोठे मेडिटेशन केंद्र; परदेशातूनही येतात लोक

Meditation Center

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल धकाधकीच्या आयुष्यात माणूस मानसिक शांतता विसरत चाललेला आहे. आणि तीच मानसिक शांतता मिळवण्यासाठी अनेक लोक मेडिटेशन करत आहेत. आपल्या महाराष्ट्रात अनेक मेडिटेशन केंद्र देखील उभारण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही मेडिटेशन करू शकता आणि मानसिक शांतता मिळवू शकतात. परंतु तुम्हाला माहित नसेल की, जगातील सगळ्यात मोठे मेडिटेशन सेंटर हे आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि अगदी परदेशातून देखील अनेक लोक ध्यानधारणा करण्यासाठी महाराष्ट्रातील या मेडिटेशन सेंटरवर येत असतात. हे सेंटर नाशिकमध्ये आहे. नाशिक मधील विपश्यना केंद्र हे जगातील सर्वात मोठे मेडिटेशन केंद्र म्हणून ओळखले जाते. धम्मगिरी नावाने हे विपश्यना केंद्र ओळखले जाते. जगभरातून हजारो लोक या ठिकाणी ध्यानधारणा करायला येत असतात.

महाराष्ट्रातील नाशिक जवळील धम्मगिरी नावाने हे विपश्यना केंद्र प्रसिद्ध आहे. नाशिकपासून केवळ 45 किलोमीटर अंतरावर हे केंद्र आहे. तसेच मुंबईपासून 136 किलोमीटर अंतरावर हे केंद्र वसलेले आहे. या केंद्रामध्ये अनेक शिबिर असतात. तुम्हाला जर दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरामध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला विपश्यना केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि तिथे नोंदणी करावी लागेल.

दहा दिवसांच्या या शिबिरामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला मानसिक शांतता मिळते. आणि तुमची एकाग्रता देखील वाढते. केवळ दहा दिवसातच तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये तुम्हाला मेडिटेशनचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो. आयुष्यात कुठल्या गोष्टी कराव्यात. कोणत्या ठिकाणी कोणता निर्णय घ्यावा. मनाला शांत ठेवून कशा प्रकारे गोष्टी कराव्यात. या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. संपूर्ण जगामध्ये अनेक विपश्यना ध्यान केंद्र आहेत. परंतु त्यातील धम्मगिरी हे जगातील सर्वात मोठे विपश्यना ध्यान केंद्रांपैकी एक आहे. त्यामुळे अनेक लोक नाशिकला भेट देत असतात. आणि त्यांच्या शिबिरामध्ये सहभागी होत असतात.