Thursday, January 1, 2026
Home Blog Page 343

2025 मध्ये होणार जगाचा विनाश ? बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

Baba Venga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2025 हे वर्ष सुरू होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि 2025 चे स्वागत करण्यासाठी सगळेजण तयार आहेत. प्रत्येक जण नवनवीन प्लॅन्स तयार करत आहेत. 2025 मध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? हे देखील ठरवत आहेत. अनेक ज्योतिष देखील 2025 बद्दल भविष्यवाणी करत आहेत. यापूर्वी देखील अनेकांनी भविष्यवाणी केलेली आहे. आणि ते खरी देखील ठरलेली आहे. पण बिल्गेरी येथील अंध जोतिष बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आतापर्यंत नेहमीच ठरलेली आहे. आणि त्यांनी काही वर्षांपूर्वी 2025 साठी देखील भविष्यवाणी केली आहे. 2025 मध्ये जग हादरून जाईल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. आता त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी 2025 साठी एक मोठी भविष्यवाणी केली होती. त्यामुळे आता नक्की2025 मध्ये काय होणार आहे? अशी चर्चा सगळ्यांमध्ये चालू झालेली आहे. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीत 2025 मध्ये एक मोठे महायुद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे युरोपात इस्लामिक सत्ता येऊन पृथ्वीवरील मनुष्य प्राणी नष्ट होण्याची भविष्य वाणी त्यांनी केली होती. युरोपमध्ये एक मोठा संघर्ष सुरू होऊन मानव जातीच्या विनाशाची सुरुवात होईल. आणि हा संघर्ष जास्त प्रमाणात पेटणार असल्याची भविष्य वाणी बाबा वेंगा यांनी केलेली आहे. तसेच 5079 मध्ये पृथ्वीवरून मानव जात नष्ट होण्यात असल्याचे भाग्यदेखील त्यांनी केले होते

या संघर्षामुळे महाद्वीप मधील लोकसंख्या कमी होणार आहे. आणि 2025 मध्ये अशी एक भयानक घटना घडणार आहे. जी मानव जातीच्या विनाशाचे कारण होणार आहे. असे त्यांनी सांगितले होते. आता 2025 येण्यासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने बाबा वंगा यांनी केलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरणार तर नाही ना? अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे.

‘या’ आजाराची पसरलीय साथ; डोळ्यातून रक्त येऊन 8 दिवसात होतो रुग्णाचा मृत्यू

Eye Dieses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील अवयव आहे. अशातच आफ्रिकेमध्ये डोळ्यांच्या संबंधित एक आजार समोर आलेला आहे. तो म्हणजे आफ्रिकेच्या काही भागात लोकांचा डोळ्यातून रक्तस्त्राव होण्याची प्रकरणे समोर आलेली आहेत. याला रक्तस्त्राव डोळा असे नाव पडलेले आहे. कारण विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांचे डोळे पूर्णपणे लाल होतात. आणि डोळ्यातून रक्त येण्याची प्रकरणे देखील समोर आलेकी आहेत. हा आजार मारबर्ग या विषाणूमुळे झालेला आहे. या विषाणूचा आपल्या शरीरात शिरकाव झाल्यानंतर अनेक लक्षणे दिसतात. त्यातील डोळा लाल होणे हे एक प्रमुख लक्षण आहे. आफ्रिकेमध्ये या विषाणूमुळे आजाराची प्रकरणे वाढत चाललेली आहेत. आणि मृत्यूचे प्रमाण जवळपास 50 ते 80 टक्के आहे. त्यामुळे या आजाराकडे अत्यंत गंभीर दृष्टीने पाहिले जात आहे. या आजाराची लक्षणे जर तीव्र स्वरूपात असेल, तर आठ ते नऊ दिवसातच रुग्णांचा मृत्यू देखील होतो.

आफ्रिकेत सध्या मारबर्ग या विषाणूची प्रकरणे मोठ्या प्रमाणात झालेली आहे. लागण झालेल्या 66 पैकी 15 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. पूर्वी मृत्यूचे प्रमाण एक 44 ते 88 टक्के होते. या विषाणूची लागण झाल्यावर सगळ्यात आधी ताप येतो. त्यानंतर हा विषाणू हळूहळू संपूर्ण आणि शरीरात पसरत4 आणि रोगप्रतिकारशक्तीवर देखील याचा परिणाम होतो. यामुळे शरीराच्या कोणतेही भागातून रक्तस्त्राव होऊ शकतो.

याबद्दल डॉक्टरांनी सांगितले आहे की, मारबर्ग या विषाणूची जर लागण झाली, तर रुग्णाच्या शरीराच्या एखाद्या भागातून रक्तस्त्राव सुरू झाला, तर रुग्णाचा जीव वाचवणे कठीण होते. या नंतर आठ ते नऊ दिवसात रुग्णांचा मृत्यू देखील होऊ शकतो. हा विषाणू संक्रमित वटवाघुळांची लाळ, मूत्र आणि विष्ठेमध्ये आढळतो. हा रोग एखाद्या व्यक्तीमध्ये पसरला तर त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये देखील पसरू शकतो. हा विषाणू लाळ रक्त तसेच आपण वापरलेली वस्तू दुसऱ्या व्यक्तीने वापरल्यावर पसरू शकतो.

सध्या मारबर्ग या विषाणूवर कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही. तसेच कोणती लस देखील उपलब्ध नाही. केवळ रुग्णांना दिसणाऱ्या लक्षणांवरून त्याच्यावर उपचार केले जातात. जर वेळेवर त्या रुग्णाला उपचार मिळाले नाही, तर त्याचा जीव धोक्यात असतो.

कोणती काळजी घ्यावी ?

  • आफ्रिकन देशांमध्ये प्रवास करण्यात टाळा
  • वरील लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचे उपचार चालू करा.
  • घरातील स्वच्छतेची काळजी घ्या.

हिवाळ्यात महाराष्ट्रातील या अप्रतिम ठिकाणांना द्या भेट; कमी खर्चात होईल ट्रिप

travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळा चालू झाला की, अनेक लोक फिरायला जात असतात. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये सर्वात जास्त लोक फिरायला जातात. या कालावधीत हवेमध्ये गारवा असतो. आणि वातावरण देखील अत्यंत छान असते. त्यामुळे अनेक लोक या महिन्यांमध्ये ट्रीपचे नियोजन करत असतात. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशी काही ठीकानंबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्ही हिवाळ्यात चांगला अनुभव घेऊ शकता. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल. तसेच शांतता देखील अनुभवता येईल. आता महाराष्ट्रातील अशाच ठिकाणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

खंडाळा

Khandala

हिवाळ्यातील ट्रीपसाठी खंडाळा हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. पश्चिम घाट पर्वत रांगेत खंडाळा वसलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला हिरव्यागार डोंगरदऱ्या, धबधबे निसर्गाचा आनंद घेता येईल. त्यामुळे तुम्ही अगदी तुमच्या बजेटमध्ये ही प्लॅन करू शकता.

पाचगणी

Pachgani

पाचगणी मध्ये अनेक भव्य टेकड्या आहेत. तसेच या ठिकाणी तुम्हाला सिडनी पॉईंट, टेबल लँड, राजपुरी लेणी यांसारखी अनेक आकर्षक ठिकाणी देखील पाहायला मिळतील. ज्या लोकांना एडवेंचर्स करायचे आहेत. त्यांच्यासाठी हे ठिकाण खूप चांगले आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला घोडेस्वारी, रॉक क्लाइंबिंग, स्पीड बोटिंग यांसारख्या एडवेंचर्सचा आनंद घेता येईल.

माथेरान

Matheran

तुम्हाला जर हिवाळ्यातला सनराइज आणि सनसेट पाहायचा असेल, तर त्यासाठी माथेरान हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. माथेरानला अनेक लोक भेट देत असतात. तसेच या ठिकाणी तुम्हाला ट्रेक करता येईल. आणि इतर ऍक्टिव्हिटी देखील करता येईल. माथेरानचे वातावरण अत्यंत आनंददायी आहे. या ठिकाणी गाड्यांची गर्दी नसते. त्यामुळे प्रदूषण ही जास्त होत नाही. तुम्ही घोड्याने किंवा त्यांच्या ट्रेनने या ठिकाणाला भेट देऊ शकता.

नाशिक

Nashik

नाशिक हे एक धार्मिक शहर आहे. दर बारा वर्षांनी नाशिक मध्ये कुंभमेळा भरवला जातो. तुम्ही नाशिक मध्ये देखील हिवाळ्यात भेट देऊ शकता. हे अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला सुला वाईन्स, कॉइन म्युझियम, रामकुंड यांसारखी ठिकाणे पाहायला मिळेल.

भीमाशंकर

Bhimashankar

भीमाशंकर हे देखील हिवाळ्यात भेट देण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणचे तापमान जवळपास 13 ते 30°c पर्यंत असते. तसेच या ठिकाणी तुम्हाला अनेक वन्यजीव पाहायला मिळतील. अनेक वनस्पतींनी हे ठिकाण वेढलेले आहे.

ताडोबा

Tadoba

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे ठिकाण हिवाळी ट्रिपसाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आहेत. यात तुम्हाला वाघ, हरणांच्या प्रजाती, अस्वल, मगरी सी वेहर्स यांसारखे अनेक प्राणी पाहायला मिळतील. तसेच येथे चांगले निसर्ग वातावरण देखील आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; संपूर्ण मुंबईला केली सुट्टी जाहीर

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा होणार आहे. ज्या दिवशी चैत्यभूमी येथे अनेक लोक येत असतात. आणि या लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जाते. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी त्यांनी जाहीर केलेली आहे.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर जो कार्यक्रम होणार आहे, त्या ठिकाणी नक्की कोणत्या सोयी सुविधा केल्या जाणार आहेत. याचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे. दरवर्षी चैत्यभूमीवर मोठ्या उत्साहाने महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन देण्यासाठी अनेक लोक येत असतात. आणि दरवर्षी ही संख्या वाढतच आहे. त्यामुळे त्यांना भोजन, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा वाहतूक सुरक्षा आणि इतर सुविधांचा देखील पुरवठा झालाच पाहिजे यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावयाला पाहिजे.”

त्याचप्रमाणे यावर्षी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पदृष्टी होणार आहे. आणि परिसराची स्वच्छता देखील राखण्यात येणार आहे. याबद्दलच्या सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष उभारण्याचे देखील सांगितलेले आहे. याबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दरवर्षी चांगल्या सुविधांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी देखील यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी सगळ्यांनी तयारीला लागा. आणि चांगल्या दर्जाच्या सुविधांचा पुरवठा या ठिकाणी करा.”

84 दिवसांच्या वैधतेसह जिओने आणला भन्नाट प्लॅन; मिळणार हे फायदे

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिलायन्स जिओ ही सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन रिचार्ज प्लॅन जाहीर करत असतात. रिलायन्सने ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचे काही प्लॅन्स जाहीर केलेले आहेत. त्यातील त्यांचा 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन चांगलाच लोकप्रिय होत आहे. या प्लॅनची वैधता 3 महिन्यांची आहे. आता या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोण कोणत्या सुविधा मिळणार आहेत हे आपण जाणून घेऊया.

जिओचा या 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत ही 479 एवढी आहे. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 160 रुपये खर्च येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत कॉलिंग, डेटा सोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि इतर सुविधा देखील मिळणार आहे. हा प्लॅन जिओने सादर केलेला आहे. या 479 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच स्थानिक आणि एसटीडी कॉल कुठल्याही नेटवर्कवर त्यांना मोफत करता येत आहे. यामध्ये तुम्हाला 6 जीबी डेटा प्रदान केला जाणार आहे. आणि डेटा संपल्यानंतर तुम्हाला हे स्पीड 64 केबीपीएस एवढे होईल.

84 दिवसांच्या कालावधीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 हजार मेसेज मोफत मिळणार आहे. असेच मोफत जिओ ॲप जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा 84 दिवसांचा प्लॅन करू शकता. 84 दिवसांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला जास्त डेटा प्रधान केला जात नाही. परंतु यामध्ये आणखी एक प्लॅन जाहीर केला आहे. तो म्हणजे तुम्ही 1029 रुपयांचा रिचार्ज केला, तर त्याची वैधता देखील 84 दिवसाची असणार आहे. यामध्ये तुम्हाला 168 जीबी मोफत डेटा देखील मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा वापरता येणार आहे.

त्याचप्रमाणे या प्लॅनमध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंगचा अनुभव घेता येणार आहे. आणि दररोज 100 एसएमएस मोफत मिळणार आहे. यासोबतच जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ क्लाऊड आणि इतर सुविधा देखील मिळणार आहेत. इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जिओने त्यांच्या या ऑफर्स जाहीर केलेल्या आहेत.

एकनाथ शिंदेंना डेंग्यूची लागण? डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र| सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीत बिघाडणा झाल्यामुळे त्यांची नुकतीच डेंग्यू आणि मलेरीयाची टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टनंतर त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गेले होते. तेव्हा तिथे त्यांना ताप आला होता. गावी उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या ठाण्यातील निवासस्थानी परतले. परंतु त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची नुकतीच डेंग्यू आणि मलेरीयाची टेस्ट करण्यात आली. या टेस्टमधूनच शिंदे यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याचे समोर आले आहे.

महत्वाचे म्हणजे, या टेस्टनंतर त्यांचा हेल्थ रिपोर्ट (Health Report) समोर आला आहे. यामध्ये त्यांचा डेंगू-मलेरियाची टेस्ट केल्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे म्हणले आहे. मात्र त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत. यामुळेच आता डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, तापामुळे शिंदेंना अशक्तपणा आल्यामुळे त्यांना बेडरेस्ट सांगितली आहे. यामुळेच आता एकनाथ शिंदे महायुतीच्या होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहतील की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

SBI SO Recruitment 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 169 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. अनेक लोकांची बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण भारतीय स्टेट बँक (SBI SO Recruitment 2024)अंतर्गत एक मोठी जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 169 जागा आहेत. त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तसेच 12 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | SBI SO Recruitment 2024

या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 169 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी 750 रुपये अर्ज फी भरावी लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

12 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा? | SBI SO Recruitment 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 12 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

डायबिटीस झाल्यावर महिलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि याबद्दल जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या शरीरावर होताना दिसत आहे. आज काल डायबिटीस सारखा आजार अनेक लोकांना होत आहे. काही वर्षांपूर्वी केवळ म्हताऱ्या लोकांना डायबिटीस होत होता. परंतु आजकाल तरुण वैयक्तिक अनेक लोकांना डायबिटीस होत आहे. आणि लोकांना अनुवंशिकतेमुळे डायबिटीस होतो, तर काही लोकांना वाईट जीवनशैलीमुळे डायबिटीज होत असतो. परंतु या डायबिटीसकडे तर तुम्ही दुर्लक्ष केले, तर त्यामुळे हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागते. तुम्हाला जर डायबिटीज झाला असेल, तर तुम्हाला सारखी तहान लागते. तुमचे वजन देखीलअचानक कमी होते. यांसारखी अनेक लक्षणे पुरुषांमध्ये दिसतात. परंतु महिलांमध्ये डायबिटीसची लक्षणे वेगळी दिसतात. त्यामुळे आज आपण कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेणार आहोत.

यीस्ट संसर्ग

हा एक त्वचा रोग आहे. ज्यावेळी यीस्टाचा संसर्ग होतो. तेव्हा रक्तातील साखर वाढते. आणि तुमच्या अंगाला देखील खूप जास्त खाज येते. अंगावर पांढरे ठिपके दिसतात. आणि त्वचा लाल पडते. महिलांमध्ये हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

पॉलिसिस्टीक अंडाशय सिंड्रोम

पीसीओएस हा महिलांमध्ये होणाऱ्या सगळ्यांपैकी एक आहे. यामध्ये डायबिटीसची लक्षणे देखील असतात. यामुळे शरीरातील संतुलन बिघडते. आणि टाईप 2 डायबिटीस होऊ शकतो. यामुळे नियमितपणे मासिक पाळी येत नाही. आणि जास्त वजन वाढत राहते.

यूटीआय

महिलांना यूटीआय सारख्या संसर्गाचा धोका देखील अधिक असतो. यावेळी लघवीच्या वेळी जळजळ होते. वारंवार लघवी होते. तसेच मळमळ होते. यांसारखी लक्षणे असतात. यांसारखे लक्षणे असेल, तरी तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता असते.

पोस्ट ऑफिसने महिलांसाठी आणली खास योजना; केवळ व्याजातूनच मिळणार 30 हजार रुपये

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल पुरुषांच्या तुलनेत महिलांचे बचत करण्यामध्ये प्रमाण जास्त वाढलेले आहेत. अनेक महिला थोडे का होईना पण भविष्यासाठी काही ना काही रक्कम बचत करून ठेवत असतात. या सगळ्यांमध्ये अनेक महिला या पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये बचत करत असतात. पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी अनेक विविध योजना आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नाही तसेच या योजनांमधून चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळे अनेक लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अशीच महिलांसाठी एक खास योजना आहे. या योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना असे आहे.

काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये महिलांना व्याजदर आणि अधिक पैसा मिळवता येतो. ही योजना दोन वर्षासाठी असते. 2023 साली ही एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेतून महिलांना दरवर्षाला 7.5 टक्के एवढा व्याजदर मिळते. या योजनेमध्ये तुम्ही दोन वर्षांमध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. ही योजना केवळ लहान मुलींसाठी आहे. ज्या मुलींचे वय दहा वर्ष किंवा दहा वर्षापासून पेक्षा कमी आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्याचबरोबर भारतात राहणारी कोणतीही महिला या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.

पोस्टाच्या या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये तुमचा टीडीएस कापला जात नाही. तसेच तुमचे व्याजदर 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत केले, तर तुम्हाला टॅक्स लागत नाही9. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत खाते उघडू शकता. जर तुम्ही दोन वर्ष दोन लाखाची गुंतवणूक केली, तर तुम्हाला 32 हजार 44 रुपये केवळ व्याजाचे मिळतील. आणि मॅच्युरिटी नंतर तुम्हाला 2 लाख 32 हजार 44 रुपये मिळतील. म्हणजे या योजनेतून महिलांना चांगला फायदा होणार आहे.

या नंबरवरून कॉल आल्यास सावधान; अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान

Cyber Fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. परंतु या प्रगतशील तंत्रज्ञानाचा जेवढा मानवाला फायदा होत आहे. तेवढाच तोटा देखील होत आहे. कारण आता तंत्रज्ञानाचा वापर करूनच अनेक लोक सायबर गुन्हे करत आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढवताना दिसत आहे. आणि अनेक लोकांचा यामुळे पैसा देखील जात आहे. अनेक वेळा क्राईम करणारे हे लोक लोकांना धमकी देतात की, त्यांनी पैसे पाठवले नाही तर त्यांना डिजिटल अटक होईल. आणि पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अनेक लोक त्यांना पैसे देखील मिळतात. परंतु आता थेट पंतप्रधान मोदी यांनी अशा फसवणुकीचा बद्दल इशारा दिलेला आहे. तसेच दूर संचार विभागाने देखील काही आंतरराष्ट्रीय फोन कॉल आल्यावर त्यांना कोणतेही उत्तर देऊ नये असे सांगितलेले आहे.

या फोन नंबर पासून सावध रहा

दूरसंचार विभागाने सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार +77, +89, +85, +86, +84 या फोन नंबरने सुरुवात होणाऱ्या नंबर पासून सावध राहा. कारण हे नंबर फसवणुकीचे असू शकतात. तसेच जर तुम्हाला अशा नंबर वरून कॉल आला, तर तुम्हाला तक्रार करण्याची देखील सांगितलेले आहे. तुम्ही संचार साथी या पोर्टलवर भेट देऊन तक्रार करू शकता. आणि सरकार हे नंबर पूर्णपणे ब्लॉक करतात. आणि इतर लोकांना देखील तुम्ही वाचू शकता.

माझी काही दिवसापूर्वी एका 25 वर्षे विद्यार्थ्याला कॉल आला होता. ज्यामध्ये सांगितले होते की, तो एका सरकारी एजन्सीचा पोलीस अधिकारी आहे. तसेच त्या व्यक्तीने विद्यार्थ्याला धमकी दिली होती की, त्याच्या फोन नंबर वर तक्रार नोंदवली गेलेली आहे. आणि विशेष सर्टिफिकेट न घेतल्यास त्याचा नंबर ब्लॉक केला जाईल. त्यामुळे त्याने त्याचे सगळे डिटेल्स त्या माणसाला दिले. आणि त्याचे आर्थिक नुकसान झालेल्या आहेत.

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी सायबर गुन्हेगार यांनी जवळपास 2140 कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा. आणि कोणताही अनोळखी नंबर वरून फोन आला तर त्याला उत्तर देऊ नका. किंवा तुमचे कोणतेही डिटेल्स त्यांना सांगू नका.