Monday, December 22, 2025
Home Blog Page 486

Ganeshotsav Celebration | यंदा बाप्पासाठी घरीच बनवा हे खास नैवैद्य; जाणून घ्या सविस्तर रेसिपी

Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration | आपल्या भारताला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती साजरी केली जाते. सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची तयारी चालू झालेली आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. पुराणानुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सगळेजण आपल्या घरात गणपतीची छोटीशी मूर्ती स्थापन करतात. जितके दिवस गणपती घरात असतो. तितके दिवस त्याची मनोभावे प्रार्थना करतात, आराधना करतात. आणि सेवा देखील करतात. यावर्षीच्या पंचांगानुसार गणेश चतुर्थीची 7 सप्टेंबर 2024 रोजी येत आहे. हिंदू धर्मामध्ये गणपतीला हे आद्यस्थान दिले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असल्यास आपल्याकडे गणपतीची पूजा केली जाते. म्हणजेच कोणतेही शुभ काम करण्याआधी लोक गणपतीला आमंत्रण देतात.

काही लोकांच्या घरात गणपती दीड दिवसाचा असतो. काहींच्या घरी पाच दिवसांचा असतो, तर काहींच्या घरी अकरा दिवसांचा असतो. या दिवसात सगळेजण बाप्पाची जमेल तसे सेवा करत असतात. बाप्पाला आवडणारे सगळे पदार्थ नैवेद्य बाप्पासाठी तयार करत असतात. बाप्पासाठी वेगवेगळे पदार्थ अर्पण करत असतात. गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्याच प्रमाणे बापाला मोतीचूर लाडू देखील खूप आवडतात. आता तुम्ही या गणपतीच्या दिवसांमध्ये बाप्पाला मोतीचूर लाडू आणि मोदकाचा प्रसाद म्हणून देऊ शकता. आता ते कसे बनवायचे हे आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊया.

मोतीचूर लाडू बनवण्यासाठी साहित्य | Ganeshotsav Celebration

बेसन, साखर, दूध, तूप, हिरवी वेलची, फूड कलर, बेकिंग सोडा, पाणी.

मोतीचूर लाडू बनवण्याची पद्धत

मोतीचूर लाडू बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी साखरेचा पाक तयार करावा लागेलं. यासाठी तुम्ही मध्यम आचेवर एका मोठ्याकडे पाणी गरम करा. त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ते पाणी ढवळत रहा. त्यानंतर तुम्ही त्या पाण्यात दूध घालून पाच मिनिटे मंद आचेवर ते पाणी चांगले उकळू द्या. उकळताना त्या पाण्यावर फेस तयार होऊ लागेल. त्यानंतर तुम्ही चमच्याच्या साह्याने पाक घट्ट होईपर्यंत शिजवा त्यानंतर त्या पाकात वेलची पूड आणि केशरी रंग घालून हळूहळू ढवळत रहा.

त्यानंतर तुम्ही एका भांड्यात बेसन आणि दूध मऊ होईपर्यंत मिक्स करा. आणि त्यामध्ये बेकिंग सोडा घालून ते चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये तूप गरम करा कढईच्या अगदी वर झारा ठेवा. आणि लाडूसाठी तयार केलेले बॅटर तेलात घाला. बुंदी तेलात टाकल्यानंतर ती सोनेरी रंगावर होईपर्यंत तळून घ्या.आता ही बुंदी ठीशू पेपरवर काढा. जेणेकरून त्यात असलेले जास्त तेल निघून जाईल. आता ही बुंदी साखरेच्या पाकात घालून नीट मिक्स करा .आणि थंड होईपर्यंत तसेच राहू द्या. थंड झाल्यावर या बुंदीपासून लहान लहान आकाराचे लाडू तयार करा.

मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तांदळाचे पीठ, पाणी, तूप, गूळ, खोबरे, ड्रायफ्रूट्स

मोदक बनवण्याची पद्धत |Ganeshotsav Celebration

मोदक बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी खोबरं आणि गूळ चांगला किसून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात खोबरं आणि गूळ चांगला मिक्स होईपर्यंत परतून घ्या. त्यात तुम्ही बारीक चिरून ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. हे मिश्रण एका ताटलीमध्ये बाजूला काढून ठेवा. त्यानंतर तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा. ते पाणी उकळल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाका आणि ते चांगले मिक्स करून घ्या. हे पीठ पूर्ण मिक्स झाल्यानंतर ते बाजूला काढून हलक्या हलक्या हाताने ते मिक्स करून मऊसूद मळून घ्या. त्यानंतर तुम्ही त्या तांदळाच्या पिठापासून छोटे छोटे मोदक तयार करा. आणि त्यानंतर ते मोदक एकदा उकडून घ्या. अशा प्रकारे तुम्ही बापाला मोदकाचा नैवेद्य करू शकता.

Infinix Hot 50 5G : फक्त 9,999 रुपयांत लाँच झाला 5G मोबाईल; 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन बरंच काही…

Infinix Hot 50 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर कमी किमतीत आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे, कारण मोबाईल निर्माता ब्रँड Infinix भारतीय बाजारात आपलाInfinix Hot 50 5G नावाचा मोबाईल लाँच केला आहे. या स्मार्टफोन मध्ये 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. खास बाब म्हणजे हा मोबाईल खूपच स्लिम असून हाताळायला सुद्धा चांगला फील देईल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.7 इंचाचा डिस्प्ले –

Infinix Hot 50 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये पंच-होल डिझाइन आणि 93.9 टक्के स्क्रीन ते बॉडी रेशो मिळतो. इनफिनिक्सच्या या मोबाईलची जाडी अवघी 7.8mm आहे म्हणजेच दिसायला हा स्मार्टफोन अतिशय स्लिम आहे. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6300 5G प्रोसेसर बसवला असून 4GB/8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजचा वापर करता येतोय. हे स्टोरेज तुम्ही मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवू शकता. इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित XOS वर काम करतो.

कॅमेरा – Infinix Hot 50 5G

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या कॅमेराचा,,,, तर Infinix Hot 50 5G च्या पाठीमागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 48MP मुख्य कॅमेरा आणि 8MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W USB Type C चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

या मोबाईलच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हॅरियंटची किंमत 9,999 रुपये आहे तर 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हॅरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. पहिल्या सेलमध्ये 1,000 रुपयांचा झटपट बँक डिस्काउंट ग्राहकांना मिळतोय. हा मोबाईल पर्पल, निळा, काळा आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे.

मराठी चित्रपट सृष्टीला येणार चांगले दिवस ! ‘या’ शहरात उभारणार ‘मिनी बॉलिवूड’

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये आज (5) मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मराठी चित्रपट सृष्टीला उभारी देण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टी ही लवकरच कात टाकणार असून त्याला नवी उभारी मिळणार आहे. या बैठकीत चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य देण्यापासून ते अनेक महत्त्वाच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला संस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील उपसचिव महेश वावळ, बाळासाहेब सावंत, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक मीनल जोगळेकर, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे आदी सहकाऱ्यांसह प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, निर्माते संदीप घुगे बाबासाहेब पाटील, गार्गी फुले, अशोक राणे, हेलन मेहता, जयेश जोशी, अरुंधती रवींद्र मोरे, बाळासाहेब गोरे, चंद्रकांत विसपुते, शिरीष राणे, प्रशांत मानकर, आदी चित्रकरणी उपस्थित होते. चला जाणून घेऊयात या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना मुनगंटीवार यांनी सांगितलं की, मराठी चित्रपट धोरण लवकरच तयार करण्यात येणार असून त्याबाबतची समिती गठित करण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपल्या राज्याला चित्रपटाचा समृद्ध वारसा लाभला आहे. आपल्या मराठी चित्रपटांचा हा वारसा जतन करण्यासाठी आगामी काळात भव्य असे मराठी चित्रपट संग्रहालय उभारणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचनाही त्याने संस्कृतीक विभागाला दिलया आहेत.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, मराठी चित्रपटांचा दर्जा वाढावा सिनेमागृहांमध्ये मराठी चित्रपट प्रेक्षकांची गर्दी व्हावी तसेच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते यांचे मनोबल उंच व्हावं हेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या धोरण असून या सर्व बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

‘या’ महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश

  • नागपुरात100 हेक्टर मध्ये भव्य चित्रनगरी उभारणार
  • अर्थसहाय्य योजनेतून निर्मात्यांना बळ देण्याच्या सूचना
  • दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अर्थसाहाय्यकरीता दर्जा देताना ‘अ’ आणि ‘ब’ दर्जासह ‘क’ दर्जाचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
  • आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना दुप्पट अनुदान मिळणार.
  • तसेच पुरस्कार प्राप्त महिला दिग्दर्शकाला प्रोत्साहन पर पाच लाख रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
  • याशिवाय या घोषणांचा तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Vadhavan Port : वाढवण बंदर ठरणार भारतातील सर्वात मोठे बंदर; महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

Vadhavan Port

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बंदराचे (Vadhavan Port) भूमिपूजन करण्यात आलं. या प्रकल्पासाठी तब्बल 76000 कोटी खर्च करण्यात आला असून जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महामुंबई परिसर, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देश यांच्या आर्थिक विकासासाठी एक नवे दालन खुले झाले आहे. भारत देश सागरी शक्ती केंद्र म्हणून भविष्यात नावारूपाला येण्याचा हा शिलान्यास आहे. शेती, उद्योग, लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांना भरभराटीचे दिवस आणण्याची क्षमता या एका प्रकल्पात आहे. त्यामुळे हे बंदर महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी ठरणार आहे.

आणखी एका बंदराची देशाला गरज– Vadhavan Port

समुद्रमार्गे जलवाहतूक हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त प्रकार मानला जातो. भारताच्या किनाऱ्यावरून समुद्र मार्गाने विदेशात व्यापाराचा मोठा इतिहास आहे. भारतीय मसाले, कापड, रेशीम अशा अनेक वस्तूंची निर्यात समुद्रमार्गेच होत असे. ब्रिटिश आणि भारत यांच्यातील व्यवहारही समुद्र मार्गाने होत असतं. मुंबई बंदराने महाराष्ट्राला आणि मुंबईला सोन्याचे दिवस दाखवले. सध्याच्या काळात जेएनपीटी बंदर देशातले सर्वात महत्त्वाचे बंदर मानले जाते. मात्र जेएनपीटीएने मुंबई शहराचा विकास आणि काही भौगोलिक कारणांमुळे या बंदरात अधिकची वाहतूक करणं शक्य नाही. तसेच देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ पाहता भविष्यात दुसऱ्या बंदराची गरज लागू शकते. त्यामुळेच पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात एक नवीन बंदर उभारण्यात येणार आहे.

अनेक वर्षे रखडला प्रकल्प

वाढवण परिसरात बंदर (Vadhavan Port) उभारण्याचे अनेक वर्षांपासून सरकारच्या मनात होते. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जसे राज्यातील अनेक प्रकल्प मागे पडले त्यात वाढवणचाही समावेश होतो. 2014 साली राज्यात शिवसेना भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या प्रकल्पाला चालना दिली. मात्र 2019 साली महाविकास आघाडीच्या काळात वाढवणचा प्रकल्प रखडला असं बोललं जातंय. 2022 साली महाराष्ट्रात सत्तापालट झाला आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस ही जोडगोळी सत्तेत आली आणि विकासाच्या असंख्य प्रकल्पांना पुन्हा चालना देण्यात आली. त्यातही वाढवणचा प्रामुख्याने समावेश होता. स्थानिक मच्छीमारांची समजूत घालणे, जन सुनावणी घेणे, विविध यंत्रणांच्या परवानगी प्राप्त करणे असे अनेक सोपस्कार शिंदे फडणवीसांनी पूर्ण केले.

अन्य राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी

एकेकाळी महाराष्ट्र सर्वच बाबतीत प्रथम क्रमांकावर होता परंतु आता देशातील अनेक राज्ये आपल्या बरोबरीला आली आहेत. तसेच वाढवण सारख्या बंदराच्या निर्मितीसाठी अनेक राज्य उत्सुक होती. अशावेळी महाराष्ट्राला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने प्रयत्न केले. नैसर्गिक खोली, अनुकूल भौगोलिक परिस्थिती, केंद्राचे महाराष्ट्रावरील प्रेम आणि शिंदे-फडणवीस-अजित पवार यांची इच्छाशक्ती या बळावर महाराष्ट्राने बाजी मारली आणि 76 हजार कोटी रुपयांचा हा महाकाय प्रकल्प महाराष्ट्रासाठी मंजूर झाला. नुकतीच केंद्राने याला मान्यता दिली आणि या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्ण झाले.

वाढवणची व्याप्ती जेएनपीटीच्या तिप्पट

वाढवण बंदर (Vadhavan Port) हे जेएनपीटीच्या तिपटीने मोठे बंदर आहे. ते भारतातील सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. एवढच नव्हे तर जगातील टॉप 10 -बंदरांमध्ये वाढवणचा समावेश होणार आहे. देशात एकूण बंदरांची कंटेनर क्षमता जितकी आहे ती वाढवणच्या पूर्ततेनंतर दुपटीने वाढणार आहे आणि 298 मिलियन मॅट्रिक टन इतकी होणार आहे. सहाजिकच उद्योगांचा मोठा ओघ महाराष्ट्राकडे वाढणार आहे. वाढवण बंदर महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून पुन्हा प्रस्थापित करणार आहे. पालघर, डहाणू बोईसर या महाराष्ट्रातील तुलनेने मागास असलेल्या भागाचा मोठा कायापालट या बंदराच्या माध्यमातून होणार आहे.

देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्रयी दूरदर्शी नेतृत्व म्हणून ओळखली जाते. समृद्धी महामार्ग वेळेत पूर्ण करून शिंदे फडणवीस जोडगोळीने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबईच्या वैभवात भर टाकणारा अटल सेतू देखील फडणवीस यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास आला आहे. वाढवण बंदर पूर्ण होणारच हे मनाशी निश्चित करून समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हा परिसर थेट सागरी वाहतुकीशी जोडल्या जाणार आहे

Flipcart Recruitment 2024 | लवकरच चालू होणार फ्लिपकार्टचा सेल; 1 लाखापेक्षा जास्त लोकांना मिळणार नोकरी

Flipcart Recruitment 2024

Flipcart Recruitment 2024 | देशामध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्या आहेत. या कंपन्या घरबसल्या लोकांना त्यांच्या सेवा प्रदान करत असतात. अशातच फ्लिपकार्ट हे ई कॉमर्स कंपन्यांमध्ये एक मोठे नाव आहे. सध्या फ्लिपकार्टचा (Flipcart Recruitment 2024) सर्वात मोठा बिग बिलियन डेज चालू होणार आहे. आणि यामुळे आता देशात अनेक लोकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. फ्लिपकार्ट अंतर्गत जवळपास देशातील एक लाख नव्या रोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहेत. या भरती अंतर्गत गोदाम दुकान आणि डिलिव्हरीसाठी भरती होणार आहे. दिवाळीपूर्वी ही सगळी पदे flipkart अंतर्गत भरण्यात येणार आहेत.

फ्लिपकार्ट (Flipcart Recruitment 2024) लवकरच त्यांचा बिग बिलियन डेज चालू करणार आहे. आणि यासाठी त्यांना अनेक कामगारांची गरज देखील लागणार आहे. फ्लिपकार्टची डिलिव्हरी ही ऑल ओव्हर इंडियामध्ये होत असते. त्यामुळे संपूर्ण देशांमध्ये आता जवळपास एक लाख कामगारांची भरती फ्लिपकार्ट अंतर्गत होणार आहेत. फ्लिपकार्ट संपूर्ण देशभरात अनेक गोदामे देखील उघडली आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करायला तसेच डिलिव्हरी करण्यासाठी त्यांना अनेक कामगारांची गरज आहे.

एक लाख नव्या रोजगारांच्या संधी | Flipcart Recruitment 2024

सणासुदीच्या काळात फ्लिपकार्ट त्यांच्या नागरिकांना जलद गतीने सेवा देण्याचे काम करत असते. त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात त्यांच्या अनेक प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर देखील दिल्या जातात. त्यामुळेच आता भारतामध्ये गणपती त्याचप्रमाणे दसरा, दिवाळी हे सण लागोपाठ येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता लवकरात लवकर सेवा देण्यासाठी फ्लिपकार्ट सर्वात मोठा द बिग बिलियन डेज सुरू करणार आहे. यामध्ये जवळपास देशभरातून एक लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहेत. या बिग बिलियन डे पूर्वी त्यांनी नऊ शहरामध्ये 11 नवीन गोदामे सुरू केलेली आहेत
त्यामुळे देशभरात सध्या फ्लिपकार्टची 83 गोदामे आहेत.

‘या’ क्षेत्रांत सर्वाधिक नोकऱ्या

या नोकऱ्यांबाबत बोलताना फ्लिपकार्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या नोकऱ्या या सप्लाय चेन या विविध क्षेत्रात असतील. यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजर, वेअर हाऊस, असोसिएट्स लॉजिस्टिक, कॉर्डिनेटर, किराणा भागीदार, डिलिव्हरी ड्रायव्हर्स इत्यादींचा समावेश असणार आहे. आता सणासुदीच्या काळात नव्या कर्मचाऱ्यांना कौशल्य आणि प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम देखील होणार आहे.

Pune Traffic | गणेशोत्सवानिमित्त पुण्यात होणार वाहतूक बदल’; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Traffic

Pune Traffic | गणेशोत्सव अगदी दोन दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम चालू झालेली दिसत आहे. या दिवसांमध्ये रस्त्यावर खूप गर्दी देखील असते. गणपतीची तयारी करण्यासाठी सगळेजण शॉपिंग करत असतात. त्याचप्रमाणे अनेक लोक हे शहरातून त्यांच्या गावी जात असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये रस्त्यावर खूप जास्त गर्दी दिसते. अशातच आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तीन दिवस वाहतूक बदल करण्यात आलेला आहे. यासाठी वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा देखील वापर करावा. असे वाहतूक शाखेचे पोलीस अमोल झेंडे यांनी सांगितलेले आहे.

पुण्यामध्ये (Pune Traffic) सध्या गणेश मूर्तीच्या विक्री त्याचप्रमाणे डेकोरेशनची विक्री यासाठी विविध ठिकाणी मोठमोठे स्टॉल लागलेले दिसत आहेत. हे स्टॉल मोठ्या संख्येने डेंगळे पूल ते शिवाजी पूल तसेच अण्णाभाऊ साठे चौक आणि कसबा पेठ पोलीस चौकी जिजामाता चौक यांसारख्या भागांमध्ये आहेत. त्यामुळे या भागांमध्ये सतत वर्दळ पाहायला मिळते. या ठिकाणी अगदी लोकांना चालायला ही जागा मिळत नाही. वाहतुकीची तर जास्त कोंडी होते. त्यामुळे या भागातील वाहतुकीत आता बदल करण्यात आलेला आहे. 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा वाहतूक बदल असणार.

त्याचप्रमाणे पुण्यामध्ये (Pune Traffic) सावरकर पुतळा ते सिंहगड रोड पर्यंत अनेक मूर्तीविक्रेतांनी दुकाने मांडलेली आहेत. या भागात वाहन चालकांनी वाहने लावू नये. तसेच मुंडव्यामधील भागात मूर्ति खरेदीसाठी देखील गर्दी होत असते. त्यामुळे या भागातील वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे शिवाजी रोड गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक पर्यंत वाहतूक बंद असणार आहे
यावेळी लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. यासाठी तुम्ही गाडगीळ पुतळ्याच्या चौकातून डावीकडे वळून कुंभार वसे चौक शाहीर अमर शेख चौके मार्गे जाऊ शकता. यासोबत तुम्ही शिवाजीनगर मधून स्वारगेटकडे जायचे असले तर सर्व बर्वे चौकातून जंगली महाराज रोड खंडोजी बाबा चौक टिळक रस्त्याने जाऊ शकता. त्याचप्रमाणे झाशी राणी चौक ते खुडे चौक डेंगळे पूल मार्गे कुंभारकडे जाणाऱ्या वाहन तालुक्यांसाठी खुडे चौकातून मंगला चित्रपट गल्लीतून प्रीमियम चौक शिवाजी पूल मार्गे जाऊ शकता.

वाहतुकीस कोणते रस्ते चालू असणार | Pune Traffic

फडके हौद चौक ते जिजामाता चौक, आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, मंगला चित्रपटगृहासमोरील प्रीमियम गॅरेज गल्ली ते कुंभारवेसमंगला चित्रपटगृहासमोरील प्रीमियम गॅरेज गल्ली ते कुंभार वेस

पीएमपी मार्गात बदल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता जाणाऱ्या मार्गाने बदल करण्यात आलेला आहे. शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात आता बदल केलेला आहे. बर्वे चौक जंगली महाराज रस्ता टिळक रस्त्याद्वारे या बस जाणार आहेत. महानगरपालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस देखील जंगली महाराज रस्त्याने जाणार आहेत.

पावसाळा येताच सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Joints Pain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बदलत्या हवामानासोबत आपल्याला अनेक शारीरिक बदल देखील होत असतात. पावसाळा आला की, पावसासोबत अनेक आजार देखील सोबत घेऊन येतो. पावसामध्ये व्हायरल इन्फेक्शनची खूप जास्त भीती असते. त्यामुळे अनेक लोक तसेच लहान मुलं देखील पावसाळ्यात आजारी पडतात. तसेच त्यांचे वय झालेले आहे त्या लोकांना सहसा पावसामध्ये सांधेदुखीची समस्या उद्भवतात. परंतु अनेक लोक पावसाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीकडे दुर्लक्ष करतात परंतु असे करू नये. हवामान बदलले की, त्यातील आद्रता अनेक प्रकारचे संक्रमण या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होत असतात. आणि हे बदलते वातावरण आपले शरीर सहसा स्वीकारत नाही. त्यामुळे आपल्याला सांधेदुखीची समस्या उद्भवते. आता पावसाळ्यात सांधेदुखीची समस्या नक्की कशाप्रकारे उद्भवते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पावसाळ्यात सांधेदुखी काय होते

ओलसरपणा

पावसाळ्यातील हवामान हे दमट असते. या दमट हवामानामुळे आपल्या सांध्यामुळे एका प्रकारचे द्रव्य जमा होते आणि सांध्यांना सूज येऊ लागते. त्यामुळे संधिवात असलेल्या व्यक्तींना जास्त त्रास होतो.

तापमानात बदल

आपल्याकडे उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. उन्हाळ्यामध्ये उष्णतेची लाट असते आणि पावसाळा आला की, वातावरणात अचानक बदल होतो. अनेकांना हा बदल सहन होत नाही. त्यामुळे त्यांची सांधेदुखी चालू होते. यामुळे सांध्यांना कडकपणा, सूज येते आणि वेदना देखील जाणवू लागतात.

शारीरिक हालचाली कमी

पावसाळ्यामध्ये सहसा लोकांना कुठे फिरायला किंवा जॉगिंगसाठी बाहेर जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली कमी असतात. या सगळ्यांमुळे त्यांचे स्नायू कमकुवत होतात. आणि सांध्यातील वेदना वाढतात. आणि सांध्यांना कडकपणा देखील प्राप्त होतो.

सांधेदुखी पासून आराम कसा मिळवायचा

पावसाळ्यामध्ये सहसा आपल्याला बाहेर पडता येत नाही. अशावेळी तुम्ही घरातच स्ट्रेचिंग करू शकता, चालू शकता. किंवा जॉगिंग करू शकता. यामुळे तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील जास्त वजनामुळे तुमच्या सांध्यांवर दबाव येणार नाही आणि जास्त वेदनात देखील होणार नाही. त्याचप्रमाणे आपण जर जास्त पाणी पिलो तर सांध्यातील लवचिकता टिकून राहते. त्यामुळे संध्याकाळी होत नाही. आणि त्यांना हलके होणे सोपे जाते म्हणूनच जास्तीत जास्त पाणी प्या तुमच्या सांध्यातील सूज कमी करण्यासाठी सोडियम कमी प्रमाणात खा. सांधे दुखीसाठी तुम्ही चांगले पदार्थ खाणे गरजेचे असते. ज्या पदार्थांमुळे जळजळ कमी होते ते पदार्थ जसे की फ्लेक्स सीड, ब्रोकोली यांसारख्या गोष्टींचे सेवन करा. तसेच हळदीमुळे देखील सांधेदुखी कमी होते

कृषिमंत्री शुद्धीत आहेत का? संजय राऊतांची धनंजय मुंडेंवर टीका

sanjay raut on dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) कोसळत आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. नांदेड, हिंगोली, परभणी, या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक (Farmers Crop Damage) डोळ्यादेखत वाहून गेलं आहे. यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला असून झालेल्या नुकसानीची मागणी सरकारकडे केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल नुकसान पाहणी दौरा करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पाहणी दौरा केला. मात्र इतके दिवस कृषी मंत्री कुठे होते? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हंटल, काल आम्ही दुष्काळी भागात होतो. परभणी, हिंगोली, संभाजीनगर येथील रस्ते वाहून गेले. ज्यांची घरे शाळा गुरंढोरं वाहून गेली त्या लोकांनी त्यांनी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवली. या ग्रामीण भागातील रस्त्याची कामे गुजरातच्या ठेकेदारांना दिली आहेत. शेतकऱ्यांचे सर्व काही वाहून गेलं आहे तरीही सरकारने अजून पंचनामा केला नाही. आदित्य ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर सरकारला जाग आली. कृषिमंत्री इतका दिवस कुठे होते? या राज्याला कृषिमंत्री आहेत का तरी असा प्रश्न पडतोय. आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर कृषिमंत्री काही भागात पाहणी करायला गेले मात्र ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत, त्यांनी जमिनीला पाय सुद्धा लावला नाही. उलट मदतीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कृषिमंत्री ओरडत होते कि मी काय करू? मी तुमच्या शेतात काम करू का? असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असल्याचे संजय राऊतांनी म्हंटल.

संजय राऊत पुढे म्हणाले, कृषिमंत्री शुद्धीत आहेत का? जबाबदारी कोणाची आहे? हजारो शेतकऱ्यांचे पीक आणि त्यांचा संसार वाहून गेला आहे, या सगळ्याचा पंचनामा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही जे काही करत आहात ते शेतकरी कधीही विसरणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला.

कोहली, धोनी ते सचिन… भारतीय क्रिकेटर भरतायत भरभक्कम टॅक्स

kohli dhoni sachin tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट (Cricket) हा खेळ आपल्या भारतात खूपच लोकप्रिय आहे. क्रिकेटला आपण एखाद्या धर्माप्रमाणे मानतो, क्रिकेटपटूंवर प्रेम करतो, इतकी क्रेझ आपल्या देशात आहे. इतर कोणत्याही खेळापेक्षा देशात क्रिकेटला जास्त महत्व असल्याने क्रिकेटपटूंना सुद्धा या गोष्टीचा मोठा फायदा होतो. यामुळे देशातील क्रिकेटपटू सर्वाधिक श्रीमंत आहेत. सचिन तेंडुलकर पासून ते विराट कोहली, महेंद्रसिंह धोनीपर्यंत सर्वच क्रिकेटर मालामाल आहेत, आणि यामुळे सरकारकडे त्याना टॅक्स सुद्धा भरावा लागतो. आज आपण जाणून घेऊयात कि असे कोणकोणते क्रिकेटर आहेत जे सार्वधिक टॅक्स सरकारी तिजोरीचे जमा करत आहेत आणि त्यांची एकूण कमाई किती आहे.

फॉर्च्यून इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरणारा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) होता. आपल्या दमदार खेळीने क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला कोहली क्रिकेट शिवाय जाहिरातींमधूनही बक्कळ पैसा कमवतो, त्याचवेळी विराटने यंदा तब्बल 66 कोटी रुपयांचा वार्षिक कर भरला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिह धोनी (MS Dhoni)… आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेऊन बरीच वर्ष झाली असली तरी आयपीएल आणि अन्य जाहिराती तसेच काही गुंतवणुकीच्या माध्यमातून धोनी सुद्धा मालामाल आहे. धोनीने विराट नंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे

विराट आणि धोनी नंतर टॅक्स भरण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) … देशात अजूनही सचिनचे वलय कायम आहे. १० वर्षांपासून सचिन क्रिकेट मधून निवृत्त झाला असला तरी मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिराती करतो. तसेच अनेक ठिकाणी सचिनने गुंतवणूक सुद्धा केली आहे. रिपोर्टनुसार आपल्या एकूण कमाईमधून सचिनने यंदा २८ कोटींचा टॅक्स भरला आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सुद्धा टॅक्स भरण्याच्या बाबतीत मागे नाहीत. जाहिराती आणि आयपीएल मधून सौरव गांगुलीला पैसे मिळतात. यंदा गांगुलीने २३ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे तर खेळाडू हार्दिक पांड्याने १३ कोटी रुपयांचा कर भरला आहे.

Free Toll : सरकारकडून गणेशभक्तांना टोल माफ; शासन आदेश जारी

Free Toll Ganesh Devotee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होणार असून आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई- पुण्यातील अनेक चाकरमानी आपल्या मूळ गावी जाऊन गणरायाचे स्वागत करत असतात आणि या सणाचा आनंद लुटत असतात. आता राज्य सरकारकडून सुद्धा या गणेशभक्तांना खास गिफ्ट देण्यात आलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी (Free Toll) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना टोल माफ (Free Toll) करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच केली होती, परंतु या घोषणेला १० -१५ दिवस उलटून सुद्धा त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला नव्हता, मात्र आता सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. त्यासाठी सदर प्रवाशांकडे पास असणे आवश्यक आहे.

कुठे मिळणार पास? Free Toll

कोकणात जाण्यासाठी टोल माफी मिळवण्यासाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास असणे आवश्यक आहे. त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश सरकार कडून देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळे डबल डबल पास काढण्याची आवश्यकता लागणार नाही.