Monday, December 22, 2025
Home Blog Page 490

Symbiosexual | Symbiosexual म्हणजे काय? संशोधनात आली मोठी माहिती समोर

Symbiosexual

Symbiosexual | जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात असतात. तेव्हा आपसूकच त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक ओढ निर्माण होते. आता जर आपण प्रत्येकाला विचारले, तर प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त काय महत्त्वाचे असते? तर प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरे येतील. कारण या जगामध्ये वेगवेगळ्या विचारांची लोक राहतात. आपण अनेक जोडपी असे पाहिले आहेत. काही होमोसेक्सअल असतात काही बायसेक्शुल असतात. काही लोकांना स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये देखील जास्त इंटरेस्ट असतो. परंतु अलीकडे एक सिम्बियो सेक्सुअलिटी (Symbiosexual) हा प्रकार समोर आलेला आहे. म्हणजे यामध्ये एक व्यक्ती आधीच रिलेशनशिप मध्ये असलेल्या दोन व्यक्तींना डेट करते. आता हे प्रकरण नक्की काय आहे आपण जाणून घेऊया.

सिम्बियो सेक्सुअलिटी म्हणजे काय ? |Symbiosexual

आतापर्यंत आपण लेसबियन, गे ट्रान्सजेंडर यांसारखे प्रकार ऐकलेले आहेत. परंतु आता नवीनच हे सिम्बियो सेक्सुअलिटी नाव समोर येत आहे. यानुसार एक व्यक्ती एका जोडप्याकडे आकर्षित होत असते. जे आधीपासूनच एकमेकांच्या नातेसंबंधात आहे. मानवाची ही एक नवीन आवड आहे आणि काही लोकांमध्ये ती दिसून देखील आलेली आहे. याबाबत एक संशोधन देखील झालेले आहे. जे लोक अशा जोडप्याच्या नात्यात येतात. त्यांना त्यांच्या केवळ शारीरिक गरज पूर्ण करायची असते. त्यांना इतर कोणत्याही लोकांशी जवळीक वाटत नाही.

संशोधनात काय समोर आले

अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे संशोधन केले आहे. यावरून एक नवीन लैंगिकता समोर आलेली आहे. ज्या व्यक्तीला आपण सिम्बियो सेक्सुअलिटी असल्याचे माहित आहे. त्यांना इतर दोन व्यक्तींमध्ये राहायला आवडते. ते त्यांच्यातील प्रेम देखील वाढवतात. आणि स्वतः देखील शारीरिक दृष्टीने त्यांच्यामध्ये समावेश होतात. त्या व्यक्तीला या आधीच दोन प्रेम करणारे लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते.

या संशोधनात विविध विषयांवर प्रश्नांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या अभ्यासामध्ये 373 पैकी 145 सहभागी असलेल्या लोकांनी या प्रकारच्या आकर्षणाला संमती दर्शवलेली आहे. समलैंगिक 90 पेक्षा जास्त झालेले आहे. या संशोधनात ज्यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. ते लोक बहुतेक मध्यमवर्गीय आणि चांगले शिक्षण घेतले आहेत. त्यामुळे आता हा एक नवीन प्रकार उदयास आलेला आहे. या भावना अगदी नैसर्गिक असतात त्यामुळे त्या कोणत्याही गैर मानल्या जात नाहीत.

Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ; या दिवसापासून होणार सुरुवात

Mumbai University

Mumbai University | भारतातील सण उत्सव चालू असतानाच दिवाळीच्या आधी एक मोठी परीक्षा घेतली जाते. विद्यापीठाची सत्र परीक्षा ही हिवाळ्यामध्ये घेतली जाते. अशातच आता मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षांच्या तारखा देखील विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राची परीक्षा 23 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. यामध्ये बीकॉम, बीए, बीएससी यासह विविध परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आलेल्या आहे. यामध्ये इंजीनियरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी या विद्याशाखांच्या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत कामाची बातमी आहे. कारण आता परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे त्यांना अभ्यासाला सुरुवात करावी लागेल.

हिवाळी सत्रासाठी आयोजित केलेल्या या परीक्षांमध्ये तृतीय वर्ष बीकॉम, फायनान्शिअल मार्केट बँकिंग अँड इन्शुरन्स अकाउंटिंग आणि फायनान्स एमबीए या परीक्षा 23 ऑक्टोबर पासून आयोजित केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे बीएच्या तृतीय वर्षाच्या सत्र पाचच्या परीक्षा या 13 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे एलएलबी तृतीय वर्षाच्या सत्र पाच आणि एलएलबी पाच वर्षाच्या परीक्षा 19 नोवेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत.

आता विद्यापीठाकडून या पदवी आणि पदवीधर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहे. यामध्ये इंजीनियरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्या देखील परीक्षा होणार आहे. या परीक्षांच्या 26 तर वेळापत्रक तुम्ही मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पाहू शकता. विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यासोबत वेळापत्रक आणि परीक्षेचे शुल्क कधी भरायचे आहे. त्याच्या तारखा देखील जाहीर केलेल्या आहेत. तसेच जर तुम्ही उशीर केला तर त्यानंतर तुम्हाला किती फी भरावी लागेल? याची माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही आधी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्या आणि तिथे जाऊन तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

Ganeshotsav Celebration| यंदा गणेशोत्सवात चोरट्यांना होणार कडक कारवाई; पुणे पोलीस उभारणार 18 मदत केंद्र

Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration | देशातील सर्वात मोठा गणेशोत्सव हा सण लवकरच येत आहे. या वर्षी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येत आहे गणेशोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि जल्लोसा साजरा करतात. परंतु याच काळात मोबाईल चोरांचा सुळसुळाट देखील खूप मोठ्या प्रमाणात सुटलेला असतो. पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात गणेश उत्सवानिमित्त खूप जास्त गर्दी असते. आणि याचवेळी चोरटे संधी साधून लोकांचे मोबाईल तसेच इतर सगळ्या गोष्टी चोरण्याचा प्रयत्न करतात. तसेच या गर्दीत मुलींची छेडछाड देखील केली जाते. परंतु अशा चोरांवर आणि छेड काढणाऱ्यांवर यावर्षी पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

सगळ्या नागरिकांना सुरक्षित वाटावे आणि त्यांना देखील या गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा. यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या आपण पाहिले तर संपूर्ण भारतात महिला बाबतची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. अगदी लहान मुलींपासून ते म्हाताऱ्या बायका देखील भारतात सुरक्षित नसल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. आणि आता याच गोष्टींना आळा घालण्यासाठी गणेशोत्सवात अशा कोणतीही अनुचित घटना घडून कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी आता पुणे पोलिसांकडून एक मोठे पाऊल उचलण्यात येणार आहे.

आता गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav Celebration ) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून 24 तास मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. पुणे विभागात मध्यभागात 18 पोलीस केंद्र उभारण्यात येणार आहे. यात गणेश उत्सव दरम्यान मोबाईल चोरी महिलांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांची माहिती घेण्यात येणार आहेत. तसेच विशेष शाखा , गुन्हे शाखा वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे गणेश विसर्जनासाठी आणि आगमनाचा मोठमोठ्या मिरवणुका निघतात.

त्यामुळे अनेक रस्ते ब्लॉक होत असतात. परंतु या वर्षी या मिरवणुकीत देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांची कडक बंदोबस्त असणार आहे. तसेच जे लोक चोरी करतात तसेच महिलांची छेड काढतात. अशा सगळ्या लोकांवर यावर्षी कडक कारवाई पुणे पोलिसांकडून होणार आहे. यासाठी मदत केंद्र देखील उभारण्यात आलेली आहे. जर कुठल्याही व्यक्तीला काही संशयास्पद वाटले. तर ते थेट जाऊन पोलिसांशी संपर्क साधू शकता.ज्यामुळे पोलिसांना त्या व्यक्तीला पकडण्यास आणि शिक्षा देण्यास देखील सोपे होईल .

Tata Curvv ICE पेट्रोल- डिझेल इंजिनसह लाँच; किंमत किती पहा

Tata Curvv ICE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील टॉपची ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors ने Tata Curvv ची ICE आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. यापूर्वी हि कार इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करण्यात आली होती, आता पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट मध्ये ती मार्केट मध्ये धुमाकूळ घालणार आहे. Tata Curvv ICE ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. तर या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 17.69 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आज आपण या कारचे खास फिचर, त्याचे इंजिन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

इंजिन – Tata Curvv ICE

Tata Curvv ICE दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिनसह लॉन्च करण्यात आले आहे. यात 1.2 लीटर TGDi टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 125PS पॉवर आणि 225Nm टॉर्क जनरेट करते.. दुसरे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन असून हे इंजिन 120PS पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते तर तिसरे 1.5 लिटर डिझेल इंजिन 118PS पॉवर आणि 260Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे तिन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला जोडण्यात आलं आहे.

फीचर्स –

Tata Curvv ICE मध्ये इलेक्ट्रिक मॉडेल प्रमाणेच 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हॉइस असिस्टंटसह पॅनोरॅमिक सनरूफ, 9-स्पीकर JBL साउंड सिस्टम, हवेशीर अशा फ्रंट सीट्स, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, मूड लाइटिंग फीचर्स यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत तर मागच्या सीट मध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी टू-स्टेप रिक्लाइन फंक्शन, चार्जिंग इंडिकेटर, पॉवर्ड टेलगेट ,लेदर सीट्स, ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, यांसारखी वैशिट्ये मिळतात. सुरक्षिततेसाठी, या एसयूव्ही कार मधे 360 डिग्री कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, 6 एअरबॅग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, एसओएस कॉलिंग फंक्शन, क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम मिळते.

Panjabrao Dakh | शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देणाऱ्या पंजाबराव डख यांचे मोठे नुकसान; शेतातील सोयाबीन गेले वाहून

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh | हवामान खात्याकडून आपल्याला वेळोवेळी पावसाविषयी तसेच हवामानाविषयी अंदाज येत असतात. यासोबतच हवामान खात्याचे हवामान अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेले पंजाबराव डख (Panjabrao Dakh) हे देखील हवामानाचा अंदाज व्यक्त करत असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक वेळा हवामानाविषयी एक अंदाज लावले आहेत. आणि ते अंदाज बरोबर देखील लागलेले आहेत. ज्यामुळे आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज सांगितल्यामुळे त्यांना शेतीची आणि जमीन पेरणीची मशागत योग्य वेळेत करता येते. आणि पुढील नियोजन देखील करता येते. तसेच पाऊस कधी येणार आहे, याचा अंदाज माहित असल्यामुळे त्यांचे नुकसान टाळले जाते. परंतु यावर्षी पंजाबराव डख यांचा हवामानाचा अंदाज चुकलेला आहे. आणि त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झालेले दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी कालपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आणि यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. यासोबतच कितीतरी हेक्टर शेतजमीन ही पाण्याखाली गेलेली असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh) हे परभणी या जिल्ह्यात राहत आहेत. त्यांच्या गावात देखील मुसळधार पाऊस पडलेला आहे. आणि यामुळे संपूर्ण गावात पुरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. मोठे नुकसान झालेले आहे. पावसामुळे 6 – 7 एकर मधील सोयाबीन पूर्णपणे निघून गेलेले आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. आणि शेतीचे नुकसान देखील होत आहे. आता नुकसान झालेल्या या शेतीचे सरकारने ताबडतोब पाहणी करावी आणि पंचनामे करावे तसेच पूरक ग्रस्त आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. असे आव्हान पंजाबराव डख यांनी सरकारला केलेले आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी हवामानाविषयी अंदाज व्यक्त केला होता. त्यांनी सांगितले होते की, येत्या दोन दिवसात शेतातील सगळे कामे उरकून घ्या. कारण सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार आहे.. त्याचप्रमाणे जायकवाडी हे धरण 100% भरणार असल्याची माहिती देखील पंजाबराव डख यांनी दोन दिवसापूर्वी दिलेली होती. पंजाबराव यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरला आहे. परंतु त्यांच्या शेतीतील सोयाबीनचे पीक वाहून गेल्यामुळे त्यांना खूप मोठा आर्थिक झटका बसलेला आहे.

विदर्भ मराठवाड्यात पावसाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे आणि नागरिकांची तारांबळ उडालेली आहे. हवामान विभागाने विदर्भ मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे
त्यामुळे या लोकांना काळजी घेण्याची आश्वासन देखील देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आता येत्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळली; 2 भाविकांचा मृत्यू

vaishno devi landslide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माता वैष्णोदेवीच्या मंदिराजवळ दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे, या भूस्खलनात दोन महिला यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे तर एक मुलगी जखमी झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीच्या तीन किलोमीटर पुढे असलेल्या पंचीजवळील रस्त्यावर दुपारी 2.35 वाजता भूस्खलन झाले, ज्यामुळे वर बांधलेल्या लोखंडी संरचनेचा एक भाग देखील खराब झाला. अचानक दरड कोसळल्यानंतर त्याठिकाणी प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून अपघातात जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरड कोसळल्यामुळे त्या भागातील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे. प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरड कशी कोसळली त्या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत. भूस्खलनाची घटना कशी घडली हे सदर विडिओ मध्ये दिसत आहे.

प्रशासनाने यात्रेकरुंना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. तसेच सर्वत्र लक्ष ठेवून मार्गक्रमण करण्यास सांगितलं आहे. भूस्खलनानंतर यात्रेचा मार्ग बंद आहे. लवकरच मलबा हटवून वाट मोकळी करून दिली जाईल असंही प्रशासनाने सांगितलं आहे श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ यांनीही सदर घटनेबद्दल माहिती देताना म्हंटल, श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्रावर दरड कोसळली असून श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अधिक तपशिलांची प्रतीक्षा आहे. यापूर्वी 2022 मध्ये नवीन वर्षाच्या दिवशी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला होता तर 16 जण जखमी झाले होते.

Ganesh Puja | गणपती बाप्पाच्या पूजनात या 7 गोष्टींचा समावेश नक्की करा; प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Ganesh Puja

Ganesh Puja | गणेशोत्सव हा भारतातील सणांपैकी एक सगळ्यात मोठा सण आहे. हा सण गावापासून ते शहरांपर्यंत मोठ्या जल्लोषात आणि आनंदाने साजरा करतात. यावर्षी गणेश चतुर्थी हा सण 7 सप्टेंबर 2024 रोजी येत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक गणपतीच्या मूर्तीची घरात स्थापना करतात. तसेच जितके दिवस गणपती आपल्या घरी असतो. तितक्या दिवस मनोभावे पूजा (Ganesh Puja) करतात. अगदी प्रत्येकाच्या घरात ते चौका चौकात देखील आपल्याला गणपती पाहायला मिळतात. शहरांमध्ये गणपतीचे (Ganesh Puja) देखावे पाहायला मिळतात. संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो. सगळेजण या दिवसात आपले काम, आपले टेन्शन सगळे बाजूला ठेवून गणपतीच्या आराधनेमध्ये तल्लीन होऊन जातात. पुरातन काळापासूनच भारतामध्ये या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण आणि उत्सव हा भारतात मोठ्या जल्लोशात साजरा केला जातो. पुराणानुसार या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. त्यामुळेच या गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळेजण बाप्पाची मूर्ती घरात स्थापन करतात आणि मनोभावे पूजा करतात.

गणपती हे संपूर्ण भारताच्या आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण गणपती पूजन करून करतो. असे म्हणतात की गणेशाची (Ganesh Puja) उपासना केल्याने ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. परंतु ही उपासना करताना तुम्हाला काही नियम पाळणे देखील खूप गरजेचे असते. आता गणपतीची पूजा करताना नेमकी कोणती पद्धत वापरावी? हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या शास्त्रामध्ये गणपती पूजनाला खूप महत्त्व आहे. अशा काही गोष्टी आहे ज्याच्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचे पालन करून गणपतीची पूजा केली, तर नक्कीच ती पूजा गणपतीपर्यंत पोहोचते असे म्हणतात. आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना कोणत्या गोष्टींची गरज असते हे आपण जाणून घेऊया.

गणपतीची मूर्ती आणणे | Ganesh Puja

सगळ्यात आधी आपल्याला गणपतीची मूर्ती आणायची आहे. परंतु गणपती काही दिवसांनी विसर्जन करायचे आहे. त्यामुळे तुम्ही इको फ्रेंडली मूर्ती आणू शकता. म्हणजेच विसर्जनानंतर पर्यावरणाला यापासून कोणतीही इजा होणार नाही.

चौरंग किंवा पाट

तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यासाठी चौरंग किंवा पाठाचा वापर करू शकता गणपती बाप्पाची मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नये. बाप्पाचे स्थान नेहमी वर असावे. यासाठी तुम्हाला स्वच्छ जागा निवडावी लागेल आणि त्यावर चौरंग मांडून बाप्पाची स्थापना करावी लागेल.

कलश आणि नारळ

गणपती बाप्पाची पूजा करताना कलश आणि नारळ खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही मूर्तीचे स्थापना केल्यानंतर मूर्ती जवळ हा कलश ठेवू शकता. आणि त्यावर नारळ ठेवा तसेच त्यात आंब्याची पाने देखील ठेवा.

लाल कापड

बापाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी लाल रंगाचे कापड खूप महत्त्वाचे आहे. पूजेमध्ये लाल कापडाचे खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना हे लाल वस्त्र तुम्ही बाप्पाच्या खाली ठेवू शकता.

मुळ्याची पाने

गणपती बाप्पाला विशेषता मुळ्याची पाणी अर्पण करतात. बापाला ही पाने खूप प्रिय असतात. त्यामुळे बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते. त्यामुळे तुम्ही पूजा करताना जर मुळ्याची पाणी आणली, तर तुमची पूजा नक्कीच सफल होईल.

पंचामृत आणि मोदक

गणपती बाप्पाला खायला अनेक पदार्थ आवडतात. परंतु त्यातील पंचामृत आणि मोदक हे गणपती बाप्पाचे सगळ्यात आवडते पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही गणपतीला नैवेद्य दाखवताना पंचामृत आणि मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता.

इतर साहित्य | Ganesh Puja

याशिवाय गणपती बाप्पाची पूजा करताना फुले, हार, दिवा, कापूर, लोचन, सुपारी, हळद, पिवळे वस्त्र, दुर्वा घास, अगरबत्ती या गोष्टी देखील असणे गरजेचे आहे.

Ganeshotsav Celebration | यंदा गणेश चतुर्थीला येतात हे 3 मोठे योग; यावेळी करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration | आपल्या भारताला एक पारंपरिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण सगळे सण उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. अशातच येत्या चार-पाच दिवसात भारतातील सगळ्यात मोठा सण गणेश उत्सव आहे. गणेश उत्सव प्रत्येक घराघरात आणि शहरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपण गणपतीला आपले आराध्य दैवत मानतो. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनाने केली जाते. हिंदू धर्मात कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करायची असेल, किंवा कोणतेही शुभकाम करायचे असेल, तर सगळ्यात आधी गणपतीचे पूजन केले जाते. दरवर्षी भारतामध्ये गणेश जन्मानिमित्त गणेश चतुर्थी (Ganeshotsav Celebration) मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी लोक बाप्पाची मूर्ती घरी आणतात आणि त्याची मनोभावे पूजा करतात.

अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आनंदाने गणपतीची पूजा करत असतात. यावर्षी येत्या 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी लोक त्यांच्या घरी बाप्पाची स्थापना करतात. काही लोकांच्या घरी बाप्पा हा दीड दिवसांचा असतो, काही लोकांच्या घरात तोच पाच दिवसांचा असत, तर काही लोकांच्या घरात अकरा दिवसात असतो. प्रत्येकजण त्याच्या सोयीप्रमाणे गणपती बाप्पाची जमेल तेवढी आराधना आणि पूजा करतात.

गणपतीचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला मानला जातो. 2004 मध्ये ही तिथी 6 सप्टेंबर रोजी येत आहे. चतुर्थीची तारीख ही 6 सप्टेंबर 2024 पासून दुपारी 3 : 1 मिनिटापासून चालू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजून 37 मिनिटापर्यंत असणार आहे. पुराणानुसार श्री गणेशाचा जन्म हा दुपारच्या वेळेस झालेला आहे. त्यामुळे गणपतीची पूजा करण्याची शुभ वेळ ही दुपारची वेळ मानली जाते. यावर्षी तीन शुभयोग तयार होणार आहेत. आता ते कोणते योग आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

तीन शुभयोग कोणते ? | Ganeshotsav Celebration

यावर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काही शुभ योग तयार होत आहे. यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती ही परिपूर्ण असते. त्यामुळे या काळामध्ये उपासनेचे परिणाम खूप जास्त लाभदायी असतात. हा योग 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल, तर 8 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटापर्यंत असेल. यावर्षी चतुर्थीला रवी योग देखील तयार होत आहे. हा रवी योग 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल, तर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 34 मिनिटापर्यंत चालेल. या दिवशी ब्रह्मयोग देखील तयार होत आहे. त्यामुळे या योगाची निर्मिती खूप शुभदायक मानली जाते.

बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची योग्य वेळ

तुम्ही तुमच्या घरात बाप्पाची मूर्ती आणल्यावर त्या मूर्तीची वेळेमध्ये प्राणप्रतिष्ठा होणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही 7 सप्टेंबर रोजी दुपारपासून बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता. त्याचा शुभ योग सकाळी 12 वाजून 3 मिनिटांपासून सुरू होईल, ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटापर्यंत राहील. म्हणजे गणपतीच्या स्थापनेसाठी केवळ 150 मिनिटांचा शुभमुहूर्त आहे. यामध्ये जर तुम्ही गणपती बाप्पाची तुमच्या घरात स्थापना केली, तर यातून तुम्हाला खूप शुभ लाभ होईल

गणेश चतुर्थीचा सण का साजरा केला जातो? कारण जाणून घ्याच

Ganesh Celebration 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वाना हवाहवासा वाटणारा आणि ज्या सणाची मोठ्या आतुरतेने ज्याची वाट बघितली जाते तो गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या काळात प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणून त्याची मनोभावे पूजा केली जाते. खजी ठिकाणी ११ दिवसांचा गणपती असतो तर काही जणांच्या घरी दीड तर काही भक्त ५ दिवसांचा गणपती घरी आणतात. यंदा ७ सप्टेंबरला सुरु होणार असून १७ संप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. पण इतर कोणत्या सणापेक्षाही गणेशोत्सव इतक्या मोठ्या धूमधडाक्यात का साजरा केला जातो? यामागे नेमकं कारण आणि इतिहास काय आहे हे तुम्हाला माहितेय का?चला तर मग जाणून घेऊयात….

देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो आणि त्यामागे एक प्रमुख कारण लपलेलं आहे. पौराणिक कथेनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला भगवान श्रीगणेशाचा जन्म झाला म्हणून हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. श्रीगणेशाच्या जयंतीच्या दिवशी लोक त्याला ढोलताशांच्या गजरात घरी आणतात आणि विधीपूर्वक त्याची पूजा करतात. तसेच ११ दिवस गणपती बाप्पाला गोड़धोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. गणपतीला दुर्वा वाहतात, मोदक लाडू देतात. दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते.

गणेश विसर्जनाची रोचक कहाणी

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यानंतर ११ व्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते. मात्र गणपतीचे विदर्ज का केलं जाते हे पण जाणून घेणं आवश्यक आहे. पौराणिक कथेनुसार, महर्षी वेदव्यासजींनी भगवान गणेशाला महाभारताची रचना लिहिण्याची विनंती केली होती. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशीच व्यासजींनी श्लोकाचे पठण सुरू केले आणि गणेशजींनी ते लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी न थांबता 10 दिवस सतत लिहिलं आणि 10 दिवसात गणेशजींना धूळ आणि घाणीचा थर चढला. हा थर स्वच्छ करण्यासाठी गणेशजींनी 10 व्या दिवशी सरस्वती नदीत स्नान केले आणि ही चतुर्थी होती. तेव्हापासून गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो आणि गणपतीचे विधीपूर्वक विसर्जन केले जाते.

टीप – वर दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे.हॅलो महाराष्ट्र त्याची पुष्टी करत नाही. यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

बबन शिंदे यांची माघार, मात्र मुलाच्या उमेदवारीसाठी केविलवाणा संघर्ष

Baban Shinde Madha Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांनी माढ्यात लोकसभेला फिल्डिंग लावली… आणि एन मोक्याच्या टायमिंगला मोहिते पाटलांच्या हातात तुतारी देत रणजितसिंह निंबाळकर यांना पराभवाचा दणका दिला… लोकसभेचं तर झालं पण आता विधानसभेला माढा मतदारसंघातून अजितदादांसोबत गेलेल्या तब्बल सहा टर्मचे आमदार बबन शिंदे यांचा विषय खोल करण्यासाठी तुतारीकडून बबन शिंदे यांच्या सख्ख्या भावाची तसेच अनेक तगड्या उमेदवारांची चाचपणी शरद पवारांकडून केली जातेय… शरद पवारांची पॉलिटिकल पॉवर ध्यानात आल्यामुळे आता बबन शिंदेही पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्यासाठी धडपड करतायेत… त्यांच्या भेटी घेतायेत.. उमेदवारी कोणाला मिळेल, हा पुढचा मुद्दा… पण या सगळ्यात ट्विस्ट आलाय तो बबन शिंदे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे… मी सहा टर्म आमदार झालो पण यंदाच्या निवडणुकीत माझ्याऐवजी मुलगा रणजितला संधी द्या… थोडक्यात बबन शिंदेंनी विधानसभा निवडणुकीतून एक्झिट मारत मुलासाठी आता राजकारण तापवायला सुरुवात केलीय… त्यामुळे माढ्यात आमदार साहेबांच्या मुलाला जनता निवडून देईल का? शरद पवार बंडखोरी केलेल्या आमदाराच्या मुलाला तिकीट देतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माढा विधानसभेला मोहिते पाटील नेमकं कुणाच्या पारड्यात झुकत माप टाकतील? त्याचंच हे सविस्तर डिकोडिंग…

मी आयुष्यभर लोकात राहून काम केलं आणि त्यामुळेच तुम्ही मला आजवर सहा वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी केले. आता यंदाच्या निवडणुकीत माझ्याऐवजी मुलगा रणजीत भैय्याला संधी द्या… असं वाक्य होतं माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचं… बबन शिंदे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार… शिंदेंच्या या वक्तव्यानंतर ते माढा विधानसभेच्या रिंगणात नसतील हे कन्फर्म झालय… आमदार बबन शिंदे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे…. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजितदादांना साथ दिली… पण लोकसभेला शरद पवारांची ताकद कळल्यावर आणि महायुतीच्या विरोधात असणार राज्यभरातील वातावरण पाहून बबन शिंदेंची धाकधूक वाढली… म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या मूळ घरी शरद पवारांची तुतारी हातात घेण्यासाठी त्यांची धडपड चालू असल्याचं आपल्याला अनेकदा पाहायला मिळालय… शरद पवारांच्या त्यांनी अनेकदा भेटीही घेतल्या… पण कदाचित बबन दादांनी फुटीत पंगा घेतल्याने आता त्यांना इंगा दाखवण्यासाठी सुप्रिया सुळे त्यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराची चाचणी करतानाही पाहायला मिळाल्या… त्यात विद्यमान आमदार साहेबांनी आपल्या मुलाच्या नावावर म्हणजेच जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना उमेदवारी पुढे करून स्वतः माघार घेतल्याने माढाचं राजकारण कमालीचं बदलून गेलं आहे…

खरंतर लोकसभेचा कौल तुतारीच्या बाजूने गेल्यामुळे यंदा शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करताना दिसतोय… आमदारकी टारगेट करूनच शिवसेनेच्या संजय कोकाटेंनी तुतारी हाती घेतली… शिवाजी कांबळे देखील माढा विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच भाजपातून राष्ट्रवादीत आले… थोडक्यात विधानसभेला माढ्यात जिंकणार तर राष्ट्रवादीच, हे कन्फर्म समजूनच इथली राजकीय समीकरणे बदलत असल्याने प्रत्येकालाच तिकीट मिळावं, यासाठी संघर्ष करावा लागतोय… पण शरद पवारांनीही अद्याप माढ्यातून आपला उमेदवार कोण हे गुलदस्ता ठेवल्यान सगळेच सध्यातरी गॅसवर आहेत… या सुप्रिया ताईंनी आमदार साहेबांचे लहान बंधू रमेश शिंदे यांची दिल्ली दरबारी भेट घेतल्याने इथून त्यांचे चिरंजीव धनराज शिंदे यांचं नावही चर्चेत आलय… असं झाल्यास माढा विधानसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध शिंदे… तुतारी विरुद्ध घड्याळ असा कौटुंबिक संघर्ष पाहायला मिळू शकतो… त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी नेत्यांच्या मुलांना तिकीट देणार की निष्ठवंतांना संधी देणार, यावर इथल्या राजकीय समीकरणांवर भाष्य करण, सोपं जाणार आहे…

तसं पाहायला गेलं तर सहा टर्मचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांची प्रकृती ठीक नाही… ते शरद पवारांचे निष्ठावंत समजले जायचे.. मात्र लोकसभेच्या आधी झालेल्या राष्ट्रवादीच्या फुटीत मात्र त्यांनी आपली निष्ठा बदलली.. आणि अजितदादांना आपला पाठिंबा देऊ केला… मात्र लोकसभेचा निकाल फिरल्यानंतर आता बबन शिंदेही आपली राजकीय भूमिका बदलत असतील तर शरद पवार ना त्यांच्यावर कितपत विश्वास टाकतील? हा देखील कळीचा मुद्दा आहे… त्यातही मला नाही माझ्या मुलाला निवडून द्या… भविष्यात नवीन पिढी विधानसभेत जात असताना तुम्ही रणजीत भैय्याला एक संधी द्यावी तो कसे काम करतो हे पाहा. जर तुम्हाला काम नाही आवडलं तर पुढच्या वेळी मत द्यायचं की नाही ते ठरवा. मात्र या वेळेला भैय्याच्या पाठीमागे उभे राहा… असं बोलून आमदार साहेबांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला..आमदार साहेब बबन शिंदे एवढेच बोलले नाहीत. तर यापुढे बोलताना म्हणाले की, कामाच्या माणसालाच निवडून देणे गरजेचे असून प्रत्येक वेळी माझ्याकडून जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न मी केला आहे. गरिबातला गरीब माणूस जरी दिसला तरी मी गाडी थांबून बोलतो. अशाच पद्धतीने रणजीत भैय्याही काम करेल. जनता हीच माझी ताकद आहे आणि त्यामुळेच तुम्ही माझ्याप्रमाणे भैय्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.

त्यामुळे यंदा रणजीत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील हे तर कन्फर्म आहे… मात्र त्यांचा पक्ष कुठला हे आत्ताच सांगता येत नाही… निवडणूक लढली तर तुतारीच्याच चिन्हावर असा सध्या त्यांचा प्रयत्न असल्याने जर तिकीट मिळालं नाही तर केवळ अपक्ष उमेदवारी हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर राहतो… त्यातही मोहिते पाटील आणि संजय मामा शिंदे हे एकमेकांचे कट्टर विरोधक… लोकसभेलाही शिंदे बंधूंनी तुतारीच्या विरोधात म्हणजेच मोहिते पाटलांच्या विरोधात काम केलं, त्यामुळे जरी राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळालं तरी मोहिते पाटील हे त्यांचा कितपत प्रचार करतील, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको.. बबन शिंदे आणि त्यांचे चिरंजीव सध्या चांगल्याच राजकीय संकटात सापडलेत.. त्यामुळे आपल्या सहा टर्मच्या अनुभवाच्या जोरावर बबन शिंदे आपल्या मुलाकडे आमदारकीचा पुढचा वारसा देण्यात यशस्वी ठरतील की जनता नव्या उमेदवाराच्या पाठीशी आपलं निर्णायक मतदान देईल? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा