Monday, December 22, 2025
Home Blog Page 491

गणरायाची पूजा कशी करावी? बाप्पाचा आवडता नैवेद्य कोणता?

Ganesh Puja 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव हा आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय सण मानला जातो. या काळात आपण आपल्या घरी गणरायाची मूर्ती आणतो, ढोल ताशांच्या गजरात गणेशाचे स्वागत केलं जाते. आणि ११ दिवस त्याची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. अतिशय भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र गणेशाची पूजा कशी करावी? कोणते मात्र त्यावेळी म्हणावे हे तुम्हला माहित आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर सांगतो.

यंदा गणेश स्थापनेची योग्य वेळ कोणती? Ganesh Chaturthi 2024

गणेश स्थापनेची योग्य वेळ कोणते हे जाणून घेणं सर्वात महत्वाचे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो कि, ७ सप्टेंबर रोजी दुपारपासून बाप्पाची मूर्ती घरोघरी आणू शकता. त्याचा शुभ योग सकाळी 11:03 पासून सुरू होईल आणि दुपारी 01:34 पर्यंत राहील. याचा अर्थ 2024 मध्ये गणपतीची मूर्ती स्थापनेसाठी अडीच तास (150 मिनिटे) शुभ मुहूर्त आहे. त्याकाळात तुम्ही गणरायाला घरी आणून त्याची स्थापना करू शकता.

गणपतीची पूजा कशी करावी?

गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी सकाळी उठून स्नान करावे. स्थापनेच्या वेळेनुसार बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. यानंतर पूजा सुरू करावी. गणरायाला पिवळे कपडे परिधान करा, त्याला सिंदूर आणि चंदनाचा तिलक लावा तसेच यानंतर गणेशाच्या चरणी फुले ठेवावीत. गणपतीला दररोज दुर्वा वाहाव्या. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून गणेश चालिसा आणि त्याचे वैदिक मंत्र म्हणा. यानंतर गणरायाची आरती म्हणून आणि नैवेद्य म्हणून गणपती बाप्पाला मोदक प्रसाद म्हणून द्यावा.

गणपतीचा आवडता नैवेद्य कोणता?

गणरायाला तांदूळ आणि गव्हाच्या पिठाचे लाडू आणि मोदक, गूळ आणि खोबरे यांनी भरलेले गोड पकोडे खूप आवडतात. तसेच त्याला मोदक सुद्धा आवडतात. त्यामुळे गणेशोत्वसाच्या काळात गणपती बाप्पाला २१ मोदक खाऊ घाला. तसेच तुमचा प्रसाद हा शक्यतो गोड़ पदार्थ असावा.

Ganesh Puja : कोणत्याही पूजेपुर्वी गणपतीला पहिला मान का दिला जातो? जाणुन घ्या यामागील कारण

ganpati pooja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2024) धामधूम आता ऐन रंगात आली आहे. लंबोदर गणेश सिद्धीबुद्धीचा दाता, गणांचा स्वामी म्हणून गणपती आहे. हत्तीचे मस्तक आणि उंदीर हे वाहन असलेला गणेश बुद्धीमान समजला जातो. आपल्याकडे कोणत्याही शुभकार्यापूर्वी अथवा कोणत्याही देवाची पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजा (Ganesh Puja) केली जाते. आरती म्हणताना सुद्धा आधी गणपतीची म्हंटली जाते आणि मग बाकी देवांची आरती म्हंटली जाते. त्यामागे कांही कारणे सांगितली जातात व त्यासंदर्भात काही कथाही आहेत. चला जाणून घेऊयात.

असे म्हणतात, की पार्वतीमाता स्नान करत असताना पहार्‍यावर तिने गणेशाला बसविले होते. शंकर महादेव आल्यानंतरही गणेशाने त्यांना आत सोडले नाही तेव्हा रागावून त्यांनी त्याचे शिर धडावेगळे केले. मुलाची ही स्थिती पाहून पार्वती भयंकर संतापली तेव्हा तिला शांत करण्यासाठी शंकरांनी हत्तीचे डोके तोडून ते गणेशाला लावले. तरीही पार्वतीचा राग गेला नाही. तेव्हा शंकराने तिची समजूत काढताना पार्वतीला तुझ्या मुलाला कुणीही कुरूप म्हणणार नाहीत आणि सर्वप्रथम त्याचीच पूजा केली जाईल असा वर दिला.

दुसर्‍या कथेनुसार, सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा यावर वाद सुरू झाला. सर्व देव विष्णुंकडे गेले तेव्हा विष्णु त्यांना घेऊन महादेवांकडे गेले. तेव्हा अशी तोड निघाली की सर्व देवतांनी विश्व परिक्रमेला जावे व ज्याची प्रदक्षिणा सर्वप्रथम पूर्ण होईल त्याला अग्रपूजेचा मान दिला जाईल. सर्व देवता आपापल्या वाहनांवर बसून निघाल्या तेव्हा गणेशाने बुद्धीचातुर्याने पार्वती व शंकर यांनाच प्रदक्षिणा घातली. माता म्हणजे पृथ्वी व पिता म्हणजे आकाश.त्यामुळे मातापित्यांना घातलेली प्रदक्षिणा म्हणजेच विश्व परिक्रमा. अशा तर्हेने ही स्पर्धा गणेशाने जिंकली व त्यामुळे त्याला अग्रपूजेचा मान मिळाला असं म्हंटल जाते.

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाच्या काळात करू नका या चुका; पहा काय काळजी घ्यावी

Ganesh Chaturthi 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा येत्या ७ तारखेला आपल्या घरी येणार आहे. प्रत्येक वर्षी सर्वजण आतुरतेने गणरायाची (Ganesh Chaturthi 2024) वाट बघत असतात. काही जणांच्या घरी ११ दिवसांचा गणपती असतो, तर काहींच्या घरी दीड किंवा ५ दिवसांच्या गणपतीची स्थापना केली जाते. असे मानले जाते की जर एखाद्या भक्ताने श्रीगणेशाची खऱ्या मनाने पूजा केली तर त्याच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव आणि यश निश्चितच येते. तर आपल्यावर आलेल्या संर्व संकटावर गणपती बाप्पा मात करतो. मात्र गणपती घरात असताना काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे. चला तर मग हे नियम काय आहेत ते जाणून घेऊया.

गणपतीची मूर्ती घरी आणत असताना नेहमी व्यवस्थित घरी आणावी, गणपती बापाच्या मूर्तीला कुठेही तडा जाणार नाही , ती मूर्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती मंदिरात ठेवल्या जात नाहीत. तो अपशकुन मानला जातो.

गणपतीची मूर्ती (Ganesh Chaturthi 2024) घेत असताना बाप्पाच्या अंगावर लाल रंगाचा कपडा परिधान करावा, कारण गणरायाला लाल रंग खूप आवडतो.

जेव्हा तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना कराल तेव्हा तुमचं घर व्यवस्थित साफ करा, किंवा त्याठिकाणी गंगाजल शिंपडा.असं म्हंटल जाते कि जिथे घाण आणि अस्वच्छ वातावरण आहे अशाठिकाणी देवी-देवता वास करत नाहीत. त्यामुळे घराची साफसफाई करा.

गणरायाची मूर्ती बसवताना शुभ दिशा कोणती ते आधी पहा आणि मगच त्यानुसार गणरायाची स्थापना करा. गणपतीचे तोंड हे घराच्या शुभ दिशेला असावे. खास करून घराच्या उत्तर दिशेला श्रीगणेशाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. तसेच गणपती बाप्पाचे मुख घराच्या प्रवेशद्वाराकडे असावे असेही म्हंटल जाते.

यासोबतच श्रीगणेशाच्या मूर्तीच्या पूर्व दिशेला कलश ठेवा आणि दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा.

गणेश स्थापनेची योग्य वेळ कोणती? Ganesh Chaturthi 2024

गणेश स्थापनेची योग्य वेळ कोणते हे जाणून घेणं सर्वात महत्वाचे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो कि, ७ सप्टेंबर रोजी दुपारपासून बाप्पाची मूर्ती घरोघरी आणू शकता. त्याचा शुभ योग सकाळी 11:03 पासून सुरू होईल आणि दुपारी 01:34 पर्यंत राहील. याचा अर्थ 2024 मध्ये गणपतीची मूर्ती स्थापनेसाठी अडीच तास (150 मिनिटे) शुभ मुहूर्त आहे. त्याकाळात तुम्ही गणरायाला घरी आणून त्याची स्थापना करू शकता.

Airtel Postpaid Plan | Airtel ने आणले स्वस्त रिचार्ज प्लॅन; OTT सबस्क्रिप्शनसह मिळणार अनेक फायदे

Airtel Postpaid Plan

Airtel Postpaid Plan | सध्या बाजारामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या उपलब्ध आहेत. त्यातील एअरटेल ही टेलिकॉम कंपनी खूप जास्त प्रसिद्ध आहे. एअरटेलने जुलै महिन्यात त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ केलेली आहे. त्यानंतर त्यांचे युजर्स काही प्रमाणात नाराज झाले. परंतु एअरटेल देखील त्यांच्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच नवनवीन योजना लॉन्च करत असतात. कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेडमध्ये (Airtel Postpaid Plan ) विविध बदल केलेले आहेत.

जर तुम्ही देखील एअरटेल पोस्टपेडचे (Airtel Postpaid Plan ) युजर असाल, आणि तुम्हाला एका चांगली योजना पाहिजे असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही निवडक पोस्ट पॅड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. यावर तुम्हाला ओटीटीचे सबस्क्रीप्शन देखील मिळेल.

549 रुपयांचा प्लॅन | Airtel Postpaid Plan

एअरटेलचा हा एक पोस्टपेड प्लॅन आहे. प्रति महिना एवढी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 75 जीबी डेटा ऑफर करतो. त्यासोबत तुम्हाला तर रोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सेवा असते. तुमच्यासाठी हा प्लॅन अतिशय फायदेशीर असणार आहे. कारण या प्लॅनमध्ये तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यांची सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे.

699 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये (Airtel Postpaid Plan ) फॅमिली अँड ऑन सुविधा आहे. यामध्ये तुम्हाला 75 जीबी डेटा उपलब्ध आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंगसोबत तुम्हाला दररोज 100 SMS ची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यांचे सबस्क्रीप्शन मिळणार आहे. तुम्ही जर पोस्टपेड प्लॅनचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी हे दोन्ही प्लॅन खूप फायदेशीर आहेत. कारण यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डेटाचा फायदा मिळतो. असेच ओटीटीचे सबस्क्रीप्शन देखील फ्रीमध्ये मिळणार आहे.

सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही; कोर्टाने पोलिसांवर केली कारवाई

Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशामध्ये शारीरिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हा कितीही गुन्हा किती मोठा असला, तरी न्यायालयाच्या निर्णयापूर्वी काही करता येत नाही. अशातच उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलेले आहेत. म्हणजेच आरोपींचा तपास करताना पोलिसांना योग्य ते पुरावे गोळा करता येत नाही. असे देखील सांगण्यात आलेले आहे. बरेलीमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली. त्यानंतर न्यायालयाने कठोर भूमिका घेत, त्या व्यक्तीला निर्दोष देखील मुक्तता केलेली आहे. या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार सहमतीने जे शारीरिक संबंध ठेवतात, ते बलात्काराच्या श्रेणीमध्ये येत नाहीत. तसेच निकृष्ट दर्जाची चौकशी करणाऱ्या निरीक्षकावर कारवाई करण्याच्या देखील आदेश दिलेले आहेत.

या ठिकाणातील माहिती हाती आलेल्या माहितीनुसार कर्मचारी नगर येथे एक 34 वर्षीय महिला राहत होती.तिला तीन मुले देखील आहेत. या महिलेचे शिवम नावाच्या व्यक्तीसोबत 2016 ते 2019 या तीन वर्षाच्या काळात संबंध होते यावर या महिलेने त्या व्यक्तीवर सतत 3 वर्ष बलात्कार केल्याचे आरोप लावलेले आहेत. त्या महिलेच्या सांगण्यानुसार लग्न करेल या गोष्टीची आमिष दाखवून शिवमने तिच्यावर तीन वर्ष बलात्कार केला आहे. त्यानंतर त्या महिलेने प्रेम नगर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार देखील केली. यानंतर या प्रकरणाची खूप तपासणी झाली आणि महिलेने हे आरोप फेटाळले आणि तरुणाची निर्दोष मुक्तता देखील केली आहे.

या केसमध्ये कोर्टाने असे म्हटले आहे की, जर एखाद्या महिलेला तीन मुले आहेत. तर ती लग्नाच्या जाळ्यात कशी काय अडकू शकते? ही 34 वर्षीय महिला घटस्फोटीत नव्हती किंवा ती अविवाहित देखील नव्हती. तिचा विवाह झालेला असून तिला तीन मुले होती. परंतु यातून असे निदर्शनास आले की, या तीन वर्षात झालेला सर्व प्रकार हा त्या महिलेच्या संमतीने झालेला होता. त्यामुळे ही केस बलात्कारामध्ये येत नाही, असे कोर्टाने सांगितलेले आहे. त्यामुळे त्या पुरुषाला निर्दोष मुक्त केलेली आहे. तसेच न्यायालयाने त्या महिलेला दंड देखील ठोठावला आहे. या महिलेने तरुणावर लग्नासाठी दबाव टाकला होता. आणि पोलिसांची चांगले समन्वय साधून तरुणाला अडकवले असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे महिलेने हा संपूर्ण प्लॅन केला होता. आणि यामध्ये पोलिसांनी तिला मदत केल्यामुळे त्या पोलिसाला पोलिसावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे.

शिवरायांचा पुतळा तुटला नाही तर तोडला; नव्या दाव्याने खळबळ

sanjay raut on shivaji maharaj statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याप्रकरणी सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी पाहायला मिळत असून आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. शिवरायांचा पुतळा तुटला नाही तर तोडला आहे असा आरोप राऊतांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथांनी पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेलं आणि सर्वात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटीशांचा यूनियन जॅक फडकवला त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. हे आम्हाला दुर्दैवाने बोलावं लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यास विरोध करताय. मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला हे तुमचं पाप आहे. तुम्हीच तोडलात. हा पुतळा तुटला नाही तोडलात”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

महाराजांच्या पुतळ्यात कोट्यावधींचा घोटाळा करणारे आजही मोकाट आहेत. त्यांना तुम्ही अटक करु शकत नाही. कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसैनिक जेव्हा मालवणला गेले, तेव्हा त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचे काम जे भाजपचे गुंड करत होते. तुम्ही त्यांचे समर्थक आहात. पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे तुमचे गुंड आम्हाला महाराजांचा इतिहास शिकवणार का? असा सवाल करत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. असं संजय राऊतांनी म्हंटल.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात. वेगळा विदर्भ करणं हे तुमच्या मनात आहे की नाही? वेगळा विदर्भ केल्याशिवाय लग्न करणार नाही असं तुम्ही बोलला होता ना? हि घोषणा कोणाची होती. जर तुम्ही शिवरायांचे खरे भक्त असाल तर बेळगाव कारवार बद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा. शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे राज्य तुम्ही खतम करायला निघाला आहेत असा आरोप संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

Vegetable Price Hike | गणेशोत्सव गृहिणींसाठी महागणार; 10 ते 20 टक्क्यांनी वाढले भाज्यांचे दर

Vegetable Price Hike

Vegetable Price Hike | महाराष्ट्रात आता लागोपाठ सण आलेले आहेत. गणेशोत्सव त्यानंतर दसरा, दिवाळी हे सण लागोपाठ येणार आहेत. सध्या गणरायाच्या आगमनाची तयारी सर्वत्र चालू झालेली आहे. सार्वजनिक ठिकाणी त्याचप्रमाणे घरगुती गणपतीची तयारी देखील चालू झालेली आहे. लोक आनंदाने आणि उत्साहाने गणपती साजरा करतात. परंतु यावर्षी गणेशोत्सव जरा महाग जाणार आहे. खास करून महिलांसाठी महाग असणार आहे. कारण भाज्यांच्या दरात (Vegetable Price Hike) आता 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. गणेशोत्सवात भाज्या आणि फळांची किंमत जास्त वाढणार आहे. त्यामुळे तुमच्या खिशाला अतिरिक्त बाहेर पडू पडणार आहे.

सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे भाज्यांची आवाक (Vegetable Price Hike) देखील कमी झालेली आहे. त्यामुळे आता लसूण, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर तसेच घेवड्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. ही वाढ 10 ते 20 टक्क्यांनी झालेली आहे. त्याचप्रमाणे इतर फळभाज्यांचे दर स्थिर राहणार आहेत.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी अनेक राज्यातून तसेच परराज्यातून 90 ट्रक फळभाज्या येत असतात. यामध्ये कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश यांच्यातून मिळून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरचीचे असतात. कर्नाटक आणि गुजरात कडून 7 ते 8 टेम्पो कोबी असतो. कर्नाटक आणि गुजरात कडून 3 ते 4 टेम्पो घेऊन असतो. आंध्र प्रदेश तमिळनाडूकडून 4 ते 5 टेम्पो शेवगा असतो. तसेच मध्य प्रदेशातून 10 ते 12 टेम्पो गाजर गुजरात मधून तीन ते चार टेम्पो भुईमुगाच्या शेंगा. तसेच मध्य प्रदेशातून जवळपास 10 ते 12 टेम्पो लसूण परराज्यातून महाराष्ट्रात आवाहक होत असतो. याची माहिती मार्केट यार्डमधील जेष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिलेली आहे.

सध्या पाऊस आणि ऊन या दोन्हींचा खेळ चालू झालेला आहे. त्यामुळे पालेभाज्या लवकर खराब होतात. म्हणून पालेभाज्यांच्या मागणीत देखील आता कमतरता झालेली आहे. यामध्ये कोथिंबीर, मेथी, शेपू, करडई, अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे कांदा पात, मुळा, राजगिरा, चाकवत, पुदिना, चवळी, पालक यांचे भाव स्थिर झालेले दिसत. यामध्ये कोथिंबीरची एक जुडी 70 जुडी आणि मेथीच्या पन्नास हजार जोडींची आवाज झालेली आहे.

घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर | Vegetable Price Hike

  • कोथिंबीर 3000 ते 4000 रुपये
  • मेथी – 1500 ते 2500 रुपये शेकडा
  • शेपू – 1000 ते 1500 रुपये शेकडा
  • कांदापात – 1500 ते 2000 रुपये
  • चाकवत – 800 ते 1000 रुपये
  • करडई – 500 ते 800 रुपये
  • पुदिना – 500 ते 1000 रुपये
  • अंबाडी – 500 ते 1000 रुपये
  • मुळे – 1000 ते 1800 रुपये
  • राजगिरा – 500 ते 800 रुपये
  • चुका – 500 ते 1000 रुपये
  • चवळई – 500 ते 800 रुपये
  • पालक – 1000 ते 1800 रुपये

फळांचे दर | Vegetable Price Hike

सध्या फळांचे बाजार स्थिर आहे. यामध्ये अननस, लिंबू, डाळिंब, संत्री, मोसंबी, कलिंगड, सीताफळ, पपईचे भाव स्थिर आहे. फळ बाजारात जास्त बदल झालेले पाहायला मिळालेले नाही. गणेश उत्सवाच्या काळात फळांना जास्त मागणी असते. त्यामुळे फळांचे भाव स्थिर आहेत.

Railway Ticket Booking : आता आवाजाने किंवा कॉलवरूनही होईल तिकीट बुकिंग; रेल्वेची खास सुविधा

Railway Ticket Booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे उत्तम साधन आहे. खास करून लांबच्या पल्ल्यासाठी नेहमीच रेल्वेने प्रवास केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळे विस्तारलं असून कुठूनही कोणत्याही भागात जाणे शक्य आहे, त्यामुळे दररोज करोडो प्रवाशी ट्रेनने प्रवास करत असतात. . रेल्वे प्रवास सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने नवनवीन गोष्टी आणत असते. आताही इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने अशी एक सुविधा आणली आहे ज्यामाध्यमातून तुम्ही तुमच्या एका आवाजाने किंवा थेट कॉल करून रेल्वे तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) करू शकता , रद्द करू शकता किंवा PNR स्टेट्स चेक सुद्धा करू शकता. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

सुविधा वेगवेगळ्या भाषेत – Railway Ticket Booking

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) लोकांना आवाजाद्वारे ट्रेन तिकीट बुक करण्याची सुविधा सुरु केली आहे. IRCTC, NPCI आणि CoRover ने UPI साठी संभाषणात्मक व्हॉइस पेमेंट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवासी केवळ व्हाईसच्या माध्यमातून किंवा थेट कॉल करून तिकीट बुक करू शकता. रेल्वेची नवीन सुविधा पेमेंट गेटवेशी जोडलेली आहे ज्याच्या मदतीने लोकांना त्यांचा आवाज वापरून किंवा कॉलवर त्यांचा UPI आयडी किंवा मोबाइल नंबर टाइप करून तिकीट बुकिंग आणि पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. हि सुविधा वेगवेगळ्या भाषेत देण्यात आली असल्याने प्रवाशांचे काम सोप्प होतंय. खास बाब म्हणजे यामुळे आता पेमेंट सुद्धा अशाच प्रकारे करता येणार आहे. प्रवाशी क्रेडिट/डेबिट कार्ड, नेटबँकिंग आणि वॉलेट यासारख्या विविध पेमेंटचा वापर करू शकतात. पैसे भरल्यानंतर तिकीट बुक केले जाते. हे सर्व काम भारतीय रेल्वेसाठी AI व्हर्च्युअल असिस्टंट Askdisha द्वारे केले जाईल.

“UPI वापरून व्यापाऱ्यांना पेमेंट करणारी ही पहिली संभाषणात्मक व्हॉइस पेमेंट सिस्टम आहे. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की व्हॉइस पेमेंटचा अर्थ असा नाही की तो तुमचा UPI पिन आपोआप टाकेल. उलट, याचा अर्थ असा आहे की ते तुम्हाला थेट पेमेंट गेटवेवर घेऊन जाईल जेणेकरून तुम्हाला तुमचा UPI आयडी पुन्हा पुन्हा टाकण्याची गरज भासणार नाही. रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी आणि जलद आहे. तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) व्यतिरिक्त, तुम्ही पीएनआर स्टेटस तपासू शकता, तिकीट रद्द करू शकता, रिफंड घेऊ शकता, बोर्डिंग स्टेशन बदलू शकता, बुकिंग इतिहास तपासू शकता.

Special Express Train | पुण्याहून उत्तर भारतात सुरु होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक

Special Express Train

Special Express Train | रेल्वेचा प्रवास हा सर्वात सुखकर प्रवास मानला जातो. रेल्वेमुळे प्रवास चांगला होतो. आणि कमी खर्चात देखील होतो. त्यामुळे अनेक लोक या रेल्वेचा प्रवास करत असतात. अशातच आता रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यावरून उत्तर भारतात प्रवेश करणाऱ्यांसाठी ही बातमी खास आहे. अनेक लोक उत्तर भारतातून पुण्या मुंबईच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी तसेच शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात मुंबई आणि पुण्यावरून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या नेहमीच जास्त असते. यावेळी त्यांना पुण्यावरून थेट उत्तर भारतात जाता येत नाही. यासाठी त्यांना वेगवेगळ्या गाड्या आणि ट्रेन बदलावे लागतात. परंतु आता त्यांचा हा त्रास कमी होणार आहे. कारण आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पुणे ते गोरखपुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पुण्यातून थेट उत्तर भारतामध्ये जाता येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने (Special Express Train) घेतलेल्या या निर्णयाचा उत्तर प्रदेश त्याचप्रमाणे गोरखपुरला जाणाऱ्या संपूर्ण वेळापत्रक नक्की कशी असणार आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला जर या गणपतीच्या काळात तसेच सणासुदीच्या काळात उत्तर भारतात म्हणजेच तुमच्या गावी जायचे असेल, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

रेल्वे प्रशासनाने या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक देखील झाले केलेले आहे. या वेळापत्रकानुसार पुणे ते गोरखपूर गाडी क्रमांक 01431 ही रेल्वे 25 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी सोडले जाणार आहे. आणि गोरखपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.

त्याचप्रमाणे गोरखपूर ते पुणे गाडी क्रमांक 01432 ही रेल्वे 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी गोरखपुर वरून पुण्याला येण्यासाठी गोरखपूर रेल्वे स्थानकात दर शनिवारी रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी सोडली जाणार आहे. तर ही गाडी पुण्याला तिसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पोहोचणार आहे

ही गाडी दौंड, कार्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, विरंगणा, राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, मलकापूर, जंक्शन वस्ती यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. अशी माहिती प्रशासनाकडून मिळालेली आहे.

10 वी, 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित; याप्रकारे होणार परीक्षा

10 th And 12 th board Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक पद्धतीमध्ये खूप जास्त बदल झालेला आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धती बदललेल्या आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण देखील कमी केलेला आहे. पूर्वी बोर्डाचे पेपर द्यायचे म्हटले, तर तासान तास घोकंपट्टी करावी लागायची. 500 ते 700 शब्दांमध्ये उत्तर पाठ करावी लागायची. परंतु आता अभ्यासातील ही घोकंपट्टी पूर्णपणे थांबलेली आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केलेला आहे. आणि हा मसुदा विद्यार्थ्यांना ऑनलाइन देखील उपलब्ध होणार आहे. 3 जून पर्यंत हा आराखडा विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध व्हावा यासाठी हरकती देखील मागवल्या होत्या. हा आराखडा अंतिम तयार करण्यात आलेला आहे. आणि परीक्षेत आता विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी व्हावी म्हणून क्षमाधिष्ठित प्रश्नांवर अधिक भर दिलेला आहे. आणि आता हाच नियम नववी ते अकरावी आणि त्यानंतर दहावी ते बारावी साठी लागू होणार आहे.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना मानवी मूल्य, जीवन कौशल्य आणि नैतिकतेवर देखील विचार करणारे शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न होऊनच त्याच्या पुढील आयुष्यात प्रवेश करणार आहे. यासाठी त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि परीक्षा पद्धतीमध्ये देखील बदल केलेला आहे. आता तिसरी ते बारावी पर्यंतच्या परीक्षा या दोन सत्रात होणार आहे. आता अजून शिक्षणाचा नवीन आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार आरोग्य कला आणि व्यावसायिक शिक्षणावर जास्त भर दिला जाणार आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीतून त्यांचे ज्ञान कसे वाढेल, याचे प्रयत्न केले जाणार आहे. इयत्ता तिसरीपासून व्यवसायिक शिक्षण दिले जाईल. तिसरी ते आठवीसाठी व्यावसायिक कौशल्य नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय असणार आहे.

व्यवसायिक शिक्षणांतर्गत आता कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स असे विविध नवीन विषय असणार आहेत. हा आराखडा दहावी बारावी सोडून इतर सगळ्या वर्गासाठी लागू होणार आहे. त्यानंतर नवीन आराखड्यावर तुमचा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न देखील बदलणार आहे. याबद्दलची माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील आता नवनवीन ज्ञान आत्मसात करायला मिळणार आहे.

बोर्ड परीक्षा क्षमता निश्चित प्रश्न

पारंपारिक परीक्षानुसार विद्यार्थ्यांना मोठमोठे उत्तराचे प्रश्न विचारले जायचे. यावेळी विद्यार्थ्यांना ते पाठांतर करून त्याची विस्तृत अशी उत्तरे लिहिणे अपेक्षित होते. परंतु आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न जास्तीत जास्त विचारले जाणार आहे. एखादा विषय विद्यार्थ्याला किती समजला आहे. आणि त्या विषयाचा वापर तो शिक्षणानंतर आयुष्यात कसा करतोय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2025 – 26 नंतर परीक्षा पद्धतीत हा बदल होऊ शकतो

बोर्डाच्या परीक्षा 10 दिवस आधी

विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणाच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारे अडचणी येऊ नये. तसेच बारावीत कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारायची संधी मिळावी. यासाठी यावर्षीची परीक्षा ही नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर घेण्याचे बोर्डाने सांगितलेले आहे. आणि 30 ऑगस्ट नंतर हरकती सूचना देखील मागवलेल्या होत्या. त्यामुळे आता जवळपास दहा हजारापर्यंत हरकती प्राप्त झालेल्या आहे. येत्या दहा दिवसात बोर्डाकडून परीक्षेचे दहा दिवस वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. परंतु बारावीची परीक्षा ही 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी यादरम्यान दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च यादरम्यान घेण्याच्या नियोजन आहे. परंतु या तारखा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.