Sunday, December 21, 2025
Home Blog Page 498

शरद पवारांची इनकमिंग ठरवणार आमदार कोण होणार ते

sharad pawar tutari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेल लावलेला पैलवान आता मैदानात उतरलाय… लोकसभेला 80 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केल्यानंतर आता विधानसभेला कोल्हापूर पासून ते इंदापूर पर्यंत… ते अगदी नगरमध्येही शरद पवार पायाला भिंगरी बांधून फिरतायत… आणि फक्त फिरतच नाही तर राजकारण तुतारीच्या बाजूने सेट करतायेत… शरद पवारांच्या नावाचा करिष्मा, त्यांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि पक्षात असणारा स्पेस पाहून प्रत्येकजण आमदार होण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ इच्छितोय… त्यासाठीचं इनकमिंग देखील सुरू झालय… या इनकमिंगच्या प्रोसेस मध्ये असलेल्या, किंवा इन्कमिंग झालेल्या पुढाऱ्यांच्या लिस्टची यादी मोठी असली तरी त्यातले पाच चेहरे असे आहेत की ज्यांच्या हातात तुतारी दिली, तर ते आरामात आमदार होतील… दुसऱ्या पक्षातून शरद पवारांच्या पक्षात इन्कमिंग झालेल्या आणि आमदार होण्याचे फिक्स चान्सेस असणाऱ्या या मोहऱ्यांच्या विरोधात महायुतीकढून रिंगणात नेमकं कोण असेल? स्वतः शरद पवारांनी टार्गेट केलेले हे हाय व्होल्टेज पाच मतदारसंघ नेमके आहेत तरी कोणते? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

भाजप पक्ष सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेऊन आमदार होण्याचे ज्यांचे चान्सेस वाढलेत असं नाव म्हणजे समरजीतसिंह घाटगे…कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्याची घोषणा रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती… यानंतर या निर्णयाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी घाटगे नवा पर्याय शोधत होते… त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय घेऊन त्यांनी घड्याळ विरुद्ध तुतारी अशा फायनल संघर्षाची जणू घोषणाच देवून टाकली… जसं ८ वर्षं मी प्रामाणिकपणे काम केलं, तसंच शरद पवार व तुमच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करेन, असं बोलून त्यांनी कागलच्या निवडणुकीत मोठी रंगत आणलीये… देवेंद्र फडणवीसांचा विश्वासू राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या घाटगे यांना आपल्या गोटात घेऊन मुश्रीफांशी पंगा घ्यायचाच अशा आक्रमक भूमिकेत सध्या शरद पवार असल्याचं दिसतं… त्यामुळे मुश्रीफांशी सतत कडवा संघर्ष करूनही आमदारकी पदरात न पडलेल्या समरजीतसिंह घाटगे यांना तुतारी तारणार का? हे पाहावं लागेल…

शरद पवार गटात इनकमिंग होण्याची शक्यता असणार दुसरं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील….सहकार क्षेत्रातील धुरीण, पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात दीर्घकाळ मंत्री म्हणून काम केलेले ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा एक पाय भाजपात तर दुसरा राष्ट्रवादी शरद पवार गटात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे… इंदापूरवर एकहाती कंट्रोल ठेवणाऱ्या हर्षवर्धन पाटील अजित पवार गटाच्या दत्ता भरणे यांनी 2014 च्या निवडणुकीत पराभवाचा दणका दिला… हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी अजित पवार नेहमीच दत्ता भरणे यांना बळ देत आले… म्हणूनच आता आपलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी शरद पवारांची बंद दाराआड भेट घेतली… शरद पवार यांना मिळत असलेली सहानुभूती, हर्षवर्धन पाटील यांनी २० वर्षांत मंत्री म्हणून केलेले काम, त्यांचं स्थानिक राजकारणावर विशेषत: सहकारावर असलेला दबदबा हे सगळं जोडून पाहिलं तर शरद पवारांच्या तुतारी या चिन्हावर ते अजितदादांचे कट्टर समर्थक दत्तामामा भरणे यांचा आरामात कार्यक्रम करू शकतात…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेणारा तिसरा मोहरा म्हणजे वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे मदन भोसले… राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांना अनेकदा आव्हान देऊनही मदन भोसले यांच्या पारड्यात कधीच यश पडलं नाही… सध्या भाजपात राहून ते आमदारकीसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते… मात्र विद्यमान आमदार मकरंद पाटीलच अजित दादांच्या सोबतीने महायुतीत येऊन बसल्याने भोसलेंची राजकीय अस्वस्थता वाढली होती… त्यात त्यांनी नुकतीच जयंत पाटलांची भेट घेऊन आपण तुतारी हातात घेणार असल्याचं क्लियर करून टाकलंय… लोकसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातून तुतारीला मिळालेल लीड पाहता अनेक इच्छुकांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत… मात्र मदन पाटील यांच्या तोडीस तोड चेहरा पक्षात घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तयारी करून असावेत… म्हणूनच पाटलांच्या विरोधातील नेहमीचे प्रतिस्पर्धी आणि माजी आमदार मदन भोसले यांनाच राष्ट्रवादीकडून गळ घातली जातीये… लोकसभेला वाई मतदारसंघाने तुतारीला दिलेलं लीड, शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती, कडवा शिवसैनिक, मदन भोसले यांची कारखानदारी आणि संस्थात्मक ताकद हे सगळं विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना अडचणीत आणणार आहे, एवढं मात्र नक्की… मदन भोसले यांना तुतारी फुंकण्यासाठी शरद पवार वाईत भोसलेंना नेमकी ताकद कशी पुरवतील, हे पाहणं मात्र महत्त्वाचा असणार आहे…

राष्ट्रवादी शरद पवार गटाने इतर पक्षातून इन्कमिंग करताना नगर जिल्ह्यालाही सोडलं नाही त्यातलंच एका भल्या मोठ्या राजकीय प्रस्थाला तुतारीची ओढ लागलीय ते नाव म्हणजे विवेक कोल्हे यांचं….आणि राजकीय वर्तुळात चर्चांच्या वावड्या उठू लागल्या… खरंतर कोपरगावमधील कोल्हे आणि काळे यांच्यातला राजकीय संघर्ष हा तसा जुनाच… तो आता तिसऱ्या पिढीपर्यंत जाऊन पोहोचलाय… विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांना साथ देत मोठी खेळी केली… यामुळे भाजपात असणाऱ्या आणि यंदा हमखास आमदारकीच्या रिंगणात दिसणाऱ्या विवेक कोल्हे यांची सध्या मोठी कोंडी झाली होती… त्यामुळे त्यांनी आता आमदार साहेबांना टशन देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेण्यावर भर दिलाय… त्यांचा शरदचंद्र पवार पक्षातील ऑफिशियल पक्षप्रवेश किंवा तशी घोषणा अद्याप झाली नसली तरी काळेंना पारंपारिक लढत देण्यासाठी त्यांना शरद पवारांच्या बॅक सपोर्टची मोठी मदत होणार आहे, एवढं मात्र नक्की…

आता या यादीतलं पाचवं आणि शेवटचं नाव येतं ते ए. वाय. पाटील यांचं…राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव पाटील उर्फ ए. वाय. पाटील यांनी केव्हाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला होता… इतकंच काय तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शाहू छत्रपती महाराजांचा प्रचार केला होता… प्रचारात ते सर्वाधिक ऍक्टिव्ह देखील होते… कोल्हापुरातील राधानगरी विधानसभेची जागा शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर यांना जाणार यावर फक्त कन्फर्मेशनच येणं बाकी आहे… त्यामुळे ए. वाय. पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणाची पुढची पावलं ओळखत आदी महाविकास आघाडीची कड घेतली… आणि आता शरद पवार यांच्यासोबतचा त्यांचा संपर्क देखील वाढला आहे… हे सगळं सांगून जातं की येणाऱ्या काळात राधानगरीच्या जागेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ए. वाय. पाटील शिंदे गटाच्या आबिटकरांच्या विरोधात निर्णायक लढत देतील… तर अशी होती शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर आगामी विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकून विजयाचे चान्सेस असणारे पाच शिलेदार…

ITBP Recruitment 2024 | ITBP मध्ये 819 रिक्त पदांची भरती सुरु; महिना मिळणार 69 हजार रुपये पगार

ITBP Recruitment 2024

ITBP Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील एक अशी संधी घेऊन आलेलो आहोत. आता तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी लागणार आहे. कारण आता भारत सरकारच्या गृह विभागाअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला इंडो तिबेटियन पोलीस फोर्समध्ये (ITBP Recruitment 2024) नोकरी करण्याची संधी आहे. या पदाच्या तब्बल 819 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पुरुष आणि महिला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 1 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | ITBP Recruitment 2024

आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल किचन सर्विस या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

रिक्त पदांची संख्या

आयटीबीपीमध्ये तब्बल 819 रिक्त जागा आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 458 जागा, एससी प्रवर्गासाठी 48, जागा एसटी प्रवर्गासाठी 70 जागा, ओबीसीसाठी 162 जागा तर ईडब्ल्यूएससाठी 81 जागा राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता

कॉन्स्टेबल किचन सर्विसेस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | ITBP Recruitment 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी आहे. तर महिला, माजी सैनिक, एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना फी भरावी लागणार नाही

मासिक पगार

कॉन्स्टेबल किचन सर्विसेस या पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराला दर महिन्याला 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये एवढा पगार दिला जाईल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज प्रक्रिया

या भरती अंतर्गत पीईटी, पीएसटी आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.

अर्ज सुरू होण्याची तारीख

या भरतीचे अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | ITBP Recruitment 2024

1 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Hurun India Rich List 2024 | हुरून इंडियाने जाहीर केली भारतातील श्रीमंतांची यादी; जाणून घ्या टॉप 10 लोकांची संपत्ती

Hurun India Rich List 2024

Hurun India Rich List 2024 | आपला भारत देश कितीही विकसनशील देश असला, तरी आपल्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत ही एक खूप मोठी दरी बनलेली आहे. गरिब हे आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालल्याचा काहीसा प्रकार आता दिसत आहे. आपल्या देशामध्ये अनेक श्रीमंत असे लोक आहेत. ज्यांचा यावर्षी श्रीमंताच्या यादीची समवेश झालेला आहे. आणि या यादीत तब्बल 1539 भारतीयांचा समावेश आहे. या 1539 भारतीयांची एकूण संपत्ती ही 1000 कोटींपेक्षा जास्त आहे. गेल्या वेळी पेक्षा ही संख्या 220 पेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आलेली आहे. अनेक लोक अशी आहेत. ज्यांची संपत्ती ही 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि त्यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत होत चाललेली आहे. या यादीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच 272 नवीन नव्या दाखल झालेली आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षाच्या दरम्यान यावर्षी 86 टक्क्यांनी यात वाढ झालेली आहे. आता या यादीतील पहिल्या दहा श्रीमंत भारतीयांची नावे आणि संपत्ती आपण जाणून घेऊया.

भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिले नाव हे गौतम आदाने यांचे येते. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 1,161, 800 कोटी रुपये एवढी आहे. यांच्या कंपनीचे नाव आदानी असे आहे. तसेच त्यांचे वय हे 62 वर्ष एवढे आहे. दुसऱ्या क्रमांकातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 1, 014,700 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव हे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. तर त्यांचे वय हे सध्या 67 वर्ष एवढे आहे. भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत तिसरे नाव हे शिव नादर यांचे येते. त्यांची एकूण संपत्ती ही 314, 000 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव एचसीएल एवढे आहेत त्यांचे वय सध्या 79 वर्ष एवढे आहे.

कायरस पुनावाला यांची एकूण संपत्ती ही 289,800 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असे आहे. तसेच त्यांचे वय सध्या 83 वर्षे एवढे आहे. देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत पाचवे नाव हे दिलीप सांगवी यांचे येते. त्याची एकूण संपत्ती ही 249,900 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव सन फार्मासिटिक एआय इंडस्ट्रीज असे आहे. देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर कुमार मंगलम बिर्ला यांचे नाव येते. त्यांची एकूण संपत्ती ही 235,200 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव आदित्य बिर्ला असे आहे. तसेच त्यांचे वय सध्या 57 वर्ष आहे .

देशातील सर्वात श्रीमंत (Hurun India rich list 2024) लोकांच्या यादीत सातवे नाव हे गोपीचंद हिंदुजा यांचे येते. त्यांची एकूण संपत्ती 192,700 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव हिंदुजा असे आहे. त्यांचे वय सध्या 84 वर्ष आहे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आठव्या क्रमांकावर राधाकिशन दमानी यांचे नाव येते. त्यांची एकूण संपत्ती 190,900 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव अवेन्यू सुपरमार्क्स असे आहे. देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत नावे अजीम प्रेमजी यांचे येते. त्यांची एकूण संपत्ती ही 190,700 कोटी रुपये आहे. त्यांच्या कंपनीचे नाव विप्रो असे आहे. तसेच देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दहावे नाव हे नीरज बजाज यांचे येते. त्यांची एकूण संपत्ती ही 162, 800 कोटी रुपये एवढी आहे, तर त्यांच्या कंपनीचे नाव बजाज असे आहे.

शाहरुख खानला मिळाली श्रीमंतांच्या यादीत जागा | Hurun India Rich List 2024

भारतीय चित्रपट सृष्टीतील किंग खान म्हणजे शाहरुख खान हा याची देखील पहिल्यांदाच हुरून इंडियाच्या (Hurun India rich list 2024) श्रीमंताच्या यादीत जागा मिळवलेली आहे. त्याची एकूण संपत्ती ही 7300 कोटींपर्यंत पोहोचलेली आहे. चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान याच्या व्यतिरिक्त जुई चावला, हृतिक रोशन, करण जोहर, अमिताभ बच्चन यांचा देखील श्रीमंतांच्या यादीत समावेश केलेला आहे.

2030 पर्यंत ही शहरे पृथ्वीवरून होणार नाहीशी; नकाशावरही दिसणार नाही नामोनिशाण

Cities

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या पृथ्वीचा अंत होणार आहे. असे आजपर्यंत आपण कित्येक वेळा ऐकलेले आहे. एवढंच काय !अगदी जगाचा अंत होणार आहे, याची तारीख देखील समोर आलेली आहे. आणि अनेक लोकांनी त्याची वाट देखील पाहिली आहे. परंतु अजून तरी तसे काही चित्र दिसलेले नाही. परंतु अनेकांना हा प्रश्न पडतो की, या जगाचा अंत होणार आहे तर नक्की कसा होणार आहे?आणि याला नक्की कोणती कारणे आहेत? आता या गोष्टीला अनेक कारण आहेत. आणि त्यातीलच एक महत्त्वाचे कारण म्हणजे हवामानात सातत्याने होणारा बदल.

आपल्या जगात जर पाहिले तर अनेक शहरे ही समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली आहेत. जेव्हा हवामान बदल होतो. तेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. अगदीच स्तूनामीची देखील शक्यता असते. यांचा परिणाम या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना होऊ शकतो. एवढेच काहीतरी शहरे पूर्णपणे नष्ट होतील. असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. आता याच हवामान बदलाच्या कारणांमुळे 2030 पर्यंत जगातील जवळपास पाच शहरे पूर्णपणे नाहीशी होतील. असे देखील सांगण्यात आलेले आहे. तसेच नकाशावरून देखील या शहरांचे नाव हटवले जाणार असल्याची चर्चा चालू आहे. आता नक्की ही कोणती पाच शहरे आहेत? हे आपण जाणून घेऊया.

नेदरलँड, ॲमस्टर्डम

ॲमस्टर्डम हे शहर विविधतेने नटलेले आहे. हे एक ऐतिहासिक शहर आहे याच ठिकाणी अनेक कालवे आहेत. तसेच ऐतिहासिक आकर्षणासाठी हे एक प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. या शहराला एक मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि हे शहर अगदी समुद्राच्या काठावर आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली, तर या शहराच्या अस्तित्व धोक्यात येऊ शकते. तसेच नेदरलँड मध्ये ही अनेक धरणे आहेत. जर या धरणाच्या सातत्याने पाणी पातळीमध्ये वाढ झाला, तर या ठिकाणची जमीन वेगाने बुडू शकते. अशी माहिती समोर आलेली आहे.

न्यू ऑर्लियंस यूएसए

न्यू ऑर्लियंस हे शहर या नदीच्या काठावर आहे. हे शहर म्हणजे अमेरिकन संस्कृतीच्या एक प्रतीक मानले जाते. परंतु अगदी पाण्याच्या किनाऱ्यावर असलेल्या या शहराला भविष्यात जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. कारण या समुद्राचे पातळी सातत्याने वाढत असते. त्यामुळे हे शहर पूर्णपणे बुडून जाण्याचे संकेत दिसत आहेत. या ठिकाणी प्रतिबंधक भिंती देखील बांधलेल्या आहेत. परंतु या भिंती कमकुवत झाल्यानंतर मात्र या शहराला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो.

होची मिनी सिटी व्हिएतनाम

हे शहर देखील समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली, तर या शहराला एक खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. या शहराच्या पूर्वेकडील जिल्ह्यांना पुराचा खूप मोठा धोका आहे. परंतु या शहरांच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही. त्यामुळे 2030 पर्यंत हे शहर बुडण्याची शक्यता अभ्यासकांकडून वर्तवली गेलेली आहे

वेनिस शहर इटली

इटलीमधील हे वेनिस शहर अत्यंत सुंदर असे शहर आहे. पर्यटनासाठी हे शहर खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणांचे सौंदर्य पाहून अनेक लोक या ठिकाणी भेट देतात. परंतु सध्या या शहराच्या जवळ समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच हवामान विभाग देखील सातत्याने या शहराला पुराचा धोका वर्तवत आहे. जर भविष्यात या शहराला वादळी वारा आणि समुद्राच्या मोठ्या पातळीचा सामना करावा लागला, तर या शहराचा नाश होण्याची शक्यता आहे.

बँकॉक थायलंड

बँकॉक थायलंड या शहराची राजधानी आहे. परंतु या थायलंडच्या अस्तित्व देखील संपुष्टात येण्याची भीती वर्तवण्यात आलेली आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यावर या ठिकाणची जमीन बुडू शकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच बँकॉकचा काही भाग सध्या पाण्याखालीच आहे.

Mhada Mumbai : मुंबई म्हाडाच्या लॉटरीत कोणाचा नंबर लागला ? कधी समजणार ? आली अपडेट

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची (Mhada Mumbai) उपलब्धता करून दिली जाते.

म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये 2030 सदनिकांच्या विक्रीची सोडत जाहीर करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. म्हाडाच्या या घरांच्या किमती ह्या वाढलेल्या असल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी याला प्रतिसाद देणे टाळलं आणि त्यानंतर एक महत्त्वपूर्ण भूमिका घेत राज्य शासनाकडून घरांच्या किमतीमध्ये 10 ते 25 टक्क्यांनी घट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदतही 19 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी एक पुढची अपडेट म्हणजे म्हाडाची लॉटरी नेमकी कधी काढली जाईल (Mhada Mumbai) असा प्रश्न विचारण्यात येतोय. आता याच घरांची लॉटरी जाहीर करण्यासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे चला जाणून घेऊया….

कधी निघणार लॉटरी ? (Mhada Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार मुदत वाढीनंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लॉटरी जाहीर करण्यात गेली असे समजते आहे म्हणजेच म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये कोणाची निवड करण्यात आली आहे आणि कोणाची निवड केलेली नाही हे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात समजणार आहे.

घरांच्या किंमती कमी केल्या (Mhada Mumbai)

म्हाडाच्या घराच्या किंमती या 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विविध पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. मुंबई म्हाडा लॉटरी 2024 मध्ये देखील याचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार 33 (5) आणि 33 (७) अंतर्गत करण्यात आलेल्या योजनेतील घरं विकासकांकडून म्हाडाला मिळालेली आहेत. या घरांच्या किमती कमी होणार आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी किमती दहा टक्के कमी होणार आहेत तर मध्यम गटासाठी पंधरा टक्के रक्कम कमी होणाऱ आहेत तर अल्पगटासाठी 20% रक्कम कमी होणार आहे. शिवाय अत्यल्प गटासाठी असलेल्या घरांच्या (Mhada Mumbai) किमतीमध्ये 25 टक्क्यांनी घसरण होणार आहे.

Black Rice Benefits | मधुमेह आणि हृदयरोगींसाठी काळा तांदूळ आहे वरदान; होतात अनेक फायदे

Black Rice Benefits

Black Rice Benefits | आपल्या देशामध्ये भात शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे . अनेक लोक हे भात शेती करतात. त्यामुळे तांदूळ हा आपल्या देशातील एक प्रमुख आहार आहे. अनेक लोक असे आहेत, ज्यांचे भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही. कोणतीही थाळी घ्यायची असेल, तरी भाताशिवाय ती थाळी पूर्ण होत नाही. अनेक लोक हे सामान्यता पांढरा भात खातात. परंतु असे म्हणतात की, हा भात चवीला कितीही चांगला लागत असला, तरी आपल्या आरोग्यासाठी थोडा हानिकारक असतो. कारण जास्त भात खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहत नाही.

यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. कारण आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त कर्बोदके असतात. परंतु जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तरी देखील तुम्हाला भात खाण्याची इच्छा पूर्ण करायची असेल, तर तुम्ही ब्राऊन राईस (Black Rice Benefits) खाऊ शकता. हा तुमच्या आरोग्यासाठी एक अत्यंत आरोग्यदायी पर्यायी मानला जातो. आजकाल काळा तांदूळ खाण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पांढरा तांदळाच्या मान्याने काळा तांदूळ हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. आता या काळात तांदळाच्या आपल्या आरोग्याला काय फायदा होतो हे आपण जाणून घेऊया. .

काळा तांदूळ काळा का असतो ? | Black Rice Benefits

काळ्या तांदळामध्ये अँथोसायनिन नावाचे एक रंगद्रव्य असते. ज्यामुळे तांदळाला काळा रंग प्राप्त होतो हे एक चांगले अँटिऑक्सिडंट आहे. त्यामुळे तांदळाचा रंग काळा होतो.

काळ्या तांदळाचे फायदे

पांढऱ्या तांदळापेक्षा काळा तांदूळ हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्व, अमिनो ऍसिड आणि इतर अनेक खजिने असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. यासोबतच काळ्या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून देखील आराम मिळतो. काळ्या तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रणात राहते आणि तुमची पचनशक्ती सुधारते. तसेच काळा तांदूळ हा हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असा मानला जातो.

काळ्या तांदळामध्ये (Black Rice Benefits) भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. जे तुमच्या शरीराला तणावापासून दूर ठेवतात. एक्सीडेंट तणावामुळे कर्करोगासारखा आजार होतो. त्यामुळे काळ्या तांदळाचे कर्करोगापासून संरक्षण होते. काळ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 42 ते 50 या दरम्यान असतो. त्यामुळे साखरेची आपल्या शरीरातील पातळी वाढत नाही. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी हा भात अत्यंत फायद्याचा मानला जातो. तसेच जर तुमचे वजन नियंत्रणात आणायचे असेल आणि तरी देखील तुम्हाला भात खायचा असेल, तर तुम्ही जेवणात काळ्या तांदळाचा समावेश करू शकता.

महाराष्ट्रातील सिंचन प्रश्न मिटवण्यासाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन; ‘नार पार नदी जोड प्रकल्पाला देणार गती

Nar Par River Linking Project

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र हे देशात शेतीसाठी समृद्ध असं राज्य म्हणून ओळखलं जाते. राज्यात ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, तूर, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र एवढी कृषी समृद्धी असूनही महाराष्ट्राला सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, सोलापूर, माण, खटाव, धाराशिव, लातूर, आणि पश्चिम विदर्भ या भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. पुरेशा सिंचनाअभावी या भागात अनेकदा स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्या होतात. या दुष्काळी पट्टयातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या भागात पुरेशा प्रमाणात सिंचन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

राज्याची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न झाले. महामंडळे स्थापन झाली. त्यासाठी निधी दिला गेला. कर्जरोखे उभारले गेले. पण राज्याची सिंचन क्षमता अपेक्षेप्रमाणे वाढली नाही आणि स्थिती जैसे थेच राहिली. यादरम्यान अनेकदा सरकारे सुद्धा बदलली, राजकीय आरोप- प्रत्यारोप झाले मात्र महाराष्ट्रातील सिंचनाचा प्रश्न हा म्हणावा तसा अजूनही सुटलेला नाही. मात्र भाजप नेते आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आता सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारच्या नार पार नदी जोड प्रकल्पाला गती देण्याचा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) प्रयत्न आहे.

तस बघितलं तर आपल्या महाराष्ट्रात असंख्य नद्या वाहतात, तरीही महाराष्ट्रात पाणीटंचाईची गंभीर समस्या कायम आहे. उदाहरणार्थ, गोदावरी नदीचा उगम नाशिकमध्ये होतो परंतु नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याव्यतिरिक्त, दमणगंगा आणि नार यांसारख्या पश्चिम वाहिनी नद्यांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्राच्या बाजूने अपुऱ्या प्रयत्नांमुळे, मोठ्या प्रमाणात पाणी गुजरातमध्ये वाहते. पार-तापी-नर्मदा नदी जोडणी प्रकल्पाला 1980 मध्ये उत्तर महाराष्ट्राच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी मान्यता देण्यात आली. मात्र, त्यावेळी सरकारी इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रकल्प रखडला. यामुळे गुजरातला महाराष्ट्राच्या जलस्रोतांचा फायदा होत राहिला तर नाशिक आणि जळगावमधील अनेक तालुके कोरडे राहिले.

देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येला तोंड द्यायचे ठरवले होते. 2019 मध्ये त्यांनी नदीजोड प्रकल्पासाठी गुजरातची मदत नाकारली आणि तो महाराष्ट्र स्वतंत्रपणे पूर्ण करेल असे ठामपणे सांगितले. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या प्रकल्पाला खीळ बसली. परंतु 2022 मध्ये, शिवसेना-भाजप युती सरकारने नार-पार-गिरणा नदी जोड (Nar Par River Linking Project) उपक्रमासाठी 7,015 कोटी रुपये मंजूर करून प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे नार आणि पार नद्यांचे अतिरिक्त पाणी कालवे आणि बोगद्यांद्वारे गिरणा नदीच्या खोऱ्यात वाहून नेणे. यातून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५०,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.

अतिरिक्त प्रकल्प-

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयात सुद्धा पाणी टंचाईने डोकं वर काढलं आहे. याठिकाणी सुद्धा पुढील सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहेत. फडणवीस यांनी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे सकारात्मक परिणाम दिसून आले आणि पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्प सुरू केला. पूर्व विदर्भातील नद्यांचे पाणी पश्चिम विदर्भात आणण्याच्या उद्देशाने नळगंगा वैनगंगा इंटरलिंकिंग प्रकल्पालाही सरकारने मान्यता दिली आहे. अंदाजे 80,000 कोटींच्या या उपक्रमामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांना 3.71 लाख हेक्टर जमीन सिंचनाचा लाभ होईल. सरकारच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेने हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये लक्षणीय सकारात्मक बदल दिसून येतील.

अनेक आव्हानांचा सामना करूनही महाराष्ट्राची सिंचन क्षमता वाढवण्याचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. शाश्वत सिंचन पद्धतींवर राज्याचे लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट केवळ कृषी उत्पादकता वाढवणे नव्हे तर शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. जलयुक्त शिवार योजना गावांमध्ये विकेंद्रित जलस्रोत निर्माण करण्यात विशेषतः यशस्वी ठरली आहे. इतर संरचनांमध्ये चेक बंधारे आणि पाझर तलाव बांधून या उपक्रमाने भूजल पातळीत लक्षणीय सुधारणा केली आहे ज्यामुळे दुष्काळी भागातील हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

केवळ नार-पार-गिरणा नदी जोडण्याच्या उपक्रमाने पूर्वीच्या कोरड्या जमिनींना अत्यंत आवश्यक सिंचन सुविधा उपलब्ध करून देऊन महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची अपेक्षा आहे. शिवाय मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासारख्या उपक्रमांचा उद्देश पाण्याच्या उपलब्धतेतील प्रादेशिक असमानता दूर करणे आणि राज्याच्या विविध भागांमध्ये समान वितरण सुनिश्चित करणे आणि त्यामुळे संकटग्रस्त शेतकरी समुदायांमधील स्थलांतराचे प्रमाण कमी करणे. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे पीक उत्पादन सुधारेल आणि त्याची उन्नती होण्यास मदत होईल. शेतकरी आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करून त्यांच्या पिकांमध्ये विविधता आणू शकतात ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल.

राणेंचं खळबळजनक ट्विट!! ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा….

nilesh rane vaibhav naik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर खापर फोडत आहेत. परवा राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात राजकोट किल्ल्यावरच मोठा राडा सुद्धा पाहायला मिळाला. याप्रकरणी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Patil) घटनास्थळी 15 मिनिटात कसे पोचले असा सवाल करत राणेंनी या सर्व घटनेवर वैभव नाईक यांच्यावरच संशय निर्माण केला आहे.

याबाबत निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी. निलेश राणे यांच्या या ट्विट नंतर आता वैभव नाईक काय प्रतिक्रिया देतात ते पाहायला हवं.

दरम्यान, राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर आपली पोलीस आणि गृखात्याकडून काहीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया नाईकांनी दिली होती. जोपर्यंत सरकार बदलणार नाही, तोपर्यंत दडपशाहीचं राजकारण सुरूच राहील असं सांगताना त्यांनी पुतळा उभारणी आणि अनावरण सोहळ्यादरम्यानच्या काळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळला असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. खरं तर ज्यावेळी हा पुतळा तयार करण्यात येत होता त्यावेळीच स्थानिक लोकांनी कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या मात्र जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहेत असं समजून पद्धतशीरपणे याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करु असा इशारा वैभव नाईक यांनी दिला होता.

याप्रकरणातील स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप फरार असून त्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पण तो पळून पळून जाणार कुठे, तो देश सोडून तर जाऊ शकत नाही. त्याला लवकरच शोधलं जाईल. पुतळा उभारतानाा नेमकी काय चूक झाली, हे त्याच्याकडून जाणून घेतलं जाईल’, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

Jitesh Antapurkar : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप!! या आमदाराने दिला राजीनामा

Jitesh Antapurkar Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्र काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यामध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. त्यामुळे जितेश अंतापूरकर कधीही पक्षाची साथ सोडून महायुतीसोबत जातील, अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर आज त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीविषयी जितेश अंतापूरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते. मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे असलेले घनिष्ठ संबंध आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या यादीत त्यांच्या नावाची सातत्याने होत असलेली चर्चा या दोन कारणामुळे जितेश अंतापूरकर हे लवकरच काँग्रेसला रामराम ठोकतील असं बोललं जात होते. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचे तिकीट काँग्रेस कापणार असल्याच्या चर्चाही मागील काही दिवसांपासून सुरु होत्या, त्याच्याच भीतीमुळे जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी राजीनामा दिला नाही ना अशीही चर्चा सुरु आहे.

कोण आहे जितेश अंतापूरकर?

जितेश अंतापूरकर हे देगलूर बिलोलीचे काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे ते सुपुत्र आहेत. कोरोना काळात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन झालं आणि देगलूर मध्ये पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. मात्र अशोक चव्हाण जेव्हापासून भाजपमध्ये गेले तेव्हापासून जितेश अंतापूरकर यांच्यावरही संशयाचा भोवरा होता.

Chickpea Eating Benefitsn | काबुली चणे आहेत गुणांचे भांडार, आहारात सेवन केल्यास होतात अनेक फायदे

Chickpea Eating Benefits

Chickpea Eating Benefits | आपल्याला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर त्यासाठी पौष्टिक अन्न खाणे खूप गरजेचे असते. आहारात यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करू शकतो. परंतु नैसर्गिक दृष्टीने जे पौष्टिक अन्न आहे ते खाणे खूप गरजेचे असते. कारण यामध्ये सगळे पोषक तत्वे असतात. या सगळ्यांमध्ये काबुली चणे हे चवीला आणि पौष्टिक असतात. तसेच आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. चण्यांचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. परंतु जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी चणे खूप फायदेशीर आहेत. कारण चण्यांमुळे तुमच्या शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. तसेच तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल, तरी देखील चण्यांचा आहारात समावेश करणे खूप गरजेचे आहे. थोडक्यात चवी सोबतच चण्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तर चण्यामुळे नक्की कोणते फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

चणे खाल्ल्याचे फायदे | Chickpea Eating Benefits

ब्लड शुगर स्टॅबिलायझर

सगळ्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे. त्यांच्यासाठी अनेक पौष्टिक आहार आहे. तुम्ही जर सतत चण्याचे सेवन केले, तर तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील कमी होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चणे खूप पौष्टिक आहे.

प्रथिनांनी समृद्ध | Chickpea Eating Benefits

सगळ्यांमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात. तुम्ही जर शाकाहारी आहात असाल तर तुमच्यासाठी चने खाणे हा एक उत्तम आहार आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे रेसिपी करून या सणांचे सेवन करू शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर होईल.

हृदयाचे आरोग्य सुधारते

चण्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. हे फायबर आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवते. त्यामुळे आपले हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. हृदयविकाराचा धोका यांसारख्या गोष्टींपासून आपण लांब राहतो.

हाडांचे आरोग्य

चण्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम, झिंक, विटामिन के यांसारखी प्रथिने आढळतात. त्यामुळे आपल्या हाडांना मजबुती प्राप्त होते. जर तुम्हाला हाडांचे काही आजार असतील, हाडे दुखत असतील तर तुम्ही तुमच्या दररोज जेवणामध्ये चण्यांचा समावेश करू शकता.

बद्धकोष्ठते पासून आराम

चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. या फायबरमुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर तो त्रास देखील कमी होतो. आणि तुमची पचनक्रिया अत्यंत व्यवस्थित चालते.

वजन कमी होण्यास मदत | Chickpea Eating Benefits

चणे खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरून राहते. तसेच अनावश्यक भूक देखील लागत नाही. आणि जंक फूड खाण्याची इच्छा देखील कमी होते. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही दररोजच्या आहारात चण्यांचा समावेश करू शकता.