Monday, December 22, 2025
Home Blog Page 525

Russia Earthquake | रशियात तीव्र भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; त्सुनामीच्या धोक्याचा इशारा

Russia Earthquake

Russia Earthquake | रशिया मधून एक वाईट बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज सकाळी पूर्व किनाऱ्यावर रशियामध्ये भूकंपाची धक्के जाणवलेले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार रशियातील पूर्व किनार्‍याजवळ जवळपास 7.0 रिष्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक देखील झालेला आहे. या ठिकाणी झालेल्या या ज्वालामुखीची राख समुद्रसपाटीपासून जवळपास 8 किलोमीटर पर्यंत हवेत पसरलेली देखील होती. आणि ज्वालामुखीतून लाव्हारस देखील वेगाने बाहेर येत.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की, 18 ऑगस्ट रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी रशियामध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप (Russia Earthquake) झालेला आहे. याठिकाणी भूकंपाचे धक्के हे तीव्र होते. आणि याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. या भूकंपामुळे आणखी एक नवे संकट रशिया पुढे उभे राहिलेले आहे. ते म्हणजे येत्या काळात देखील येथील लोकांना दिलेला आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | Russia Earthquake

रशियामध्ये हा भूकंप झाला असला आणि स्तूनामीची भीती निर्माण केली, असली तरी आपत्कालीन मंत्रालय काम शाखेने त्सुनामीचा कोणताही दुकान असल्याची माहिती सांगितलेली आहे. परंतु अमेरिकेने माहिती दिली आहे, त्या माहितीच्या आधारे भूकंपाच्या तीव्रतेमुळे रशियाच्या 300 किलोमीटर परिसराच्या आत समुद्र किनारपट्टीवर सुनामीच्या लाटा येऊ शकतात. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सुरुवातीला जे भूकंपाचे तीव्रता होती. ती अत्यंत कमी होती परंतु हळूहळू भूकंपाचे धक्के वाढत गेले. अशी देखील माहिती समोर आलेली आहे. या दरम्यान रशियात किती जिवित झाली आहे, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

या भूकंपानंतर नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली घरातील फर्निचर तुटली आणि भांडी वगैरे सगळ्या गोष्टी उध्वस्त झाल्याची माहिती आलेली आहे. या ठिकाणी इमारतींची तपासणी देखील चालू आहे. अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

BSNL TATA Deal | BSNL ने TATA सोबत केला मोठा करार; युजर्सला मिळणार सुपरफास्ट इंटरनेट सुविधा

BSNL TATA Deal

BSNL TATA Deal | जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिओ, एअरटेल आणि व्हीआय यांसारख्या लोकप्रिय टेलिफोन कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्यामुळे त्यांचे युजर्स देखील मोठ्या प्रमाणात नाराज झालेले आहेत. अशातच आता अनेक युजर्स हे सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळताना दिसत आहे. बीएसएनएल अत्यंत स्वस्त दरामध्ये मोबाईल रिचार्ज प्रदान करत असते. अशातच आता बीएसएनएल आणि टाटा (BSNL TATA Deal) यांनी एक करार केला आहे. त्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत.

बीएसएनएल सध्या सर्वत्र त्यांची 4G सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी बीएसएनएल आणि टाटा यांनी एक करार केला आहे. या कारणामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. टाटा कंपनी ही बीएसएनएलसाठी एक आता मोठे डाटा (BSNL TATA Deal) सेंटर चालू करत आहे. यामध्ये टीसीएस आणि बीएसएनएल यांच्यातील करारानुसार 4G इंटरनेटसाठी डाटा सेंटरचे काम टाटा कंपनी करत आहे. बीएसएनएल ही कंपनी सध्या खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी काम करत आहे. खेड्यापाड्यातल्या युजर्सला देखील इंटरनेट सेवा चांगल्या गतीने मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठीच टीसीएसचे हे डेटा सेंटर चालू होत आहे.

डेटा सेंटर कधी चालू होणार | BSNL TATA Deal

बीएसएनएल कंपनीने त्यांची 4G सेवन नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत जवळपास 25 हजार साइट ते काम पूर्ण केलेले आहे. यामध्ये असे सांगण्यात आलेली आहे. की BSNL 4G सेवा ही 15 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशभरात सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर आता देशभरात 5G नेटवर्क सुद्धा तयार केले जाणार आहे. म्हणजेच BSNL चे नेटवर्क संपूर्ण देशभरात अत्यंत वेगाने पसरणार आहे. आणि नागरिकांना त्याचा लाभ देखील घेता येणार आहे.

बीएसएनएल लवकरच त्यांची 4 G सेवा लॉन्च करणार आहे. आणि 5G सेवा देखील लॉन्च करण्यासाठी कंपनीकडून काम केले जात आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये नेटवर्क टेस्टिंगचे काम देखील सुरू आहे. यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वतः टेस्टिंग नंतर नेटवर्कला मान्यता दिलेली आहे. आणि त्यांनी हे मान्य केलेले आहे की, ही 5G सेवा सुरू होण्यास वेळ झालेला आहे. पण हे नेटवर्क खूपच चांगले असणार आहे. त्यामुळे जे बीएसएनएलचे ग्राहक आहेत, त्यांना हा मोठा फायदा होणार आहे.

संभाजी भिडे आधुनिक महाराष्ट्राचा सरडा; कोणी केली जळजळीत टिका?

sambhaji bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठे मागता? असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी मांडल्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे सचिन खरात यांनी मनोहर भिडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संभाजी भिडे आधुनिक महाराष्ट्राचा सरडा आहेत कारण सरडा हा वेळोवेळी गरजेनुसार रंग बदलत असतो असं म्हणत सचिन खरात (Sachin Kharat) यांनी भिडेंवर हल्लाबोल केला. तसेच आंतरावलीत मागील वर्षी जाऊन मराठा आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्याची आठवणही सचिन खरात यांनी मनोहर भिडे याना करून दिली.

सचिन खरात म्हणाले, संभाजी भिडे यांनी मागच्या वर्षी आंतरावली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, मात्र आता याच संभाजी भिडे यांनी मराठा समाजाने आरक्षण का मागावे असं विधान केलं आहे. याच वरून ते आरक्षण विरोधी आणि बहुजन विरोधी असल्याचे दिसत आहे. आमचं तर स्पष्ट मत आहे कि संभाजी भिडे हे आधुनिक सरडा आहे, कारण सरडा हा वेळोवेळी गरजेनुसार रंग बदलत असतो त्यामुळे संभाजी भिडे हे आधुनिक महाराष्ट्राचा सरडा आहे अशी जळजळीत टीका सचिन खरात यांनी केली आहे.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते?

आज सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना मनोहर भिडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत म्हंटल कि, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण वाघ सिंहाने मागावे का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे असं भिडे म्हणाले.

Success Story | 10 वीनंतर दूध व्यवसाय सुरु करून; शेतकऱ्याची कन्या बनली कोट्यवधींची मालकीण

Success Story

Success Story | आजकाल असे अनेक लोक आहेत. जे जास्त शिकलेले असले, तरी देखील नोकरी न करता व्यवसाय करतात. कारण व्यवसायामध्ये त्यांना चांगले काम करता येते. तसेच चांगला नफा देखील कमावता येतो. असे अनेक शेतकरी तरुण आहेत. ज्यांनी मध्येच शिक्षण सोडले आणि ते शेती व्यवसायामध्ये काम करत आहे. आज काल शेती तसेच शेतीचे अनेक असे जोड व्यवसाय आहेत, ज्यामध्ये लोक आधुनिक पद्धतीने व्यवसाय करत आहेत. आणि चांगल्या नफा कमवत आहे. आज आपण अशाच एका तरुणीची कहाणी (Success Story) जाणून घेणार आहोत. जिने दहावीनंतर शाळा सोडली आणि दूध व्यवसायात प्रगती केलेली आहे.

बाजारात जरी दुधाचे भाव जास्त असले तरी शेतकऱ्याकडून जेव्हा दूध जाते. तेव्हा त्याचे भाव अत्यंत कमी मिळतात. त्याचप्रमाणे गाई म्हशींच्या खाद्याचा खर्च इतर सगळा खर्च पकडून शेतकऱ्यांना सहसा दूध व्यवसायात नफा होत नाही. परंतु ही सगळी मानसिकता तोडून काढण्यासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धा धवन हीने दूध व्यवसायात झेप घेतलेली आहे. ती खूप चांगल्या प्रकारे हा दूध व्यवसाय सांभाळते आणि या व्यवसायातून तिने एक कोटीची कमाई देखील केली आहे.

वडिलांना मदत म्हणून झाली व्यवसायाची सुरुवात | Success Story

श्रद्धा धवन ही अहमदनगर जिल्ह्यातील निघोज या गावातील रहिवासी आहे. तिचे संपूर्ण कुटुंब आधीपासूनच जनावरांची खरेदी यांनी विक्री करत असतात. त्यांचा एक छोटासा व्यवसाय होता. त्याचप्रमाणे त्यांना जमीन देखील अत्यंत कमी होती. त्यामुळे ते जनावरांची खरेदी विक्री करायचे. दहावीची परीक्षा झाल्यानंतर श्रद्धा वडिलांना मदत म्हणून जनावरांच्या खरेदी आणि विक्री करण्याच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत केली. म्हैस कशी ओळखायची, खरेदी करण्यापूर्वी त्या गोष्टीची कोणती कोणती माहिती पाहिजे, लीलाव कसा करतात, योग्य किंमत कशी ओळखायची, या छोट्यातल्या छोट्या गोष्टी तिने शिकून घेतल्या. आणि यातूनच तिला तिच्या भविष्यातील एक नवीन व्यवसाय उमगला.

श्रद्धाने 2013 साली घरीच काही म्हशींना पाळून दूध व्यवसाय सुरू करायचा असा निर्णय घेतला. आणि तिचा हा एक निर्णय तिच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उजळून टाकणारा ठरला. परंतु व्यवसाय करताना तिला शिक्षणाकडे देखील लक्ष द्यायचे होते. तिने तिचे एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे वडिलांचा व्यवसायात मदत करण्यात आलेली नाही घेतला. तिने सुट्ट्यांमध्येच दूध व्यवसायाबद्दलची सगळी माहिती घेतली. जेव्हा अकरावी सुरू झाली त्यावेळी तिने दुधाचा स्टार्टअप सुरू केला होता. हळूहळू तिने त्यांच्या गोठ्यातील गाई आणि म्हशींची संख्या वाढवली. त्यानंतर तिने या गोठ्यामध्ये काम करण्यासाठी कामगार देखील नेमले. सध्या तिच्याकडे 130 म्हशी आहेत. ती सध्या राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी दूध आणि दुधापासून बनवलेले प्रॉडक्ट्स पाठवत असते. यामध्ये ती तूप, लोणी, लस्सी, ताक, दही इत्यादी पदार्थ पाठवते.

एका वर्षात कोट्यवधीची मालकीण

श्रद्धा दुधापासून बनवलेली सगळी उत्पन्न उत्पादने ही घरी नैसर्गिक पद्धतीने बनवत असते. यासोबतच श्रद्धाने एक फार्मचा टन बायोगॅस देखील सुरू केलेला आहे. या ठिकाणी सेंद्रिय खत बनवले जाते. खते ती शेतकऱ्यांना तसेच कृषी कंपन्यांना देखील विकते. तिला सध्या भारतभर ई-मेलच्या माध्यमातून ऑर्डर्स येतात. तिने अगदी वर्षभरातच हा कोट्यावधीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि तिच्या कुटुंबाला एक वेगळी दिशा दिलेली आहे.

पंढरपूरमधील विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन मिळणार फक्त 2 तासात; सुरु होणार नवी सुविधा

Vitthal Rukhmini Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूरचा विठूराया हा संपूर्ण जगाचा दाता आहे. आयुष्यात आणि नशिबात धरलेला प्रत्येक माणूस हा शेवटी त्याचं डोकं टेकवण्यासाठी विठुरायाच्या दरबारी येत असतो. दररोज हजारो भक्त पंढरपूरला येतात विठुरायाचे दर्शन घेतात. कारण विठुराया हा एकमेव आधार वाटतो. आपण कधीही चुकलो तरी आपल्याला योग्य वाट दाखवतो. एक वेळेस गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चुकू शकतो, पण विठुरायाने दाखवलेला रस्ता कधीच चुकणार नाही. याची सगळ्यांनाच खात्री असते. म्हणूनच लाखो संख्येने भक्त हे पंढरपूरला भेट देत असतात. परंतु रोज एवढे फक्त एका वेळी पंढरपूरला गेल्याने पंढरपूरमध्ये देखील खूप गर्दी असते. आणि अनेक लोकांना हे विठुरायाचे थेट दर्शन घेता येत नाही.

परंतु आता इथून पुढे पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांना लांबच लांब रांगांमध्ये दर्शनासाठी उभा राहण्याची काही गरज नाही. कारण आता इथून पुढे केवळ दोन तासातच तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचे थेट दर्शन घेता येणार आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या मंदिरात टोकन दर्शनाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी दर्शन मंडळांनी स्काय वॉकसाठी राज्य सरकारच्या समितीने मान्यता देखील दिलेली आहे.

अशातच आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेले आहे की, “आता पंढरपूरच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जास्त वेळ थांबण्याची गरज नाही. कारण भाविकांना केवळ दोन तासात हे दर्शन मिळणार आहे. आषाढी एकादशीला देखील ही खास सुविधा सुरू राहणार आहे. ही नवी सुविधा चालू करण्यासाठी सरकारने 110 कोटी रुपयांचा आराखडा देखील मंजूर केलेला आहे. आणि लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.”

त्यामुळे इथून पुढे आता पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी गोपाळपूर पत्राशेड येथे चार मजली दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणावरून मंदिरापर्यंत 1050 मीटर लांबीचा स्काय वॉक देखील उभारला जाणार आहे. या ठिकाणावरून दर्शन घेण्यासाठी भाविकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने टोकन घ्यावी लागणार आहे. परंतु तुम्हाला जी वेळ दिलेली आहे. त्या वेळेआधी अर्धा तास प्रतीक्षागृहात वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर पुढील दोन तासात तुम्हाला पण दर्शन घेता येणार आहे.

भाविक भक्तांसाठी ही जी चार मजली दर्शन मंडप बांधणार आहे. त्या मध्ये स्वच्छतागृह, उपहारगृह, आरोग्य व्यवस्था, विश्रांती कक्ष देखील उभारली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने 129 कोटी रुपयांचा आराखडा देखील सादर केलेला आहे. यातील 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.

भक्तांना कोणत्या सुविधा मिळणार ?

या ठिकाणी भावी भक्तांना पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधा, वेटिंग हॉल, टोकन सुविधा, रिफ्रेशमेंट, हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी सुविधा, पोलीस, जेवणाची व्यवस्था पार्किंगची सुविधा इत्यादींचा समावेश असणार आहे.

मालेगांव बाह्य आमदारकीला ‘दादा’गिरी भुसेंचीच…

malegaon vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । हिरे कुटुंबीयांचा एकहाती दबदबा राहिलेल्या मालेगाव बाह्य या मतदारसंघात 2004 ला दादा भुसे यांची एन्ट्री झाली.. आणि तेव्हापासून चांगल्या अर्थाने या मतदारसंघावर भुसेंचीच दादागिरी चालू लागली… भुसे यांनी विकासकामं केली… जनतेचा विश्वास संपादित तर केलाच पण सोबतच शिवसेनेला मतदारसंघातल्या गावाखेड्यात नेऊन पोहचवलं… याच प्रेमापोटी सलग आमदारकीचा चौकार मारणारे भुसे शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात दिसतील… त्यामुळे किमान मालेगावात तरी शिवसेना म्हणजे भुसे आणि भुसे म्हणजेच शिवसेना असंच समीकरण असल्याने खरंच गद्दरीचा बसलेला शिक्का त्यांना विधानसभेला पराभवाचा उंबरठ्यावर घेऊन जाईल का? दादा भुसे यांना काटशाह देण्यासाठी ठाकरे गटाकडून कोणत्या मोहऱ्याला समोर केलं जाऊ शकतं? मालेगाव मध्ये सलग पाचव्यांदाही भुसेंचीच दादागिरी चालेल… की नवा भिडू आमदार होईल? त्यांचंच हे विश्लेषण…

दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य मतदारसंघ म्हणून ओळखला जातो… भाऊसाहेब हिरे यांचा मतदार संघ अशीदेखील त्याची ओळख… स्वातंत्र्यानंतर हा मतदार संघ कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. भाऊसाहेब हिरे, डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि अलीकडे 2004 पर्यंत या मतदार संघात हिरे घराण्याचे वर्चस्व होते. पुष्पाताई नंतर प्रशांत हिरे यांनी एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत मंत्रीपद मिळवले. 2004 साली दाभाडी मतदार संघात दादा भुसे यांचा प्रवेश झाला… आणि नवीन राजकीय समीकरणांचा मतदारसंघात जन्म झाला…

शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंड करत दादा भुसेंमागे शक्ती उभी केली. भुसे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत प्रशांत हिरे यांचा पराभव केला. येथूनच हिरे घराण्याच्या राजकीय अस्तित्वाला उतरती कळा लागली…. वर्षानुवर्षे एकाच घराण्याला पाढिंबा देणाऱ्या दाभाडीच्या मतदारांनी बदल घडवत प्रथमच हिरे घरण्याला बाजूला सारले आणि दादा भुसेंच्या रुपाने नवीन चेहरा मतदारांनी स्वीकारला… 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दाभाडीचा मालेगाव बाह्य मतदारसंघ झाला… तेव्हाच्या निवडणुकीत अधिकृतपणे सेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला…

मतदार संघात केलेली विकासकामे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली. त्याचा फायदा त्यांना 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत झाला. सलग तीन वेळा निवडून आल्यावर भुसे यांनी विकासावर अधिक भर दिला. शिवाय युवाशक्ती त्यांच्या मागे उभी ठाकली, गावा गावात त्यांनी सेनेचा प्रभाव वाढविला. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मागे उभे ठाकत ग्रामपंचायती, पंचायत समिती, बाजार समिती ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. विरोधक कमी करत गेले. याचाच फायदा त्यांना 2019 च्या निवडणूकीत झाला आणि सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले… काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना तब्बल 48 हजारांनी पराभवाचा दणका देत भुसेंनी आमदारकीचा चौकार मारला.. खरंतर दादा भुसे हे शिवसेनेचे असले तरी कायम विकासाभिमुख राजकारणावर भर दिल्यानेै शिवसेनेच्या फुटीनंतरही त्यांनी विकासाला कधीही दुजाभाव न झाल्याने बंडाळीचा फारसे पडसाद मालेगाव बाह्यमध्ये उमटताना दिसले नाहीत.

पण मालेगाव बाह्यच राजकारण आतून बाहेरून ढवळून निघालं… भुसे बंडाळीत सहभागी झाल्याने ठाकरेंनी भुसेंचे पारंपारिक प्रतिस्पर्धी अद्वेय हिरे यांच्या हाती शिवबंधन बांधत मालेगाव बाह्य मधील दादा भुसेंच्या विरोधात यॉर्कर टाकला… पण अगदी फिल्मी स्टाईल प्रमाणे हिरेंनी मशाल हाती घेताच त्यांच्या पाठीशी चौकशीचा ससेमिरा लागला… त्यांना अटकही झाली… त्यामुळे ठाकरे गट पुन्हा बॅकफुटला गेला.. भुसेंना हायस वाटणार तोच आणखीन एक नवा बॉम्ब भुसेंवर येऊन आदळला… तो म्हणजे भुसेंचेच जिवलग मित्र असलेले आणि बारा बलुतेदार संघटनेचे नेते बंडूकाका बच्छाव यांनी दिल्लीत संजय राऊतांची भेट घेत मशाल हाती घेतली…. आणि मालेगाव मधील धक्कातंत्र नाटकाचा एक अंक पूर्ण झाला… खरंतर त्यांना मशालीकडून उमेदवारीचा शब्द मिळाला असला हिरे यांना जामीन मिळाल्यावरच मशालीचा उमेदवार कन्फर्म होईल, असं बोललं जातंय…

बच्छाव इच्छुक असल्याने आता मालेगाव बाह्य मध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना… मशाल विरुद्ध धनुष्यबाण, बच्छाव विरुद्ध भुसे अशी अटीतटीची आणि घासून लढत येणाऱ्या विधानसभेला आपल्याला पाहायला मिळू शकते… त्यामुळे चेहरा बदलला तरी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार आहे.. फक्त कोणत्या चिन्हाच्या याचं उत्तर समजून घेण्यासाठी शेवटच्या दिवसातीलच राजकारण कसं घडतंय? ते पाहावं लागेल… मागच्या वेळेला भुसेंचं राजकीय वर्चस्व मोडीत काढण्यासाठी सगळे विरोधक एकवटले.. त्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी ताकद लावली… पण भूसेंच्या लोकप्रियतेपुढे सारं काही फिकं पडलं… पण यंदा शिवसेना फुटीचा इमोशनल फॅक्टर आणि हिरे – बच्छाव या जोडगोळीला मिळणारी ठाकरे आणि मविआची साथ पाहता दादा भुसेंचा विजयाचा वारू नक्कीच रोखता येऊ शकतो.. पण भुसेंचं मतदारसंघावरच वर्चस्व पाहता ठाकरे गटाला एक्सटरा ऑर्डनरी काम करावं लागेल एवढं मात्र नक्की…बाकी तुम्हाला काय वाटतं? मालेगाव बाह्यचा 2024 चा आमदार कोण? अद्वैय हिरे, बंडूकाका बच्छाव की पुन्हा दादा भुसे? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..

भारतीय व्यक्ती चंद्रावर उतरणार!! केंद्रीय मंत्र्यांनी वेळही सांगितली

indians on moon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या वर्षी भारताने चांद्रयान ३ या मिशनच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकलं. आताही जर सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं तर २०४० पर्यंत माणूस सुद्धा चंद्रावर उतरेल असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे. तसेच २०३५ पर्यंत भारत एक अंतराळ स्टेशन उभारेल अशी माहितीही त्यांनी दिली.

जितेंद्र सिंह (Jitendra Singh) म्हणाले, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकार कडून अवकाश क्षेत्रासाठी ज्या काही मोठंमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्या भविष्याचा विचार करूनच करण्यात आल्यात. यावेळी त्यांनी सांगितलं कि 2025 च्या उत्तरार्धात भारतीय अंतराळवीराला अंतराळात पाठवण्याची आणि 2040 पर्यंत चंद्रावर पहिल्या भारतीय नागरिकाला उतरवण्याची आमची योजना आहे. जर ठरल्याप्रमाणे सगळं झालं तर नक्कीच २०४० पर्यंत माणूस सुद्धा चंद्रावर उतरेल असा विश्वास जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

जितेंद्र सिंह पुढे म्हणाले, आम्ही 2023 पर्यंत 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक बघितली. पुढील 10 वर्षांत अंतराळ अर्थव्यवस्था पाचपट किंवा सुमारे $44 अब्ज वाढेल असा अंदाज आहे. यावेळी त्यांनी गगनयान मोहिमेबद्दलही माहिती दिली. गगनयान पुढील वर्षी अंतराळात जाईल तसेच यासोबतच भारताने रोबोट फ्लाइट पाठवण्याचेही लक्ष्य ठेवले आहे. 2025 मध्ये वायुमित्र या महिला रोबोटला अवकाशात पाठवले जाईल. हा रोबोट अंतराळवीराच्या सर्व हालचाली पार पाडेल आणि पृथ्वीवर परत येईल असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठे मागता? मनोहर भिडेंचं विधान चर्चेत

manohar bhide on maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा आजही राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली असून आजही ते मराठा समाजासाठी लढत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते सत्ताधारी भाजपवर टीकाही करत आहेत. एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून त्यातच शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी आरक्षणाच्या वादात उडी घेत वेगळंच विधान केलं आहे. मराठ्यांनो, तुम्हाला उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठे मागता? असं मनोहर भिडे यांनी म्हंटल आहे. मनोहर भिडे यांचं हे विधान चर्चेत आलं आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून सांगली जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पुकारला जाणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी मनोहर भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर थेट भाष्य केलं. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सवाल केला असता मनोहर भिडे म्हणाले, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण वाघ आणि सिंहाने मागावे का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे असं भिडे म्हणाले.

यावेळी त्यांनी बांगलादेश मध्ये हिंदूंवर सुरु असलेल्या अत्याचारावरही भाष्य करत भारत सरकारला आवाहन केलं आहे. बांगलादेशमध्ये जो अत्याचार सुरू आहे, त्याविरोधात भारत सरकारने कडक पाऊले उचलावीत असं भिडे यांनी म्हंटल. बांगलादेशमध्ये चाललेला नंगा नाच बंद झाला पाहिजे. जसे बटन दाबल्यावर दिवा बंद होतो, तसं काम या समस्येबद्दल केलं पाहिजे, भारताच्या सरकारमध्ये तशी धमक असून तसं काम त्यांनी करावं अशी मागणी मनोहर भिडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

57 टक्के नोकऱ्यांत 20,000 रुपयांपेक्षा कमी पगार; धक्कादायक अहवाल समोर

work india job report

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी नोकरी करत असतो. चांगल्यात चांगल्या पगाराची नोकरी (Job) शोधून आपल्या जीवनात स्थिर होण्याचा आपला प्रयत्न असतो. परंतु वर्कइंडियाच्या एका रिपोर्टनुसार, देशातील खासगी क्षेत्रात नोकरी (job) करणाऱ्या बहुतेक लोकांची स्थिती दयनीय आहे. बहुतेक लोकांचे पगार दरमहा 20,000 रुपये किंवा त्याहून कमी आहेत असं या अहवालात समोर आलं आहे. त्यामुळे देशातील तरुणाईसाठी हि चिंतेची बाब म्हणावी लागेल.

57.63 टक्क्यांहून अधिक कामगार-केंद्रित नोकऱ्या दरमहा 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगाराच्या श्रेणीत येतात, असे वर्कइंडिया या तंत्रज्ञानावर आधारित कामगार-केंद्रित भर्ती मंचाने अहवालात म्हटले आहे. यावरून असे दिसून येते की अनेक कामगार किमान वेतनाच्या जवळपास कमावतात. अहवालात असे दिसून आले आहे की सुमारे 29.34 टक्के कामगार-केंद्रित नोकऱ्या मध्यम उत्पन्न गटातील आहेत, ज्यांचे वेतन 20,000- 40,000 रुपये प्रति महिना आहे.अहवालानुसार, या श्रेणीतील उत्पन्न सदर व्यक्तींच्या दैनंदिन गरजा पूर्ण करते परंतु बचत किंवा गुंतवणुकीसाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे शिल्लक राहत नाहीत तसेच असे लोक आरामदायी जीवनमान जगू शकत नाहीत असेही या रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.

वर्कइंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सह-संस्थापक नीलेश डुंगरवाल यांनी याबाबत सांगितले की, सदर रिपोर्ट मधून हे लक्षात येत कि, कमी वेतनाच्या नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाटा कामगार क्षेत्राचा आहे. तसेच यामध्ये जास्त पगार मिळण्याच्या संधीही खूपच मर्यादित आहेत. ही असमानता केवळ कर्मचाऱ्यांच्या मोठ्या भागासमोरील आर्थिक आव्हानेच प्रतिबिंबित करत नाही, तर सामाजिक स्थिरता आणि आर्थिक वाढीवरही व्यापक परिणाम करते. त्यासाठी कौशल्य विकास, वेतन सुधारणा आणि उच्च वेतनाच्या संधी निर्माण कराव्या लागतील.

Secret Beach | शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर नवी मुंबईतील ‘या’ सिक्रेट समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या

Secret Beach

Secret Beach | मुंबई हे स्वप्नांची नगरी आहे. अनेकजण स्वतःच्या उराशी कितीतरी स्वप्न बाळगून मुंबईमध्ये जातात. मुंबई हे कसे शहर आहे जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट अनुभवायला मिळते. अगदी 24 तास गर्दी एका बाजूला, तर एका बाजूला नजर पोहोचणार नाही, इथपर्यंत अथांग पसरलेला समुद्र.. वरवर जरी सुंदर आणि अगदी शांत दिसत असला, तरी मानवाच्या मनाप्रमाणेच या समुद्राच्या तळाशी देखील अनेक हालचाली चाललेल्या असतात. मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन अगदी धकाधकीचे असते. त्यामुळेच या सगळ्यातून वेळ काढून मुंबईतील लोक इतरत्र शांततेसाठी जातात. मुंबईला लाभलेले एक सगळ्यात मोठे वरदान म्हणजे समुद्र. अगदी मुंबईच्या चौफेर अथांग समुद्र पसरलेला आहे. या समुद्रावर जाऊनच अनेक लोकांचे मन हलके होत असते.

आपल्याला मुंबईतील अनेक चौपाटी, बीचची (Secret Beach) माहिती आहेत. ज्यांना वेळोवेळी सगळेच भेट देत असतात. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध देखील आहे. परंतु नवी मुंबईत एक सिक्रेट समुद्र मिळालेला आहे. जो सिक्रेट समुद्रकिनारा कोणत्याही व्यक्तीला मोहन टाकेल अगदी असाच आहे. हा समुद्र अतिशय सुंदर आहे. इथे पर्यटकांची जास्त गर्दी देखील नसते. मुंबईपासून अगदी काही मिनिटाच्या अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. ज्याबद्दल अनेकांना माहिती देखील नाही. तुम्हाला जर अत्यंत शांततेचा आणि समाधानाचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही या सीक्रेट समुद्रकिनाऱ्याला नक्कीच भेट देऊ शकता.

हा सिक्रेट समुद्रकिनारा (Secret Beach) उरणपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जर या ठिकाणी रेल्वेने गेला तर तुम्हाला बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून रिक्षाने या समुद्रावर जाता येईल. या ठिकाणी माणसांची जास्त गर्दी देखील नसते. त्यामुळे तुम्हाला तुमचा आनंद घेता येईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा जास्त प्रमाणात घाण नाही. कारण या ठिकाणी जास्त लोक नसतात. त्यामुळे तुम्हाला अत्यंत स्वच्छ असा समुद्रकिनारा अनुभवायला मिळेल. त्यासोबतच या समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक मंदिरे तसेच दर्गा देखील आहेत. म्हणजेच या ठिकाणी गेल्यावर देवदर्शन देखील होईल.

मुंबईतील या सिक्रेट समुद्रकिनाऱ्याचे नाव पिरवाडी बीच असे आहे. हा पिरवाडी बीच सनसेटसाठी खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस तुम्ही अत्यंत सुंदर असा सनसेट पाहू शकता. त्याचप्रमाणे समुद्रावर असलेली रेती वाळू आणि सोनेरी लाटा यामुळे तुमचे मन नक्कीच मोहन जाईल. या समुद्रकिनाऱ्याच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर या ठिकाणी अनेक झाडे आहेत. या ठिकाणी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे आहेत. तसेच येथे तुम्हाला पांढरी रेती देखील बघायला मिळेल. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्य अजूनच फुलून आलेले आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये जे पर्यटक राहतात. त्यांच्यासाठी हा समुद्रकिनारा खूपच जवळ आहे. आणि विकेंडला ते नक्कीच या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकतात.