Monday, December 22, 2025
Home Blog Page 531

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक सीडींग स्टेटस महत्वाचे; अशाप्रकारे करा चेक

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून या विधानसभेच्या आधी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या योजनेचे अर्ज प्रक्रिया देखील गेल्या महिन्यांपासून सुरू झालेली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.

अनेक महिलांना 14 ऑगस्टपासून या योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झालेली आहे. अनेक महिन्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे देखील जमा झालेले आहेत. 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहेत. परंतु अनेक महिलांना या योजनेचा लाभ देण्यामध्ये अडचणी निर्माण झालेले आहेत. अनेक महिलांचे आधार क्रमांक आणि त्यांचे बँक खाते एकमेकांची लिंक नसल्याने ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

त्यामुळे तुम्ही जर या योजनेचा अर्ज केला असेल, तर तुम्हाला आता तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. तसेच कोणते बँक खाते आधार कार्डची लिंक आहे. हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. आता त्याची संपूर्ण प्रक्रिया आपण समजून घेऊया.

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना त्या अर्जामध्ये बँकेचा खाते क्रमांक जो दिला आहे. तो तुमच्या आधार क्रमांक अशी लिंक आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. तुमचे जर आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही जरी या योजनेसाठी पात्र असाल, तरी देखील तुम्हाला ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमची बँक सीडींग स्टेटस जाणून घेणे आणि बँक खाते आधार क्रमांकला लिंक करणे खूप गरजेचे आहे.

अशाप्रकारे चेक करा बँक खाते आणि आधार क्रमांक लिंकचे स्टेटस | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

  • तुम्हाला जर बँक सीडींग स्टेटस टाक तपासायचे असेल, तर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला हवी ती भाषा निवडायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला आधार सर्विस हा पर्याय दिसत आहे.
  • पर्यावर क्लिक करून तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस हा पर्याय दिसेल.
  • हा पर्याय दिसल्यावर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल.
  • त्यावर बँक शेडिंग स्टेटस हा पर्याय देखील दिसेल.
  • त्यानंतर त्या क्रमांकावर क्लिक करावे आणि तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेल्या कॅपचा कोड टाकून लॉगिन करावे.
  • त्यानंतर आधार कार्ड सिलिंग असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल हा ओटीपी तुम्ही त्या वेबसाईटवर टाकावा त्यानंतर लॉगिन होईल.
  • यानंतर तुमचे बँक सीडींग स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकशी कोणते बँक खाते लिंक आहे हे देखील तुम्हाला लगेच समजेल.

कर्नाटक सरकारच्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या गृहलक्ष्मी योजनेला खीळ

gruhlaxmi yojana congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली… खरंतर या योजनेला महाविकास आघाडीचा घटक असणाऱ्या काँग्रेसचा विरोध आहे… पण अगदी लाडक्या बहिणीसारखीच एक योजना काँग्रेस कर्नाटक मध्ये राबवतय… जीचं नाव आहे गृहलक्ष्मी योजना… अगदी कर्नाटक सरकारच्या योजनेप्रमाणेच लाडकी बहीण योजना देखील आहे… पण समसमान योजनेसाठी काँग्रेसने वेगवेगळी भूमिका घेतली… आणि आता त्यात मोठा गाजावाजा करत घोषणा केलेली महालक्ष्मी योजनाही वादात सापडली… नेमकं काय घडलंय? त्याचाच हा रिपोर्ट…

काँग्रेसने कर्नाटकातील आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ज्या पाच मी दिल्या होत्या त्यातील एक महत्त्वाची हमी होती ती गृहलक्ष्मी योजनेची… राज्यातील महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याची मदत करणारी ही योजना काँग्रेस सरकार निवडून आल्यावर सुरूही करण्यात आली… राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांसारख्या बड्या नेत्यांच्या हातून या योजनेचा शुभारंभ झाला… पण तब्बल तीन महिने उलटून गेले तरी कर्नाटकातील महिला लाभार्थ्यांना लक्ष्मी काही बघायला भेटलेली नाही… मागच्या वर्षी 15 ऑगस्ट ला सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा काही अपवाद वगळता मे पर्यंत कार्यक्रम ठीकठाक सुरू होता… मात्र मागील तीन महिन्यांपासून हे पैसे न आल्यानं योजना बंद झाली की काय? अशी म्हणण्याची वेळ आता कर्नाटकातील महिला विचारू लागले आहेत… पण किमान सरकार दरबारी तरी योजना बंद झाल्याची… थकबाकी असल्याची.. कोणतीही नोंद नाही…

मुख्यमंत्री सिद्धरामय्या योजनेची रक्कम केवळ एका महिन्याची थकीत असल्याचे सांगतायत खरं, पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे… विधानसभा निवडणुकीत फक्त दोन वेळा योजनेचे पैसे आल्यानंतर पुन्हा सरकारने कोणतीही रक्कम जमा केलेली नाही, असं स्पष्ट म्हणणं महिला लाभार्थी मांडतायत… त्यामुळे या निमित्ताने काही मूलभूत प्रश्न आता पडतायेत, महाराष्ट्रात महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला काँग्रेस एकीकडे विरोध करतेय… आवश्यकता वाटली म्हणून सुप्रीम कोर्टाचेही दरवाजे ठोकवण्याची तसदी काँग्रेसने घेतली… पण महिलांना पैसे देण्याच्या धर्तीवर काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक मध्ये मात्र अशाच योजनेची घोषणा केली, त्याला मात्र विरोध नाही… यावरून काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलय…

त्यामुळे महिला, वंचित, गरीब कल्याणासाठी, आम्ही आहोत, असं म्हणणाऱ्या काँग्रेससाठी , निवडणुकीआधी एक, आणि निवडणुकीनंतर एक… अशा घेतलेल्या स्टॅन्डमुळे , पक्षाला टीकेचं धनी बनावं लागणार… एवढं मात्र नक्की… म्हणूनच , महाराष्ट्रात महायुती सरकारने, अशाच काहीशा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला, काँग्रेसने केलेला विरोध, हा फक्त राजकीय भूमिका म्हणूनच घेतलाय, असा आरोपही , आता केला जातोय… त्यामुळे काँग्रेसने, महिलांसाठी घोषणा केली… आणि वाया गेली… असं म्हटलं , तर वावगं ठरणार नाही… बाकी तुम्हाला काय वाटतं? कर्नाटकातील काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

Travel : मुंबईजवळ घ्या उटीचा फील ! विकेंडला प्लॅन करा जबरदस्त प्लॅन

Travel : राज्यभरात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्यात राज्यात दमदार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. सध्या जोडून सुट्ट्या आल्यामुळे ततुम्ही देखील कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर एका अप्रतिम हिल स्टेशन बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत क्वॅलिटी टाइम घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. चला तर मग (Travel) जाणून घेऊया…

आम्हीं ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत हे ठिकाण आहे माथेरान . मुंबई आणि पुण्यापासून हे ठिकाण जवळच आहे. त्यामुळे तुम्ही विकेंडला या ठिकाणाला आवर्जून भेट देऊ शकता. मुंबईहून हे ठिकाण अगदी १ तासाच्या अंतरावर आहे. पुण्याहून हे ठिकाण १२० किमी अंतरावर आहे.राज्यातील हे एक नावाजलेले हिल स्टेशन असून या ठिकाणी हजारो पर्यटक (Travel) भेट देतात.

रोचक इतिहास (Travel)

या ठिकाणाचा इतिहासही तेवढाच रोचक आहे. रायगड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यू पॉइंट्झ मॅलेट यांनी मे १८५० मध्ये माथेरान चा शोध घेतला. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून या ठिकाणाचा विकास केला. परदेशातून आलेल्या इंग्रजांना येथील उष्णतेचा त्रास होत असे म्हणूनच प्रादेशिक उष्णतेपासून वाचण्यासाठी ब्रिटिशांनी माथेरानचा विकास केला इंग्रज कुटुंबं येथे सुट्टी घालवण्यासाठी येत असत. स्वातंत्र्यसैनिक वीरभाई कोतवाल यांचेही हे जन्मस्थान (Travel) आहे.

माथेरानची टॉय ट्रेन (Travel)

येथील सदाबहार हिरवाई तुमचे मन मोहून टाकेल यात शंका नाही. सुंदर डोंगर दऱ्या, पावसाळ्यात प्रवाहीत होणारे धबधबे, आणि जमिनीवर येणारे ढग तुमहाला सुंदर निसर्गाची अनुभूती देऊन जातील यात शंका नाही. शिवाय येथे खूप औषधी वनस्पती आणि वन्यजीव सुद्धा आढळतात. येथील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘माथेरानची टॉय ट्रेन’ हिलस्टेशन वरून धावणारी ही टॉय ट्रेन (Travel) येथील प्रमुख आकर्षण असून या ट्रेनमध्ये बसून आजूबाजूचा निसर्ग पाहणे म्हणजे एक अप्रतिम अनुभव…

किती येतो खर्च ? (Travel)

प्रवासाठी 500 रुपये तर निवास आणि खाण्यापिण्यासह साधारण २०००ते ३००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. तुम्ही कोणत्या सोयी सुविधा निवडता यावर खरंच अवलंबून राहील.

येथील पाहण्यासारखी ठिकाणे

  • अलेक्झांडर पॉइंट
  • रामबाग पॉइंट
  • छोटा चौक पॉइंट
  • मोठा चौक पॉइंट
  • वन ट्री हिल पॉइंट
  • बेलवेडेअर पॉइंट
  • लॉर्ड्स पॉइंट
  • celia पॉईंट
  • इको पॉइंट
  • मंकी पॉइंट
  • पोर्क्युपिन पॉइंट (सेन्सेट पॉइंट म्हणूनही ओळखला जातो)
  • खंडाळा पॉइंट
  • माधवजी पॉइंट
  • लुईसा पॉइंट

Excess Water Side Effect | आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिणे आहे धोकादायक; होतात या समस्या

Excess Water Side Effect

Excess Water Side Effect | आपल्या निरोगी आरोग्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे असते. पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य पद्धतीने पाण्याचे सेवन करणे खूप गरजेचे असते. आपल्या शरीरात जवळपास 50% पेक्षा जास्त पाणी आहे. डॉक्टरांकडूनही आपल्याला दररोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जर तुम्ही रोज गरजेपेक्षा जास्त पाणी पिले (Excess Water Side Effect) , तर त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका देखील निर्माण होऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एकाच वेळी भरपूर पाणी पिणे हे तुमच्या आरोग्यासाठी घातक असते.

जेव्हा आपल्या शरीरात गरजेपेक्षा जास्त पाणी असते. तेव्हा त्यात आपल्या शेजारी सोडियम वितळू लागतो. त्यामुळे आपल्या रक्तातील सोडियमची पातळी देखील कमी होते. आणि मेंदूचे पेशिंमध्ये यामुळे सूज येऊ शकते. ज्यामुळे शरीराच्या अवयवांना होणारा रक्त कुठे होता खंडित होऊ शकतो. ही एक अत्यंत दुर्मिळ अशी समस्या आहे. परंतु जर मर्यादा पेक्षा जर कोणी जास्त पाणी दिवसाला पीत असेल, तर त्यामुळे हा धोका निर्माण होतो आणि त्यातील इलेक्ट्रॉलाईट रक्तात पातळ होतात.

त्यामुळे आपल्या शरीरासाठी पाणी खूप गरजेचे असले, तरी एका नियंत्रणात ते पिणे खूप गरजेचे असतात. आपण नेहमीच लहानपणापासून अति तिथे माती ही म्हण ऐकत आलेलो आहोत.आणि तीच म्हण पाण्याला देखील लागू होते. म्हणूनच व्यक्तीला सामान्यपणे पाणी पिणे गरजेचे असते. दिवसाला किती पाणी प्यावे हे साधारण त्या व्यक्तीचे आरोग्य, लिंग, जीवनशैली आणि हवामान या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स अँड इंजीनियरिंग मेडिसिनच्या मते पुरुषांनी दररोज 3.7 लिटर पाणी पिणे गरजेचे असते. तर महिलांसाठी दररोज 2.7 लिटर पाणी पिणे हे गरजेचे असते.

Mahindra Thar Roxx Launched : 12.99 लाख रुपयांत लाँच झाली 5-डोर Mahindra Thar Roxx

Mahindra Thar Roxx Launched

Mahindra Thar Roxx Launched । अखेर महिंद्राने आपली बहुप्रतीक्षित 5-डोर Mahindra Thar Roxx बाजारात लाँच केली आहे. हि SUV कार अवघ्या 12.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमती लाँच करण्यात आली आहे. येत्या ३ ऑक्टोबरपासून महिंद्रा थार रॉक्सचे बुकिंग सुरू होणार असून दसऱ्यापासून या SUV ची डिलिव्हरी सुरु होणार असल्याचे कंपनीने म्हंटल आहे.

लूक आणि डिझाईन – Mahindra Thar Roxx Launched

गाडीच्या लूक आणि डिझाईन बद्दल सांगायचं झाल्यास, महिंद्रा थार रॉक्समध्ये नवे ग्रिल, सी आकाराचे एलईडी डीआरएल, प्रोडेक्टर हेडलॅंप, गोलाकार फॉग लाइट, ड्युअल टोन एलॉय व्हील आणि रियर-डोर-माऊंटेड हॅंडल देण्यात आले आहे. आधीप्रमाणे यामध्ये रेक्टॅंग्युलर एलईडी टेललाइट्स आणि टेलगेट-माऊंटेड स्पेअर व्हील देण्यात आले आहेत. मागील बाजूस, थार रॉक्समध्ये आयताकृती टेललाइट्स आहेत, जे त्याच्या ३ -DOOR मॉडेलमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होते. गाडीच्या इंटेरिअर बाबत सांगायचं झाल्यास, तीन-दरवाजा मॉडेलपेक्षा या नव्या थारच्या केबिनमध्ये भरपूर फीचर्स पाहायला मिळतात. यामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, लेदरेट अपहोल्स्ट्रीसह हवेशीर फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हरमन कार्डन साउंड सिस्टीम आणि ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड कनेक्टिव्हिटीसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेशआहे. महिंद्रा थार रॉक्समध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. गाडीमध्ये लेवल-2 ADAS सूट देण्यात आलाय. यामध्ये 4 डिस्क ब्रेक, 6 एअरबॅग, TCS, TPMS आणि ESP ची सुविधा देण्यात आली आहे.

इंजिन –

महिंद्रा थार रॉक्समध्ये 2.0 लीटरचे 4 सिलेंडर, mStallion टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 160bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय 2.2 लीटर, 4 सिलिंडर, mHawk डीझेल इंजिनदेखील या suv कार मध्ये उपलब्ध आहे. जे 150bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. हे दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सला जोडण्यात येईल. महिंद्राने अजून तरी मिड आणि टॉप व्हेरियंटचे इंजिन स्पेसिफिकेशन्स उघड केलेले नाहीत. मात्र ते इंजिन अधिक शक्तिशाली असण्याची शक्यता आहे आणि त्यात ऑटोमॅटिक आणि 4×4 चा पर्याय देखील असेल. (Mahindra Thar Roxx Launched)

किंमत किती?

कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, रियर व्हील ड्राइव्ह ऑप्शनमधील महिंद्र थार रॉक्स एसयूव्हीच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 12.99 लाख रुपये आहे तर डिझेल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे. महिंद्राची ही नवीन थार रॉक्स काळ्या आणि पांढऱ्या तसेच इतर आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

चिकन विंग्स चोरल्याबद्दल महिलेला झाला तुरुंगवास; किंमत जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Chicken Wings

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपणा सर्वांना अगदी शाळेत असल्यापासूनच शिकवले जाते की, चोरी करणे ही खूप मोठी चूक आहे. एक गुन्हा आहे. आणि त्यासाठी शिक्षा देखील केली जाते तरीही आपल्या समाजात विविध स्ट्रॅटेजी वापरून चोर चोरी करत असतात. परंतु त्यांची चोरी उघडकीस आल्यावर तुरुंगात त्यांना जावे लागते. चोरीचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत आपण सोने,पैसे यांसारख्या गोष्टींची चोरी होताना. बातम्या ऐकल्या आहे. परंतु सध्या चक्क अन्न चोरीला गेलेले आहे. आणि ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

अमेरिकेतील शिकागोमध्ये एका महिलेने चक्क चिकन विंग्स चोरलेले आहेत. आणि या प्रकरणी तिला 9 वर्षांची शिक्षा भोगावी लागली आहे. आता तुम्ही म्हणाल की, अन्नपदार्थ चोरल्याने शिक्षा का व्हायला पाहिजे? कदाचित त्या महिलेची काही मजबुरी असू शकते. परंतु या ठिकाणी किंमत ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल.

महिलेने चोरले 20कोटी रुपयांचे चिकन विंग

अमेरिकेतील शिकागो मधून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. या ठिकाणी महिलेने खूप चिकन विंग्स चोरी प्रकरणी नऊ वर्षाच्या तिला शिक्षा झालेली आहे. या महिलेचे नाव वेरा लिडेल असे आहे त्या ती हार्वे स्कूल डिस्ट्रिक्ट 152 मध्ये अन्नसेवांच्या पर्यवेक्षक होत्या.

कोव्हीडच्या काळात या ठिकाणी लोकांची ये-जा पूर्णपणे थांबलेली होती.परंतु त्यावेळी उपहारगृहातून शाळेमध्ये अन्न पोहोचवले जात होते. त्याची देखरेख देखील तीच महिला करत होती. परंतु या कालावधीत हे अन्नपदार्थ 1100 शाळांमध्ये पोहोचले नसल्याची बातमी समोर आलेली आहे या घटनेची संपूर्ण माहिती काढल्यावर असे लक्षात आले की या चिकन विंग्सची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय 12 कोटी एवढे होते आणि ते वितरित केले नाहीत.

महिलेला 9 वर्षे तुरुंगवास

कोर्टाने या प्रकरणात वेरा लिडेलला दोषी ठरवले आणि तिला 9 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. जेव्हा कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या. आणि मुलं अक्षरशः अभ्यास करत होती. त्यानंतर शाळा प्रशासनाने मुलांना शाळेतच जेवण देण्याची व्यवस्था केली होती. मात्र मुलांपर्यंत अन्न पोहोचले नाही. पण दरम्यान, चिकन पंखांसाठी अनेक पावत्या सापडल्या ज्यावर व्हेरा लिडेलच्या स्वाक्षरी होत्या. तर चिकन विंग्स हा शाळेच्या जेवणाचा भाग नव्हता. आणि यातूनच कोंबडीच्या पंखांची चोरी उघडकीस आली.

Dinesh Karthik All time Indian XI : दिनेश कार्तिकने निवडली भारताची ऑल टाइम बेस्ट XI; धोनीला वगळलं, कोणाकोणाला संधी?

Dinesh Karthik All time Indian XI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आपली सर्वोत्तम ऑल टाइम बेस्ट XI संघ निवडला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी कार्तिकने खेळाडूंची निवड केली असून यात ५ स्पेशालिस्ट फलंदाज, २ अष्टपैलू, २ फिरकीपटू आणि २ जलदगती खेळाडूंचा समावेश आहे. कार्तिकने आपल्या संघात आजी माजी खेळाडूंचा समन्वय राखला आहे. मात्र महेंद्रसिंघ धोनी आणि सौरव गांगुली या भारताच्या दोन्ही दिग्गज कर्णधाराना त्याने आपल्या संघात जागा दिलेली नाही त्यामुळे क्रिकेटप्रेमी हैराण झालेत. (Dinesh Karthik All time Indian XI)

कसा आहे कार्तिकचा ऑल टाइम बेस्ट संघ –

दिनेश कार्तिकने आपल्या संघात सलामीवीर म्हणून आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि हिटमॅन रोहित शर्माचा समावेश केला होता. या दोन्ही खेळाडूंनी भारताकडून प्रदीर्घ काळ सलामी करून संघाला मोठं यश मिळवून दिले आहे. खासकरून आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर समोरच्या गोलंदाजाला बॅकफूटवर ढकलण्याचे काम रोहित आणि वीरूने करून दाखवलं आहे. मध्यक्रमात द वॉल राहुल द्रविड, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि किंग विराट कोहली या महारथींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारताची फलंदाजी अतिशय मजबूत दिसत आहे.

यानंतर दिनेश कार्तिकने अष्टपैलू खेळाडू म्हणून सिक्सर किंग युवराज सिंग आणि फिरकीपटू रवींद्र जडेजाची निवड केली आहे. युवराज सिंगने भारतीय क्रिकेटसाठी दिलेलं योगदान आणि 2007 तसेच 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भूमिका यामुळे भारताच्या ऑल टाइम बेस्ट इलेव्हन मध्ये त्याचा समावेश तर असतोच. तर दुसरीकडे रवींद्र जडेजाने सुद्धा मागील १० वर्षात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. यानंतर फिरकीपटू म्हणून आर अश्विन आणि अनिल कुंबळे या महान गोलंदाजांना कार्तिकने आपली पसंती दाखवली आहे. तर जलदगती गोलंदाज म्हणून झहीर खान आणि जसप्रीत बुमराहला दिनेश कार्तिकने संधी दिली आहे. तर टर्बोनेटर हरभजन सिंगला १२ व्या खेळाडूच्या रूपात कार्तिकने निवडलं आहे.

अशी आहे कार्तिकची ऑल टाइम बेस्ट XI-

वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अनिल कुंबळे, झहीर खान, जसप्रीत बुमराह, हरभजन सिंग (बारावा खेळाडू)

काहीतरी वेगळं राजकारण दिसतंय… सावध व्हा! नार्वेकरांना पत्र; ठाकरेंचा उल्लेख

uddhav thackeray milind narvekar (2)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) तयारीला लागली आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आला असून, मविआचे नेते या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत मार्गदर्शनही करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या कि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख असतील. परंतु मुख्यमंत्री मात्र विधानसभा निकालानंतर ठरवलं जाईल… नेमकं याच मुद्यावरून एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) याना पत्र लिहून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव साहेबाना मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देण्यात येत आहे. यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे अशी शंका सदर शिवसैनिकाने व्यक्त केली आहे.

काय हे सदर पत्रात ?

मिलिंद भाई,
जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल महाविकास आघाडी तरच उद्धव साहेबांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा. जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल व महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही.

लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या व काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील… मुख्यमंत्रीपदाची ऑफर महाविकास आघाडी न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे आपण देखील सावध राहून एकत्रित जेव्हा सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावे अन्यथा आपल्या उमेदवारांचा आपण प्रचार प्रत्येकाने आपल्या पक्षाने प्रचार करावा असं ठरविण्यात यावे आणि तिच रणनिती ठेवावी…. असं या पत्रात म्हंटल आहे. या पत्रामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आलाय.

Weather Update | राज्यातील हवामानात होणार मोठा बदल; पुढील 15 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Weather Update

Weather Update | जुलै महिनामध्ये जोरदार पाऊस बरसल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. पावसाचा जोर सगळीकडेच कमी झालेला आहे. आणि अगदी ऊन पडताना देखील दिसत आहे. परंतु आता हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा मोठा हवामान बदल होणार आहे. आणि मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्टनंतर पुढील दहा-बारा दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. याबद्दलची माहिती हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी दिलेली आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. परंतु त्यानंतर हवामानात मोठ्या बदल होऊन 19 ऑगस्टपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यातही चांगलाच पाऊस पडणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात वर्धा, नागपूर, अकोट, परतवाडा, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, नंदुरबार, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, रत्नागिरी, धुळे, ठाणे या ठिकाणी 17 ऑगस्ट पर्यंत तुरळक पाऊस पडेल. परंतु त्यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देखील पावसाने राज्यात चांगलाच घातलेला होता. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता केरळ, ओडिसा आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये देखील पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आलेला आहे. 21 ऑगस्ट पर्यंत दिल्ली आणि एनसीआर पर्यंत वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे 20 ऑगस्ट या दरम्यान अलर्ट देखील जारी केलेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आग्नेय अरबी समुद्र आणि दक्षिण केरळ किनारपट्टीवरील राज्यात 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे या काळात मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा मासेमारांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे 17 ऑगस्टपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान कधी? आज निवडणूक आयोग घोषणा करणार?

Maharashtra Assembly Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर मधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. याशिवाय हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखाही आजच निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी होणार? आचारसहिंता कधीपासून लागू होणार? याबाबत निवडणूक आयोग कोणती घोषणा करते का याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील मतदाराचे लक्ष्य असेल.

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीचं आधी विधानसभा निवडणुका होतात कि दिवाळीनंतर होतात ते पाहायला हवं. महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. 9 ऑगस्ट रोजी मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार यांनी अपल्या टीमसह जम्मू-कश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळेस त्यांनी लवकरच निवडणुका होणार असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-कश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तीन ते चार टप्प्यांत मतदान होऊ शकते. सप्टेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याच महिन्याच्या अखेरीस निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.