Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 547

PM Kusum Yojana | या शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान कुसुम योजनेचा लाभ? जाणून घ्या फायदे

PM Kusum Yojana

PM Kusum Yojana | शेतकरी हा आपल्या देशातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी शेतात धान्य पिकवतात, म्हणूनच संपूर्ण देश हे अन्न खाऊ शकतो. त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यातील एका योजनेचे नाव कुसुम योजना (PM Kusum Yojana ) असे आहे. या योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. याशिवाय शेतकरी गट सहकारी संस्था आणि पाणी वापर करता संघटना देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात

नापीक जमिनीवर सोलर पॅनल बसवून शेतकरी सिंचन पंप चालवू शकतात आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवू शकतात. सौर पॅनेल 25 वर्षे टिकतील आणि प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत (PM Kusum Yojana ) शेतकरी, सहकारी संस्था आणि इतर गट त्यांचा लाभ घेऊ शकतात.

पीएम कुसुम योजनेचे फायदे | PM Kusum Yojana

  • वीज बिलात कपात: शेतकरी सौर पंपाने सिंचन करून वीज बिलात मोठी बचत करतात.
  • पर्यावरण संरक्षण: सौर ऊर्जा हा स्वच्छ उर्जा स्त्रोत आहे, ज्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात मदत होते.
  • भूजल पातळीत सुधारणा: सौर पंपाद्वारे सिंचन केल्याने शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाणी वापरता येते, ज्यामुळे भूजल पातळी सुधारते.
  • स्वावलंबन: सौर पंप बसवून शेतकरी वीज कपातीपासून मुक्त होतात आणि त्यांच्या सिंचन गरजा स्वतः पूर्ण करू शकतात.
  • सरकारी अनुदान: या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी अनुदान देते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होतो.

महत्त्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • नोंदणीची प्रत
  • अधिकृतता पत्र
  • जमीन कराराची प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Bangladesh Violence | बांगलादेशात हिंसा पसरवण्यासाठी ‘या’ देशांतून पुरवला जातोय फंड, गुप्तचर यंत्रणेने दिली माहिती

Bangladesh Violence

Bangladesh Violence | सध्या बांगलादेशमध्ये हिंसक असे आंदोलन चालू झालेले आहे. आणि या आंदोलनाचा परिणाम अगदी जागतिक स्तरावर देखील होत आहे. या आंदोलनानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांनी हा देश देखील सोडलेला आहे. सध्या त्या भारतामध्ये आलेल्या आहेत. परंतु अनेकांना हा प्रश्न झालेला आहे की, अचानक बांगलादेशमध्ये ही परिस्थिती कशी उद्भवली? हाती आलेल्या माहितीनुसार यामागे दोन देशांनी खंडणी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पाकिस्तान एजन्सी आयएसआय आणि चीनचा हात असल्याचे गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळालेली आहे. जमात- ए- इस्लामी संघटनेची विद्यार्थी शाखा असलेल्या इस्लामिक स्टुडंट कंपनी बांगलादेशात हे आंदोलनाला स्फोटक वळण लावलेले आहे. त्यासाठी या संघटनेला चीन आणि पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात फंडिंग केले जात असल्याचे देखील समोर आलेले आहे.

भारत विरोधी संघटना | Bangladesh Violence

जमात- ए- इस्लामी ही संघटना भारताविरुद्ध देखील काम करते. भारता विरोधात कट रचनात ही संघटना नेहमीच काम करत असते. या संघटनेच्या विद्यार्थ्यांनीच बांगलादेश मधील हे आंदोलन एक हिंसक वळणावर नेलेले आहे. त्यांनी शेख हसीन यांच्या जागी पाकिस्तान आणि चीन समर्थक यांचे सरकार आणण्याचे काम केलेले आह इस्लामी स्टुडन्ट कॅम्प यांनी या आधीच्या बाबतचा कट देखील रचला होता. देशामध्ये हिंसाचार वाढवणे हा त्यांचा उद्देश सुरुवातीपासूनच होता. या काही ओघाने झालेल्या गोष्ट नाही. हे पूर्ण प्लॅनिंगने त्यांनी आधीपासूनच केले होते. अशी माहिती गुप्तचर विभागाकडून समजलेली आहे.

देशातील परिस्थिती अस्थिर करणे आणि हसीना यांना राजीनामा द्यायला लावणे. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आलेले होते. आणि हा त्यांच्या प्लॅनिंगचा एक खूप मोठा भाग होता. पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या चिनी संस्थाकडून देखील हा निधी पुरवण्यात आलेला आहे. शेख हसीना यांच्या आधीपासूनच भारतासोबत चांगले संबंध होते. आणि चीनला भारतापासून तर आशिया खंडातील देश दूर करायचे आहे. त्यामुळे चीन देखील हा प्रयत्न करत आहे. शेख हसीना यांनी देशांमध्ये तब्बल पाचव्यांदा सत्ता स्थापन केली होती. तरी देखील देशातील आक्रमक परिस्थिती वाढल्याने त्यांना ही सत्ता सोडायला लागलेली आहे.

इस्लामिक स्टुडन्ट कॅप ही भारतीय सीमा भागात प्रभाव वाढवण्याचा देखील प्रयत्न करत आहे. भारताविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी ही संघटना नेहमीच सक्रिय असत. परंतु भारतीय गुप्तचर संघटनेने या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलेले होते. ही संघटना बांगलादेशात काम करत असली, तरी ती मूळ पाकिस्तानमधूनच चालते. पाकिस्तानमधून या सगळ्या गोष्टींचे प्लॅनिंग केले जाते. आणि याचाच परिणाम म्हणून आज बांगलादेशाने अत्यंत हिंसक असे वळण घेतलेले आहे. आत्तापर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांचा या आंदोलनात मृत्यू देखील झालेला आहे.

Airtel vs Jio | Airtel आणि Jio ने आणले स्वस्त डेटा प्लॅन; जाणून घ्या सविस्तर

Airtel vs Jio

Airtel vs Jio | जुलै महिन्याच्या सुरुवातीला देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया त्यांनी देखील त्यांच्या रिचार्ज प्लॅन महाग केले आहे. त्यानंतर त्यांच्या युजर्स मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. रिचार्जची रक्कम जास्त झाल्याने आता अनेक लोक हे बीएसएनएलकडे वळताना दिसत आहे. परंतु लोकांनी तसे करू नये. यासाठी आज डेटा प्लॅन (Airtel vs Jio) बद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

एअरटेल डेटा प्लॅन | Airtel vs Jio

एअरटेलचे ग्राहक खूप होते. परंतु एअरटेलने त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने अनेक युजरस आता बीएसएनएलकडे वळलेले आहेत. परंतु आता एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना टिकून ठेवण्यासाठी आणि नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी एक नवीन डेटा प्लॅन लॉन्च केलेला आहे. त्यांनी सगळ्यात स्वस्त 11 रुपयांचा प्लॅन आणलेला आहे. यामध्ये तुम्ही केवळ एक तासासाठी अनलिमिटेड डेटा वापरू शकता.

त्याचप्रमाणे 33 रुपयांमध्ये तुम्हाला 2 जीबी डेटा दिला जातो त्याचा वैधता एक दिवसाची असते. त्याचप्रमाणे 49 रुपयांचा देखील एक प्लॅन आहे. ज्यामध्ये तुम्ही एक दिवसासाठी अनलिमिटेड डेटा वापरू शकतो. तसेच 99 रुपयांचा देखील एक डेटा प्लॅन आहे. या डेटा प्लॅनची वैधता दोन दिवसांसाठी आहे. यात तुम्ही अनलिमिटेड देता वापरू शकता. त्यामुळे ज्या लोकांना जास्त डेटा लागतो. त्यांच्यासाठी हे प्लॅन अत्यंत चांगले आहेत.

जिओचे डेटा प्लॅन

एअरटेल प्रमाणे जिओने देखील त्यांचे अनेक डेटा प्लॅन लॉन्च केलेले आहेत. सगळ्यात स्वस्त 49 रुपयांचा डेटा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची वैधता एक दिवसाची आहे. तुम्ही एखाद्या दिवसासाठी अनलिमिटेड डेटा वापरू शकता. यामध्ये तुम्हाला 25 जीबी डेटा मिळतो. दुसरा प्लॅन 175 रुपयांचा आहे. हा प्लॅन 28 दिवसांचा आहे. यामध्ये तुम्हाला 10 जीबी नेट वापरता येते.

त्याचप्रमाणे सोनी लिव, झी फाईव्ह, जिओ सिनेमा प्रीमियम आणि इत्यादींच्या सबस्क्रिप्शन देखील मिळते. त्याचप्रमाणे 289 रुपयांचा आणखी एक प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 40 जीबी डेटा मिळतो. त्याचप्रमाणे 359 रुपयांचा देखील एक प्लॅन आहे. ज्या प्लॅनची वैधता 30 दिवसाच्या आहे. यामध्ये तुम्हाला तब्बल 50 जीबीचा डेटा मिळतो. तुम्हाला जर जास्त डेटाची गरज असेल, तर जीओ आणि एअरटेलचे हे प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असे प्लॅन आहेत.

Pune Viral Video : रात्रीस खेळ चाले…! पुण्यात विनाचालक धावला पालिकेचा टेम्पो

Pune Viral Video : मागच्या काही दिवसांपासून पुण्यात आलेल्या पावसामुळे आणि पुराममुळे पुण्याचं नाव चर्चेत आलं होतं. मात्र आता पुण्याची आणखी एका व्हिडिओमुळे चर्चा होत आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या गाड्यांबद्दल आम्ही आजिबात बोलत नाही आहोत… तर इथे चर्चा आहे चालकाशिवाय धावणाऱ्या गाडीची…रात्रीच्या वेळेस पुणे महानगरपालिकेची गाडी अचानक भर रस्त्यात विनचालक रिव्हर्स धावू लागते…. याच गाडीचा व्हिडीओ (Pune Viral Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय चला पाहुयात …

नक्की काय आहे व्हिडीओ ? (Pune Viral Video)

या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकाल पुणे महापालिकेची एक गाडी जी विना चालक रस्त्यावरून उलटी धावत आहे. या गाडीला बरेच स्पीड देखील आहे. शिवाय बाजूच्या रस्त्यावरून जाणारी वाहतूकही या व्हिडीओ (Pune Viral Video) मध्ये दिसत आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी ही गाडी डिव्हायडर ला धडकते आणि तिरकी होऊन रस्त्यावर थांबते असा हा व्हिडीओ आहे.

खरेतर अचानकपणे उलट्या दिशेने येणाऱ्या या वाहनाला पाहून मागच्या वाहनांना धडकीच भरली असती. मात्र सुदैवाने यावेळी मागे कुणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. व्हिडिओमध्ये (Pune Viral Video) उलट्या दिशेने जाणारा हा टेम्पो पुणे महानगरपालिकेचे रोड मेंटेनन्स वाहन असल्याचं दिसत आहे.ही घटना रविवारी, 4 ऑगस्ट रोजी पुण्यातील हडपसर येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील वैदूवाडी उड्डाणपुलावर रविवारी रात्री हा प्रकार समोर आला. कदाचित उतरती असल्यामुळे हा टेम्पो रिव्हर्स आला असावा असे बोलले जात आहे.

Veg Thali Price : शाकाहारी थाळी 11 टक्क्यांनी महागली!! नेमकं काय आहे कारण?

Veg Thali Price hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या श्रावण महिना सुरु असून जवळपास अनेकजण नॉन व्हेज खात नाहीत, त्याउलट सर्वत शुद्ध शाकाहारीचा थाट (Veg Thali Price) पाहायला मिळतो. अनेक शाकाहारी हॉटेलमध्ये श्रावण महिन्यात तोबा गर्दी पाहायला मिळते. मात्र तुम्हीही शुद्ध शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी आम्ही महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. जुलै 2024 मध्ये घरगुती शिजवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किंमती महिन्या-दर-महिन्यानुसार अनुक्रमे 11 टक्के आणि 6 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

काय आहे कारण? Veg Thali Price

रोटी राईस रेट नावाची वेबसाईट, रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या म्हणण्यानुसार, शाकाहारी थाळीच्या किमतीत झालेल्या 11 टक्के वाढीपैकी 7 टक्के वाढ केवळ टोमॅटोच्या किमतीमुळे झाली आहे. कारण टोमॅटोच्या किमती जुलैमध्ये 55 टक्क्यांनी वाढून 42 रुपये प्रति किलोवरून थेट 66 रुपये प्रति किलो झाली. टोमॅटो हा जेवण बनवताना वापरावाच लागतो, त्यामुळे त्याचा फटका शाकाहारी थाळीला बसला आणि थाळीच्या किमती वाढल्या. क्रिसिलच्या म्हणण्यानुसार, टोमॅटो शिवाय कांदा आणि बटाट्याच्या किमतीत सुद्धा अनुक्रमे 20 टक्के आणि 16 टक्क्यांनी वाढ झाली. कमी रब्बी उत्पादनामुळे कांद्याच्या किमतीवर परिणाम झाला, तर पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये उशिरा झालेल्या ब्लाइटच्या संसर्गामुळे बटाट्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असं या अहवालात म्हंटल आहे. त्यामुळेच शाकाहारी थाळी महागली.

मांसाहारी थाळी स्वस्त कि महाग?

दुसरीकडे, मांसाहारी थाळीच्या किमती व्हेज थाळीच्या (Veg Thali Price) तुलनेत कमी वेगाने वाढल्या, कारण ब्रॉयलरच्या किमती स्थिर राहिल्यात. अहवालानुसार, जून महिन्यात मांसाहारी थाळीची किंमत ५८ रुपये होती मात्र ती जूनमध्ये ६ टक्क्यांनी वाढून ६१ वर पोचली. मात्र याचे कारणही नॉन व्हेज चा कोणता पदार्थ नसून टोमॅटोच्या वाढत्या किमती हेच आहे. महिन्याची तुलना केली तर जून पेक्षा जुलै महिन्यात मांसाहार थाळी महाग झाली आहे मात्र वर्षभराची तुलना केली तर मागच्या वर्षीपेक्षा यंदा नॉन व्हेज थाळी स्वस्तच झाली आहे. जुलै २०२३ मध्ये मांसाहारी थाळीची किंमत ६७ रुपये होती, मात्र यंदा हीच किंमत ६१ रुपये झाली आहे.

बाप रे ! महिलेच्या डोळ्यात सापडल्या चक्क 60 जिवंत आळ्या; डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

Buldhana News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण सोशल मीडियावर रोज काही ना काही नवीन घटना वाचत असतो पाहत असतो. या घटना पाहून अनेकदा आपल्याला आश्चर्याचा धक्का देखील बसतो. आणि असाच एक आश्चर्याचा धक्का बसणारा प्रकार बुलढाणामध्ये घडलेला आहे. बुलढाणातील एका महिलेच्या डोळ्यांमध्ये तब्बल साठ जिवंत आळ्या आढळून आलेल्या आहेत. आणि हे बघितल्यानंतर डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसलेला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावात हा सगळा प्रकार घडवून आलेला आहे. येथील मोरवाल या रुग्णालयात या महिलेवर उपचार चालू आहेत. आणि डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा डोळा वाचला आहे. ही महिला चिखलीतील मालगणी येथील रहिवासी आहे. तिचे नाव ज्योती गायकवाड असे आहे. यावेळी डॉक्टरांनी केवळ दीड तासांमध्ये त्या महिलेच्या डोळ्यातून 60 आळ्या बाहेर काढलेल्या आहे. मोरवाल हॉस्पिटलच्या या डॉक्टरचे नाव डॉक्टर स्वप्नील मोरवाल असे आहे. त्यांनी या गरीब महिलाकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाही. ही महिला मजुरी करून पोट भरत असते. परंतु काम करताना दुखापत झाल्याने तिच्या डोळ्यांमध्ये आळ्या झाल्या होत्या.

डोळा दुखत असल्याने ती डॉक्टरांकडे तपासण्यासाठी आली. परंतु डॉक्टरांना हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर जवळपास दीड ते दोन तास या महिलेच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया चालू होती. आणि त्यानंतर तिचा डोळा वाचलेला आहे. डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक त्या महिलेच्या डोळ्याची शस्त्र क्रिया केली आहे. आणि त्यानंतर तिचा डोळा वाचला आहे. या डॉक्टरांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महिलेच्या डोळ्या आधीपासूनच दुखत होता. परंतु पैशाच्या अभावी आणि काम करायचे असल्याने तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर तिचा तो त्रास जास्तच वाढत गेला आणि तिने मोरवाल हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला. त्यावेळी डॉक्टरांच्या जे निदर्शनास आले ते पाहून त्यांना स्वतःलाच खूप धक्का बसला. त्यानंतर त्या डॉक्टर त्यांनी एकही रुपयांना न घेता त्या गरीब महिलेचा डोळा वाचवला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेकडून पांबन पुलावर घेतली ट्रायल रन ; कधी सुरु होणार वाहतूक ?

Indian Railway : भारताच्या विकासात भर घालणारे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स हाती घेण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन , मेट्रो प्रकल्प , रस्ते आणि पूल यांचा यात समावेश आहे. यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत. आता भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. या पुलाची लिफ्ट स्पॅनची यंत्रणा पूर्ण झाल्यामुळे, दक्षिण रेल्वेने रविवारी संध्याकाळी नवीन पांबन रेल्वे सागरी पुलावर यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. ही चाचणी ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) टॉवर कार ब्रिज ओलांडून रामेश्वरम स्टेशनपर्यंत चालवली गेली.

सेंटर लिफ्ट स्पॅनची स्थापना जुलैच्या अखेरीस पूर्ण झाली, त्यानंतर गेल्या आठवड्यात पांबन पुलाच्या दोन्ही टोकांना ट्रॅक जोडणी पूर्ण झाली. नवीन पुलावर OHE टॉवर कारची चाचणी 2022 नंतर पहिलीच होती.

रेल्वे मंत्रालयाने पोस्ट केला व्हिडीओ

रेल्वे मंत्रालयाने या ट्रायल रनचा एक व्हिडीओ देखील शेअर केला असून ट्विट करीत म्हंटले आहे की, “नवीन पंबन पूल अंतिम रेषेच्या जवळ आहे! टॉवर कारची यशस्वी चाचणी नुकतीच भारतातील पहिल्या वर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिजवर घेण्यात आली. अशा आशयाचे ट्विट रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

कधीपर्यंत सुरु होणार पूल

अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, 1 ऑक्टोबरपासून रामेश्वरमसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची योजना आहे. तर पुलाच्या बाबतीत सांगायचे झाले तर सप्टेंबरपूर्वी पूल तयार होईल अशी अपेक्षा असून यासाठी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी वेगाने कामाला लागले आहेत.

काय आहे वैशिष्ट्ये ?

समुद्रसपाटीपासून 22 मीटर उंचीवर नेव्हिगेशनल एअर क्लिअरन्ससह व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज सध्याच्या पुलापेक्षा 3 मीटर उंच असेल. ट्रेन कंट्रोल सिस्टमसह इंटरलॉक केलेल्या इलेक्ट्रो-मेकॅनिकल कंट्रोल सिस्टमचा (Vertical Lift Railway Bridge) वापर करून हा ऑपरेट केला जाईल. पांबन रेल्वे सागरी सेतूमध्ये 99 स्पॅन आहेत, प्रत्येकाची लांबी 18.3 मीटर आहे, तसेच 72.5 मीटरचा एक स्पॅन आहे.

हा रेल्वे पूल मुख्य भूमीला रामेश्वरम, एक ऐतिहासिक दक्षिण भारतीय शहर आणि चार धाम तीर्थस्थानांपैकी एक, उत्तरेकडील बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका आणि पूर्वेला पुरीशी जोडतो म्हणून हा पूल खूप महत्त्व आहे. हा पूल परंपरा आणि नवकल्पना यांच्या गतिशील समन्वयाचे उदाहरण देतो, जो भारताच्या विकास (Vertical Lift Railway Bridge) कथेचे वैशिष्ट्य आहे.

बीड ते तासगाव… पवारांचे हे 13 चेहरे यंदा फिक्स आमदार होतायत

Tutari 13 MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात टप्प्यात कसा कार्यक्रम करायचा? ते पवारांना पक्क ठावूक… म्हणूनच नवा पक्ष नव चिन्ह,… आणि नवी फळी असतानाही शरद पवारांनी 80 च्या स्ट्राईक रेटने लोकसभेचे मैदान गाजवलं… खासदारकीला महायुतीला आणि विशेषतः अजितदादा गटाला पाणी पाजल्यानंतर आता शरद पवारांचं नेक्स्ट मिशन आहे ते विधानसभा 2024. यंदा काहीही झालं तरी सत्तेत येणारच! असा प्रण केलेल्या शरद पवारांनी विधानसभेची घोषणा होण्याच्या आधीच अनेक उमेदवारांची तिकीट डिक्लेअर करून टाकलीयेत… त्यातही तुतारीच्या बाजूने सध्या असे काही खंदे 13 चेहरे आहेत ते अगदी डोळे झाकून निवडून येतील… अशी राजकीय परिस्थिती आहे… त्यामुळे शरद पवारांच्या आमदारांचा आकडा वाढता असला तरी पवारांचे कोणते 13 राजकीय नेते डोळे झाकून निवडून येतील… तुतारीचे हे अनबिटेबल टॉप 13 चेहरे नेमके कोण आहेत? त्याचाच हा सविस्तर आढावा…

शरद पवारांचा कुठला उमेदवार डोळे झाकून निवडून येईल? याचा जेव्हा आपण आढावा घ्यायला जातो, तेव्हा आपसूकच पहिलं नाव समोर येतं ते इस्लामपूरचे जयंत पाटील… इस्लामपुरात वन मॅन शो जयंत पाटलांचं राजकारण चालतं… 1990 पासून तब्बल तीन दशकं ते या मतदारसंघाचं निर्विवाद प्रतिनिधित्व करत आले आहेत…मात्र नगरपालिकेतील राष्ट्रवादीची तीस वर्षांची सत्ता भाजपने संपुष्टात आणली.. हा पाटलांसाठी मोठा धक्का होता…त्यासोबतच अजित पवार गटापासून ते स्वाभिमानी पर्यंत प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे… पण असं असलं तरी इस्लामपुरात जयंत पाटील यांचंच पारड सध्या तरी जड दिसतय…यातलं दुसरा नाव आहे ते तासगावच्या रोहित पाटलांचं…पवारांनी एका सभेत आधीच तासगाव मधून रोहित पाटलांना उमेदवारी जाहीर करून टाकलीये… आर. आर. आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार.. २०१९ ला त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी… शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरपंचायतीतील विजयापासूनच रोहित पाटील य़ांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापीत झालं.. आमदारकीसाठी त्यांची तयारीही झा्लेली असून ते कवठे महांकाळ मधून ते आरामात तुतारी वाजवतील असं बोललं जातंय…

तुतारीचा आमदारकीचा तिसरा फिक्स चेहरा म्हणजे बीड विधानसभेचे संदीप क्षीरसागर … बजरंग बाप्पांच्या विजयासाठी बीडात ज्यांनी फिल्डींग लावली होती ते संदीप क्षीरसागर हे या मतदारसंघाचे पहिल्या टर्मचे आमदार.. आपल्याच काकाला म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना मात देत संदीप हे विधीमंडळात गेले. पक्षातील आपली पोजिशनही स्ट्रोंग बनवली. यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभेला संदीप क्षीरसागर यांना तगडा विरोधकच नसल्याने त्यांचा तुतारीकडून विजय जवळजवळ निश्चित समजला जातोय. यातलं चौथं नाव येतं ते घनसावंगीच्या राजेश टोपे यांचे…पवार साहेबांसोबतच निष्ठा दाखवणाऱ्या काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकीच एक असणारे राजेश टोपे या मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व करतात. शांत, सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यात कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्रीपद मोठ्या धाडसानं पेलल्यामुळे त्यांची उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली होती.. सतीश घाटगे, राजू शेट्टी यांची नावं सध्या टोपेंच्याविरोधात चर्चेत असली तरी आमदारकीला टोपे यांच्यापेक्षा सध्या तरी प्लसमध्येच दिसतायेत…

या यादीतला पाचवा उमेदवार असेल तो बिग फाईट बारामती विधानसभेतील युगेंद्र पवार … राष्ट्रवादीची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात अजितदादांचा शब्द अंतिम चालतो. पण पक्षफुटीनंतर आता शरद पवार इथून युगेंद्र पवार यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी करतायत… त्यात अजितदादांच्याच मतदारसंघात तुतारीला ४५ हजारांचं लीड मिळाल्यानं युगेेंद्र पवारांच्या आमदारकीच्या महत्वकांक्षा चांगल्याच वाढल्यात.. त्यामुळे समोर बिग बॉस दादा असताना युगेंद्र पवार इथून तुतारी वाजवण्याचे सध्यातरी फुल टू चान्सेस आहेत…तुतारीकडून आमदारकीचा सहावा चेहरा असेल तो राहुरीच्या प्राजक्त तनपुरे यांचा… 2019 च्या विधानसभेला भाजपच्या शिवाजीराव कर्डीलें सारख्या मातब्बर नेत्याला आसमान दाखवत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे जायंट किलर ठरेल… त्यात राष्ट्रवादीतील फुटीत ते शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांनी लोकसभेलाही लंकेंना विजयातील महत्वाचा हात दिला. त्यामुळे तनपुरेच इथून तुतारी वाजवतील, असं सध्या मतदारसंघातलं जनमत आहे..

सातवं नाव जे आमदारकीसाठी फिक्स समजले जातंय ते कर्जत जामखेडच्या रोहित पवारांचं…2019 च्या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार जायंट किलर ठरले. अजितदादा गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत… त्यासोबत भाजपकडून प्रवीण घुले देखील उमेदवारीसाठी अडून बसल्याचं समजतंय… पण मागील पाच वर्षांत रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये केलेली विकास कामं आणि पक्षबांधणी बघता याही टर्मला त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत…या यादीतला आठवा चेहरा येतो तो शिरूरच्या अशोक पवारांचा…शिरुरच्या पट्ट्यातून सगळे अजितदादांच्या पाठिशी गेले उरले फक्त निष्ठावान शिरुरचे आमदार अशोक पवार.. त्यामुळे यंदाही तेच राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात दिसतील, यात शंका नाही… प्रदीप कंद यांनी पवारांना चितपट करण्यासाठी जोर लावला असला तरी लोकसभेला मिळालेलं लीड, अमोल कोल्हेंची मिळणारी साथ आणि अजित दादांच्या बाजूने असणारे सहानुभूतीची लाट पाहता अशोक पवारांचाच गुलाल यंदा फिक्स दिसतोय

नववं नाव येतं ते काटोळच्या अनिल देशमुख यांचा…महाविकास आघाडीत सर्वाधिक जास्त चर्चेत राहिलेले अनिल देशमुख याच काटोळचं विधीमंडळात प्रतिनीधीत्व करतात… राष्ट्रवादीची दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांची फळी अजितदादांसोबत गेलेली असताना काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नाव साहेबांसोबत थांबली.. त्यापैकीच एक अनिल देशमुख.. काटोळ हा देशमुखांचा बालेकिल्ला असल्याने ते इथून तुतारी आरामात वाजवतील, असा सध्या ट्रेंड दिसतोय..बोलूयात फायर ब्रँड जितेंद्र आव्हाडांबद्दल… शरद पवारांच्या पाठीशी नेहमीच सावलीप्रमाणे उभे असणारे आव्हाड इथून सलग अनेक टर्म इथून निवडून जातायत.. मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्यांक बहुल सामाजावर आव्हाडांची असणारी पकड पाहता मुंब्रा कळव्याला तुतारीचा आवाज ऐकायला मिळेल, यात कसलीच शंका नाही… नजीब मुल्ला कळवा मुंब्र्यातून आव्हाडांना टक्कर देऊ शकतात… पण आव्हाडांच्या आमदारकीला सध्या तरी धोका नाही, असं म्हणता येऊ शकतं…

अकरावा भिडू आहेत पंढरपूरचे भगीरथ भालके…पंढरपूरचे तीन टर्म चे आमदार भारत भालके यांची सुपुत्र भगीरथ भालके… खरतर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंनी भालकेंना पराभवाचा धक्का दिला… यानंतर त्यांनी बिआरएसची वाट धरली… पण पुन्हा एकदा भगीरथ भालके शरद पवारांच्या वाटेवर आल्याने पोट निवडणुकीचा वचपा भालके यंदा विधानसभेला काढू शकतात… बाकी समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, अभिजीत पाटील यांच्या उमेदवारीचा खल कायम असताना कारखानदारी, संस्थात्मक राजकारण आणि जनसंपर्काच्या जोरावर भालके आरामात पंढरपुरातून तुतारी वाजू शकतात…बारावा चेहरा येतो तो विक्रमगडच्या सुनील भुसारा यांचा… भाजपचा बालेकिल्ला भुसारा यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदाच ताब्यात घेतला.. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांनाच विक्रमगडची उमेदवारी निश्चित आहे. फक्त भाजपने इथं ताकद लावली तर ही जागा अटीतटीची होऊ शकते… पण भुसारा यांच्याच राजकारणाचं पारडं सध्यातरी जड दिसतंय…

तुतारीचा तेरावा आमदार असू शकतो तो म्हणजे भोसरीच्या अजित गव्हाणे यांचा…अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी काही नगरसेवकांसह शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला. विधानसभा निवडणुक लढवण्याच्या दृष्टीनेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं. अजित पवार गटाने आधी – घड्याळ तेच, वेळ नवी असं घोषवाक्य तयार केलं होतं.. अजित गव्हाणे हे भोसरीतून लांडगेंना कट टू कट फाईट देतील, असं सध्या चित्रं आहे… पवारांनी ताकद लावलीच तर अजित गव्हाणे हे शरद पवारांची तुतारीही भोसरीमध्ये वाजवू शकतात, असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे…

Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगटविरोधात सरकारच षडयंत्र; कोणी केला गंभीर आरोप?

Vinesh Phogat Disqualified (1)

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक मधून भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरल्यानंतर भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. विनेशचे वजन ५० किलोग्रॅम पेक्षा थोडं जास्त भरल्याने ती आता फायनलमध्ये खेळू शकणार नाही, मात्रहा सर्व प्रकार म्हणजे विनेश फोगटविरुद्ध रचलेलं षडयंत्र असून यामध्ये सरकारचा हात आहे असा गंभीर आरोप तिचे सासरे राजपाल राठी यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी या संपूर्ण घटनेनंतर संताप व्यक्त केला.

राजपाल राठी म्हणाले, हे एक मोठं षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजनामुळे कोण बाहेर काढतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅमपर्यंत वजन वाढतं. तर मग त्यांना जेव्हा माहिती होतं की तिचं १०० ग्रॅम वजन जास्त आहे, तर तिचे केस कापायला हवे होते. तिच्यासोबत जे लोक होते, जो स्टाफ होता, त्यांनी अजिबात तिची मदत केली नाही. यामध्ये सरकार आणि कुस्ती फेडरेशनचा हात आहे. माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचं विनेशनं वारंवार सांगितलं होतं असेही राजपाल राठी यांनी म्हंटल. तसेच काल फाईट झाली त्यावेळी तिचं वजन जास्त का नव्हत?” असा सवालही त्यांनी केला.

नेमकं काय घडलं? Vinesh Phogat Disqualified

विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले आहे. आता ती अंतिम सामना खेळू शकणार नाही. खरं तर तिने मंगळवारच्या लढतींसाठी वजन केले परंतु नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशने वजन मंगळवारी रात्री अंदाजे 2 किलो जास्त होते. ती रात्रभर झोपली नाही आणि वजन कमी करण्यासाठी जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत तिने सर्वकाही प्रयत्न केले तरीही १०० ग्राम तिचे वजन जास्तच भरल्याने ती अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरली आहे. भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. कारण संपूर्ण देशाला तिच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती.

दरम्यान, ड‍िहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे विनेश बेशुद्ध झाली असून तिला पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विनेशने तिचं वजन कमी करण्यासाठी रात्रभर बरीच मेहनत केली. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊन ती बेशुद्ध झाली. विनेश जॉगिंग, स्किपिंग सर्वकाही केलं. रात्रभर सायकल चालवली. पण केवळ 100 ग्रॅम वजनामुळे तिचं सुवर्णवेध हुकलं.

Double Decker Bus : मुंबईनंतर ‘या’ दोन शहरांना मिळणार डबल डेकर बसेस

Double Decker Bus : मुंबईत फिरताना तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर डबल डेकर बसेस दिसल्या असतील अगदी स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून या बसेस मुंबईमध्ये धावत आहेत. आता लवकरच ठाणे आणि पुणे या दोन शहरातही डबल डेकर बसेस (Double Decker Bus) धावताना दिसणार आहेत. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती…

पुण्यातही डबल डेकर (Double Decker Bus)

पुण्यामध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या भेडसावत आहे. शिवाय सध्या सुरु असलेल्या PMP ला देखील मोठी गर्दी असते. यामुळे पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुक सुधारण्यासाठी प्रशासन भर देत आहे. पुणेकरांसाठी आत एक खुशखबर असून मुंबई प्रमाणेच पुण्यातही डबल डेकर (Double Decker Bus) बसेस सुरु होणार आहेत. पीएमपी संचालकांच्या बैठकीत बस खरेदीला मान्यता मिळाली आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. 100 नवीन इलेक्ट्रिक बसेसही खरेदी करणार आहे त्यातच वीस डबल डेकर बसेस असणार आहे. त्यामुळे लवकरच पुण्यातल्या रस्त्यांवर डबल डेकर बसेस धावताना दिसणार आहेत.

ठाण्याला 10 डबल डेकर (Double Decker Bus)

तर दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागात आतापर्यंत 123 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्यात उर्वरित 180 बसेस घेण्यासाठी परिवहन विभागाने निविदा मागवली आहे त्यातील दहा बसेस या डबल डेकर बसेस असणार आहेत. ठाणे महापालिकेकडून ज्या परिवहन सेवेसाठी निविदा मागवण्यात आलेली आहे अशा 180 इलेक्ट्रिक एसी बस घेण्यात येणार आहेत. ठाणेकरांना डबल डेकर मिळणार आहे त्यादेखील इलेक्ट्रिक आणि एसी असतील त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास हा सुखदायक होणार आहे. दरम्यान मुंबईत 1937 पासून म्हणजेच मागच्या 87 वर्षां पासून डबल डेकर बस (Double Decker Bus) रस्त्यावर धावत आहेत तीच डबल डेकर बस आता नाविन्यतेने ठाण्यात येणार आहे.