Friday, January 2, 2026
Home Blog Page 5672

कोरोनाच्या उद्रेकामुळं ‘या’ राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि संकट पाहून पंजाब सरकारने कडक पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु हे लॉकडाऊन-१ या प्रमाणे इतके कठोर असणार नाही. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार पंजाबमध्ये शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी संपूर्ण लॉकडाऊन असेल. म्हणजेच शनिवार आणि रविवार तर सरकारी सुट्टीच्या दिवशी दुकाने उघडली जाणार नाहीत. याशिवाय राज्यात वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.

आदेशानुसार केवळ ई-पास असलेल्या लोकांनाच येणे आणि जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याखेरीज पंजाब सरकारने हे स्पष्ट केले आहे की औद्योगिक युनिट आठवड्यातून ७ दिवस सुरू असतील. पंजाबमध्ये कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २८०५ आहे, तर या साथीमुळे ५५ लोकांचा बळी गेला आहे.

दरम्यान, देशभरात लॉकडाऊनचे ४ टप्पे झाल्यानंतर देशभरात अनलॉकचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला. त्यात प्रमुख रेल्वे सेवा आणि मेट्रो सेवा बंद ठेवल्याने सगळा भार सार्वजनिक बस वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर येऊ लागला आहे. त्यातून सोशल डिस्टसिंगचे तीन-तेरा वाजत असून कोरोना पसरण्याची भीती आणखी वाढली आहे. मुंबईत गर्दी पाहता पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला. तर दिल्लीतही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

कोरोना बचाव निधी उभारण्यासाठी केरळमधील तरुणांनी वापरला ‘हा’ नवीन फंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले तीन चार महिने केरळमध्ये सुरु असणाऱ्या कोरोना संकटात मदत निधी उभा करण्यासाठी केरळमधील नागरिकांनी अनेक कौशल्यपूर्ण मार्ग निवडले आहेत. ज्याची चर्चाही झाली आहे. कोल्लम मध्ये ६० वर्षाच्या महिलेने तिच्या उत्पन्नाचे साधन तिची शेळी मदतनिधी देण्यासाठी विकली, एर्नाकुलम मध्ये आपल्या सायकलच्या सामानासाठी जमा केलेले पैसे एका मुलाने मदत म्हणून दिले. कासारगोड मधील एका कुटुंबाला त्यांच्या घरातील सहा लोकांना कोरोना झाला होता, त्यांना डिस्चार्ज च्या वेळी मुख्यमंत्री सहायता निधीमधून एक लाखाचा चेक देण्यात आला. आता राज्यातील इडुक्की जिल्ह्यात तरुण स्वयंसेवकांचा एक संघ एलईडी बल्ब तयार करून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पैसे गोळा करत आहे.

केरळ राज्य युवा कल्याण मंडळांच्या सदस्यांनी ही नामी कल्पना शोधली आहे. या माध्यमातून केरळमधील कोरोना संकटासाठी बचाव निधी देण्याचे त्यांनी ठरविले आहे. या संस्थेने बल्ब तयार करण्यासाठी मध्यप्रदेशमधून कच्चा माळ खरेदी करून या कामात रस असणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले. गेल्या पाच दिवसात थोडुपुझा शहरातील १० स्वयंसेवकांनी ९ व्हॅट चे ६०० बल्ब तयार केले आहेत. संस्थेद्वारे त्यांच्या भोजन व प्रवासाची काळजी घेतली जात आहे. पण या कल्पनेमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. यापूर्वीही या संस्थेने अशा अनेकविध संकल्पना राबवून मदतकार्यात वाटा उचलला आहे.

२०१८ साली आलेल्या पुराच्या काळात संस्थेने केरळ स्वयंसेवी युवा कृती दल उभा केला होता. जो मदतकार्यात सक्रिय होता. राज्यातील १६०० स्वयंसेवकांना एकत्रित करून त्यांना संबंधित प्रशिक्षण देण्यात आले होते. पुराच्या काळात लोकांना औषधे पुरविणे, सामुदायिक स्वयंपाकघरात काम करणे, साफसफाई करणे अशी कामे हे स्वयंसेवक करत होते. सध्या हा प्रकल्प इडुक्की जिल्ह्यात प्राथमिक पातळीवर आहे. तो यशस्वी झाल्यास इतर जिल्ह्यातही राबविला जाणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे. एखाद्याच्या घरी जाऊन त्याला मदतीसाठी १०० रु द्या म्हणण्यापेक्षा बल्ब खरेदी करण्यास सांगणे सोपे जाते असे संस्थेचे एक सदस्य बिंदू म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; बुधवारी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्याने खळबळ

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य  कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.

याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. धनंजय मुंडे हे करोनाची बाधा होणारे राज्य सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे.

यामध्ये त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी आणि बीडच्या वाहन चालकाचा समावेश आहे. काल रात्री धनंजय मुंडे यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट आला. राज्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्याचवेळी आता राज्यातील मंत्रीही करोनामुळे बाधित होत आहेत. मंत्रालयातील काही सचिव, अधिकाऱ्यांनाही या व्हायरसची बाधा झाली होती. धनंजय मुंडे यांनी चार दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात करोनाची टेस्टिंग करणाऱ्या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले होते.

पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ; दिवसभरात सापडले २६८ नवीन रुग्ण

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आज दिवसभरात राज्यात ३६०७ रुग्णांची अर्थात आतापर्यंतच्या सार्वधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज पुण्यातही मोठ्या संख्येत रुग्णांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. आज दिवसभरात पुण्यात २६८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सात रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे.

पुण्यातील एकूण रुग्णसंख्या आता ८ हजार ७७७ झाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ७८२ रुग्ण बरे झाले आहेत. आज २०७ रुग्णांची पुन्हा तपासणी केली असता त्यांचे अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे.

जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरात आज सर्वाधिक ८९ रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच शहरातील एकूण रुग्णसंख्या १ हजार १७ झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आणि हद्दी बाहेरील एकूण १०१७ जण करोना बाधित आहेत. पैकी, ५१६ हद्दीतील तर हद्दीबाहेरील ७५ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू करोना विषाणूमुळे झालेला आहे. प्रशासनाकडून सामाजिक अलगाव चे नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक; ‘ही’ ठिकाणे बनलेत हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे|

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गुरुवारी बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले. शिराळा तालुक्यात हॉटस्पॉट बनलेल्या मणदूरमध्ये तब्बल सहा जण पॉझिटिव्ह आढळले. बाधितांमध्ये 90 वर्षीय वृद्ध महिलेसह सहा जणांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील लादेवाडी मध्ये 41 वर्षीय पुरुष तर रिळेमध्ये 41 वर्षांची महिला, मिरज तालुक्यातील सोनीमध्ये 39 वर्षाचा तरुण, याशिवाय आटपाडीतील गळवेवाडी येथे 65 वर्षाचा वृद्ध बाधित असल्याचे स्पष्ट झाले. कोरोना बाधितांपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 202 वर गेली असून सद्यस्थितीत 87 रुग्णांवर मिरजेतील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.

शिराळा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. या भागातील बहुतांशी लोक मुंबईला नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने असतात. ते परतत असल्याने तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र सर्वाधिक रुगण मणदूरमध्ये आढळत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मणदूरमध्ये बाधितांच्या संपर्कातील पुन्हा सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मणदूर येथील 80 वर्षीय व्यक्ती मुंबईतून आली होती. त्यानंतर बाधितांच्या संपर्कात आलेल्या मणदूर मधील व्यक्तींना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या तब्बल सहाजणांच्या स्वाबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 17 वर्षाचा मुलगा, 23 वर्षांचा पुरुष, 90 वर्षांची वृद्ध महिला, 50 वर्षांचा पुरुष, 47 वर्षांची महिलासह 76 वर्षांच्या वृद्ध महिलेचा समावेश आहे. बाधित झालेले सर्वजण एकाच परिसरातील रहिवाशी आहेत. बाधित सर्वांना तातडीने मिरजेतील कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

गेल्या पंधरा दिवसापासून शिराळा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिकच वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिळेमध्ये 41 वर्षाच्या महिलांमध्ये कोरोना ची लक्षणे आढळून आली होती त्यामुळे तिची प्राथमिक तपासणी केली कोरोनाची तीव्र लक्षणे असल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला होता. त्या अहवालामध्ये बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मांगले जवळील लादेवाडी येथे 41 वर्षीय पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्याची तपासणी केली असता ती व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरज तालुक्यातील सोनी मध्ये ठाण्यातून 39 वर्षांची व्यक्ती बुधवारी गावात आली होती. ती व्यक्ती आजारी होती. खोकल्याचा ज्यादा त्रास होता, त्यामुळे त्या व्यक्तीला तात्काळ मिरजेतील आयसोलेशन विभागात दाखल केले होते. तिथे कोरोनाची चाचणी घेतली असता त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी मध्ये 65 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे होती. त्यामुळे त्याची प्राथमिक तपासणी तालुक्यात केली. त्या व्यक्तीला अधिक त्रास होऊ लागल्याने चाचणी घेतली. त्यामध्ये 65 वर्षीय वृद्ध बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
चार जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात चौघे जण गुरुवारी कोरोनामुक्त झाले आहे. कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील 25 वर्षीय महिला, नेर्ली येथील 51 वर्षांची महिला, जत तालुक्यातील खलाटी येथील 62 वर्षांचा पुरुष, जत तालुक्यातील औंढी येथील 30 वर्षांच्या युवकाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 202
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 202 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी सात व्यक्तींचा मृत्यू झाला असून 108 जण कोरोनामुक्त रुग्ण झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 87 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात आज सर्वाधिक ३ हजार ६०७ कोरोनाग्रस्तांची वाढ; एकुण रुग्णसंख्या ९७, ६४८

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेच आहे. आता ही संख्या १ लाखाच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. जर अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर लवकरच आपण लाखांच्या घरात जाऊन बसणार आहोत. आज दिवसभरात राज्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. हे चित्र राज्यासाठी खूप चिंताजनक आहे.

एका दिवसात राज्यभरात ३६०७ रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच सर्वाधिक मृत्यूच्या संख्येतही आज वाढ झाली आहे. दिसभरात एकूण १५२ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. याबरोबरच राज्यातील रुग्णसंख्या आता ९७,६४८ झाली आहे. आपण लवकरच १ लाख पार करण्याची शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

 

दरम्यान राज्यातील ४६ हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून सरकार सामाजिक अलगाव चे सर्व नियम पाळून मिशन बिगिन अगेन द्वारे पुन्हा राज्यातील कामकाज सुरु करते आहे. सोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे, सॅनिटायझर ने सतत हात धुणे, भौतिक अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असली तरी बरे होणारी रुग्णसंख्याही आशादायी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नेपाळचे पंतप्रधान भडकले; दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी पुन्हा एकदा नेपाळी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा हे भूभाग परत घेण्याच्या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. नेपाळच्या संसदेमध्ये बोलताना त्यांनी काली नदीच्या सीमारेषेस मानण्यास नकार दिला आहे. काली नदी ही भारत आणि नेपाळ मधील सीमारेषा मानली जाते. कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा या आपल्या प्रदेशांवर भारताने अतिक्रमण केलेय असे ओली यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या नेपाळच्या नव्या नकाशात हे भाग नेपाळमध्ये असल्याचे याआधीच दाखवले आहेत.

यावेळी पंतप्रधान ओली यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ‘ तिबेटने केली तशी चूक नेपाळने करु नये’ असे काहीसे विधान योगीं आदित्यनाथ यांनी नुकतेच केलेले होते. ‘हा नेपाळच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्याचा प्रकार आहे’ असे ओली यावेळी म्हणाले.

“भारताने बनावट काली नदी दाखवून नेपाळचा प्रदेश बळकावला असून तिथे आपले लष्कर तैनात केले आहे. पण हा प्रदेश परत मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या मुद्दावर संपूर्ण देश एक आहे. सभागृहात विविध पक्षीयांनी एकजूट दाखवण्याची ही दुर्मिळ बाब आहे” असे ओली म्हणाले.

‘भारत आणि नेपाळ हे दोन वेगळे देश असले तरी त्यांचा आत्मा हा एकच आहे तसेच भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक संबंध आहेतच पण पौराणिक दृष्टीनेही ते एकमेकांशी जोडले गेलेले आहेत हे नेपाळने लक्षात ठेवावे त्यामुळे तिबेटने केली ती चूक नेपाळने करु नये.’ असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले होते. त्यावर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी ‘भारताच्या केंद्रीय नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांना नेपाळला धमकावण्याची भाषा करु नका, हा सल्ला द्यावा’ असे म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक ! खाऊ समजून स्फोटकाचा चावा घेतल्याने सहा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूमध्ये नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे एका सहा वर्षाच्या मुलाने खाऊ समजून स्फोटकाचा चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. तिरुचिरपल्ली येथील एका गावात ही घटना घडली आहे. इथे ठेवलेल्या गावठी स्फोटकाला खाण्याची वस्तू आहे असं समजून मुलाने चुकून ते खाल्लं. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अटक केलेल्या त्या तिघांनी कावेरी नदीत मासेमारी करण्यासाठी स्फोटकं आणली होती. यावेळी त्यांनी फक्त दोन जिलेटीन स्फोटकांचा वापर केला आणि न वापरलेले पुन्हा घरी आणून ठेवले. आरोपींमधील एका व्यक्तीचा मुलगा हा त्यावेळी घरातच खेळत होता. ही खायची वस्तू आहे असे समजून त्याने स्फोटकाला तोंडात टाकून चावू लागला. यावेळी त्या स्फोटकाचा त्या मुलाच्या तोंडातच स्फोट झाला. मात्र कोणतीही मदत मिळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांना कळाले तर आपण अडचणीत येऊ या भीतीने या तीनही आरोपींनी त्या रात्रीच मुलांवर अंत्यसंस्कार केले. मात्र पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी या तिघांना अटक केली आणि चौकशीला सुरुवात केली. या स्फोटकांचा अजून कुठे वापर केला जात होता का याची माहिती आता पोलीस घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारत पुन्हा ‘डेंजर झोन’मध्ये ? नोमुराचा अहवाल; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु करण्यात आलेला होता, ज्यामध्ये आता हळहळू शिथिलता आणली जात आहे, मात्र असे असले तरी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढच होताना दिसते आहे ज्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडत चालली आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा घेतलेला हा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका संस्थेनं नुकत्याच केलेल्या अभ्यासातून भारताच्या चिंतेत भर टाकणारे असे काही निष्कर्ष समोर आले आहे. जपान मध्ये असलेल्या सुरक्षेसंबंधित नोमुरा या संस्थेने कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर जगभरातील एकूण ४५ देशांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. ज्यामध्ये भारत हा ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचं त्यांनी सांगितले आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली असून, भारतात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे.

भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लगेचच लॉकडाउन सुरु करण्यात आलेला होता. सुमारे अडीच महिन्यांच्या या कालावधीनंतर आता संपूर्ण देशातून हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. मात्र हळूहळू सामान्य जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाथीचे हे प्रयत्न सुरू असतानाच जपानमधील नोमुरा या संस्थेनं केलेल्या या अभ्यासानं भारताच्या चिंतेत भर पडली आहे. नोमुरानं आपल्या या संशोधनात जगातील सर्वात मोठ्या ४५ अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची श्रेणी निहाय विभागणी केली आहे. यात पहिली श्रेणी ऑन ट्रॅक, दुसरी वॉर्निंग साइन आणि तिसरी डेंजर झोन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. नोमुरानं केलेल्या या अभ्यासानुसार लॉकडाउन हटवल्याने अनेक देशांमध्ये दोन प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे सांगण्यात आलेले आहे.

पहिली स्थिती : पहिली स्थती जे कि एक चांगला संकेत दर्शवते. लॉकडाउनला हटवल्यानंतर लोकांचे कोरोनाच्या संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच दररोज काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढूही शकते. मात्र, लोकांची याबाबतची भीतीही कमी होईल. त्यामुळे व्यवसाय सुरू होतील आणि सामान्य जनजीवन पूर्वपदावर येण्यास होईल. जसंजसे रुग्णांची संख्या कमी होत जाईल, तसतसे याचे सकारात्मक परिणामही दिसून येतील.

दुसरी स्थिती : या स्थितीमध्ये वाईट परिणाम दिऊ शकतील. यामध्ये लॉकडाऊन हटवून अर्थव्यवस्थेला चालना देतानाच कोरोनाचे संक्रमण वाढतच जाईल. त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही वाढतच जाईल. यामुळे लोकांच्या मनात भीतीही वाढेल आणि जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होईल. यामध्ये अत्यंत अंत्यत गंभीर स्थिती झाल्यामुळे कदाचित लॉकडाउन पुन्हा एकदा लादला जाऊ शकतो, असा निष्कर्ष नोमुराच्या या अभ्यासात मांडण्यात आला आहे.

डेंजर झोन म्हणजे नेमकं काय ते जाणून घेउयात
नोमुरानं केलेल्या अभ्यासात डेंजर झोनमधील देशांची एक वेगळी लिस्ट तयार करण्यात आलेली आहे. यात भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, कोलंबिया, ब्राझील, सिंगापूर, इंडोनेशिया, मेक्सिको, कॅनडा, अर्जेटिंना, दक्षिण आफ्रिका, चिली, स्वीडन आणि इक्वाडोर या देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. या देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ज्यामुळे येथील परिस्थिती ही अधिकच चिंताजनक होऊन लॉकडाउन पुन्हा लागू करण्याची स्थिती उद्भवू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आजी माजी आमदार, खासदारांचे वेतन कपात करून कोरोना योद्ध्यांना वेळेवर मानधन द्या – भीम आर्मी 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |

सध्या कोरोना संकटामुळे दोन महिने संचारबंदी असल्याकारणाने राज्यातील कामकाज बंद होते. सध्या हळूहळू कामकाज सुरु झाले असले तरी राज्याची आर्थिक व्यवस्था चांगलीच कोलमडली आहे. त्यामुळे शासकीय नोकरदारांच्या पगारात कपात करण्यात येत आहे. यासंदर्भात भीम आर्मीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शासकीय नोकरदारांचे पगार कपात करण्याऐवजी आजी माजी लोकप्रतिनिधी यांचे मानधन तसेच पेन्शन कपात करून या कोरोना युद्धात लढणाऱ्या योद्ध्यांना मानधन द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

या निवेदनात त्यांनी महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात योग्य उपाययोजना केल्या आहेत असे म्हंटले आहे. राज्यातील बरेच दानशूर लोक शासनाला मदत करत असले तरीही ती अपुरी पडत असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार कापले जात आहेत. त्यामुळे या युद्धात अग्रभागी लढणाऱ्या पोलीस, महसूल, पालिका,वैद्यकीय, सफाई कर्मचारी यांचे पगार न कापता सर्व आजी-माजी लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांचे सहा महिन्याचे मानधन तसेच पेन्शन कपात करून या योद्ध्यांना मानधन द्यावे अशी मागणी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी केली आहे.

दरम्यान राज्यातील आर्थिक स्थिती सध्या बिकट असून सरकारला कर्ज घेण्याची शक्यता भासू शकेल याचा खुलासा काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. राज्याची आर्थिक स्थिती पूर्ववत होण्यासाठी खूप कालावधी लागणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. सध्या मिशन बिगिन अगेन द्वारे संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू कामकाज सुरु केले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.