Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5698

कोरोनाचा आणखी एक बळी;’या’ प्रसिद्ध अमेरिकन गायकाचा उपचारादरम्यान मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजलेला आहे. या कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसागणिक वाढतच चालले आहे. अशा या प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत सर्वसामान्यां बरोबरच अनेक सेलिब्रिटींना देखील आपले प्राण गमवावे लागले आहेत. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे.

प्रसिद्ध अमेरिकन गायक ख्रिस ट्रोसडेल याचा नुकताच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तो ३४ वर्षांचा होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या ख्रिसला २१ मे रोजी कॅलिफोर्नियातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्ब्ल १२ दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याच्या शरीराने या उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि अखेर दोन जूनला ख्रिसची प्राणज्योत मालवली.

 

ख्रिस ट्रोसडेल हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध गायक तसेच संगीतकार होता. बायबँड या प्रसिद्ध म्युझिक ग्रुपमधून त्याने संगीतातील आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘इट हँपन एव्हरी टाईम’, ‘डान्स फॉर लव्ह’, ‘गॉट गेट द गर्ल’, ‘विथ ऑल माय हार्ट’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी त्याने गायली आहे.

तसेच गाण्यासोबत तो अभिनयक्षेत्रातही काम करत होता. ‘डेज ऑफ आर लिव्ह्स’, ‘शेक इट अप’, ‘ऑस्टिन अँड अ‍ॅली’, ‘लुसिफर’ यांसारखा काही टीव्ही मालिकांमध्येही त्याने काम केले होते. ख्रिसच्या मृत्यूमुळे अमेरिकन संगीतक्षेत्रात एकच शोककळा पसरली आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

चिंताजनक! राज्यात दिवसभरात १३९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; एकट्या मुंबईत सर्वाधिक ५४ मृत्यू

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगात वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ होत आहे. राज्यात काल १२२ कोरोनाबाधित रुग्ण दगावले असतानाच आज पुन्हा१३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २८४९वर गेली आहे. आज दगावलेल्या रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक ५४ तर ठाण्यात ३० रुग्ण दगावले आहेत. तर आज २४३६ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ८० हजार २२९ झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोरची चिंता वाढली आहे.

राज्यात आज सर्वाधिक ठाणे परिमंडळात एकूण ९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मुंबईतील ५४, ठाण्यातील ३०, वसई-विरार आणि भिवंडीतील प्रत्येकी एका आणि कल्याण-डोंबिवलीतील ७ रुग्णांचा समावेश आहे. तर नाशिक परिमंडळात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगावमधील १४, मालेगाव ८ आणि नाशिकमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. पुणे परिमंडळात १६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून त्यात पुण्यातील १४ आणि सोलापुरातील दोघांचा समावेश आहे. रत्नागिरीत ५ आणि औरंगाबादमध्ये एका बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात आज १४७५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३५ हाजर १५६ झाली आहे. राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ८० हजार २२९ झाली असून राज्यात एकूण ४२ हजार २१५ करोना रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भूमिपुत्रांना उद्योगांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी एम्प्लॉयमेंट ब्युरो सुरु करणार- सुभाष देसाई

मुंबई । मिशन बिगेन अगेन मिशनमध्ये उद्योग विभागही सज्ज झाला असून आतापर्यंत ५५ हजार २४५ उद्योगांनी उत्पादन सुरु केले आहे. तर १३ लाख ८६ हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी दिली. राज्यातील तरुणांना उद्योगांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी वेगळे एम्प्लॉयमेंट ब्युरो पोर्टल सुरू करत असल्याची घोषणाही उद्योगमंत्र्यांनी केली.

लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात परतले आहेत. राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट ब्युरो पोर्टल सुरु करण्याची घोषणा उद्योगमंत्री देसाई यांनी केली. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांतून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ पुरवले जाईल, असे देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई आणि लगतच्या महापालिका तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव येथील अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना सरकारने परवानगी दिली आहे. तसेच निर्यात करणाऱ्या उद्योगांनाही परवानगी दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. शेतीवर आधारित उद्योग आणि संरक्षण दलाला लागणाऱ्या उत्पादनांच्या उद्योगांनाही परवानगी दिली असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.

जेथे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी या महिन्यातच आणखी काही उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असेही देसाई म्हणाले. सोबतच राज्यात उद्योग चक्र वेगाने फिरू लागल्याचा दावा उद्योगमंत्र्यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

स्थलांतरीत मजुरांना १५ दिवसात त्यांच्या गावी सोडा; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशातील विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यांवरून सुप्रीम कोर्टाने आज राज्यांना डेडलाइन दिली आहे. स्थलांतरीत मजुरांना १५ दिवसांत त्यांच्या गावी सोडा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहेत. स्थलांतरीत मजुरांसबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने राज्यांना आणखी हे निर्देश दिले आहेत.

देशातील विविध ठिकाणी अडकलेल्यासर्व स्थलांतरीत मजुरांना आपल्या गावी सोडण्यासाठी राज्यांना १५ दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे. यासोबतच राज्यांनी मुजरांच्या रोजगाराची आणि इतर गोष्टींची व्यवस्था कशी केली गेली, हे याची माहिती द्यावी. तसंच प्रवासी मजुरांची नोंदणी केली गेली पाहिजे. मजुरांचे रजिस्ट्रेशन, ट्रान्सपोर्टेशन आणि रोजगाराच्या मुद्द्यावर मंगळवारी कोर्टाने हे आदेश दिले.

विविध राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ४२७० श्रमिक ट्रेनचा उपयोग केला जातोय. यापैकी उत्तर प्रदेश सरकारने १६२५ ट्रेन मागितल्या आहेत. बहुतेक ट्रेन या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येच संपत आहेत. आम्ही राज्य सरकारांच्या संपर्कात आहोत. पण किती स्थलांतरीत मजुरांना गावी सोडायचे आहे आणि किती ट्रेन चालवायच्या आहेत याची माहिती राज्य सरकारेच देऊ शकतात. यासाठी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे.

त्यात किती मजुरांना गावी पाठवायचे आणि किती ट्रेनची आवश्यकता आहे, याची माहिती मागवण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात दिली. या प्रकरणी केंद्राकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. कोर्टाने जी माहिती मागितली होती सर्व त्यात देण्यात आली आहे. राज्यांनी एक चार्ट बनवला आहे. त्यांना किती ट्रेन हव्या आहेत, याची ते मागणी करू शकतात, असं मेहता यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सत्यवानाची सावित्री व्हायचं की  महात्मा फुलेंची सावित्री व्हायचंय हे महिलांनी ठरवावं – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

हिंदू संस्कृतीतील महिलांचा एक महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा आज साजरी केली जात आहे. या दिवशी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले होते. अशी आख्यायिका आहे. म्हणूनच सर्वत्र सात जन्म हाच पती मिळावा तसेच पतीच्या मंगल कामनेसाठी हा सण महिला साजरा करतात. याला श्रद्धा अंधश्रद्धेचे अनेक पदर आहेत. भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर करून सत्यवानाची सावित्री व्हायचे आहे कि फुलेंची सावित्री व्हायचे हे महिलांनीच ठरवण्याची वेळ आली आहे असे म्हंटले आहे. 

या व्हिडिओमध्ये त्यांनी पुरातन काळापासून सुरु असणाऱ्या प्रथेबद्दल माहिती देत काही प्रश्न विचारले आहेत. त्या म्हणतात, ‘वटपौर्णिमा हा सण महिलांसाठीच आहे , पण असा कोणताही सण पुरुषांसाठी नाही. एखाद्या महिलेचे पुरुषाशी लग्न झाल्यानंतर त्या महिलेला मंगळसूत्र, बांगड्या आणि जोडवी घातली जातात परंतु अशी कुठलीही बंधने पुरुषांना नसतात.एखाद्या महिलेच्या पतीचे निधन होते तेव्हा संबंधित महिलेला विधवा/ परितक्त्या संबोधले जाते परंतु एखाद्या पुरुषाच्या पत्नीचं निधन झाले तर त्याला मात्र विधवा किंवा इतर शब्द वापरला जात नाही.पतीच्या निधनानंतर महिलेला पांढरी साडी घालनणे,बांगड्यां न घालणे, टिकली न लावणे असे नियम घातले जातात सध्या परिस्थिती थोडीफार बदलली ही आहे परंतु 90% परिस्थिती ग्रामीण भागात तशीच आहे.’ 

वर्षानुवर्षे चालत आलेल्या या रूढी परंपरा केवळ महिलांसाठीच का असा प्रश्न त्यांनी सर्वाना केला आहे. त्यांनी महिलांना हे प्रश्न विचारत असताना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्याच आहेत. पण त्याबरोबर हा सण जरूर साजरा करा मात्र एकविसाव्या शतकात हे करत असताना आपल्याला नेमकी कोणती सावित्री व्हायचे आहे याचा विचार करा असेही सांगितले आहे. सत्यवानाची सावित्री व्हायचं की महात्मा ज्योतिबा फुले यांची सावित्री व्हायचं हे आता स्वतः महिलांनी ठरवण्याची वेळ आली आहे. असे त्यांनी या व्हिडिओच्या शेवटी म्हंटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.

देशातील २०० शहरांत उभारली जाणार शहरी जंगले; प्रकाश जावडेकरांची घोषणा

नवी दिल्ली । आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री यांनी भारतातील २०० महानगरपालिकेच्या शहरांमध्ये ‘नागरी वन’ उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.  भारतात मोठ्या प्रमाणात वने ही ग्रामीण भागात आहेत पण शहरांमध्ये फारशी वने पाहावयास मिळत नाहीत. म्हणूनच ‘नागरी वन’ उपक्रम सुरु करीत आहोत. असे ते म्हणाले. शहरात उद्याने, बाग आहेत. पण जंगले नाहीत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जावडेकर म्हणाले मी जगभरात फिरलो आहे तेव्हा लक्षात आले की, न्यूयॉर्क, नैरोबी रिओ द जेनेरिओ यासारख्या ठिकाणी वने आहेत. अगदी मुंबईतही राष्ट्रीय वन आहे. पण देशात इतर ठिकाणी याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

शहरांमध्ये ही नागरी वन योजना सुरु करत आहोत त्यासाठी कंपाउंड करण्यास तसेच तिथे किमान सेवा देण्यासाठी निधी देण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. “आपण शहरांतील वनक्षेत्र आणि विखुरलेल्या जमीनींचा नकाशा बनवूया. आणि जर ती शहरी जंगले तयार करण्यासाठी राखीव ठेवली गेली असतील तर लोकांची एक चळवळबनते. मी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे केले आवाहन करत आहे. आम्ही लोकांच्या सहभागातून तयार झालेल्या उत्तम वनास पारितोषिक देण्याचा विचार करत आहोत.” असे मंत्री जावडेकर यांनी सांगितले.  

दरम्यान जगातील जैवविविधतेच्या ८%  जैवविविधता जतन करण्यास भारत सक्षम आहे. जगातील लोकसंख्येच्या १६% लोकसंख्या भारतात आहे. जगातील एकूण १६% जनावरे भारतात आहेत. आणि या दोन्हीसाठी अन्न, पाणी आणि जागेची गरज आहे. तर जगातील एकूण २.५% भूभाग आणि ४% पाण्याचे स्रोत आहेत असेही ते म्हणाले. या संकटकाळात ही देश ८% जैवविविधता टिकवून ठेवू शकतो आणि हे काही छोटे पाऊल नाही आहे. आपण जगासमोर हे सिद्ध करू शकतो. याबरोबरच आपले जीवन निसर्गाशी निगडित आहे. वृक्ष आणि इतर सर्व प्रजाती आपल्या जगण्याचा भाग आहेत. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

अखेर ‘त्या’ प्रकरणावर युवराज सिंगने मागितली माफी

नवी दिल्ली । दोन दिवसांपासून सोशल मीडियावर युवराज सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत युवराज सिंग लाइव्ह चॅटमध्ये रोहित शर्माशी बोलत असताना त्याने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची खिल्ली उडवताना एक जातीवाचक उल्लेख केला. युवराजने जातीवाचक शब्द वापरल्याने सोशल मीडियावर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता. तसेच, हरयाणामध्ये युवराजवर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. या साऱ्या प्रकारानंतर युवराज घडलेल्या प्रकाराबद्दल आता माफी मागितली आहे.

युवराजने एक ट्विटरवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आपण जर कोणाला दुखावले असेल तर त्याची सपशेल माफी मागत असल्याचे त्याने सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये युवराजने सांगितले की, ” रंग, धर्म, पंथ किंवा लिंग यामध्ये आतापर्यंत मी कोणताच भेदभाव केलेला नाही. लोकांसाठी मी आतापर्यंत झटत आलो आहे. त्यामुळे कोणत्याही असमानतेवर माझा विश्वास नाही. त्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो.”अशा आशयाचा माफीनामा त्याने ट्विट केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि वकिल असलेल्या रजत कलसन यांनी हरियाणातील हांसी येथील पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. कलसन हे दलित अधिकाराचे कार्यकर्ते आहेत. कलसन यांनी युवराजविरोधात तक्रार दाखल करत, जातीय तेढ वाढवल्यामुळे त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळ आता युवराजला खरं अटक होणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष होते. पण त्यापूर्वीच आता युवराजने आपली बाजू मांडली आणि त्याबाबत ट्विटरवर माफी मागितली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

डॉन ब्रॅडमन यांना ० धावांवर बाद करून १००च्या कसोटी धावांच्या सरासरीला ब्रेक लावणारा ‘तो’ गोलंदाज कोण होता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ५ जून … क्रिकेटच्या इतिहासात ही तारीख खूप महत्वाची आहे कारण या दिवशी जन्मलेल्या एका गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीत २३२३ विकेट घेतल्या परंतु केवळ एका विकेटमुळे तो क्रिकेट इतिहासात आजरामर झाला. तो खेळाडू आहे इंग्लंडचा माजी लेगस्पिनर एरिक हॉलिस, ज्यांची आज १०८ वी जयंती आहे.

एरिक हॉलिस लेगस्पिनर होते ज्यांनी १९३५ मध्ये इंग्लंड संघाकडून पदार्पण केले होते. हॉलिसने आपल्या पूर्ण कारकीर्दीत फक्त १३ कसोटी सामनेच खेळले आणि ४४ विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा काउन्टी क्रिकेटमध्ये हॉलिस अधिक प्रसिद्ध होते. वारविक्शायरच्या या अनुभवी खेळाडूने एकूण ५१४ प्रथम श्रेणी सामन्यांत केवळ २०.९४ च्या सरासरीने २३२३ विकेट्स घेतल्या, त्यामध्ये त्याने १८२ डावात पाच विकेट आणि ४० सामन्यांत १० गडी बाद केले.

एरिक हॉलिसने आपल्या कारकीर्दीत नक्कीच २३२३ विकेट्स घेतल्या असतील मात्र १९४८ मध्ये खेळल्या गेलेल्या ओव्हल टेस्टसाठी त्याला जास्त ओळखले जाते. कारण क्रिकेटचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमनचा हा शेवटचा सामना होता आणि कसोटी क्रिकेटमधील १०० धावांची सरासरी पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ ४ धावाच करायच्या होत्या. मात्र हॉलिसच्या गुगलीने दुसऱ्याच बॉलवर ब्रॅडमनला क्लीन बोल्ड केले आणि त्याची कसोटी कारकीर्द ९९.९४ च्या सरासरीने संपली. या सामन्यात ब्रॅडमन दुसर्‍या डावात फलंदाजी करू शकला नाही कारण ऑस्ट्रेलियाने हा सामना एका डावाने जिंकला होता.

ब्रॅडमनला १०० च्या सरासरी करण्यापासून रोखल्यानंतरही हॉलिसची कारकीर्द फार काळ टिकली नाही. ओव्हल कसोटीनंतर हॉलिस आणखी फक्त ६ सामनेच खेळू शकला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन आणि न्यूझीलंडविरुद्ध चार कसोटी सामने खेळले. भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॉलिसची कारकीर्द कदाचित १३ कसोटी सामन्यांपुरती मर्यादित राहिली असेल, मात्र वारविक्शायरसाठी खेळताना त्याने १९ पैकी १४ काऊन्टी हंगामात १०० हून अधिक बळी मिळवले,जो कि एक विक्रमच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

खासगी रुग्णालयाचे शुल्क निश्चित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

नवी दिल्ली । खासगी रुग्णालयाचे शुल्क निश्चित करण्याबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस बजावली आहे. खासगी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांकडून जादा पैसे उकळले जात असल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. एका आठवड्यात केंद्र सरकारने उत्तर देण्याचे आदेश या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायलयात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी सुरु करण्यात आली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावत केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयाकडून भरसाठ पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाली आहे. खासगी रुग्णालयात उपचारांच्या खर्चाची मर्यादा असण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी वेगळी सुविधा देण्याबरोबर रुग्णालयांची संख्या वाढवून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांना कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यायचा याचं स्वातंत्र्य देणं शक्य आहे का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालायने केंद्र सरकारला केला आहे. सोबतच खासगी रुग्णालयात एकाच दर्जाच्या रुम, उपचार तसंच इतर गोष्टींसाठी शुल्क निश्तित करण्यासंबंधीही विचारणा नोटीसमध्ये करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक! देशभरात मागील ४ दिवसांत ९११ जणांचा कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली । कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन मागील ४ दिवसांत ९११ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर १ हजार जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी ४८ दिवस लागले होते. तिथे ही संख्या आता गेल्या ४ दिवसांत नोंदवली गेली आहे.यावरुन भारतात कोरोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणात नसल्याचं समोर येत आहे.

जसे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं आहे तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजारांवर पोहोचण्यासाठी ८७ दिवस लागले होते. २६ एप्रिलला भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार होती. पण यामध्ये वेगाने वाढ होत असून फक्त ६ आठवड्यात रुग्णसंख्या २ लाख २६ हजार ७७० वर पोहोचली आहे.

बघायला गेलं तर भारतात १२ मार्च रोजी पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. २९ एप्रिल रोजी भारतात मृतांची संख्या १ हजारावर पोहोचली होती. पण काही आठड्यातच ही संख्या ६०७५ इतकी झाली आहे. ४ जूनपर्यंतची आकडेवारी पाहता फक्त गेल्या चार दिवसांत ९०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाउनचे नियम शिथील करत असताना समोर येणारी ही आकडेवारी चिंताजनक असून भीती वाढवणारी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”