Sunday, December 21, 2025
Home Blog Page 576

Jayant Patil Meet Babajani Durrani : जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी; बंद दाराआड काय चर्चा झाली?

jayant patil ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठं बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांच्या गटात असलेल्या आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली आहे. जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांच्या पाथरी येथील निवासस्थानी भेट दिली. बाबाजानी दुर्रानी यांच्या कार्यकर्त्यानी जयंत पाटील यांचं जंगी स्वागत केलं. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बाबाजानी दुर्रानी घड्याळ सोडून पवारांची तुतारी हातात घेणार का? असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष्य लागलं आहे. त्यानुसार सर्वजण कामाला लागले असून जागांची चाचपणी, मतदार संघाचा आढावा चाललाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा लोकसभेतील यशानंतर आता विधानसभेच्या तयारीला लागलाय. पक्षाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे परभणी दौऱ्यावर असताना त्यांनी बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली. बाबाजानी दुर्राणी हे अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार आहेत. येत्या २ दिवसातच त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे अशा वेळी जयंत पाटील यांनी बाबाजानी दुर्रानी यांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा शरद पवारांनी दादा गटातील निलेश लंके, बजरंग सोनावणे यांच्यासारखे नेते आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आणि निवडून सुद्धा आणलं. आताही सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता अजित पवार गटातील अनेक आमदार हे शरद पवारांकडे स्वगृही परततील अशा चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्रानी यांची भेट झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. बाबाजानी दुर्राणी घड्याळ सोडून शरद पवारांची तुतारी हातात घेणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं आहे.

Weather Update | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांवर पावसाचे संकट कायम; IMD ने केला हायअलर्ट जारी

Weather Update

Weather Update | गेल्या 2 दिवसापासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. पुण्यापासून तर अगदी सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती देखील निर्माण झालेली आहे. अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे काल म्हणजेच 25 जुलै आणि आज 26 जुलै रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्ट्या देखील जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरातील शाळांना देखील सर्वत्र आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

अशातच आज म्हणजे 26 जुलै रोजी देखील पावसाचा (Weather Update) अंदाज व्यक्त केलेला आहे. आज देखील पुण्यात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे घाट माथ्यावर देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचप्रमाणे इतर अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

काही राज्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देखील हवामान विभागाने जारी करण्यात आलेला आहे. त्यात रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. सातारातील घाट परिसरात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात देखील मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच इतर अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच आज 60 ते 70 किलोमीटर तासी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार त्यातील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज अनेक ठिकाणी तुरळक आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे आता प्रशासनाने देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान दिलेले आहे. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याची देखील सांगितलेले आहे.

Dengue Treatment | डेंग्यू झाल्यानंतर हॉस्पिटलायझेशन आवश्यक आहे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Dengue Treatment
Dengue Treatment

Dengue Treatment | पावसाळा सुरू झाला की डेंगूच्या डासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे डेंगूचे रुग्ण देखील झपाट्याने वाढत असतात. परंतु अनेक लोक डेंगूचा ताप झाल्यावर हॉस्पिटलमध्ये न जाता घरच्या घरी उपचार करतात. परंतु असे न करता डेंग्यू झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचे असते. डेंगू (Dengue Treatment) हा एक प्राणघातक असा आजार आहे. एडिस डासांच्या चावण्याने हा आजार होतो. त्यावर जर तुम्ही योग्य वेळी उपचार घेतले नाही, तर एखाद वेळी त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. डेंगूमध्ये रक्तातील प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते. आणि ती वाढवण्यासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते.

डेंगू (Dengue Treatment) झालेल्या व्यक्तीला विविध प्रकारचे अँटीबायोटिक्स आणि अँटीव्हायरल औषधे दिली जातात, ज्यामुळे रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढते. पण डेंग्यू झाल्यास रुग्णालयात दाखल करावे की नाही याबद्दल डॉक्टरांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेऊया

एखाद्या व्यक्तीला डेंग्यूचा (Dengue Treatment) डास चावल्यानंतर तीन ते पाच दिवसांनी डेंग्यू तापाची लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे 3 ते 10 दिवसांपर्यंत देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला डेंग्यूची लक्षणे दिसतात तेव्हा तुम्ही थेट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला हॉस्पिटलमध्येही दाखल करावे, कारण डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते आणि व्यक्ती मरू देखील शकते.

हे प्लेटलेट्स अंदाजे 150,000 ते 450,000 असावेत. अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्याने रूग्ण 5 ते 7 दिवस रूग्णालयात भरती राहू शकतात.

लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की डेंग्यूची (Dengue Treatment) लक्षणे गंभीर नसतील तर घरी राहूनही डेंग्यू बरा होऊ शकतो का? या स्थितीत डॉक्टर सांगतात की, जेव्हा रुग्णाला खूप ताप येतो आणि ताप उतरत नाही, सांधे आणि स्नायू दुखतात, शरीरात थकवा येतो, चालायला त्रास होतो किंवा उलट्या होण्याची समस्या असते. आणि अतिसार, नंतर ही डेंग्यूची गंभीर लक्षणे असू शकतात.

अशा परिस्थितीत तुम्हाला रुग्णालयात दाखल करावे लागेल. याशिवाय रक्तस्राव, चक्कर येणे, खूप ताप येणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. डेंग्यूची सामान्य लक्षणे आढळल्यास डॉक्टरांनी सांगितलेले औषध घेऊन तुम्ही घरीच त्यावर नियंत्रण मिळवू शकता.

Railway News : पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प; ‘या’ गाड्यांचा समावेश

Railway News : राज्यभरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. पुण्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. काल रात्रीपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्यातल्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून पुण्यातील सिंहगड रोड आणि नदीलगतच्या भागातील घरं आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्या (Railway News) पावसानं तोडला आहे.

तर दुसरीकडे मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून ठाणे आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे नद्यांना पूर आला आहे. तर बदलापूर जवळील उल्हास नदीला पूर आला आहे. शिवाय सखल भागातील रस्ते हे जलमय झाले असून त्यामुळे (Railway News) वाहतूक विस्कळीत झाले आहे.

मुंबई आणि पुण्यामध्ये होणाऱ्या पावसाचा परिणाम मध्य रेल्वेवर झाला असून पुणे आणि मुंबई या मार्गावरून प्रवास (Railway News) करणाऱ्या गाड्या आज (२५) आणि उद्यासाठी (२६) रद्द करण्यात आले आहेत.

पुराची एकूणच परिस्थिती पाहता मध्य रेल्वे कडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज दिनांक 25 जुलै रोजी रद्द करण्यात आलया आहेत. तर उद्या सकाळी पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस, पुणे- मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे (Railway News) मुंबई ते पुणे आणि पुणे मुंबई अशा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.

Maharashtra Rain : महत्वाची बातमी! पावसामुळे दहावी, बारावीचे पेपर पुढे ढकलले ; कधी होणार परीक्षा ?

Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. पुणे, कोल्हापूर या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने दहावी आणि बारावीच्या उद्या होणाऱ्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात (Maharashtra Rain) आल्या आहेत.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पुरवणी परीक्षा ह्या उद्या दिनांक 26 जुलै रोजी होणार होत्या. मात्र सध्या राज्यातल्या बहुतांश शहरांमध्ये पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्यात (Maharashtra Rain) यलो ओलड जारी करण्यात आलाय. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कधी होणार परीक्षा ? (Maharashtra Rain)

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 26 जुलै रोजी होणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 31 जुलै रोजी होणार आहे. तर इयत्ता बारावीची (Maharashtra Rain) बोर्ड पुरवणी परीक्षा 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

उद्या दिनांक 26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयांचा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान नियोजित करण्यात आला होता. मात्र आता हा पेपर दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान होणार आहे. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटक व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान एमसीव्हीसी पेपर दोन हे तीन पेपर होते हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीनही पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन (Maharashtra Rain) देखील करण्यात आलं आहे.

Cleaning Hacks : पाण्याची टाकी साफ करायची वाटते कटकट ? ट्राय करा ‘या’ काही सोप्या पद्धती

Cleaning Hacks : विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात पाणी गढूळ येत असल्यामुळे टाकी घाण होते. पाण्याची टाकी धुण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. जर हे पाणी तसेच राहू दिले तर या दूषित पाण्यामुळे लहानमुलांसह सर्वांना या दूषित पाण्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे सहजसजी तुमही पाण्याच्या टाक्या साफ (Cleaning Hacks) करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया…

तुरटी (Cleaning Hacks)

तुरटी ही नैसर्गिक क्लिनिंग एजंट म्हणून काम करते. पावसाळ्यात दूषित पाणी येत असल्यामुळे पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. तुरटीचा वापर मोठ्या टॅंक साफ करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. यासाठी टाकी साफ करताना त्यामधले पाणी अर्ध्यापर्यंत येईल एवढे खाली करा. त्यानंतर बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात तुरटी घाला. थोड्या वेळाने हे पाणी टाकीच्या पाण्यात घाला आणि हे पाणी टाकीच्या पाण्यात घातल्यानंतर त्यामधली सगळी घाण किंवा गाळ जो असेल तो खाली जमा होतो नंतर एका स्वच्छ कापडाने टाकीत (Cleaning Hacks) जमा झालेले घाण स्वच्छ करा.

हायड्रोजन पेरॉक्साइड

हायड्रोजन पेरॉक्साइड हे एक प्रकारचं केमिकल आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. यासाठी तुम्हाला सावधगिरी सुद्धा तितकीच बाळगावी लागेल. एका मोठ्या पाण्याच्या टाकीला क्लीन करण्यासाठी 500 ml हायड्रोजन परॉक्साईड घ्यावे लागते. पाण्याच्या अंदाजानुसार ते प्रमाण घ्या आणि टाकीच्या पाण्यात मिसळ 15 ते 20 मिनिटं तसंच सोडा. घराच्या सर्वांना सुरू करा. टाकी पूर्णपणे खाली करा आणि हे पाणी बाहेर पडल्यानंतर टाकी स्वच्छ होईल. टाकीचे पाणी बाहेर काढल्यानंतर टाकी पुसून सुकवून (Cleaning Hacks) घ्या आणि नंतर दुसरं पाणी भरा.

वॉटर टॅंक क्लीनर (Cleaning Hacks)

वॉटर टँक क्लीनर हे बाजारामध्ये ऑलरेडी उपलब्ध असतात. हे एक प्रकारचे ब्लिच क्लीनर असतात. हे टॅंक क्लीनरच्या स्वरूपात ओळखले जातात. याच्या वापरासाठी 400 g पावडर ब्लिच किंवा 300 ग्रॅम लिक्विड ब्लिच घ्या आणि आता ही क्वांटिटी दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करा. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण पाण्याच्या टाकीत घालायचे आहे. या पद्धतीने पाण्याची टाकी स्वच्छ (Cleaning Hacks) करता येईल.

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी; अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

satara school close

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मागील ३-४ दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच सुरु राहण्याची शक्यता आहे. आज मुंबई, पुण्यात अनेक घरात पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळालं. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्टाच्या घाट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. सातारा जिल्ह्यातील पावसाचे वाढते प्रमाण पाहता सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी (Satara School Closed) देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत आदेश काढलेत.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना उद्या दि. 26 जुलै रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबधीत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, तसेच इयत्ता 10 वी व 12 वी च्या जुलै 2024 च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डूडी यांनी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात ही पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागातील जावळी, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यात संततधार सुरू आहे. तर उद्या शुक्रवारी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 77.70 टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पवारांची तुतारी दणक्यात वाजणार??

sharad pawar vidhan sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधानसभेला अवघे ३ महिने शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार असला तरी चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील ते म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) …. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हि पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने शरद पवार नेमका काय डाव टाकणार? आपल्या पक्षाला पुन्हा एकदा नवी उभारी कशी देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे. कोणत्याही क्षणी डाव पलटवण्याची ताकद आणि क्षमता शरद पवारांकडे असल्याने आजही भलेभले त्यांना दचकून असतात… आताही शरद पवार यांच्याकडे म्हणावे तसे आकडे नाहीत.. अजित पवारांच्या बंडानंतर जमतेम १२-१३ आमदार शरद पवारांसोबत आहेत. त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुद्धा निवडणूक आयोगाने काढून घेतलं आहे. मात्र तरीही लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा पवारांची तुतारी दणक्यात वाजू शकेल असं बोललं जातंय. पवार पुन्हा आपली पॉवर दाखवू शकतील का? त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेत पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतो का ? हे जाणून घेऊया…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा पक्ष जास्तीत जास्त काळ सत्तेत राहिलाय. शाहू- फुले- आंबेडकरांचा विचार जपणारा आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार हा पक्ष… आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात महत्वाची खाती सांभाळली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेशी चांगलीच नाळ सुद्धा जोडली हा इतिहास आहे. १९९९ ला पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागांवर यश मिळालं. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ७१ जागा जिंकता आल्या. २००९ च्या विधानसभेला पुन्हा ६२ आमदार राष्ट्रवादीने निवडून आणले. या तिन्ही निवडणुकांनंतर पक्षाने राज्यातील सत्ता आपल्या हातात ठेवली. मात्र २०१४ ला भाजप- शिवसेनेचे सरकार आलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला 41आमदाराना निवडून आणता आलं. २०१९ ला तर पक्षातील अनके बड्या नेत्यांनी साथ सोडूनही फक्त शरद पवारांच्या करिष्म्यावर पक्षाने ५४ आमदार निवडून आणले आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करून सत्ताही स्थापन केली

परंतु अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि शरद पवारांकडे अवघे १२ आमदार राहिले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष संपला असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त सुद्धा व्यक्त केलं. मात्र हार मानतील ते पवार कसले. पक्ष आणि चिन्ह गेलं, निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवारांना दिले. तीच तुतारी पवारांनी लोकसभा निवडणुकीत फुंकली आणि त्यांच्या पक्षाने १० पैकी ८ खासदार निवडून आणत विरोधकांना धोबीपछाड दिला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा पक्षाला मोठी अपेक्षा आहे आणि सत्तेत बसण्याची संधीही… शरद पवारांकडे स्वतःची पॉवर आहे, एकनिष्ठ नेत्यांची फळी आहे, युवा नेत्यांची साथ आहे आणि महत्वाची बाब म्हणजे बेरजेचे राजकारण करण्याची खेळी आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा उभारी घेण्याची संधी आहे.

१) पवारांची पॉवर –

शरद पवार हे जनमानसात मिसळणारे, जनतेत जाऊन लोकांचं म्हणणं ऐकून घेणारे नेते मानले जातात. सलग ५० वर्ष शरद पवार राजकारण कोळून प्यायलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण जाण, राजकीय वातावरण, लोकांच्या अपेक्षा, जनतेचे प्रश्न या सर्व गोष्टींची पवारांना चांगलीच जाणीव आहे. हीच गोष्ट शरद पवारांना इतर राजकारण्यांपेक्षा मोठं करते. कोणत्याही पक्षाचे ध्येयधोरणे काय आहेत हे त्या पक्षाच्या अध्यक्षांवर अवलंबून असते आणि त्यावर पक्षाचं यश- अपयश ठरते. पवार गटाकडे शरद पवारांसारखा दमदार नेता असल्याने साहजिकच त्यांच्या पक्षाला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे

२) निष्ठावान नेते सोबतीला-

अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या बड्या नेत्यांसह तब्बल ४० आमदार असले तरी शरद पवारांकडे जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या निष्ठावान आमदारांची फळी आहे. शरद पवार आणि त्यांच्या पक्षासाठी काहीही करण्याची तयारी आणि धमक या आमदारांमध्ये आहे. हे नेते सध्याच्या राजकीय परिस्थिती इतर कोणत्या पक्षात जाण्याची अजिबात शक्यता नाही. याशिवाय रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारखे युवा नेत्यांची साथ शरद पवारांना असल्याने त्याचाही फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे.

३) शरद पवारांबद्दल सहानभूती –

कोणी कितीही नाही म्हंटल, तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शरद पवारांबद्दल सहानभूती आहे हे नक्की… लोकसभा निवडुकीच्या निकालाने ते दाखवून सुद्धा दिले. ८४ वर्षाचा हा तरुण योद्धा अजूनही लोकांच्यात जातोय, त्यांचे प्रश्न समजावून घेतोय, ऊन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता या वयात संघर्ष करतोय यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शरद पवार यांच्याविषयीचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न असो, कष्टकर्यांचे प्रश्न असो, कामगारांचे प्रश्न असो वा विद्यार्थ्यांचा प्रश्न असो… शरद पवारांनी प्रत्येक प्रश्न अतिशय हुशारीने हाताळले आहेत. पवार सत्तेत असो वा विरोधात असो, अनेकदा तर सरकारला सुद्धा पवारांशी चर्चा करूनच अनेक विषयांवर तोडगा काढावा लागतो.

४) बेरजेचे राजकारण –

डोक्यात २४ तास राजकारणच घुमत असलेल्या पवारांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे त्यांचं बेरजेचे राजकरण.. सर्वच राजकीय पक्षात पवारांचे चांगले संबंध असल्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होत असतो. लोकसभा निवडणुकीत तर पवारांना उमेदवार तरी मिळतील का असा सवाल विरोधकांनी केला असता पवारांनी पुन्हा एकदा आपली बार्गेनिंग पॉवर दाखवत गोळाबेरीज केली. निलेश लंके, बजरंग सोनावणे, बाळ्यामामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारखे उमेदवार आयात केले आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं. पवारांची हीच बेरीज विरोधकांना ऐन निवडणुकीत घायाळ केलं तर नवल वाटायला नको. बडे नेते सोडून गेले तरी आता युवा नेत्यांची फळी नव्याने उभी करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणजे अजून महाविकास आघडीचे जागावाटप झालेलं नसतानाही पवारांनी रोहित पाटील, अमित भांगरे यांच्यासारख्या युवा नेत्यांची नावे जाहीर करून टाकलीत.

५) मराठा आरक्षणाच्या मुद्याचा पवारांना फायदा –

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील वर्षभरापासून चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलनाला चांगलीच धार आली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज सत्ताधाऱ्यांवर नाराज असून याचा आपोआप फायदा विरोधकांना होतोय. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा परिणाम दिसून आला आणि याचा फायदा महाविकास आघाडी आणि विशेषत: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना झालेला दिसतो. तेच चित्र विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Redmi K70 Ultra : 24GB रॅमसह Redmi ने लाँच केला K70 Ultra; किंमत किती पहा?

Redmi K70 Ultra launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi ने आपला नवीन स्मार्टफोन Redmi K70 Ultra लॉन्च केला आहे. दिसायला हा मोबाईल अतिशय आकर्षक तर आहेच याशिवाय या स्मार्टफोन मध्ये अनेक भन्नाट फीचर्स सुद्धा देण्यात आली आहेत. 24GB RAM, 50MP कॅमेरा, 5500mAh बॅटरी सारख्या फीचर्सने हा मोबाईल सुसज्ज आहे. कंपनीने हा स्मार्टफोन एकूण ५ व्हॅरियंट मध्ये लाँच केला असून त्यानुसार त्याच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. आज आपण रेडमीच्या या मोबाईलचे सर्व डिटेल्स आणि किंमत सविस्तर जाणून घेऊयात…..

6.67-इंचाचा डिस्प्ले –

Redmi K70 Ultra मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 144Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. कंपनीने स्क्रिनला Xiaomi Shield Glass चे प्रोटेक्शन दिले आहे. Redmi K70 Ultra मध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित HyperOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. कंपनीने हा स्मार्टफोन एकूण पाच व्हेरिएन्टमध्ये लॉन्च केला आहे.

कॅमेरा – Redmi K70 Ultra

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi K70 Ultra मध्ये पाठीमागील बाजूला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि वव्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 20MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5500mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 120W चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Redmi K70 Ultra च्या 24GB RAM + 1TB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 3999 युआन (जवळपास 46 हजार रुपये) आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2599 युआन (अंदाजे 29,900 रुपये) आहे. हा स्मार्टफोन काळया, पांढऱ्या आणि निळ्या रंगात लाँच करण्यात आला आहे. सध्या या मोबाईलचे लौंचिंग चीनमध्ये करण्यात आलं असून येत्या काळात लवकरच तो भारतात सुद्धा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

House Rent Rule: भाडे न देता जळूसारखा चिकटून राहिलाय भाडेकरू ? वाद न घालता ‘हे’ पद्धतशीर उपाय करा

House Rent Rule: हल्लीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक मनाली जाते. म्हणूनच हल्ली घरे बांधून ती भाड्याने देण्याचा ट्रेंड वाढलेला दिसतो आहे. मात्र अनेकदा घर भाड्याने दिले की कित्येक महिने भाडेकरू भाडे देत नाहीत. वारंवार सांगूनही भाडे चुकवण्याचा प्रकार जर तुम्ही देखील अनुभवत असाल तर थांबा ! भाडे न देणाऱ्या तुमच्या भाडेकरू सोबत वाद घालू नका. आजच्या लेखात आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे वाद न घालता तुम्हाला तुमच्या घराचे भाडे मिळून जाईल. चला तर मग जाणून घेऊया…

भाडे करार

सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेंट ऍग्रिमेंट. या महत्वाच्या करारात स्वतः भाड्याची रक्कम, देय तारीख आणि न भरण्याचे परिणाम समाविष्ट आहेत का ? हे तपासून पहा. हा दस्तऐवज जमीन मालकाने केलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईचा (House Rent Rule) आधार असतो. काळजीपूर्वक करार करा आणि सर्व अटी स्पष्टपणे करारात नमूद करा.

नोटीस द्या (House Rent Rule)

भाडेकरू ठरवलेल्या वेळेमध्ये घर भाडे देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर रेंट एग्रीमेंट नुसार घर मालक भाडेकरू बरोबर कायदेशीर कारवाई करू शकतो. यासाठी घरमालक भाडेकरूच्या विरुद्ध इंडियन कॉन्ट्रॅक्ट 1872 अंतर्गत कायदेशीर (House Rent Rule) नोटीस पाठवू शकतो.

न्यायालयात खटला दाखल करा

कायदेशीर नोटीस पाठवूनही भाडेकरू भाडे देण्याचे नाव घेत नसेल तर सरळ घर मालक कोर्टामध्ये खटला दाखल करू शकतो. यामध्ये जर भाड्याची रक्कम कमी असेल तर हा खटला सिव्हिल कोर्ट मध्ये दाखल केला जातो. मात्र भाड्याची रक्कम जास्त वेळ थकीत आणि मोठी असेल तर खटला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टामध्ये देखील दाखल केला जाऊ शकतो. अशावेळी कोर्टामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही बाजूंचा म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि जर का पुरावे हे भाडेकरूच्या विरोधात असतील तर निकाल हा घर मार्गाच्या बाजूला लागतो.

डिपॉझिट घ्यायला विसरू नका (House Rent Rule)

घर मालक आपले घर हे भाडेकरूच्या हातात देतो तेव्हा सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट पोटी काही रक्कम घेत असतो. समजा अशा परिस्थितीमध्ये भाडे करूने भाडे दिले नाहीत किंवा भाडेच द्यायचं नाही म्हंटले तर घर मालक भाडेकरूने दिलेल्या डिपॉझिट मधून घर भाड्याची रक्कम वजा करू शकतो.

निष्कासन कार्यवाही (House Rent Rule)

भाडेकरू सातत्याने भाडे भरत नसल्यास , तुम्ही बेदखल कारवाई देखील सुरू करू शकता. भारतातील (House Rent Rule) बेदखल कायदे राज्यानुसार बदलतात. तुमच्या मालमत्तेतून भाडेकरूला बेदखल करण्यासाठी बेदखल केस दाखल करण्यापूर्वी, चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या.