Sunday, December 21, 2025
Home Blog Page 579

Agniveer Reservation | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! केंद्रीय सुरक्षा दलामध्ये माजी अग्निवीरांना वय आणि शारीरिक चाचणीत सूट

Agniveer Reservation

Agniveer Reservation | सरकारने अनेक विविध योजना आणलेल्या आहेत. यातीलच केंद्र सरकारची अग्नीवीर योजना ही सध्या चर्चेत आहे. परंतु या योजनेवरून मोठा वाद चालू झालेला दिसत आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेते देखील सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने माजी अग्निरांसाठी (Agniveer Reservation) केंद्रीय सुरक्षा दलामध्ये आरक्षणाची मोठी घोषणा केलेली आहे. याबद्दल आज म्हणजे 24 जुलै रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद लेखी उत्तरात सांगितलेले आहे की, “केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी रायफलमन पदाच्या भरतीमध्ये माजी अग्निरांसाठी 10टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच अग्निविर जमानांना वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत देखील सूट देण्यात आलेली आहे.”

या अग्नीवीर योजनेअंतर्गत भारतात लष्कर आणि नौदल त्याचप्रमाणे हवाई दलात सैनिकांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. यात सशस्त्र दलातील नियुक्ती ही एक नवीन श्रेणी तयार करण्यात आलेली आहे. या अंतर्गत आता 35 75 टक्के अग्नीवीर (Agniveer Reservation) 4 वर्षाच्या सेवेनंतर कोणत्याही पेन्शन लाभाशिवाय निवृत्त होतात त्याचप्रमाणे उरलेले 25 टक्के अग्नीवीर हे नियमित सैनिक म्हणून दलामध्ये सामील होतात. परंतु आता या योजनेवरून विरोधक चांगलेच भडकलेले आहे. आणि सातत्याने ते सरकारवर टीका करताना दिसत आहे. त्यामुळे आता सरकारने उरलेले 75 टक्के अग्नीवीरांच्या रोजगारांची देखील व्यवस्था केलेली आहे.

यामुळे आता गृहराज्यमंत्री आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदांची देखील माहिती दिलेली आहे. यावेळी ते म्हणाले की, “सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये एक जुलै 2024 पर्यंत रिक्त जागांची संख्या ही 8416 एवढी असणार आहे. एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत 67 हजार 345 एवढ्या उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे 64 हजार 91 रिक्त पदे अधिसूचित करण्यात आलेली आहे. ही पदे भरतीच्या विविध टप्प्यात आहेत.” अशी माहिती त्यांनी राज्यसभेत दिलेली आहे.

Mahabaleshwar Tourism : पर्यटनासाठी महाबळेश्वरला जाताय ? थांबा…! येथील प्रसिद्ध धबधब्याबद्दल प्रशासनाचे आदेश

Mahabaleshwar Tourism : राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने जोर पकडला आहे. मागच्या दोन-तीन दिवस सतत या भागात पाऊस बरसत आहे. अशातच जर तुम्ही पावसाळी ट्रिप साठी महाबळेश्वरला जाण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

महाबळेश्वर येथे पावसाचा जोर वाढल्यामुळे काही पर्यटन स्थळं ही पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. यापैकीच एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे लिंगमळा धबधबा… लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी प्रशासनाने तात्पुरता (Mahabaleshwar Tourism) बंद केला आहे. या धोकादायक पर्यटन स्थळाकडे जाळण्याचे टाळा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

खरंतर वेण्णा नदीवरचा पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्यामुळे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध असा लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत असून धबधब्याने राऊडर रूप धारण केले आहे. याठिकाणी पर्तकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यटनासाठी हा धबधबा बंद करण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणी काटेरी तारा व काटेरी झुडपं टाकून येथे बंदी घालण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये एकूणच दमदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे नदी नाले भरून वाहत आहेत अशातच धबधब्यांनी देखील रौद्ररूप धारण केले आहे. लिंगमळा धबधबा हा सध्या ओसंडून पाहत आहे. जरी निसर्गाचे हे देखणं रूप असलं तरी सुद्धा जीवाची (Mahabaleshwar Tourism) पर्वा न करता इथे जाणं हे धोकादायक ठरू शकतं म्हणून जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

महाबळेश्वर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे अनेक पर्यटक महाबळेश्वरला जाणं पसंत करतात. मात्र लिंगमळा धबधब्याप्रमाणेच महाबळेश्वर मध्ये असणाऱ्या ऑर्थो सीट पॉईंट (नीडल पॉईंट ) परिसरात देखील पर्यटकांना जाण्यासाठी मज्जाव (Mahabaleshwar Tourism) करण्यात आला आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यात हवामान विभागांवर रेड अलर्ट जारी केला असून शुक्रवार पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर पावसाळी पर्यटनासाठी महाबळेश्वरला जात असाल तर प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा (Mahabaleshwar Tourism) आणि शक्यतो पावसाळ्यात धोकादायक पर्यटन स्थळी जाणे टाळा

बजेटनंतर मोबाईल रिचार्ज आणखी महागणार? 5G सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता

Telecom Network

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान झाल्यानंतर केंद्र सरकारने काल आपला पहिलाच अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला खुश करणाऱ्या अनेक मोठमोठ्या घोषणा सरकार कडून करण्यात आल्या. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे अप्रत्यक्षपणे मोबाईल रिचार्जच्या किमती (Mobile Recharge) आणखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वीच ३ जुलै पासून मोबाईल रिचार्जच्या किमती वाढल्याने आधीच सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे.

बजेटमध्ये काही टेलिकॉम उपकरणांवरील प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्लीज (पीसीबीए) शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या शुल्कात 10 ते 15 टक्के वाढ होणार आहे. असे झाल्यास दूरसंचार उपकरणांवर त्याचा परिणाम होईल. अनेक उपकरणांची किंमत वाढू शकते. याचा परिणाम केवळ रिचार्ज प्लॅनवरच नाही तर इतर अनेक प्लॅनवर होऊ शकतो. कारण कंपन्या हा सगळा पैसा ग्राहकांकडून वसूल करणार हे नक्की. प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्लीज (पीसीबीए) शुल्कात वाढ केल्यामुळे याचा परिणाम 5G सेवेवर देखील होऊ शकतो. कारण उपकरणे महाग असल्यास वेगावर परिणाम होऊ शकतो. यामुळे दूरसंचार कंपन्यांवर बोजा पडणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नेटवर्क प्रोव्हायडर्सना आता त्यानुसार रणनीती तयार करावी लागणार आहे.

दरम्यान, जिओ, एअरटेल सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आधीच मोबाईल रिचार्जच्या किंमती महाग केल्या आहेत. त्यामुळे आधीच महागाईने मेटाकुटीला आलेला सर्वसामान्य माणूस रिचार्जच्या वाढत्या किमतींनी हैराण झालाय. रिचार्ज परवडत नसल्याने अनेक ग्राहक आता देशी टेलिकॉम कंपनी BSNL ची वाट धरत आहेत. कारण बीएसएनएलचे रिचार्ज इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. सध्याच्या महागाईत हाच एक दिलासा सर्वसामान्य ग्राहकाला आहे असं म्हणावं लागेल.

Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत आणखी 6 बदल; या महिलांनाही पैसे मिळणार

Mazi Ladki Bahin Yojana (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील. माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने करता यावे, महिलांना जास्त त्रास होऊ नये यासाठी सरकार सतत नवनवीन बदल करत आहे. आताही सरकारने या योजनेत आणखी ६ बदल केले आहेत, ज्यामुळे अर्जदार महिलांचं काम आणखी सोप्प होणार आहे.

लाडकी बहीण योजनेत कोणकोणते बदल करण्यात आले? Mazi Ladki Bahin Yojana

१) आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे.
२) एखाद्या महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.
३) ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे.
४) केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
५) नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
६) ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.

लवकरचे हे बदल लागू करण्यात होतील. याबद्दलचा शासन निर्णयही लवकरच लागू केला जाणार आहे. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mazi Ladki Bahin Yojana) घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळाली होती. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र सरकारने अनेक अटी आणि शर्थी काढून टाकल्यानंतर आता अर्ज प्रक्रिया सोप्पी झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय?

२१ ते ६५ वय वर्ष असलेल्या महिलांना अर्ज करता येईल
सदर महिला महाराष्ट्र रहिवासी असावी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा कमी असावं

आवश्यक कागदपत्रे –

आधारकार्ड
रेशनकार्ड
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र

Google Map | ‘पुढे पोलिस आहेत, हेल्मेट घाला…’, गुगल मॅपने बाईकस्वारांसाठी आणले नवीन फिचर

Google Map

Google Map | गाडी चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांकडून नेहमीच लोकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची जाणीव करून दिली जाते. परंतु तरीही अनेक लोके वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. वाहन चालवताना नेहमीच हेल्मेट खूप गरजेचे असते. परंतु अनेक वेळा लोक हेल्मेट घालत नाही. आणि नंतर अनेक अपघाताला बळी पडतात. पोलिसांकडूनही आजपर्यंत वारंवार यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तरीदेखील अनेक लोक हेल्मेट घालत नाही. परंतु आता केवळ गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून तुम्हाला पोलीस पुढे असल्याचे सांगण्यात येणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या पोस्टमध्ये गुगल मॅप लोकांना पुढे उभे आहेत. आणि हेल्मेट घाला अशी आज्ञा देताना दिसत आहेत.

गुगल मॅपने (Google Map) चेन्नईच्या काही भागात पोलिस चौक्या खुणावल्या आहेत. चेन्नईतील फिनिक्स मॉलजवळील एका जागेला ‘पोलिस इरुपंगा हेल्मेट पोधुंगो’ असे नाव देण्यात आले आहे. गुगल मॅप येथून जाणाऱ्या रायडर्सना सतर्क करतो आणि त्यांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करतो. एवढेच नाही तर गुगल मॅपच्या आवाहनावर रायडर्स हेल्मेट घालतात. आता लोक सोशल मीडियावर ही व्हायरल पोस्ट वेगाने शेअर करत आहेत. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी गुगल मॅपच्या (Google Map) या फीचरचे कौतुकही केले आहे. चालकांना सतर्क केल्याने अपघात कमी होऊ शकतात, असे युजर्सचे म्हणणे आहे.

व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, “गुगल मॅपचा हा एक चांगला उपक्रम आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “यामुळे अपघात कमी होतील आणि लोकांना आधीच सतर्क केले जाईल.” त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला जात आहे.

NPS Vatshalya Scheme | मुलांच्या नावे पालक करू शकतात NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक; बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांची घोषणा

NPS Vatshalya Scheme

NPS Vatshalya Scheme | भविष्याचा विचार करून अनेक लोक काही ना काही गुंतवणूक करत असतात. सरकारकडून देखील अनेक योजना राबवले जातात. ज्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करता येते. अशातच सरकारचे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS Vatshalya Scheme) ही एक पेन्शन योजना आहे. ज्याद्वारे आपल्याला गुंतवणूक करता येते. आणि एक खात्रीशीर उत्पन्नाची देखील आपल्याला दखल मिळते. ही गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळासाठी करता येते.

या योजनेत आता पालकांना त्यांच्या मुलांसाठी देखील गुंतवणूक करता येणार आहे. याबाबतची माहिती आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी केलेल्या अर्थसंकल्पात सादर केलेली आहे. त्यांनी एनपीएस वात्सल्य योजनेची देखील घोषणा केली आहे.

या योजनेअंतर्गत पालक आता त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी (NPS Vatshalya Scheme) देखील या योजनेमध्ये योगदान देऊ शकतात. त्यानंतर तुमचा मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर ही स्कीम सामान्य एनपीएस खात्यामध्ये रूपांतर केली जाईल. तसेच एनपीएससाठी एक आणखी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ती म्हणजे आता नियुक्त त्यांचे योगदान हे 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यात आलेले आहे.

अनेक लोक सध्या आपल्या रिटायरमेंटच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. मार्केटमध्ये सध्या अनेक योजना आलेल्या आहेत. याआधी ही योजना केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. परंतु 2009 पासून सरकारने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी देखील ही राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS Vatshalya Scheme) सुरू केली आहे.

Home Loan | होमलोन फेडल्यानंतर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; अन्यथा होईल मोठे नुकसान

Home Loan

Home Loan |आपले एक स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू सध्या जर आपण पाहिले तर जमिनींचे आणि फ्लॅटचे दर एवढे वाढलेले आहे की, प्रत्येकाला हे स्वप्न आता पूर्ण करायला जमत होत नाही. परंतु आजकाल बँका देखील आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. बँकांच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे होम लोनचा पर्याय मिळतो. आणि त्यातून अनेकजण होमलोन घेऊन घर घेतात. परंतु कर्ज घेतले तरी, आपल्याला वेळेत त्याची परतफेड करावी लागते.

होमलोन (Home Loan) हे खूप जास्त रकमेचे असते. आपण जेव्हा हे होम लोन संपूर्ण फेडतो. त्यावेळी आपल्याला एक मोठ्या कर्जातून सुटका झाल्याची भावना येते. परंतु तुम्ही तुमच्या लोन जरी पूर्ण फेडले असेल, तरी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. तुम्ही बँकेकडून तुमची काही महत्त्वाचे कागदपत्र परत मागायला पाहिजे. कारण जेव्हा बँक आपल्याला होम लोन देते. तेव्हा आपल्याकडून काही कागदपत्रे घेते आणि काही गोष्टी लिहून देखील घेत असते. परंतु आपण हे लोन (Home Loan) फेडल्यानंतर बँकेकडून ही कागदपत्र परत मागत नाहीत. आता अशी कोणती काम कागदपत्र आहे? जी आपण लोन संपल्यानंतर बँकेकडून घेणे गरजेचे आहे. हे आपण जाणून घेऊया.

बँकेला दिलेले पोस्ट डेटेड चेक | Home Loan

आपण बँकेकडून जेव्हा कर्ज घेतो, तेव्हा बँक आपल्याला काही चेक देते. एखाद्या वेळेस जर आपला कर्जाचा हप्ता चुकला, तर बँकेचे वापर करून त्याचे पैसे वसूल करत असते. हा चेक देण्यामागे उद्देश हाच असतो की जर तुम्ही बँकेचे लोन पूर्णपणे फेडले नाही, तर ही बँक तुमच्याकडून चेक मागून घेत असते. जेव्हा आपण आपले कर्ज पूर्णपणे फेडतो. तेव्हा बँकेकडून हेच एक मागून घेणे गरजेचे असते.

नो ड्युज सर्टिफिकेट मागणे

जेव्हा तुम्ही बँकेकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे वेळेत फेडता. तेव्हा बँकेकडून तुम्ही सदर लोनची थकबाकी नाही. याचे प्रमाणपत्र घेणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही हे प्रमाणपत्र घेतले नाही, तर तुम्हाला पुढच्या वेळेस अडचणी येऊ शकता. म्हणजेच कर्जाची परतफेड केल्यानंतर तुमच्याकडे बँकेचा एकही रुपया थकबाकी नाही, असा त्याचा अर्थ होतो.

कर्ज परतफेडचे प्रमाणपत्र

जेव्हा तुम्ही कर्जाची परतफेड करता. तेव्हा बँकेच्या माध्यमातून तुमचे कर्ज फेडीचे सर्व स्टेटमेंट मागून घेणे गरजेचे असते. त्यात तुमच्या पहिल्या पेमेंटपासून शेवटच्या पेमेंटपर्यंत सविस्तर माहिती दिलेली असते.

क्रेडिट रिपोर्ट अपडेट | Home Loan

जेव्हा तुम्ही होम लोन फेडता, त्यावेळी अनेक वेळा बँक ही कर्ज बंद झाल्याची माहिती देऊन क्रेडिट कंपनीला पुरवत नाही. यावेळी त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो. त्यामुळे बँकेचे लोन पूर्ण फेटल्यावर क्रेडिट रिपोर्ट अपडेट करून घेणे खूप गरजेचे आहे.

Nepal Plane Crash: टेक ऑफ करताना विमान कोसळलं!! समोर आला धडकी भरवणारा व्हिडीओ

Nepal Plane Crash: सध्या नेपाळ येथून एक महत्वाची बातमी हाती आली असून नेपाळची राजधानी काठमांडू येथून प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं आहे. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण घेत असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजताच्या सुमारास कोसळलेल्या पोखराला जाणाऱ्या विमानात फ्लाइट क्रूसह 19 लोक होते. या अपघाताची माहिती वृत्त संस्था ANI कडून देण्यात आली असून याबाबतचा एक व्हिडीओ सुद्धा प्रसारित (Nepal Plane Crash) करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातानंतर विमानाचा कॅप्टन मनीष शाक्य यांच्यासह दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी तैनात असलेले वरिष्ठ पोलीस अधीक्षक डंबर बीके यांनी सांगितले की, विमानातील सर्व १९ जण सौर्य एअरलाइन्सचे (Nepal Plane Crash) कर्मचारी होते.

नक्की काय घडले ? (Nepal Plane Crash)

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, राजधानीच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सच्या विमानाला आग लागल्याने ही दुःखद घटना घडली.विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकऑफच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरले, परिणामी हा अपघात झाला. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते आणि त्यात एकूण १९ जण होते.

घटनेनंतर आकाशात धुराचे लोट

स्थानिक सूत्रांनी सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली आणि आकाशात धुराचे प्रचंड लोट पसरले. अपघातामुळे विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी (Nepal Plane Crash) अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे.

Right To Free Internet | इंटरनेटबाबत नागरिकांना मोठा दिलासा; लवकरच लागू होणार राईट टू फ्री इंटरनेट

Right To Free Internet

Right To Free Internet | 3 जुलैपासून देशातील अनेक खाजगी टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये बदल केलेले आहेत. देशातील जीओ एअरटेल आणि व्हीआय या आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. त्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ केल्याने ग्राहकांमध्ये देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आता ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी येत आहे. ती म्हणजे आता आपल्या देशात लवकरच राईट टू फ्री इंटरनेट (Right To Free Internet) सेवा लागू केली जाणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना मोफत इंटरनेटची सुविधा दिली जाणार आहे. कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर ग्राहकांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे.

राईट टू फ्री इंटरनेट (Right To Free Internet) हे विधेयक मागच्या वर्षी संसदेत मांडण्यात आले होते. आणि आता यावर एक नवीन अपडेट समोर येत आहे. तो म्हणजे आता दूरसंचार मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यसभेच्या सरचिटणीस यांना कळविण्यात देखील आलेले आहे.आणि यावर विचार करण्याची शिफारस केलेली आहे. हे विधेयक मंजूर झाले, तर नागरिकांना फ्री इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता सगळेजण खूप खुश आहेत. या विधेयकात देशातील गरीब घटकातील आणि मागास लोकांना मोफत इंटरनेटची सुविधा मांडण्यात आलेली आहे. देशातील गरीब लोक डिजिटल इंडियापासून लांब राहता कामा नये, यासाठी ही मागणी केलेली आहे.

आपल्या देशात अनेक अशे ठिकाण आहे. जिथे अजूनही इंटरनेटचा पुरेसा वापर केला जात नाही. त्यांना इंटरनेट सेवेचा लाभ मिळत नाही. हे सगळे लोक डिजिटल जगापासून खूपच लांब आहे. यामुळे खेड्यापाड्यातील दुर्गम भागातील लोकांना डिजिटल इंडियाची ओळख व्हावी. या उद्देशाने राईट टू फ्री इंटरनेट (Right To Free Internet) हे विधेयक मागील वर्षी संसदेत मांडण्यात आलेले होते.

Southern Railway Bharti 2024 | दक्षिण रेल्वे अंतर्गत 2438 रिक्त पदांची भरती सुरु; 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी

Southern Railway Bharti 2024

Southern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता दक्षिण रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती अप्रेंटिस या पदासाठी चालू झालेली आहे. या पदाच्या एकूण 2438 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार आता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 12 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Southern Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • पदसंख्या – 2438 जागा
  • वयोमर्यादा – 15 – 24 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ? | Southern Railway Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी तुम्ही पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 12 ऑगस्ट 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आता या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.