Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5825

माहेरी निघून आलेल्या पत्नीला नांदायला ये नाहीतर घटस्फोट दे म्हणणाऱ्या जावयाला बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

भांडण करून माहेरी गेलेल्या पत्नीस नांदन्यास येत नाहीस तर घटस्फोट दे असे सासरवाडीत जाऊन म्हणणाऱ्या जावयास पत्नीच्या नातेवाईकांकडून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी निखिल आप्पासाहेब कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशाल कांबळे, रामदास कांबळे, पत्नी दिपाली कांबळे आणि माणिक कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

निखिल कांबळे यांचा काही वर्षांपूर्वी दीपाली कांबळे हीच्याशी विवाह झाला होता. वारंवार या पती पत्नी मध्ये वादविवाद होत असल्याने पत्नी दीपाली नोव्हेंबर 2019 मध्ये आपल्या माहेरी निघून गेली होती. अनेक वेळा पत्नी दीपालीला घरी परत नेण्याचा निखिल याने प्रयत्न केला, मात्र ती पुन्हा नांदायला अली नाही. बुधवारी दुपारी तीन वाजता सदाशिव पेट्रोल पंपावर निखिल मोटरसायकल मध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेला असता, पत्नी दीपाली पेट्रोल साठी पंपावर अली होती. निखिलने पत्नीस मला तुझ्या बरोबर बोलायचे आहे. असे म्हंटले असता पत्नी बिनबोलता घरी निघून गेली. निखिल तिच्या पाठीमागे पत्नीच्या घरासमोर गेला. घरासमोर उभा राहून निखिल याने पत्नीस हाक दिली तो म्हणला, एकतर नांदन्यास येत नाहीस तर घटस्फोट दे असे म्हणल्यावर पत्नी दीपाली हिने निखिल यास शिवीगाळ केली. तर विशाल कांबळे आणि रामदास कांबळे या दोघानी काठीने निखिल यास बेदम मारहाण करून जखमी केले. असे निखिल कांबळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

संजयनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे नातेवाईक विशाल कांबळे, रामदास कांबळे, माणिक कांबळे आणि पत्नी दीपाली कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पती-पत्नीच्या भांडणात सासुरवाडीतील नातेवाईकांनी केलेला हस्तक्षेप भारी पडला असून या घटनेची पोलीस अधिक तपास करीत आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Video: शाहरूखच्या ‘बेताल’ या हॉरर सीरिजचा ट्रेलर लाँच, तुम्ही पहिलात का?

मुंबई । बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरूख खान नेटफ्लिक्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला एक नवी वेब सीरिज घेऊन आला आहे.’बेताल’ असं या सीरिजच नवा असून तिचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट कंपनीने या हॉरर आणि थ्रिलर सीरिज बनवली आहे. ही सीरिज २४ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना गुंतवणून ठेवणाऱ्या बेताल वेब सीरिजची कथा हॉरर आणि थ्रिलर या भयावह गोष्टींभोवती फिरताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

‘बेताल’मध्ये विनीत कुमार, अहाना कुमरा, सुचित्रा पिल्लई, जितेंद्र जोशी, मंजरी पुपला आणि सायना आनंद मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या सीरिजचं शुटींग खासकरून मुंबई, लोणावळा, खंडाळा या ठिकाणी करण्यात आलं आहे. दरम्यान, शाहरूख खानने आपल्या सीरिजचा ट्रेलर त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सीरिजचा ट्रेलर पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये, ‘राक्षसांसोबत युद्ध करायला तुम्ही करायला तुम्ही किती दूर जाल?’ असं लिहिलं आहे. त्याचप्रमाणे आमची ही दुसरी वेब सीरिज असून २४ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा देखील त्याने या वेळी केली. चला तर पाहुयात ‘बेताल’चा ट्रेलर….

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

येत्या १० दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली । देशभरातील सार्वजनिक वाहतुक सुरु करण्याबाबत एक महत्वाचा निर्णय केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. येत्या १० दिवसात देशभरातील सार्वजनिक वाहतूक सुरु होणार असल्याचं गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन लागू झाल्यापासून सार्वजनिक प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, बंद असलेली सार्वजनिक प्रवाशी वाहतूक सुरू करण्याबाबत गडकरी म्हणाले की, ”आता सार्वजनिक प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होईल. दुकानं देखील हळूहळू सुरु होत आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यासाठी काही गाईडलाईन बनवण्यावर विचार सुरु आहे. आमचा विभाग या गाईडलाईन्सचं पालन करेन,” असं देखील गडकरी यांनी सांगितलं.

दरम्यान, काल नितीन गडकरी यांनी बस आणि कार ऑपरेशन कॉन्फेडेरशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊनमुळे बस आणि कार चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांचे प्रश्न सोडविण्यासठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी या वेळी दिले होते. ” सार्वजनिक वाहतूक आणि महामार्ग खुले केल्यानंतर लोकांमध्ये आत्मविश्वास येईल असा अंदाज आहे. पण यासाठीही आधी नियमावली आखून देण्यात येईल आणि त्यानंतरच सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरू करण्यात येईल असं गडकरी म्हणाले होते.

राज्यांसोबत केंद्राच्या समन्वयाबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, ”राजकारण आपल्या जागी आणि आता आलेलं हे संकट आपल्या जागी आहे. हे संकट गंभीर आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि त्यानंतर भारताला महासत्ता बनवण्यासाठी कुठलेही राजकीय मतभेद नाहीत. आम्ही कुणीच सध्या राजकीय मतं व्यक्त करत नाहीत. मी महाराष्ट्रात आहे. दर दोन तीन दिवसांनी मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी बोलतो. माझ्या काही सूचना असतात त्या दोतो. पंतप्रधान मोदी देखील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद करत आहेत,” असं गडकरी यांनी सांगितलं.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ कार्यक्रमांमुळेच गुजरातमध्ये कोरोना फोफावला; काँग्रेसचा आरोप

अहमदाबाद । गेल्या फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, हा कार्यक्रम आता कोरोनामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरला, असा दावा गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी केला आहे. सध्या गुजरातमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ हजाराच्या पुढे गेली असून साडे तीनशेच्या वर लोकांचा कोरोनानाने मृत्यू झाला आहे. अशा वेळी या संपूर्ण परिस्थितीला ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम कारणीभूत असल्याचा दावा प्रदेश काँग्रेसने केला आहे.

“जागतिक आरोग्य संघटनेनं जानेवारीमध्येच करोनाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन त्याचवेळी आरोग्य संघटनेनं केलं होतं. मात्र, आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून राजकीय लाभासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्याला गुजरात सरकारनंही परवानगी दिली. या मोठ्या कार्यक्रमामुळे हजारो परदेशी नागरिक अहमदाबादला आले आणि त्यामुळे करोना पसरला. त्यामुळे यासंदर्भात आम्ही गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत” असं प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी म्हटलं.

दरम्यान, कोरोनाचा महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातला मोठा फटका बसला आहे. गुजरातमध्ये २० मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. विशेष म्हणजे नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाला महिना झाल्यानंतर हा रुग्ण आढळून आला होता. सध्या गुजरातमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६ हजार २४५ इतकी आहे. तर ३६८ जणांचे संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘मी पंतप्रधान असतो तर IFSC केंद्र बिहार, उत्तर प्रदेशात नेलं असतं’; संजय राऊत असं का? म्हणाले

मुंबई । आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विषयावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मी पंतप्रधान असतो तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) गुजरातऐवजी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालसारख्या राज्यात नेलं असत. असं म्हणण्यामागे संजय राऊत यांनी त्यामागचे कारण सुद्धा या मुलाखतीत सांगितलं.

संजय राऊत पंतप्रधान मोदींच्या हेतुंवर प्रश्न उपस्थित करत म्हणाले कि, ”पंतप्रधान हे देशाचे असतात. त्यांना गृहराज्य असं काही नसतं. पक्षपाताची शंकाही येऊ नये असं त्यांनी वागणं अपेक्षित असतं. मी पंतप्रधान असतो तर वित्तीय सेवा केंद्र बिहार, उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालसारख्या गरीब राज्यांमध्ये नेलं असतं. किमान ती राज्ये तरी जगाच्या नकाशावर आली असती. मोदींना हे करता आलं असतं,’ असं राऊत यांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला विरोध करताना म्हटलं.

भारतातील मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी आपलं मत मांडलं. ‘भाजपशी संलग्न संस्था, संघटना ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यातून धार्मिक अराजक निर्माण होऊ शकतं. देशात अशांतता आणि अस्थिरता माजू शकते. अशानं एखाद्याचं पंतप्रधानपद, मुख्यमंत्रिपद राहील, पण देश राहणार नाही. याचं भान ठेवलं पाहिजे,’ असंही ते म्हणाले. ‘मुस्लिमांमधील काही लोक देशविघातक काम करतात. तसे इतरही आहेत. पण त्यासाठी आपल्याकडं कठोर कायदे आहेत. नक्षलवादाविरुद्धही कायदे आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. हे कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी मोदींची आहे. कोणाला चिरडून राज्य करता येत नाही,’ असं ते म्हणाले.

यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबरोबरच भाजपच्या कारभारावर परखड भाष्य केलं.’देशात गृहयुद्ध सुरू झालंय. ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते भयंकर आहे. प्रत्येक मुद्द्यावर कठोरपणे बोलत असल्यामुळं कदाचित उद्या मलाही अर्बन नक्षलवादी ठरवलं जाईल,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सर्व राज्यांनी दारू विक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’ चा विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | सर्व राज्यांनी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत कोणताही संपर्क न वाढवता दारूची ‘होम डिलिव्हरी’ करण्याचा विचार करावा,” अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्यांना केल्या आहेत. सरकारने लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ दिली. तसेच दारू विक्रीला परवानगी दिली. मात्र, दारुविक्रीच्या आदेशात स्पष्टता नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. त्यात या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार अनेक राज्यांनी दारुविक्रीला परवानगी दिली. आणि सर्व ठिकाणी दारूची दुकाने सुरू झाली. दारूची दुकाने सुरू झाल्याने तळीराम खुश झाले खरे पण कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टन्स ते पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने वरील सूचना दिल्या आहेत.

3 मे नंतर लॉकडाउन वाढवताना केंद्र सरकारने काही बाबतीत शिथिलता दिली. त्यामुळे अनेक राज्यांनी जीवनावश्य असलेल्या व जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकानं खुली करण्यास परवानगी दिली होती. गेल्या 2 महिण्यापासून दारूची दुकाने बंद होती. त्यामुळं सरकारचा मोठा महसूल बुडाला आहे. या गोष्टीचा विचार करून अनेक राज्यांनी दारू विक्रीला सुरुवात केली. मात्र लोक दारू खरेदीसाठी मोठी गर्दी करत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे न्यायालयाने दारूची होम डिलिव्हरी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही; संजय राऊतांनी हाणला भाजपाला टोला

मुंबई । ‘मी स्वत: प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वाचा विचार अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं मांडत आलोय. पण आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही. देश तुटावा, आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावा. व्होटबँका निर्माण कराव्यात हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता,’ असं खासदार संजय राऊत म्हणाले.एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबरोबरच भाजपच्या कारभारावर परखड भाष्य केलं. ‘देशात गृहयुद्ध सुरू झालंय. ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते भयंकर आहे. प्रत्येक मुद्द्यावर कठोरपणे बोलत असल्यामुळं कदाचित उद्या मलाही अर्बन नक्षलवादी ठरवलं जाईल,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

भारतातील मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याच्या प्रश्नावर त्यांनी आपलं मत मांडलं. ‘भाजपशी संलग्न संस्था, संघटना ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यातून धार्मिक अराजक निर्माण होऊ शकतं. देशात अशांतता आणि अस्थिरता माजू शकते. अशानं एखाद्याचं पंतप्रधानपद, मुख्यमंत्रिपद राहील, पण देश राहणार नाही. याचं भान ठेवलं पाहिजे,’ असंही ते म्हणाले.

‘भारतातील मुस्लिमांची संख्या मोठी आहे. त्यांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही. मात्र, आता ठरवून आपण फाळणीच्या दिशेनं चाललो आहोत. हे असंच सुरू राहिलं तर देश कायमचा तुटेल,’ अशी भीती शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ‘मुस्लिमांमधील काही लोक देशविघातक काम करतात. तसे इतरही आहेत. पण त्यासाठी आपल्याकडं कठोर कायदे आहेत. नक्षलवादाविरुद्धही कायदे आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. हे कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी मोदींची आहे. कोणाला चिरडून राज्य करता येत नाही,’ असा सल्लाही संजय राऊत यांनी भाजप नैतृत्वाला दिला.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”. 

‘IPL’साठी यंदाची टी-२० विश्वकप स्पर्धा रद्द होणे गरजेचे; ‘हे’ आहे कारण

मुंबई । देशभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा १३ वा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे. यासाठीच स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. त्यानुसार यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास आयपीएल स्पर्धेचे वर्षाअखेरीस आयोजन करणं सहज शक्य असल्याचे बीसीसीआय अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

तर.. बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करणार
कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसीलाही याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मध्यंतरी प्रेक्षकांविना विश्वचषक स्पर्धा खेळवण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. मात्र आयसीसीच्या बहुतांश सदस्यांचा याला विरोध असल्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलली जाईल असे संकेत मिळत आहेत. असं झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करु शकतं. याविषयीवर बीसीसीआय अधिकाऱ्यांची टेलिकॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. विश्वचषकातला एक-दुसरा सामना रिकाम्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो, मात्र संपूर्ण स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवणं शक्य नसल्याचं मत एका बीसीसीआय अधिकाऱ्याने व्यक्त केलं. “जर या कालावधीत आयपीएल आयोजनाची संधी मिळाली तर आम्ही नक्की प्रयत्न करु, पण सध्या यावर आम्ही ठोस काहीही सांगू शकणार नाही.” “सध्या बीसीसीआय कोणत्याही गोष्टीबद्दल ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पण खेळाडू, प्रेक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल कोणताही धाडसी निर्णय घेण्यास आम्ही तयार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल काय निर्णय घेतात हे आधी पहावं लागेल, त्यानंतर आयपीएलच्या आयोजनाबद्दल विचार करता येईल. सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनाबद्दल निर्णय घेईल”, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एक्स्प्रेसला माहिती दिली.

टी-२० विश्वचषक स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवण्यास अनेक देशांचा नकार
टी-२० विश्वचषक स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवण्यास अनेक देशांचा नकार आहे, त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यास आयपीएल आयोजनाची संधी मिळेल. परदेशी खेळाडूंचा सहभाग हा त्यावेळी फारसा मोठा मुद्दा असेल असं वाटत नसल्याचं मत बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. परदेशी खेळाडूंना लिलावात मिळणाऱ्या रकमेतली १० टक्के रक्कम ही आपल्या बोर्डाला द्यावी लागते. सध्या करोनामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता सर्व क्रिकेट बोर्ड बीसीसीायशी चांगलं नात ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत, बीसीसीआय अधिकाऱ्याने माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भाजपने तिकीट नाकारल्यावर निष्ठावंत खडसे म्हणाले, ‘पक्षाला शिव्या घालणाऱ्यांना मान दिला गेला,पण..

जळगाव । विधान परिषदेची उमेदवारी नाकारली गेल्यामुळं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी ४० ते ४२ वर्षे एकनिष्ठ राहून भाजपचं काम करतोय. पक्ष वाढवताना अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. चढउतार पाहिले. आतातरी मला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचं काम करणाऱ्यांना संधी द्यायला हवी होती. तसं झालं असतं तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या घालणाऱ्यांना मान दिला गेला. भाजप कोणत्या दिशेनं चाललाय, यावर आता चिंतन करण्याची गरज आहे,’ अशी खंत खडसे यांनी आज व्यक्त केली.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यापैकी चार जागा निवडून आणण्याची संधी भाजपला आहे. चारही जागांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, शेवटच्या क्षणी चौघांचाही पत्ता कापून पक्षानं नव्या चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘परिषदेच्या उमेदवारीसाठी माझ्यासह पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांचं नाव दिल्लीला पाठवण्यात आलं असं मला सांगण्यात आलं होतं. पण आता वेगळीच नावं समोर आली आहेत. त्यात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आहेत. याच पडळकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात प्रचार केला होता. मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. जवळपास पक्षाला शिव्याच घातल्या होत्या. ‘मोदी गो बॅक’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीत अनेक वर्षे असलेल्या मोहिते-पाटलांना संधी मिळाली आहे,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊन ३१ मेपर्यंत लांबणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई । राज्यातील कोप्रादुर्भाव वाढतच असून तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार असल्याने ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल गुरुवारी राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना राज्यातील करोना परिस्थितीची माहिती दिली. तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनाही ऐकून घेतल्या. या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यातील लॉकडाऊन १७ मेनंतर वाढवून तो ३१ मेपर्यंत ठेवण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमधील सर्व लोकांची तपासणी करण्यात यावी आणि करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवून रस्त्यावर फिरणाऱ्यांना अटकाव करावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचं सूतोवाच केल्याचं बोललं जातंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ३१ मेपर्यंत राज्यातील सर्व जिल्हे ग्रीन झोनमध्ये आणण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, असं सांगण्यात येतं. दरम्यान, आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्री ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे ते काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”