Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5824

उपासमारीने बेशुद्ध पडली होती महिला…कराड पोलिसांनी जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

तीन-चार दिवस उपाशीपोटी कराडमध्ये फिरणाऱ्या एका वृद्ध महिलेला कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार मारूती चव्हाण आणि सहकारी पोलिसांनी आज तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. विमल बाबासाहेब आटोळे (वय ६५, रा. कोळे, ता. कराड), असे त्या महिलेचे नाव आहे. लॉकडाऊन मध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात कराड पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीच्या दर्शनाने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

तीन-चार दिवसांपासून एक वृद्ध महिला कराडमध्ये फिरत होती. त्यांचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे जाणवत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील हे पेट्रोलिंग करत असताना ही महिला दिसली होती. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून शहरात महिला एकटीच फिरताना दिसल्यास कळविण्यास सांगितले होते.

आज सकाळी विजय दिवस परिसरात बंदोबस्तावर असणाऱ्या हवालदार मारूती चव्हाण यांना ही महिला साईबाबा मंदीर परिसरात बेशुध्दावस्थेत आढळून आली. उपासमार झाल्यामुळे तिच्या अंगात त्राण नव्हते. हवालदार चव्हाण यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना कळविली. त्यांनी पोलिसांना सांगून कराड, सैदापूर परिसरात महिलेची माहिती स्पीकरवरून प्रसारीत केली. त्या आधारे त्या महिलेची सैदापूर बेघर वसाहतीत राहणारी मुलगी आणि नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला.

हवालदार चव्हाण यांनी त्या महिलेच्या तोंडावर पाणी मारून उठवले. बिस्किटे आणि पोलिसांसाठी आलेला नाष्टा खाऊ घातला. त्यामुळे काही वेळाने महिलेच्या अंगात उठून चालण्याइतपत त्राण आले. सदर महिलेची मुलगी आणि नातेवाईक आल्यानंतर त्या महिलेस उपजिल्हा रूग्णालयात नेऊन तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर नातेवाईक त्यांना घरी घेऊन गेले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/238748824014158/

प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी; इक्बाल चहल सूत्र घेणार हाती

मुंबई । मुंबईत कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच राज्य सरकारने मुंबई पालिकेचं व्यवस्थापन सांभाळत असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. मुंबईत कोरोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यात पहिला दणका मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना देण्यात आला आहे. परदेशी यांच्या जागी मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्र इक्बाल चहल हाती घेणार आहेत.

प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे तर नगरविकास विभागाचे विद्यमान प्रधान सचिव असलेले इक्बाल चहल हे आता मुंबई पालिका प्रशासनाचे प्रमुख असणार आहेत. मुंबईत कोरोनाचे संकट गडद होत असताना स्थिती हाताळण्यात प्रशासन कमी पडत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत मुंबईत जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने उघडण्याबाबतचा आदेश काढताना पालिका आयुक्तस्तरावर गोंधळ पाहायला मिळाला. त्याचाही फटका परदेशी यांना बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई पालिका प्रशासनात आणखीही मोठे बदल करताना ठाणे पालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांची मुंबई पालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे पालिकेचे आतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची मदत आणि पुनर्वसन सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘प्रोपगंडा’ – लोकांच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं पुस्तक

पुस्तकांच्या दुनियेत । प्रविण दाभोळकर

रूईया महाविद्यालयात रवि आमले सरांचं प्रोपगंडा या विषयावरचं व्याख्यान ऐकलं होतं. त्यानंतर याविषयाबद्दलची उत्सुकता वाढली होती. लाॅकडाऊनच्या ४ दिवस आधी विषय पुन्हा आठवला आणि सहज म्हणून सरांची वाॅल पाहीली. तर या विषयावर त्यांनी लिहिलेलं एक पुस्तकं असल्याचं कळालं. लगेच त्या लिंकवर जाऊन मागवलं. मागच्या काही दिवसात हे वाचून संपलं. खूप चांगलं पुस्तकं वाचल्याचं समाधान मिळालं.

टीव्ही, दैनिकं, सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी गोष्ट आपल्या मनावर कशी बिंबवली जाते? कालांतराने ती गोष्ट आपल्याला खरी कशी वाटू लागते? एखाद्या वस्तूचा खप अचानक कसा वाढतो? एखादा नेता अचानक लोकप्रिय तर एखादा नेता अचानक तुच्छ कसा काय वाटू लागतो? तर या सगळ्यामागे असलेलं अदृश्य सरकार काम करतं असतं. प्रोपगंडा काम करत असतो. जो जनसामान्यांचा कलं कोणत्या दिशेने आहे? याचा विचार करतो आणि त्यानुसार पाऊलं उचलतो.

प्रोपगंडा करताना माहिती जाणिवपूर्वक पेरली जाते. महत्वाची माहिती दाबून ठेवणे, आपल्याला हवी तितकीचं माहीती देणे आणि तिचा हवा तसा वापर करणे हे प्रोपगंडाकार करत असतात. अनेकदा टीबी, कॅन्सर सारख्या समाजपयोगी जाहीराती पटवून देण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. पहिल्या महायुद्धात युद्धज्वर वाढवण्यासाठी ब्रिटनने प्रपोगंडाचा वापर सफाईदारपणे केल्याचा पाहायला मिळतो. नंतर हिटलर तर याचं विद्यापीठंच होतं. प्रचारतंत्राचा वापर करून एखाद्याची प्रतिमा उच्च स्तरावर नेऊन ठेवायची आणि त्याला विरोध करणारे हे कसे देशद्रोही आहेत हे लोकांच्या मनात बिंबवण्याचे काम या माध्यमातून होत असे.

पुस्तकवेड्या लोकांसाठी बी ह्युमनिस्ट वेबसाईट घेऊन आलीय पुस्तकांच्या अनोख्या कल्पना. माहिती घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://behumanist.com/?ref=hellomaha

पहिल्या महायुद्धापासून ते भारतातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये प्रोपगंडाचा कसा वापर झाला ? हे या पुस्तकात वाचायला मिळेल. राजकिय मंडळी जसा याचा वापर करतात तसे जाहीरातदार ही आपल्या वस्तूंची विक्री वाढण्यासाठी हे तंत्र वापरतात. “अच्छे दिन”, “अब की बार मोदी सरकार” ही संकल्पना कशी सुचली? राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती? या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला? आण्णा हजारेंचं आंदोलन देशव्यापी कसं झालं? त्यानंतर आण्णा प्रसिद्धीमाध्यमांपासून कसे दूर फेकले गेले? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह या पुस्तकात केलाय.

मीठ तेच पण “देश का नमक” टॅग जोडून त्याला देश भावनेशी कसं जोडलं जातं. डेअरी मिल्कमध्ये आळ्या सापडल्यानंतर त्यांच्या ३० टक्के विक्रीवर परिणाम झाला. पण मग नव्या पॅकींगमध्ये येऊन डेअरी मिल्क पुन्हा सर्वांना आवडू लागली. दिवाळीत मिठाईची जागा कॅडबरीने व्यापून टाकली. या आणि अशा हजारो परिणामकारक जाहीरातींमागे काय विचार असतो. हे या पुस्तकातून वाचता येणार आहे. पुस्तकात एकूण ४० प्रकरणं आहेत. पहिल्या ३० प्रकरणात पहिल्या महायुद्धात प्रोपगंडाशी संबंधित महत्वाची उदाहणं, हिटलरने करून घेतलेला प्रोपगंडाचा वापर, प्रोपगंडाचे प्रकार, त्याला बळ देणाऱ्या इतर घटना, पीआर तंत्र याबद्दल वाचायला मिळतं. त्यानंतरची १० प्रकरणं ही भारतीय राजकारण आणि जाहिरातीशी संबंधित आहेत. वाचून संग्रही ठेवण्यासारखंच हे पुस्तक आहे.

behumanist.com या साईटवर हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.
प्रोपगंडा
लेखक – रवि आमले
मूल्य :- ४०० रूपये

पीएम केअर्स फंडचे पैसे खर्च झाले तरी कुठं? हे जनतेला कळू द्या!- राहुल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पीएम केअर्स फंड बनवला होता. कोरोना संकटात पीएम केअर्स फंड अंतर्गत जमा केलेला निधी कुठे खर्च झाला? याची माहिती जनतेला कळायला हवी अशी मागणी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. हा पैसा कुठे, कसा खर्च झाला याचे तपशील मोदी सरकारने जनतेला द्यायला हवे असे राहुल यांनी म्हटलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पीएम केअर फंडच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले.

पीएम केअर्स फंडचे ऑडीट होणं गरजेचं आहे. याअंतर्गत किती निधी आला? यातील किती निधी खर्च झाला ? याची माहिती जनतेला कळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आरोग्य ‘सेतू एप’चा सोर्स खुला करण्याबद्दलही ते म्हणाले. याचसोबत केंद्र सरकारने लॉकडाऊननंतर देश कसा सुरु करायचा, याची नीट आखणी केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. राहुल गांधी यांनी म्हटले की, लॉकडाऊन म्हणजे एखादा ऑन-ऑफ स्विच नव्हे. त्यामुळे आता लॉकडाऊनंतर देशात काय करायचे, याचे नियोजन सरकारने केले पाहिजे. मुख्य गोष्ट म्हणजे सरकारने आपल्या कारभारात पारदर्शकता आणायला पाहिजे. लोकांना सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगायला हव्यात. तसेच निर्णय घेताना केंद्रीकरण टाळले पाहिजे, असे राहुल यांनी सांगितले.

मोदी सरकारने सर्वात आधी लॉकडाऊनची मोठी झळ बसलेल्या लोकांना तात्काळ आर्थिक मदत पुरविली पाहिजे. अन्यथा आपण काहीच करु शकणार नाही. काँग्रेसने आखलेल्या न्याय योजनेप्रमाणे या लोकांच्या बँक खात्यांमध्ये तात्काळ पैसे जमा केले पाहिजेत. स्थलांतरित कामगार, गरीब आणि लघुद्योगांना आजच आर्थिक मदत केली पाहिजे. नंतर वेळ निघून गेल्यावर मदत करून काही फायदा होणार नाही. कारण, या उद्योगांना आर्थिक मदत न केल्यास देशात बेरोजगारीची त्सुनामी येईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशभरात २४ तासात कोरोनाचे ३ हजार ३९० नवे रुग्ण आढळले, रुग्णसंख्या ५६ हजार पार

नवी दिल्ली । कोरोना प्रादुर्भावा संदर्भातील मागील २४ तासाची आकडेवारी आज पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. या आकडेवारीनुसार मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ३ हजार ३९० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसोबत देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही ५६ हजार ३४२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासातच १ हजार ३७३ रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत १६ हजार ५४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

चिंताजनक बाब म्हणजे आजही कोरोनाच्या मृत्यू संख्येत वाढ कमी झाली नसल्याचे दिसून आलं आहे. मागील २४ तासात देशभरात कोरोनाची लागण होऊन १०३ जणांचा मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत देशात कोरोनाबाधित मृतांची संख्या १ हजार ८८६ वर पोहोचलीआहे. देशात सापडणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी प्रत्येक ३ रुग्णांमधला एक रुग्ण बरा होतो आहे असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.

देशभरात असे २९ जिल्हे जिथे मागील २१ दिवसात एकही करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ४२ जिल्हे असे आहेत जिथे २८ दिवसात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. तर ४६ जिल्हे असे आहेत ज्यामध्ये मागील सात दिवसांपासून करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असंही अग्रवाल यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कराड येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह; 134 जण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथील एका निकट सहवासिताचा अहवाल कोरोना बाधित (कोविड-19 ) आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 83, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 145, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 असे एकूण 244 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

134 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 26, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 72, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 15 व वाई येथे 21 असे एकूण 134 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 115 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 93, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 20, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पालकांना दिलासा; शाळांना ‘फी’ वाढ न करण्याचे राज्य शासनाचे आदेश

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं आर्थिक संकट निर्माण झालेले आहेत. अशा वेळी राज्य शासनाने पालकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची सक्ती करीत आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडे अनेक शाळांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. या तक्रारांची दखल घेत शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करुन नये, असे निर्देश दिले आहेत.

या निर्देशांमध्ये पालकांच्या सोईसाठी शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ या काळातील शिल्लक फी एकाच वेळी न घेता मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने जमा करण्याचा पर्याय पालकांना उपलब्ध करुन द्यावा असं शाळांना सांगितलं आहे. तसेच येणार शैक्षणिक वर्ष २०२०-२१साठी कोणतीही फी वाढ करु नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासोबतच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही तसेच त्यासाठीचा खर्च कमी होणार असेल तर पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये (ईपीटीए) ठराव करुन त्याप्रमाणे योग्य प्रमाणात फी कमी करावी अशी सूचना राज्य शालेय शिक्षण विभागाने शाळांना केली आहे.

लॉकडाउनच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाइन फी भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा असही जारी केलेल्या निर्देशात सूचना केली गेली आहे. दरम्यान, वरील आदेश सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या व पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असतील, असं राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागानं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या रखडलेल्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. आज शुक्रवारी ८ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी या परीक्षांच्या वेळापत्रबाबत माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनं  CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबतची घोषणा करणारा डॉ. पोखरियाल यांचा एक विडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

यात डॉ. पोखरियाल यांनी CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या रखडलेल्या परीक्षा येत्या जुलै महिन्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. येत्या १ जुलै ते १५ जुलै यादरम्यान ह्या परीक्षा CBSE बोर्डाकडून घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी मिळालेला वेळेचा फायदा घेत परीक्षेची चांगली तयारी करण्याचे आवाहन डॉ. पोखरियाल यांनी केलं आहे.

गेल्या मंगळवारी, NEET आणि IIT-JEE (Main) परीक्षांची घोषणा करताना CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करण्याचं डॉ. पोखरियाल यांनी म्हटलं होत. दरम्यान, येत्या जुलै महिन्याच्या १८, २०, २१, २२ आणि २३ तारखांना IIT-JEE Main परीक्षा घेण्यात येणार आहेत. तर IIT-JEE Advance परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. याचबरोबर NEETची परीक्षा २६ जुलैला घेण्यात येणार असल्याचे डॉ. पोखरियाल यांनी जाहीर केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

लॉकडाऊन स्पेशल | खमंग, खुसखुशीत – सातारी बाकरवडी

पोटासाठी सर्वकाही | बाकरवडी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्रातील विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीच्या बाकरवड्या प्रसिद्ध आहेत. तिखट-गोड स्वरुपाचा हा पदार्थ एकदा खायला सुरुवात केली की संपेपर्यंत सोडायची इच्छाच होत नाही बघा. पश्चिम महाराष्ट्रातील चितळेंची बाकरवडी तुम्हाला राज्याबाहेरील विमानतळांवर, इतर दुकानांमध्येही पहायला मिळते. सातारकर मेघना देशमुख यांनीही अशीच सातारी पद्धतीची बाकरवडी खवय्यांसाठी बनवली आहे. त्यांनी बनवलेली खाऊनसुद्धा झाली बरं का..!! आता तुमची वेळ – बनवायची. चला तर मग, लागा तयारीला..

कणकेसाठी साहित्य :-
1 वाटी मैदा
2-3 चमचे बेसन
मीठ, हळद व चिमूटभर हिंग
2 मोठे चमचे तेल

सारणासाठी साहित्य :-
1 वाटी बारीक चिरलेले खोबरे
1 चमचा पांढरे तीळ
1 चमचा बडीशेप
1 चमचा खसखस
1 चमचा धने
1 चमचा जिरे
चिमूटभर मीठ, हिंग
1 चमचा लाल तिखट
1 चमचा पिठीसाखर

कृती (कणकेसाठी) :-
मैदा व बेसन एकत्र करा मीठ, हिंग व हळद घाला . 2 चमचे कडक तेलाचे मोहन घालुन ते एकजीव करून घ्या. 1 वाटी पाणी घालून घट्ट मळून घ्या. जास्त सैल करू नये. 20 मिनिट कणिक झाकून ठेवा.

सारणासाठी :-
सारणाचे सर्व साहित्य एकत्र मिक्सरमध्ये बारीक करा.(साहित्य भाजुन घेऊ नये नाहीतर ते तेलामध्ये जास्त करपते)

बाकरवडी करण्याची कृती :-
कणकेचे व सारणाचे समान भाग करून घ्या. कणकेची लांबट किंवा गोल आकाराची पोळी लाटून घ्या (पीठ लावू नये). पोळीवर चिंचेचा कोळ पसरून लावा. त्यावर सारणाचा 1 भाग पसारा ते पोळीला चिकटेल अशा पद्धतीने समान पसरून दाबून घ्या. आता पोळीच्या कडांना पाणी लावून त्या पोळीची सुरळी (रोल) बनवा.
1-1 इंचाच्या गोल वड्या कापून घ्या. या वड्या मध्यम आचेवर तळून घ्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

मेघना देशमुख या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात जैवतंत्रज्ञान विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांना पाककलेची, रांगोळीची आणि फॅशन क्षेत्राची विशेष आवड आहे. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 8698163195

धक्कादायक! घरी फोन करण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मजुराकडून मजुराचा खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी गावच्या हद्दीत दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कत्राटदाराकडे काम करणाऱ्या परप्रांतीय मजूराचा घराकडे फोन करण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या कारणावरून लोंखडी रॉडने मारहाण करून व गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कवठेमहांकाळच्या पोलीसांनी आरोपीस गुरूवारी अटक केली आहे. सिंकदर हरीप्पा गंजू असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. तर सोनुकुमार शंभूसिंग असे आरोपीचे नांव आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मिरज पंढरपूर मार्गावरील लांडगेवाडी गावच्या पूर्वेला तानाजी व संभाजी कदम यांच्या शेताजवळ बुधवारी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी सोनुकुमार व मयत सिंकदर हे दोघे गेले होते. आरोपीने मयत सिंकदर यांस घरी फोन करावयाचा आहे म्हणून मोबाईल मागितला. परंतु सिंकदरने मोबाईल दिला नाही. याचा राग आल्याने आरोपी सोनुकुमार यांने लोखंडी रॉडने तोंडावर व बरगडीवर मारहान केली. व त्यानंतर आरोपी सोनुकुमारने सिंकदरचा गळा दाबला असल्याचे शवविच्छेदन नंतर दिसून आले असल्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी सांगितले.

यातील मयत सिंकदर गंजू हा त्यावेळी दारूच्या नशेत होता. गुरूवारी सकाळी श्र्वानपथक दाखल झाले. श्र्वानने आरोपी रहात असलेल्या खोलीपर्यत मार्ग दाखविला आहे. यातील मयत सिंकदर गंजू हा परप्रांतीय मजूर दिलीप बिल्डकॉन कंपनीचे कंत्राटदार श्री नागराज यांच्याकडे काम करीत होता.